चौक-दुभाजक सुशोभीकरणासाठी महापौरांचे कडक निर्देश साईमत जळगाव प्रतिनिधी शहराच्या सौंदर्यीकरणाला गती देण्यासाठी महापौर दीपमाला काळे यांनी प्रशासनाला ठोस आणि कडक निर्देश दिले आहेत. पावसाळ्यापूर्वी शहरातील प्रमुख चौक आणि दुभाजकांचे (डिवायडर) सुशोभीकरण पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले असून, कामांमध्ये विलंब करणाऱ्या विकासकांना थेट अल्टिमेटम देण्यात आला आहे. गुरुवारी (९ एप्रिल) महापौर दीपमाला काळे यांच्या अध्यक्षतेखाली शहर सौंदर्यीकरणासंदर्भात विशेष बैठक पार पडली. या बैठकीत शहरातील प्रमुख रस्ते, चौक आणि दुभाजकांच्या डिझाईन, अंमलबजावणी आणि देखभालीबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. शहर सौंदर्यीकरणात एकरूपतेवर भर या बैठकीत महापौरांनी स्पष्ट भूमिका मांडत सांगितले की, शहरातील प्रत्येक चौक आणि दुभाजक सुशोभित करताना त्यामध्ये एकसमानता (सिमिलॅरिटी) आणि ठराविक…
Author: saimat
हृदयद्रावक घटना; आजोबांच्या संशयामुळे उघडकीस आले थरारक सत्य साईमत / पुणे पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कुरुळी परिसरात 6 वर्षीय चिमुकल्याच्या निर्घृण हत्येने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्याने आईने आपल्या प्रियकराच्या मदतीनेच मुलाची हत्या केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. 27 वर्षीय बसरिन शेख हिचे विनायक कजेवाड याच्यासोबत प्रेमसंबंध होते. गेल्या चार महिन्यांपासून दोघेही कुरुळी येथे एकत्र राहत होते. मात्र बसरिनचा 6 वर्षांचा मुलगा आवेज हा त्यांच्या संबंधात अडथळा ठरत असल्याचे मानले जात होते. याच कारणातून 4 एप्रिल रोजी रात्री 11.30 वाजता आईने प्रियकराच्या मदतीने मुलाची हत्या केल्याचा आरोप आहे. आरोपींनी अत्यंत क्रूर पद्धतीने मुलाचा जीव घेतला. प्रथम…
शासकीय धान्य खरेदीसाठी टोकन वाटप सुरू असल्याची चुकीची माहिती पसरल्याने गोंधळ पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती नियंत्रणात साईमत भडगाव प्रतिनिधी शासकीय धान्य खरेदीसाठी टोकन मिळणार असल्याच्या अफवेने भडगाव शहरात सोमवारी सकाळपासूनच मोठी खळबळ उडाली. कोणतीही अधिकृत घोषणा किंवा आदेश नसतानाही शेकडो शेतकऱ्यांनी केंद्रावर धाव घेतल्याने परिसरात प्रचंड गर्दी उसळली. काही वेळातच केंद्राबाहेर लांबच लांब रांगा लागल्या आणि संपूर्ण परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. शेतकरी संघाकडून टोकन वाटप सुरू झाल्याची चुकीची माहिती ग्रामीण भागात वेगाने पसरली. परिणामी, आपल्या धान्याच्या विक्रीच्या आशेने अनेक शेतकरी सकाळपासूनच केंद्रावर दाखल झाले. मात्र प्रत्यक्षात कोणतीही टोकन प्रक्रिया सुरू नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर उपस्थित शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आणि नाराजीचे वातावरण पसरले.…
साईमत / जळगांव डिजिटल व्यवहार झपाट्याने वाढत असताना ऑनलाइन फसवणुकीचे प्रकारही वाढत असल्याचे चित्र आहे. यावर आळा घालण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) कडून UPI आणि IMPS व्यवहारांबाबत महत्त्वाचा बदल करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. या प्रस्तावानुसार 10,000 रुपयांपेक्षा जास्त रकमेचा UPI किंवा IMPS व्यवहार केल्यास पैसे लगेच समोरच्या खात्यात जमा न होता सुमारे एक तासाचा ‘कूलिंग ऑफ पीरियड’ लागू होऊ शकतो. या कालावधीत व्यवहाराची पडताळणी करण्यासाठी वेळ मिळेल. संशय आल्यास व्यवहार रद्द करण्याची सुविधाही उपलब्ध असू शकते. देशात ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत असून, 2026 पर्यंत अशा फसवणुकीची रक्कम 22,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. बहुतांश…
नागरिकांना एकाच छताखाली मिळाल्या १५ पेक्षा अधिक महसुली सेवा साईमत जळगाव प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वनविभाग तसेच तहसील कार्यालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान (टप्पा-१)’ अंतर्गत पिंप्राळा येथे आज, १० एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० वाजता भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. भवानी स्वीट मार्ट शेजारील ग्राम महसूल अधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त आणि मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला. नागरिकांना त्यांच्या दैनंदिन महसुली कामकाजासाठी विविध कार्यालयांमध्ये हेलपाटे मारावे लागू नयेत तसेच एकाच ठिकाणी सर्व सेवा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ‘एक खिडकी योजना’ अंतर्गत तहसीलदार, नायब तहसीलदार,…
साईमत / जळगांव आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या इराण-इस्रायल संघर्षाला तात्पुरता विराम मिळाल्यानंतर त्याचे थेट परिणाम जागतिक तसेच देशांतर्गत बाजारावर दिसून येत आहेत. विशेषतः कच्चे तेल आणि सोन्याच्या दरात मोठ्या प्रमाणात चढ-उतार होत असून, शुक्रवारी जळगावसह मुंबई, पुणे, दिल्ली आणि चेन्नई या प्रमुख बाजारपेठांमध्ये सोन्याच्या किमतीत लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली. जळगावच्या सराफा बाजारात आज २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति तोळा तब्बल एक हजार रुपयांची वाढ झाली असून, सोन्याचा दर एक लाख ५५ हजार १५ रुपयांवर पोहोचला आहे. चांदीच्या दरातही मोठी उसळी दिसून आली असून, प्रति किलो दरात सुमारे पाच हजार रुपयांची वाढ होऊन तो २ लाख ५२ हजार ३५० रुपयांवर गेला…
पहिल्याच दिवशी सर्व विभागांना भेटी देत कामकाजाचा सखोल आढावा साईमत जळगाव प्रतिनिधी जळगाव जिल्हा परिषदेच्या नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी शुक्रवार, दि. १० एप्रिल रोजी पदभार स्वीकारताच कामकाजात वेग आणण्याचा स्पष्ट संदेश दिला. पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी त्यांनी सर्व विभागांना प्रत्यक्ष भेटी देत सखोल आढावा घेतल्याने जिल्हा परिषद प्रशासनात ‘ॲक्शन मोड’ची सुरुवात झाल्याचे चित्र दिसून आले. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी यांच्या हस्ते करिश्मा नायर यांनी पदभार स्वीकारला. यावेळी सर्व विभाग प्रमुखांची उपस्थिती होती. माजी मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांची मुंबई येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या अभियान संचालकपदी बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी नायर…
महापौर दीपमाला काळे यांच्या आदेशानंतर महापालिकेची आक्रमक कारवाई; प्रमुख भागांत कचरा हटवून परिसर चकाचक साईमत जळगाव प्रतिनिधी ‘माझं जळगाव, स्वच्छ जळगाव’ हे ब्रीदवाक्य केवळ घोषणांपुरते मर्यादित न ठेवता ते प्रत्यक्षात उतरवण्याचा ठोस निर्धार जळगाव महानगरपालिकेने केला असून, शहरात मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहिमेचा धडाका सुरू झाला आहे. महापौर दीपमाला काळे यांच्या स्पष्ट आणि कडक निर्देशानंतर महापालिका प्रशासनाने शहरातील विविध भागांत स्वच्छतेची व्यापक मोहीम हाती घेतली आहे. गेल्या काही दिवसांत शहरातील विविध भागांतून साचलेला कचरा, अस्वच्छता आणि दुर्गंधी याबाबत नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत महापौरांनी आरोग्य विभागाला तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार आरोग्य विभागाने मेहरूण…
केंद्र व स्थानिक प्रशासनाच्या सूचनांनुसार, कामगारांसाठी थंडावा, पिण्याचे पाणी आणि विश्रांती क्षेत्रे सुनिश्चित करणे अनिवार्य; ग्रामयात्रा व सार्वजनिक कार्यक्रमांमध्येही विशेष खबरदारी. साईमत / जळगांव भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार येत्या काही महिन्यांत तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाचे श्रम व रोजगार मंत्रालय आणि राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (NCDC) यांनी उष्णतेच्या लाटेपासून कामगार आणि नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. अत्यंत उष्णतेच्या परिस्थितीत बांधकाम कामगार, वीटभट्टी कामगार, रोजंदारी मजूर तसेच असंघटित क्षेत्रातील कामगारांना उष्माघाताचा धोका जास्त आहे. प्रशासनाने जिल्ह्यातील नियोक्ता, उद्योग, बांधकाम कंपन्या तसेच ग्रामपंचायत व स्थानिक स्वराज्य संस्थांना तातडीने आवश्यक उपाययोजना राबविण्याचे आवाहन…
साईमत / वृत्तसंस्था हल्दिया येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमध्ये सध्या चालू असलेल्या टीएमसी सरकारवर जोरदार टीका केली. मोदींनी म्हटले की, “तृणमूल काँग्रेसने फक्त घुसखोरीचं राजकारण केलं आणि तरुणांचा विश्वासघात केला. व्होट बँक खुश व्हावी म्हणून धर्माच्या आधारे आरक्षण देण्याचा प्रयत्न केला जात आहे, ज्यावर कोर्टानेही निषेध दर्शवला आहे.” मोदींनी टीएमसी सरकारचे ‘लांगुलचालन’ आणि घुसखोरांचा खेळ थांबवण्याची गरज असल्याचा स्पष्ट इशारा दिला. ते म्हणाले, “भाजपाचं सरकार आल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला त्याचा हक्क मिळेल; सरकारी नोकऱ्या वेळेनुसार, व्यवहारांमध्ये पारदर्शकता असेल आणि कोणतीही कमिशनखोरी, दलाली राहणार नाही.” पंतप्रधानांनी मत्स्य पालन क्षेत्रावरही लक्ष वेधले. मोदी म्हणाले की, बंगालमध्ये मासे देशातल्या मागणीनुसार तयार…