नागपूर : समृद्धी महामार्गावर सर्वाधिक अपघात सकाळी ६ ते दुपारी १२ पर्यंत तर सर्वाधिक अपघाती मृत्यू हे रात्री १२ ते ३ च्या दरम्यान नोंदवण्यात आले आहे. ११ डिसेंबर २०२२ ते ३१ डिसेंबर २०२३ पर्यंतच्या कालावधीमधील अपघातांबाबत महामार्ग (सुरक्षा) पोलिसांच्या अहवालातून ही माहिती पुढे आली आहे. पंतप्रधानांनी ११ डिसेंबर २०२२ रोजी समृद्धी महामार्गाचे लोकार्पण केले. याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा महामार्ग सर्वात सुरक्षित असल्याचा दावा केला होता. परंतु, उद्घाटनापासून ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत समृद्धी महामार्गावर एकूण ७२९ अपघात झाले. त्यात १०१ नागरिकांचा मृत्यू झाला. तर २६२ जण गंभीर तर ४८६ जण किरकोळ जखमी झाले. अपघातांचे विश्लेषण…
Author: saimat
मुंबई ः प्रतिनिधी शिवसेनेत आणि राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर आता भाजपा ठाकरे गट आणि शरद पवार गटाकडे राहिलेल्या नेत्यांना आपल्या गळाला लावण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यावरून संजय राऊत आणि त्यांचे भाऊ सुनिल राऊत यांनी मोठा दावा केला आहे. मलाही १०० कोटींची ऑफर असल्याचा दावा सुनिल राऊतांनी केला आहे. त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, या व्हिडीओत त्यांनी असे म्हटले आहे. “संजय राऊतांनीही विचार केला असता, भाजपासमोर गुडघे टेकले असते तर ते साडेचार महिने तुरुंगात गेले नसते. मंत्री झाले असते. पण संजय राऊत डमगमला नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्यावर त्यांची निष्ठा होती. पक्षासाठी, संघटनेसाठी त्यांनी जे केलं…
नागपूर : महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ मधील पदसंख्येसंदर्भातील शुद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. प्रस्तुत परीक्षेमधून एकूण ८१७० ऐवजी ८२५६ पदांची भरती करण्यात येईल. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ३० एप्रिल, २०२३ रोजी आयोजित महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट- क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ (जाहिरात क्रमांक ००१/२०२३) करीता दिनांक २० जानेवारी, २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये तसेच दिनांक २८ जून, २०२३, ७ जुलै, २०२३ व दिनांक ८ ऑगस्ट, २०२३ रोजीच्या शुद्धिपत्रकानुसार भरावयाच्या एकूण ८१७० पदांचा समावेश करण्यात आला होता. दिनांक ८ ऑगस्ट, २०२३ रोजीचे शुद्धिपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्यानंतर शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण…
सातारा : पुढच्या पिढीचा विचार करता महाराष्ट्रात ना.अजित पवार यांच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. एकविसाव्या शतकात अजितदादा हेच महाराष्ट्राला प्रमुख व सक्षम राज्य म्हणून विकास करू शकतील. त्यासाठी अजित पवार यांना योग्य वेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करायचे आहे, असे प्रतिपादन आ. रामराजे नाईक – निंबाळकर यांनी केले. दहिवडी (ता. माण) येथे आयोजित कार्यकर्ता संवाद बैठकीत ते बोलत होते. यावेळी माजी जि.प. अध्यक्ष सुभाष नरळे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, सुरेंद्र गुदगे, नंदकुमार मोरे, माजी सभापती संदीप मांडवे आदी उपस्थित होते. आ. रामराजे म्हणाले की, खा. शरद पवार यांनी देशात, राज्यात विकासाचे राजकारण केले व तेच कार्यकर्त्यांना शिकवले. भविष्यातील विकासासाठी आम्हाला युती सरकारमध्ये…
फैजपूर : प्रतिनिधी येथील जे.टी.महाजन कॉलेज ऑफ इंजिनियरिंग येथे प्रथम वर्ष प्रवेशित इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणेरे यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ‘इंडक्शन प्रोग्राम’ आयोजित केला होता. यादरम्यान वेगवेगळ्या विषयांवर व्याख्यात्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर. डी.पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महाविद्यालयाच्या विविध प्रयोगशाळा तसेच सुविधांची माहिती दिली. महाविद्यालयाचे ॲकेडेमिक डीन डॉ.पी.एम.महाजन यांनी विद्यार्थ्यांना विविध शाखांच्या अभ्यासक्रमाविषयी तसेच अभ्यासाच्या नियोजनाविषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर डॉ.के.जी.पाटील यांनी प्रथम वर्षाला असलेला अभ्यासक्रम याविषयी सविस्तर माहिती दिली. त्यानंतर जळगाव येथील “गती फाउंडेशनचे” देवदत्त गोखले, रश्मी गोखले यांनी विद्यार्थ्यांना “कम्युनिकेशन स्किल” विषयावर मार्गदर्शन केले. पुढील सत्रात धनाजी नाना महाविद्यालयातील इंग्रजी विभागाचे प्रमुख डॉ.जगदीश…
फैजपूर : प्रतिनिधी येथील सतपंथ चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आयोजित रक्तदान शिबिरात सतपंथ संस्थानचे गादीपती महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी स्वतः रक्तदान करून अवतरण दिन साजरा केला. सुरत येथील राजूभाऊ राणे यांच्या तर्फे ४५ गुलाब पुष्पहार अर्पण करून मोतीचूर लाडूची तुला करण्यात आली. रक्तदान शिबिरात ५१ रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. प्रत्येकाने आपला वाढदिवस साजरा करताना राष्ट्रीय कार्य तसेच समाजाभिमुख उपक्रम राबवून वाढदिवस साजरे करावेत, असा संदेश त्यांनी दिला. रक्त संकलनाचे कार्य संजीवनी ब्लड सेंटर, फैजपूर यांचे संचालक नितीन इंगळे व रक्तपेढी समन्वयक नेमचंद बऱ्हाटे यांच्या संपूर्ण टीमसह सकाळी नऊ वाजेपासून तर रात्री नऊ वाजेपर्यंत रक्त संकलनाचे कार्य केले. दिवसभर परमपूज्य महाराजांना शुभेच्छा…
मुक्ताईनगर : प्रतिनिधी शहरात २३ रोजी सायंकाळी साडेआठ वाजेच्या दरम्यान मुक्ताईनगर येथील बोदवड चौफुलीवर पी.एस.आय.बोरकर आणि सोबत असलेले कर्मचारी यांनी सिनेस्टाईलप्रमाणे जामनेरवरून येणारी इर्टिका गाडी अडवून ज्या दरोडेखोरांना ताब्यात घेतले. त्याप्रमाणे त्या गाडीत आठ ते दहा लाख रुपयाची रक्कम असलेले गाठोडे होते, अशी नागरिक चर्चा करत आहे. ज्या हॉटेलवर हा दरोडा पडला त्या हॉटेलवर कायमस्वरूपी क्लब चालविण्याचे चर्चिले जात आहे. हॉटेल मालक जामनेर येथील विशिष्ट राजकीय नेत्यांचे जवळचे असल्यामुळे गाठोडे दाबण्यात तर आले नाही ना? की त्याची प्रशासकीय ‘लेव्हललाच’ विल्हेवाट लावली असेल, अशी चर्चा सुज्ञ नागरिक करत आहे. या टवाळखोऱ्यांनी जळगाव जिल्ह्यात विशिष्ट क्लबवरच दरोडा टाकल्याचे चर्चिले जात आहे. सावदा,…
फैजपूर : प्रतिनिधी येथून जवळील पाडळसे येथे भोई समाजासाठी विविध सामाजिक धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी सामाजिक सभागृहाची मागणी पुढे येत होती. त्या अनुषंगाने गावातील भोई समाजाच्या युवकांनी पाडळसे ग्रामपंचायतीकडे जागा मागणी केली होती. यासाठी पाडळसे ग्रामपंचायत आवारात पार पडलेल्या ग्रामसभेत जागा मागणीचा ठराव मंजूर करण्यात आला. गावापासून जवळील गट नंबर १२३४ मध्ये भोई समाज सामाजिक सभागृह बांधण्याचे प्रस्तावित असल्याने त्या जागेवर साफसफाई करण्याचे काम पाडळसे येथील सरपंच पती ॲड. सुरज पाटील यांच्या हस्ते श्रीफळ फोडून सुरू करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य तुषार भोई, उपसरपंच अलका सोनवणे, पूनम पाटील, पांडुरंग कोळी, मनोज पाटील, माजी ग्रा.पं. सदस्य प्रकाश भोई, सुरज कोळी, दिलीप…
बोदवड : प्रतिनिधी तालुक्यातील नाडगाव येथील रेल्वे उड्डाणपुलाची आ.एकनाथराव खडसे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह पाहणी केली. आ.एकनाथराव खडसे यांनी पुलाची पाहणी करून कामाच्या निकृष्ठ दर्जाबाबत संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारून धारेवर धरले. याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या ॲड.रोहिणी खडसे-खेवलकर, बाजार समितीचे उपसभापती ज्ञानेश्वर पाटील, रामदास पाटील, किशोर गायकवाड, राजेंद्र माळी, भागवत टिकारे, विजय चौधरी, प्रदीप बडगुजर, भरत पाटील, दीपक वाणी, किरण वंजारी, प्रमोद धामोडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते. मुक्ताईनगर ते बोदवड रस्त्यावर नाडगाव येथे मध्य रेल्वेची रेल्वे क्रॉसिंग आहे. येथे असलेले रेल्वे गेट तासन्तास बंद राहते. त्यामुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागतो.…
भुसावळ : प्रतिनिधी शहरातील एसबीआय बँकेजवळ गांजाचा नशा करणाऱ्या एका तरूणावर रविवारी, २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास पोलिसांनी कारवाई केली आहे. याप्रकरणी तरूणावर भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर असे की, भुसावळ शहरातील एसबीआय बँकेजवक एक जण गांजाचा नशा करत असल्याची गोपनिय माहिती भुसावळ बाजार पेठ पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार रविवारी, २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता पोलिसांनी गांजाचा नशा करणारा शेख रमजान शेख रउफ (वय ३८, रा. जाम मोहल्ला, भुसावळ) याच्यावर कारवाई केली. त्यांच्याजवळून नशा करण्याचे साधन हस्तगत केले. पोलीस कॉन्स्टेबल सचिन चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेख रमजान शेख रउफ याच्यावर भुसावळ बाजारपेठ पोलीसात…