जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपविभागीय अभियंता साईमत/अमळनेर/जळगाव//प्रतिनिधी : अमळनेर तालुक्यातील ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपविभागीय अभियंत्यास चार हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहाथ अटक केली. ही कारवाई नंदुरबार आणि जळगाव विभागाच्या लाचलुचपत विभागाने बुधवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास केली. दिलीप पाटील असे लाचखोर अभियंत्याचे नाव आहे. जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपविभागीय अभियंता दिलीप पाटील यांच्याकडे धरणगाव ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचा देखील पदभार होता. तेथील एका प्रकरणात मंजुरीसाठी दिलीप पाटील याने चार हजार रुपयांची लाच मागितली. मात्र, तक्रारदाराला लाच द्यायची नसल्याने त्याने लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली. तक्रारीनंतर एलसीबीने सापळा रचत अभियंता दिलीप पाटील याला तक्रारदाराकडून लाच स्विकारताना रंगेहाथ अटक…
Author: saimat
परिसरात पंचायत समिती निवडणुकीसाठी राजकीय तयारी जोरात सुरू आहे. साईमत/ यावल/प्रतिनिधी : तालुक्यातील दहिगाव गण मतदारसंघातून यावल पंचायत समितीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सौ.यशश्री देवकांत पाटील यांची उमेदवारी ठरल्याची माहिती समोर आली आहे. दहिगाव गण हा महिला सर्वसाधारण आरक्षण असलेला मतदारसंघ असून परिसरात पंचायत समिती निवडणुकीसाठी राजकीय तयारी जोरात सुरू आहे. यशश्री देवकांत पाटील या छत्रपती शिवाजी महाराज फाउंडेशनच्या सचिव आणि यावल तालुका संजय गांधी निराधार योजना समितीच्या सदस्या आहेत. त्यांनी सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आरोग्य, कला, क्रीडा आणि महिला सबलीकरण अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. फाउंडेशनच्या माध्यमातून समाजहिताचे उपक्रम राबवले असून, निराधार समितीच्या माध्यमातून गरीब, विधवा, अनाथ, ज्येष्ठ नागरिक व…
परिसरातील नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. साईमत/फैजपूर /प्रतिनिधी : येथील सामाजिक कार्यकर्ते सिद्धेश्वर वाघुळदे यांनी खंडोबा वाडी, आशिष सराफ नगर आणि लक्ष्मी नगरमध्ये स्वखर्चाने गटारी स्वच्छ करण्याचा पुढाकार घेतला. त्यांनी जेसीबीच्या माध्यमातून गटारीत अडलेल्या सिमेंटच्या पाईप्स काढून गटारी मोकळ्या केल्या. गटारी स्वच्छ करण्यासाठी पालिकेचे कर्मचारी देखील उपस्थित होते. सर्वांच्या समक्ष नागरिकांच्या सोयीसाठी गटारी सफाईचे काम सुरू करण्यात आले, ज्यामुळे परिसरातील नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. शहरातील खंडोबा वाडी, आशिष सराफ नगर आणि लक्ष्मी नगरच्या बाजुंच्या गटारींमध्ये अनेक दिवसांपासून साचलेली घाण नागरिकांसाठी त्रासदायक ठरत होती. गटारीत थांबलेले पाणी, डबके आणि मच्छर यामुळे परिसरात रोगराईच्या भीतीने वातावरण गंभीर झाले होते.…
कोळी समाजाच्या परंपरागत शिस्तबद्ध आयोजनात युवक, महिला आणि लहान मुले सहभागी साईमत/फैजपूर/प्रतिनिधी : शहरातील आठवडे बाजार श्रीरामपेठ परिसरातील वाल्मिक नगरमध्ये रामायणाचे रचयिता, आद्यकवी महर्षी वाल्मिक यांच्या जयंतीनिमित्त रविवारी दि.१२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी उत्साह, श्रद्धा आणि भक्तीमय वातावरणात भव्य मिरवणूक काढण्यात आली. आ.अमोल जावळे यांच्याहस्ते महर्षी वाल्मिक यांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमास विविध मान्यवर, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी तसेच शेकडो नागरिक उपस्थित होते. वाल्मिक नगरात संध्याकाळी वाल्मिक मूर्तीची आकर्षक सजावट करण्यात आली होती. सुवासिक फुलांच्या माळांनी आणि रंगीबेरंगी विद्युत रोषणाईने परिसर उजळून निघाला होता. सजवलेल्या ट्रॅक्टरवर महर्षी वाल्मिक यांची भव्य मूर्ती विराजमान करून मूर्ती पूजनानंतर आरती करण्यात आली. भाविकांच्या जयघोषात…
छाजेड ऑईल मिलजवळ पोलीस कारवाई; भारतीय हत्यार प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी : शहरातील छाजेड ऑईल मिलच्या पाठीमागे पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने रविवारी पहाटे १९ वर्षीय तरुण मयुर राजु मोरे याला गावठी बनावटीचे पिस्तुल व दोन जिवंत राऊंडसह रंगेहात पकडण्यात यश मिळवले. ही कारवाई पोलिस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस शिपाई रविंद्र निंबा बच्छे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. ११ ऑक्टोबर रोजी रात्री ११.२५ वाजेच्या सुमारास पोलीस निरीक्षक मनेळ, उपनिरीक्षक गणेश सायकर तसेच पोलीस कर्मचारी निलेश पाटील, ज्ञानेश्वर पाटोळ, नरेंद्र चौधरी, कल्पेश पगारे, केतन सुर्यवंशी, राकेश महाजन आणि पंचांच्या उपस्थितीत कोबींग ऑपरेशनसाठी रवाना झाले…
दोन आस्थापनांवर ५ हजारांचा दंड ; व्यापाऱ्यांना स्वच्छतेचे आवाहन साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील गोलाणी मार्केट परिसरात रविवारी, १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता महानगरपालिकेच्यावतीने भव्य स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. मोहिमेदरम्यान सुमारे ८ ते १० टन कचरा संकलित केला आहे. अस्वच्छता आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दोन आस्थापनांवर प्रत्येकी ५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. मनपाच्या स्वच्छता विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहराच्या मध्यवर्ती भागातील व्यापारी संकुल असल्याने येथे विशेष स्वच्छता मोहीम राबविण्याचे नियोजन केले होते. मोहिमेसाठी २५ ते ३० कर्मचाऱ्यांची टीम तैनात केली होती तर कचरा उचलण्यासाठी १३ वाहने वापरण्यात आली. मोहिमेदरम्यान मार्केट परिसरातील जुना, साचलेला आणि दुर्गंधीयुक्त कचरा उचलण्यात आला, ज्यामुळे परिसरातील अस्वच्छतेची…
भोकरीतील पुरात मृत व्यक्तीच्या कुटुंबाला मिळाले शासनाकडून ४ लाख रुपये साईमत/पाचोरा/प्रतिनिधी : नैसर्गिक आपत्तीमध्ये जीव गमावलेल्या नागरिकांच्या वारसांना तात्काळ दिलासा देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. पाचोरा–भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते, पुराच्या पाण्यात मृत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला शासनाकडून मंजूर झालेली चार लाख रुपयांची आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली. माहे सप्टेंबरमध्ये आलेल्या पुराच्या पाण्यात भोकरी (ता. पाचोरा) येथील सतीष मोहन चौधरी (वय ४०) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेने चौधरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. शासनाच्या आपत्ती मदत निधीमधून त्यांच्या वारस चंदाबाई सतीष चौधरी यांना चार लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे. शासन…
कार्तिक मास व दीपदानाचे महात्म्य उलगडले साईमत/पाचोरा /प्रतिनिधी : श्रील प्रभुपाद मार्ग, वरखेड़ी रोडवरील श्री जगन्नाथ इस्कॉन मंदिरात भगवद्गीता साप्ताहिक सत्संग भक्तिमय वातावरणात उत्साहात पार पडला. कार्यक्रमात इस्कॉनचे प्रवचनकार श्रीमान यदुवंशी प्रभुजी यांनी “कार्तिक मास की महिमा एवं दीपदान का महत्व” या विषयावर प्रेरणादायी प्रवचन दिले. प्रभुजींनी सांगितले की, कार्तिक महिना हा भगवान श्रीहरि विष्णूला अत्यंत प्रिय असून या काळात श्रद्धेपूर्वक केलेले दीपदान सर्व पापांचे नाश करून भक्ताला परमशांती व मोक्ष प्रदान करते. स्त्री असो किंवा पुरुष, जो कार्तिक महिन्यात भगवान विष्णूला दीप अर्पण करतो त्याला मृत्यूनंतर यमलोकाचे दर्शन होत नाही. दीपदान हे केवळ बाह्य प्रकाश नसून अंतःकरणातील अंधकार दूर…
महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे तहसीलदारांना निवेदन साईमत/पारोळा/प्रतिनिधी : तालुक्यात गेल्या आठ-दहा दिवसांमध्ये अतिवृष्टी सदृश्य मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने कापूस, मक्का, सोयाबीन, ज्वारी, केळी आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने सरसकट पंचनामा करावा, एकही शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित राहू नये, अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष शेतकरी नेते सुनील देवरे यांनी तहसीलदार डॉ.उल्हास देवरे यांना दिले. अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. नुकसान भरपाईचे पंचनामे करताना कृषी आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी वस्तुनिष्ठ पंचनामे करावे, त्यांनी अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचलेले असेल, अशाच शेतकऱ्यांचा आम्ही पंचनामे करू, असे दिसून येत आहे. परंतु पाऊस जाऊन…
हिंदू जनजागृती समिती यांनी शस्त्र पूजनाचे महत्त्व पटवून दिले. साईमत/पाळधी, ता.धरणगाव/प्रतिनिधी : विजयादशमी निमित्त हिंदू जनजागृती समितीच्या वतीने शौर्य जागरण शस्त्र पूजन कार्यक्रम पार पडला. समिती सेवकांनी पारंपरिक शस्त्रांचे शास्त्रोक्त पद्धतीने पूजन करून विधी संपन्न केला. कार्यक्रमास प्रतापराव गुलाबराव पाटील, हरिभक्त परायण ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज पाळधीकर, तसेच खर्ची येथील रहिवासी बीएसएफ जवान सोपान माळी यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमात निखील कदम (हिंदू जनजागृती समिती) यांनी शस्त्र पूजनाचे महत्त्व पटवून दिले. यावेळी ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज पाळधीकर म्हणाले, शास्त्राचे रक्षण शस्त्र शिवाय होऊ शकत नाही. धर्मरक्षणासाठी शस्त्र ही केवळ परंपरा नसून ती आपल्या शौर्याची आणि आत्मसन्मानाची ओळख आहे.शौर्य जागरण शस्त्र पूजन प्रसंगी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे…