पुणे: नीट (NEET), ‘सीयुईटी’ (CUET) आणि ‘सीबीएसई’ (CBSE) परीक्षांमधील पेपरफुटीमुळे देशातील सुमारे एक कोटी विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या निष्पाप विद्यार्थ्यांना न्याय देण्याऐवजी सत्ताधारी मात्र खुर्चीला चिकटून बसले आहेत, असा घणाघाती आरोप ‘कॉकरोच जनता पक्षा’चे (CJP) संस्थापक अभिजित दीपके यांनी केला आहे. “पंतप्रधानांना एक कोटी विद्यार्थ्यांचे भविष्य महत्त्वाचे आहे की काम न करणारा एक मंत्री?” असा सवाल करत, शनिवारपर्यंत शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा न झाल्यास दिल्लीत देशव्यापी आंदोलन छेडण्याचा आणि थेट पंतप्रधानांचा राजीनामा घेण्याचा इशारा दीपके यांनी दिला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात ‘सीजेपी’ (CJP) च्या वतीने गुरुवारी एका भव्य आंदोलनाची हाक देण्यात आली होती. या आंदोलनात प्रसिद्ध पर्यावरणवादी कार्यकर्ते…
Author: Bharati Bharsake
साईमत -जळगाव- प्रतिनिधी |राज्यात मान्सूनचे आगमन झाले असले तरी अद्याप संपूर्ण महाराष्ट्र मान्सूनच्या प्रभावाखाली आलेला नाही. त्यामुळे सध्या राज्यात दुहेरी हवामान पाहायला मिळत आहे. एकीकडे काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे, तर दुसरीकडे अनेक भागांमध्ये उष्णता आणि दमट वातावरणाचा त्रास कायम आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने (IMD) आज राज्यातील २८ जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’ जारी केला असून विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि सोसाट्याचा वारा वाहण्याचा इशारा दिला आहे. या २८ जिल्ह्यांना पावसाचा इशारा हवामान खात्याने रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा,…
नाशिकचा तिढा सुटला, पण जळगावात पेच कायम; संकटमोचक गिरीश महाजनांच्या रणनीतीला खिळ? साईमत -जळगाव- प्रतिनिधी | नाशिकमधील विधान परिषद निवडणुकीतील बंडखोरीचा तिढा अत्यंत कौशल्याने सोडवल्यानंतर महायुतीचे नेते सुटकेचा श्वास सोडत नाहीत, तोच जळगावातून मोठी राजकीय खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. जळगावमधील शिवसेना (शिंदे गट) बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांनी महायुतीची डोकेदुखी कमालीची वाढवली असून, आज त्यांच्या बंडखोरीवर अंतिम तोडगा निघण्याची शक्यता असतानाच त्या अचानक ‘नॉट रिचेबल’ झाल्या आहेत. सकाळपासूनच त्यांचा कोणाशीही संपर्क होत नसल्याने जळगावच्या राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले असून महायुतीच्या गोटात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. रात्री उशिरापर्यंत बैठकांचे सत्र, पण… नाशिकमधील बंडखोरी रोखण्यात यश आल्यानंतर…
‘विरोधकांचे तर राज्यात बारा वाजलेत!’; एकनाथ खडसेंना थेट ‘आराम’ करण्याचा खोचक सल्ला साईमत -जळगाव- प्रतिनिधी | विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर महायुतीसमोरील सर्वात मोठी डोकेदुखी ठरलेला जळगाव आणि नाशिकमधील बंडखोरीचा प्रश्न अखेर मिटला आहे. आता केवळ अधिकृत घोषणेची औपचारिकता बाकी असून, दोन्ही जागांवर महायुतीचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे, असा मोठा दावा राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांनी केला. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी सविस्तर चर्चा झाली असून, शिंदे स्वतः याबाबतची घोषणा करतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. जळगावात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ना. महाजन यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेत विविध राजकीय घडामोडींवर अत्यंत रोखठोक आणि खणखणीत भाष्य केले.…
मेन रोडवरील ‘गोल्ड हाऊस’मध्ये धाडसी चोरी; ३ संशयित सीसीटीव्हीत कैद, पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह साईमत -चोपडा- प्रतिनिधी | शहरातील अत्यंत गजबजलेली आणि मुख्य बाजारपेठ असलेल्या मेन रोडवर आज एक धक्कादायक आणि तितकीच खळबळजनक घटना घडली. येथील नामांकित ‘गोल्ड हाऊस’ या सोन्याच्या दुकानातून तीन सराईत चोरट्यांनी दुकानदाराची नजर चुकवून तब्बल ८१ ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास केले. भरदिवसा घडलेल्या या ‘डिजिटल’ हातचलाखीमुळे चोपड्यातील व्यापारी वर्गासह नागरिकांमध्ये तीव्र भीतीचे आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे. चोरीला गेलेल्या या दागिन्यांची बाजारभावानुसार एकूण किंमत ६ लाख ४८ हजार रुपये आहे. नजर हटली अन… ३ संशयितांनी डागला डल्ला! मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार, नेहमीप्रमाणे दुकानात ग्राहकांची वर्दळ असताना तीन संशयित…
रेश्मा काळेंचा बंड अद्याप कायम; जळगावात ‘महायुती’चे टेन्शन वाढले! साईमत /प्रतिनिधी/ जळगाव : नाशिकमध्ये बंडखोर उमेदवार गोकुळ गीते यांची मनधरणी करण्यात महायुतीच्या नेत्यांना यश आले असले, तरी जळगावात मात्र बंडखोरीचा तिढा अधिकच गुंतागुंतीचा बनला आहे. शिवसेना शिंदे गटाच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांनी आपली उमेदवारी मागे घेण्यास स्पष्ट नकार दिला असून, त्या अजूनही निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. “गोकुळ गीतेंना विचार करायला चार दिवस मिळाले, मला चार तास तरी द्या,” असा थेट सवाल करत त्यांनी महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांना घरचा आहेर दिला आहे. रेश्मा काळे यांच्या या पवित्र्यामुळे जळगाव महायुतीमधील राजकीय वातावरण कमालीचे तापले असून नेत्यांची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे. ’कार्यकर्त्यांची इच्छा,…
बैलजोडीचा खर्च परवडेना; शेतकरी बापाने मुलांनाच जुंपले जोखडाला! जळगावमधील विदारक वास्तव समोर साईमत -जळगाव- प्रतिनिधी | एका बाजूला देशात कृषी क्षेत्राच्या आधुनिकीकरणाच्या आणि डिजिटल शेतीच्या गप्पा रंगत असताना, दुसऱ्या बाजूला आर्थिक विवंचनेमुळे गरीब शेतकऱ्यांना आजही मूलभूत साधनांसाठी किती टोकाचा संघर्ष करावा लागतो, याचे एक अत्यंत विदारक आणि हृदयद्रावक वास्तव जळगाव जिल्ह्यातून समोर आले आहे. बैलजोडी परवडत नसल्याने एका हताश शेतकऱ्याने आपल्या दोन मुलांनाच बैलांच्या जागी जोखडाला जुंपून शेतात कपाशीसाठी सऱ्या पाडल्याची धक्कादायक घटना पाचोरा तालुक्यात घडली आहे. या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून हळहळ व्यक्त केली जात असून, प्रशासकीय यंत्रणा आणि शासकीय योजनांच्या दाव्यांवर मोठे…
साईमत -जळगाव- प्रतिनिधी | जळगावच्या प्रसिद्ध सुवर्ण बाजारपेठेतून ग्राहक आणि गुंतवणूकदारांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. जागतिक बाजारातील घडामोडींमुळे जळगावात सलग दुसऱ्या दिवशी गुरुवारी (११ जून) सोन्या-चांदीच्या दरांमध्ये लक्षणीय घसरण झाली. विशेष म्हणजे, गेल्या अडीच महिन्यांच्या कालखंडानंतर सोन्याचे दर दीड लाखांच्या खाली आले असून चांदीचे दरही अडीच लाखांच्या आत स्थिरावले आहेत. या घसरणीमुळे लग्नघाई आणि सणासुदीच्या खरेदीचे नियोजन करणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सोन्याचे आजचे नवीन दर (जीएसटीसह) बुधवारी सोन्याच्या दरात ४,३२६ रुपयांची मोठी घट झाली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी, म्हणजेच गुरुवारी सकाळी बाजार उघडताच सोन्यात आणखी २,०६० रुपयांची घसरण नोंदवली गेली. २४ कॅरेट सोने (प्रति १० ग्रॅम): ₹१,४९,८६५…
भारतीय रेल्वेने प्रवाशांची सुरक्षा आणि रेल्वेच्या मालमत्तेचे रक्षण अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने एक मोठे पाऊल उचलले आहे. देशभरातील सर्व रेल्वे स्थानकांवर आता ‘देशव्यापी अग्निसुरक्षा लेखापरीक्षण’ (Fire Safety Audit) केले जाणार आहे. या महत्त्वाकांक्षी उपक्रमाच्या माध्यमातून रेल्वे स्थानकांवरील सद्यस्थितीतील अग्निसुरक्षा यंत्रणेचे सखोल मूल्यमापन केले जाईल आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व आधुनिक सुधारणा निश्चित केल्या जातील. आग लागण्यासारख्या दुर्घटना किंवा इतर कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा रेल्वे स्थानकांवर प्रभावीपणे सामना करता यावा, यासाठी रेल्वे प्रशासनाने ही कडक पावले उचलली आहेत. ’या’ सर्व यंत्रणांची होणार कडक तपासणी या देशव्यापी ऑडिट अंतर्गत रेल्वे स्थानकांवरील खालील महत्त्वाच्या पायाभूत सुविधांची आणि यंत्रणांची बारकाईने तपासणी केली जाणार आहे:…
साईमत -जळगाव- प्रतिनिधी | जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात उभारण्यात आलेला बहुचर्चित सोलर प्रकल्प पुन्हा एकदा तीव्र वादाच्या आणि चर्चेच्या फेऱ्यात अडकला आहे. या प्रकल्पामुळे बाधित झालेल्या स्थानिक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे थेट निर्देश दिले आहेत. तसेच प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनींचे झोनिंग करून त्याचा सविस्तर अहवाल तातडीने शासनाकडे सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. मंत्रालयात महसूल मंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण आणि जळगावचे जिल्हाधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) उपस्थित होते. आमदार मंगेश चव्हाण यांनी बाधित शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे मंत्र्यांचे…