साईमत जळगाव प्रतिनिधी आदिवासी टोकरे कोळी समाजाच्या वतीने शुक्रवारी जळगाव शहरात भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले. आमोदा गावातील महर्षी वाल्मिकी यांच्या मूर्तीची झालेली विटंबना या घटनेच्या निषेधार्थ समाजबांधवांनी तीव्र संताप व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. छत्रपती शिवाजी महाराज तीर्थ (शिवतीर्थ मैदान) येथून सुरू झालेला हा मोर्चा जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत काढण्यात आला. मोर्चात समाजातील मोठ्या संख्येने पुरुष, महिला आणि युवक सहभागी झाले होते. हातात फलक, बॅनर घेऊन आणि घोषणाबाजी करत मोर्चेकऱ्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. मोर्चाचे मुख्य कारण म्हणजे आमोदा गावात असलेल्या आदिवासी टोकरे कोळी समाजाच्या आराध्य दैवत महर्षी वाल्मिकी यांच्या मूर्तीची विटंबना झाल्याची घटना. या प्रकारामुळे…
Author: saimat team
साईमत जळगाव प्रतिनिधी शहरात क्रिकेटचा ज्वर शिगेला पोहोचला असून जळगाव क्रिकेट लीग-२०२६ (JCL T-20) च्या निमित्ताने क्रीडाप्रेमींना रोमांचक क्रिकेटचा अनुभव मिळणार आहे. दि. १८ ते २६ एप्रिलदरम्यान मेहरूण तलाव परिसरातील कांताई नगर येथील जैन ड्रीम स्पेसेस या भव्य क्रीडांगणावर या स्पर्धेचा थरार रंगणार असून, शनिवारी भव्य उद्घाटन सोहळ्याने या लीगची अधिकृत सुरुवात होणार आहे. उद्घाटन सोहळ्यास राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, विविध मतदारसंघांचे आमदार तसेच जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन आणि जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. जिल्ह्यातील क्रिकेटप्रेमींसाठी हा एक मोठा क्रीडा उत्सव ठरणार आहे. या स्पर्धेत सहा संघ, सहा प्रशिक्षक आणि एकूण १०८ खेळाडू…
साईमत नाशिक प्रतिनिधी शहरात अलीकडील काळात उघड झालेल्या विविध गंभीर घटनांमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. लैंगिक शोषण, फसवणूक तसेच धर्मांतरणाशी संबंधित काही प्रकरणांमुळे महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज (दि. १८) नाशिकमध्ये उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक विभागीय आयुक्त कार्यालयाजवळील मित्रा संस्थेत पार पडणार असून, शहरातील आयटी कंपन्यांचे प्रमुख, विविध उद्योजक संघटनांचे प्रतिनिधी तसेच शासकीय आणि सामाजिक क्षेत्रातील प्रमुख अधिकारी यात सहभागी होणार आहेत. महिला सुरक्षेबाबत ठोस धोरण आखणे आणि अंमलबजावणीची दिशा ठरवणे हा या बैठकीचा मुख्य उद्देश आहे. गेल्या काही दिवसांत भोंदू बाबा अशोक खरात आणि कथित पत्रकार रवींद्र एरंडे प्रकरणांमुळे…
साईमत जळगाव प्रतिनिधी जिल्ह्यातील पाण्याच्या परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतल्यानंतर नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे. जळगाव येथे झालेल्या पाणी आढावा बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना विविध राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवरही आपली भूमिका स्पष्ट केली. पाणी परिस्थितीबाबत बोलताना मंत्री पाटील यांनी सांगितले की, जिल्ह्यातील जलसाठा आणि पुरवठ्याचा आढावा घेण्यात आला असून अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुढील काळात पाण्याचे योग्य नियोजन आणि बचत अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. दरम्यान, महिला विधेयकाबाबत बोलताना त्यांनी महिला सक्षमीकरणाचे जोरदार समर्थन केले. “महिला प्रत्येक क्षेत्रात सक्षम आहेत. आज त्या सर्व क्षेत्रांमध्ये उच्च स्थानावर पोहोचल्या…
साईमत वृत्तसेवा देशातील स्वयंपाकगॅस म्हणजेच एलपीजीच्या किंमतीतील सततचे चढ-उतार आणि पुरवठ्यातील अनिश्चिततेमुळे हॉटेल, रेस्टॉरंट तसेच मोठ्या व्यावसायिक संस्थांचे गणित बिघडत असताना, सरकारकडून एक महत्त्वाचा पर्याय समोर आणला जात आहे. व्यावसायिक स्वयंपाकासाठी एलपीजीऐवजी इथेनॉलचा वापर करण्याबाबत केंद्र सरकार सक्रिय विचार करत असून, या दिशेने एक व्यापक धोरण तयार करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. आखाती देशांतील तणाव आणि त्यातून निर्माण झालेल्या जागतिक ऊर्जा संकटाचा परिणाम भारताच्या इंधन पुरवठा व्यवस्थेवरही जाणवत आहे. परिणामी एलपीजीच्या उपलब्धतेवर काही प्रमाणात मर्यादा येत असून, विशेषतः व्यावसायिक क्षेत्रात अडचणी वाढल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर सरकारने स्वदेशी आणि टिकाऊ पर्याय शोधण्यावर भर दिला आहे. मनीकंट्रोलच्या अहवालानुसार, सरकार…
साईमत जळगाव प्रतिनिधी जळगाव शहरातील तांबापूर परिसर शुक्रवारी संपूर्ण दिवस वीजपुरवठा खंडित झाल्याने अक्षरशः अंधारात बुडाला. सकाळी सुमारे ९ वाजता गेलेली वीज रात्रीपर्यंतही परत न आल्याने नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. प्रचंड उकाडा, पाणीटंचाई आणि दैनंदिन कामकाज ठप्प झाल्याने परिसरात तीव्र असंतोष निर्माण झाला. स्थानिक नागरिकांनी वीज विभागाशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र समाधानकारक प्रतिसाद मिळाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. काही वेळा फोन उचलला गेला नाही, तर काही वेळा “थोड्याच वेळात वीज येईल” असे सांगून वेळकाढूपणा करण्यात आल्याचा नागरिकांचा दावा आहे. या निष्काळजीपणामुळे संतापाचा उद्रेक झाला. अखेर त्रस्त नागरिकांनी श्यामा फायरजवळ रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन छेडले. अचानक सुरू…
साईमत नाशिक प्रतिनिधी राज्यात होऊ घातलेल्या जनगणना प्रक्रियेमध्ये अनेक ठिकाणी दिव्यांग कर्मचारी, अधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कामे दिल्याच्या तक्रारी समोर येत असून, हे शासनाच्या स्पष्ट निर्देशांचे उल्लंघन असल्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. दिनांक २९ सप्टेंबर २०१० रोजी सामान्य प्रशासन विभागाने काढलेल्या शासन निर्णयानुसार दिव्यांग कर्मचाऱ्यांना जनगणनेची कामे देऊ नयेत, असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. तरीदेखील प्रत्यक्षात या निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याने संबंधितांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष बाळासाहेब सोनवणे यांनी या संदर्भात तीव्र भूमिका घेत शासन व प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. दिव्यांग कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण टाकणे अन्यायकारक असून, शासनानेच दिलेल्या आदेशांचे…
साईमत जळगाव प्रतिनिधी शहरातून जाणाऱ्या महामार्गावर वारंवार घडणाऱ्या अपघातांमुळे रस्ते सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नगरसेविका जयश्री राहुल पाटील यांनी केली आहे. नॅशनल हायवे प्रकल्प अधिकाऱ्यांना गुरुवार, १६ एप्रिल रोजी निवेदन देत त्यांनी संबंधित ठिकाणी रिफ्लेक्टर व दिशा दर्शक फलक बसविण्याची मागणी केली. निवेदनात नमूद केल्यानुसार, मानराज पार्क स्टॉप ते खोटेनगर दरम्यान असलेल्या पूल व सर्व्हिस रोडच्या कडेला वाहनांची अनियमित पार्किंग होत असल्याने अपघातांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तसेच मानराज पार्क स्टॉप ते शिव कॉलनी स्टॉप दरम्यान रेल्वे पुलाजवळही अशीच परिस्थिती निर्माण झाली असून, येथे तातडीने रिफ्लेक्टर आणि दिशा दर्शक फलक बसविण्याची गरज अधोरेखित…
साईमत जळगाव प्रतिनिधी शासनाच्या दारात जनतेने फिरू नये, तर सरकारच जनतेच्या दारी जावे या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेले ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ हे खऱ्या अर्थाने नागरिकांसाठी दिलासादायक ठरत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने सुरू करण्यात आलेले हे शिबिर म्हणजे स्वराज्याच्या विचारांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणारे जनआंदोलन असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. तरसोद सर्कल अंतर्गत आयोजित या शिबिराचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने झाली, तर जिल्हा परिषद शाळा तरसोद येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रार्थनेने वातावरण भक्तिमय झाले. प्रास्ताविकात महसूल अधिकारी रुपेश ठाकूर यांनी शिबिराचा उद्देश…
साईमत प्रतिनिधी समृद्धी महामार्गावर घडलेल्या भीषण अपघातात शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष आणि अशोक खरात यांचे निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संभाजीनगरहून शिर्डीकडे जात असताना धोत्रे गावाजवळ त्यांच्या कारने उभ्या कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. मिळालेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गावर प्रवास करत असताना शेळके यांच्या कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला मागून धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की कार थेट कंटेनरखाली घुसली आणि वाहनाचा अक्षरशः चक्काचूर झाला. या अपघातात जितेंद्र शेळके यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत शेळके यांचा मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.…