मानसिक विवंचनेतून पाचोरा तालुक्यातील नाचनखेडा येथील ३७ वर्षीय तरुणाने विषारी औषध सेवन केले साईमत/जळगाव/प्रतिनिधी : पत्नी माहेरी गेल्यानंतर निर्माण झालेल्या मानसिक विवंचनेतून पाचोरा तालुक्यातील नाचनखेडा येथील ३७ वर्षीय तरुणाने विषारी औषध सेवन केले. उपचार सुरू असताना शुक्रवारी १४ नोव्हेंबर रोजी सकाळी त्याचा मृत्यू झाला. याबाबत जळगाव जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. समाधान संतोष पाटील (वय ३७, रा.नाचनखेडा) असे मयत तरुणाचे नाव आहे.नाचनखेडा येथे पत्नी, दोन मुले आणि आई-वडिलांसह वास्तव्यास असलेले समाधान पाटील हे प्लंबरचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी त्यांची पत्नी लहान मुलीला घेऊन माहेरी गेली होती आणि ती परत…
Author: saimat
भिमटेकडी, छत्रपती संभाजीनगर येथे होणार ऐतिहासिक सोहळा; २५ देशांतील भिक्खु संघ व एक लाख उपासक सहभागी साईमत/मलकापूर /प्रतिनिधी : छत्रपती संभाजीनगर येथील भिमटेकडी परिसर पुन्हा एकदा जगाच्या नकाशावर तेजाने उजळणार आहे. सुमारे ७० वर्षांनंतर येथे प्रथमच ‘जागतिक बौद्ध धम्म परिषद’ भव्य आणि ऐतिहासिक पद्धतीने आयोजित करण्यात आली असून २६, २७, २८ फेब्रुवारी ते १ व २ मार्च २०२६ या पाच दिवसांच्या कालावधीत हा सोहळा पार पडणार आहे. परिषदेतील सहभागी देशांची संख्या तब्बल २५ असून, विविध देशांतील तसेच महाराष्ट्रातील भिक्खु व भिक्खुनी संघ मोठ्या संख्येने दाखल होणार आहेत. त्याचबरोबर एक लाखांहून अधिक उपासक-उपासिका या भव्य सोहळ्यात सहभागी होणार असल्याने छत्रपती संभाजीनगर…
पाचोरा पोलिसांची कारवाई; ४१,५०० किमतीचा मुद्देमाल जप्त साईमत/पाचोरा/प्रतिनिधी : तालुक्यातील भातखंडे खुर्द येथे झालेल्या घरफोडी प्रकरणात पाचोरा पोलिसांनी केवळ चार तासांत आरोपीला जेरबंद करत चोरीस गेलेला ४१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळवले आहे. या जलदगती कारवाईबद्दल पोलिस दलाचे सर्वत्र कौतुक होत आहे. जळगाव जिल्ह्यातील चोरी, घरफोडीच्या वाढत्या घटनांवर आळा घालण्यासाठी व आरोपींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिल्या होत्या. त्या अनुषंगाने पाचोरा पोलिस ठाण्याचे निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने ही कारवाई केली. फिर्यादी सोपान भिकन कुमावत (वय ५१, रा. भातखंडे खुर्द, ता. पाचोरा) हे दि.१० नोव्हेंबर रोजी लग्नानिमित्त बाहेरगावी गेले…
अमळनेर पोलिसांची धडक कारवाई; २४ दुचाकींसह १५ लाखांचा मुद्देमाल जप्त साईमत/अमळनेर /प्रतिनिधी : अमळनेर शहरासह परिसरात वाढत्या मोटारसायकल चोरीच्या घटनांचा छडा लावत पोलिसांनी दोन आरोपींना जेरबंद केले असून, त्यांच्या ताब्यातून तब्बल २४ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त वाहनांची एकूण किंमत सुमारे १५ लाख ६३ हजार रुपये असून, या यशस्वी कारवाईने अमळनेर पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलिस अधीक्षक कविता नेरकर (चाळीसगाव विभाग) आणि उपविभागीय पोलिस अधिकारी विनायकराव कोते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. अमळनेर पोलिस स्टेशन गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज, पोकॉ प्रशांत पाटील,…
माणुसकी समुहाच्या प्रयत्नांमुळे हरवलेल्या युवतीचे नातेवाईक सापडले; परंतु मुलीने घरी जाण्यास दिला नकार साईमत/पाळधी (ता.जामनेर) /प्रतिनिधी : येथील २२ वर्षीय पूजा निलेश खुर्पे ही युवती घरातून न सांगता बाहेर पडल्याने कुटुंबीयांची झोप उडाली होती. तिचा शोध सुरु असतानाच ती सिल्लोड शहरातील शिक्षक कॉलनी परिसरात बेवारस अवस्थेत आढळली. रात्रीच्या वेळी एकटी फिरत असल्याचे लक्षात येताच सिल्लोड शहर पोलिसांनी तिच्या सुरक्षेच्या दृष्टीने तात्काळ तिला ताब्यात घेतले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेशराव उदार यांनी तिच्या ओळखीबाबत चौकशी केली असता, ती योग्य पत्ता सांगू शकत नव्हती. त्यामुळे त्यांनी सु-लक्ष्मी सेवाभावी संस्थेचे सुमित पंडित यांच्यामार्फत तिला माणुसकी वृद्ध सेवालय (जटवाडा रोड, सिल्लोड) येथे पुनर्वसनासाठी दाखल केले.…
शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर वृत्तपत्र पत्रकार बहुउद्देशीय संस्थेतर्फे तहसीलदारांना निवेदन साईमत/लोहारा, ता.पाचोरा -/प्रतिनिधी : – लोहारा परिसरातील लोहारा, म्हसास,कासमपुरा ,कळमसरा, कुऱ्हाड शिवारातील शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केल्याप्रमाणे अतिवृष्टी अनुदानाची रक्कम अत्यंत कमी प्रमाणात मिळाली तर अनेक शेतकऱ्यांना अद्यापही अनुदानाची रक्कम मिळाली नाही. याबाबत शेतकऱ्यांनी पत्रकारांजवळ नाराजी बोलून दाखवल्याने लोहारा शहर वृत्तपत्र पत्रकार बहुउद्देशीय संस्थेने तहसीलदार पाचोरा यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे बागायती शेती प्रमाणे अनुदान देण्यात यावे,अशा मागणीचे निवेदन दिले. परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या उताऱ्यावर शेततळे विहीर ठिबक व बोअर ची नोंद असताना बागायती शेती असून सुद्धा कोरडवाहू अनुदान मिळाले आहे. तरी शेजारील चाळीसगाव तालुक्यात बहुसंख्य शेतकऱ्यांना बागायती प्रमाणे अनुदान रक्कम मिळाली आहे. हे चुकीचे असून…
कृषी उत्पन्न बाजार समिती यावल कार्यक्षेत्रात गेल्या महिन्यापासून केळी व्यापारी मातीमोल दरात साईमत/यावल/प्रतिनिधी : कृषी उत्पन्न बाजार समिती यावल कार्यक्षेत्रात गेल्या महिन्यापासून केळी व्यापारी मातीमोल दरात केळीची खरेदी करीत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांमधून आल्याने काही दिवसांपूर्वीच जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाणे यांनी व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.त्याच पाश्वभूमिवर यावल कृषी उत्पन्न बाजार समितीने केळी व्यापाऱ्यांना दप्तर तपासणीच्या नोटीसा काढल्याची माहिती सभापती राकेश फेगडे यांनी दिली. काही दिवसांपूर्वीच जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था, जळगाव यांनी यावल येथे केळी भावाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी व्यापारी,शेतकरी व बाजार समिती यांची सामायिक सभा घेतली होती. त्यात त्यांनी व्यापाऱ्यांची दप्तर तपासणी करण्यात यावी व दोषी आढळून येणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई…
‘पॅथॉलॉजी’ वैद्यकीय शास्त्रात मास्टर डिग्री मिळवीत सुवर्ण अक्षरांनी कोरले नाव! साईमत/ यावल -/प्रतिनिधी : जळगाव जिल्ह्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या डोंगर कठोरा या गावातील कन्या कुमारी डॉ. मेत्ता मिलींद ढाले यांनी वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत ‘पॅथॉलॉजी’ या वैद्यकीय शास्त्रात मास्टर डिग्री मिळवून आपले नाव सुवर्ण अक्षरांनी कोरले आहे. त्यांच्या या यशामुळे त्यांच्यावर डोंगर कठोरासह संपूर्ण यावल तालुक्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. डॉ. मेत्ता या प्रतिष्ठित सिताराम सुका तायडे यांचे नात असून, आयुर्वेदाचार्य पितांबर सिताराम तायडे आणि डॉ. डिगंबर सिताराम तायडे यांच्या नात, तसेच डॉ. अनिता (तायडे) ढाले आणि मिलींद ढाले यांच्या कन्या आहेत. डावणगेरे येथील जेजेएम मेडिकल कॉलेजमध्ये त्यांनी पॅथॉलॉजी…
धुळे-चाळीसगाव राष्ट्रीय महामार्गावर भोरस गावाजवळ मंगळवारी दुपारी अपघातात साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी : ट्रक-मोटारसायकलमध्ये झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना धुळे-चाळीसगाव राष्ट्रीय महामार्गावर भोरस गावाजवळ मंगळवारी दुपारी घडली. भागवत पाटील (रा.पिराचे बोरखेडा) असे अपघातातील मयत तरुणाचे नाव आहे. दुपारी साधारण १ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला असून, ट्रक क्र.(एच.आर.७४ बीओ ४५०) ने मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. धडकेनंतर मोटारसायकल ट्रकच्या पुढील भागात अडकून अक्षरशः चिरडली गेली. अपघात इतका भीषण होता की भागवत पाटील यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेनंतर काही वेळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. स्थानिक नागरिकांनी तत्काळ चाळीसगाव ग्रामीण पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्याचे…
जनगणना हे राष्ट्रीय कार्य – नागरिकांनी सहकार्य करावे : जिल्हाधिकारी रोहन घुगे साईमत/अडावद, ता.चोपडा -/प्रतिनिधी : चोपडा तालुक्यात प्रायोगिक स्वरूपात सुरू असलेल्या जनगणना कार्याचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी मंगळवारी सायंकाळी अडावद गावाला भेट दिली. यावेळी त्यांनी जनगणनेचे काम पाहणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधून कामातील अडचणी जाणून घेतल्या व आवश्यक मार्गदर्शन केले. जिल्हाधिकारी श्री.घुगे यांनी यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधताना सांगितले की, जनगणना हे राष्ट्रीय कार्य असून सर्व नागरिकांनी यात सक्रिय सहभाग घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे. तसेच त्यांनी स्पष्ट केले की, ही जनगणना जातीनिहाय नसून केवळ लोकसंख्येची जनगणना आहे. हे प्रायोगिक कार्य यशस्वी ठरल्यास पुढील काळात याची अंमलबजावणी केवळ…