Author: Saimat

मुंबई : प्रतिनिधी ( यास्मीन शेख ) राज्यातील आमदारांना अच्छे दिन आले आहेत. गेल्या तीन वर्षा पासून दर वर्षी १ कोटी निधी वाढत आहे. या वर्षी आमदार निधी 5 कोटी पर्यंत करण्यात आला असून,आमदारांच्या पीए आणि ड्रायव्हर यांच्या पगारात पाच हजाराने वाढ करण्यात आल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली. त्यामुळे आता आमदारांन बरोबर पीए आणि ड्रायव्हर याना ही अच्छे दिन येणार आहेत.

Read More

औरंगाबाद : वृत्तसंस्था नात्यातील एका महिलेला मारहाण केल्या प्रकरणी वैजापुर तालुक्याचे शिवसेना आमदार रमेश बोरनारे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण, आता आमदार बोरनारे यांच्यावर याप्रकरणी विनयभंगची कलमं लावण्यात आली आहे. पीडित महिलेच्या पुरवणी जवबावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका कार्यक्रमासाठी वैजापूरात आले असताना आमदार बोरनारे आणि त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांनी मारहाण केल्याचा आरोप करत आमदारांच्या नात्यातील एका महिलेने वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. पण आपला विनयभंग झाला असल्याचा आरोप सुध्दा या महिलेने केला होता. त्यानंतर पोलिसांनी महिलेचा पुरवणी जवाब नोंदवत आता आमदार बोरनारे यांच्यावर विनयभंगाची कलमे लावण्यात आली आहे. पोलीस अधीक्षकांशी चर्चा करणार…

Read More

मुंबई : प्रतिनिधी ( यास्मीन शेख ) अर्थसंकल्पाच्या चर्चेवर उत्तर देतांना राज्याचे अर्थ मंत्री तसेच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या उत्तराची अभंगापासून सुरुवात केली . कोरोना काळात झालेल्या वैद्यकीय सेवा बरोबर अन्य सेवा अधिकाऱ्यांनी काम केले त्यांच्या कौतुकावरही टीका होते ही शोकांतिका आहे. लसीकरणासाठी ग्रामीण भागात राजकीय नेत्यांनी प्रबोधन करण्याची गरज आहे. राज्यवर कर्ज भार वाढतो आहे हे सत्य आहे, तरी कोविड संकटात कर्ज काढावे लागले. सरकारने प्रयत्न केला की, स्थूल उत्पन्नाच्या 3 टक्केपेक्षा हे कर्ज वाढू नये मात्र कोविड काळात 14 हजार कोटी हे कर्ज रकमेतून खर्च झाले आहे. केंद्र सरकारला ही कोविड काळात कर्ज घ्यावे लागले आहे. योजना या…

Read More

पणजी : वृत्तसंस्था गोव्यात आणि मणिपूरमध्ये भाजपने पुन्हा सत्ता मिळवण्यात यश प्राप्त केले आहे. असे असले तरी दोन्ही राज्यांमधील मुख्यमंत्रिपदाचा तिढा पक्षासमोर निर्माण झाला होता. मात्र आता हा सस्पेन्स दूर झाला असून गोवा आणि मणिपूर या दोन्ही राज्यांमध्ये विद्यमान मुख्यमंत्री कायम राहणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे आता गोव्यामध्ये प्रमोद सावंत तर मणिपूरमध्ये बीरेन सिंह हे पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांच्यामध्ये झालेल्या भेटीनंतर पंतप्रधानांनी सांगितले की, नुकताच पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाच्या शानदार विजयासाठी मुख्यमंत्री बीरेन सिंह यांना शुभेच्छा. आमचा पक्ष मणिपूरच्या लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आणि अधिक…

Read More

नाशिक : प्रतिनिधी देशातील भाजपाशासित राज्यांमध्ये महिलांवरील अत्याचार सुरूच आहेत. फडणवीसांच्या काळात सामूहिक बलात्कार आणि खुनाच्या ४७ घटनांमुळे २०१९ मध्ये महिलांवरील अत्याचाराच्या बाबतीत महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर होता. पण भाजपाच्या चित्रा वाघ यांना त्या प्रकरणाचा विसर पडलेला दिसतो. त्यांनी थोडे मागे वळून पाहिले पाहिजे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदार आणि राज्य महिला आयोगाच्या सदस्या दीपिका चव्हाण यांनी व्यक्त केले. नाशिक दौऱ्यावर असताना चित्रा वाघ यांनी महिला अत्याचाराबाबत महाविकास आघाडीवर केलेल्या आरोपांना राज्य महिला आयोगाच्या सदस्या दीपिका चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत सडेतोड उत्तर दिले. देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी सरकारने महिलांसाठी सर्वसमावेशक धोरण राबवले आणि त्यांचा सन्मान करण्याचा…

Read More

फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला होलिका दहन केले जाते. असे मानले जाते की जेव्हा हिरण्यकशिपूची बहीण होलिकाने भगवान विष्णूचा भक्त प्रल्हादला आगीत जाळण्याचा प्रयत्न केला तेव्हा होलिका जळून राख झाली आणि प्रल्हादला काहीही झाले नाही. ज्या दिवशी ही घटना घडली, त्या दिवशी फाल्गुन महिन्याची पौर्णिमा होती. तेव्हापासून होलिका दहनाची परंपरा सुरू झाली. वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून होलिका दहन केले जाते. यावेळी होलिका दहन 17 मार्च 2022 च्या रात्री केले जाईल. ज्योतिषांच्या मते, होलिका दहन दरम्यान काही चुका कधीच करू नये, अन्यथा त्याचा फटका नंतर भोगावा लागू शकतो. होलिकेच्या अग्निला जळत्या शरीराचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे कोणत्याही नवविवाहित जोडप्याने ही अग्नी पाहू नये.…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी पाणी हेच जीवन आहे या वाक्यावरून पाण्याचे महत्व लक्षात येते.पाण्याच्या उपलब्धतेवर समस्त सजीव सृष्टीचे अस्तित्व अवलंबून आहे.पाण्याची बचत ही काळाची गरज आहे. याअनुषंगाने राज्यभर जलजागृती सप्ताहाचा आज आरंभ करण्यात आला. येथील आकाशवाणी चौकीतील पाटबंधारे विभागातील मुख्य कार्यालयात कार्यकारी संचालक पी.जी.मांडाळे यांच्या हस्ते जलसप्ताह प्रारंभ करण्यात आला. या जलसप्ताहाची सांगता 22 मार्च रोजी होणार आहे. तापी पाटबंधारे विभागाच्या मुख्य कार्यालयात जलजागृती सप्ताह सुरुवात करण्यात आली.याप्रसंगी मुख्य अभियंता जी.डी.बोरकर, अधिक्षक अभियंता श्री.दळवी, जे.आय.पी.सी.चे अधिक्षक अभियंता श्री.भोसले, जळगाव पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.बेहरे, गिरणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.अग्रवाल, वाघूर धरण विभागाचे कार्यकारी अभियंता गोकुळ महाजन, साईमतचे संपादक प्रमोद बऱ्हाटे…

Read More

गेल्या तीस वर्षापुर्वी जळगाव हे राज्यातील एक विकसनशील शहर म्हणून ओळखले जात असे,त्याचे श्रेय कोणीही सुरेशदादा जैन यांना दिल्याशिवाय राहणार नही मात्र गेल्या सात-आठ वर्षापासून या शहराला कोणाची नजर लागली की, जळगावचं पार वाटोळं झाल्याची तीव्र प्रतिक्रिया अनेक जळगावकरांनी व्यक्त केल्यास नवल वाटू नये.शहरात फिरतांना त्याचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही.शहरातील विस्तारीत भागातील रस्त्यांची तर पार दुरवस्था झाली असून त्याकडे मनापाच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यास किंवा अधिकाऱ्यास बघायला वेळ आहे कुठे… अहो,हे तर सोडा परंतु शहरातील एक-दोन रस्ते सोडले तर सर्व प्रमुख रस्त्यांची इतकी दुरवस्था झाली आहे की,रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते हे समजायला मार्ग नाही. जळगावची जनता किती सहनशील आहे हे…

Read More

नवी दिल्ली :वृत्तसंस्था नुकत्याच झालेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकींचे निकाल जाहीर झाल्यानंतर यात भाजपने मोठी भरारी घेतल्याचे दिसून आले. पाच पैकी चार राज्यांमध्ये भाजपने मोठे यश संपादन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या प्रगतीचा आलेख दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. यात महामंडलेश्‍वर स्वामी यतींद्र आनंद गिरी यांनी पंतप्रधान मोदींबद्दल भविष्यवाणी केली आहे. गिरी यांनी केलेल्या भविष्यवाणीनुसार राष्ट्रवादाच्या नावावर मोदी स्वत: पंतप्रधानपद सोडतील आणि ही जबाबदारी एखाद्या योग्य व्यक्तीकडे सोपवतील, असे सूचक वक्तव्य महामंडलेश्‍वर स्वामी यतींद्र आनंद गिरी यांनी केले आहे. महोबामध्ये स्वजन शिष्य संम्मेलनाच्या कार्यक्रमामध्ये बोलताना महामंडलेश्‍वर स्वामी यतींद्र आनंद गिरी यांनी ही भविष्यवाणी केली आहे. महामंडलेश्‍वर स्वामी यतींद्र…

Read More

उन्हाळा आला की सर्वांनाच चविष्ट आंबे खाण्याचे वेध लागतात. पण आंबे असो वा कैरी आपण दोन्ही फळे चवीने खातो. ही फळे आपल्या आरोग्यासाठीही अतिशय फायदेशीर आहेत. करीपासून आपण अनेक चटण्या, लोणची आणि पन्ह बनवू शकतो. उन्हाळ्यात उष्माघात, डिहायड्रेशन टाळण्यासाठी कैरी पन्ह हे सर्वोत्तम पेय आहे. कैरीमध्ये कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, फायबर इत्यादी घटक असतात. यामुळे आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. उन्हाळ्यात कैरी पन्ह प्यायल्याने आपल्या शरीराला कोणकोणते फायदे होतात हे जाणून घेऊया. उष्माघातापासून बचाव : कैरीचा गुणधर्म थंड असतो. त्यामुळे कैरीचे पन्ह बनवून प्यायल्याने पोटाला थंडावा मिळतो. उन्हाळ्यात लोकांना उष्माघाताचा सर्वाधिक त्रास होतो, अशा परिस्थितीत जर तुम्ही अर्धा कप कैरीचे पन्ह…

Read More