Author: Saimat

जळगाव : प्रतिनिधी शहीद दिनानिमित्त शहीद भगतसिंग राजगुरू सुखदेव यांच्या प्रतिमेचे पूजन करतांना श्री आयुक्त सतीश कुलकर्णी व महापौर सौ जयश्री ताई महाजन अपर आयुक्त सौ विद्या गायकवाड चंद्रकांत वांद्रे नितीन पटवे सुरेश कोल्हे प्रकाश सपकाळे राजु सोनवणे प्रमोद निकम व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Read More

मालेगावः नाशिक जिल्ह्यातल्या मालेगावमध्ये पूर्व वैमनस्यातून चक्क एका व्यक्तीचा हात तोडल्याचा प्रकार उघड झाला असून, जखमीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. संशयित फरार झाला असून, पोलीस त्याच्या मागावर आहेत. मात्र, या अघोरी हल्ल्याने पोलिसही चक्रावून गेलेत. गेल्या काही दिवसांपासून वाढत्या गुन्हेगारींमुळे मालेगाव सतत चर्चेत आहे. दिवाळीच्या सुमारास तर मालेगावमध्ये पेटलेल्या दंगलीने देश हादरला. त्यामुळे या संवेदनशील शहरात पोलिसांसमोर रोज एक आव्हान उभे राहताना दिसत आहे. मालेगावमधील पवारवाडीतील मेहवीनगर येथे दोन कुटुंबात पूर्व वैमनस्य आहे. त्यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली. हे प्रकरण थेट भांडणापर्यंत गेले. या भांडणांनी इतके टोक गाठले की, एका व्यक्तीने समोरच्याच्या मनगटावर शस्त्राचा वार करून हात तोडला. या…

Read More

मेष : तुम्हाला व्यवसायात पुढे जाण्याची संधी मिळेल. आज काही चांगल्या संधी देखील मिळू शकतात ज्यातून ते उत्पन्न मिळू शकते. आर्थिक बाजू सुधारेल आणि तुम्हाला आर्थिक बाबतीत सकारात्मक परिणाम मिळतील. आज तुम्हाला करिअरमध्ये नवीन संपर्कांचा लाभ मिळेल. वैवाहिक चर्चेत यश मिळेल. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवता येईल. बचतीत वाढ होईल. वृषभ : वृषभ राशीचे लोक व्यावसायिक क्षेत्रात नवीन योजना सुरू करू शकतात. उच्च शिक्षण किंवा नोकरीसाठी परदेशात जायचे असेल तर निराश होऊ नका, प्रयत्न करा, काम पूर्ण होईल. आज नोकरीत अधिकारी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवू शकतात. घरामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही घर घेण्याचा प्रयत्न करत असाल तर या कामासाठी आजचा…

Read More

मुंबई यास्मिन शेख  महाराष्ट्र विधानमंडळ काँग्रेस पक्षाचे विधान परिषद गटनेते पदी आ. अमरनाथ राजूरकर तर मुख्य प्रतोद पदी आ. अभिजित वंजारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी आज सभागृहात ही घोषणा केली. अमरनाथ राजूरकर नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे आमदार असून अभिजीत बंजारी नागपूर पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. विधीमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. नाना पटोले व वरिष्ठ नेते तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी सदर नियुक्ती संदर्भात पक्षश्रेष्ठींनी शिफारस केली होती. महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस…

Read More

मुंबई, यास्मिन शेख  पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या दरात केंद्रातील मोदी सरकारने वाढ करून सामान्य जनतेच्या जखमेवर मीठ चोळले आहे. आधीच महागाईने त्रस्त झालेल्या जनतेला पुन्हा एकदा भाजपाने महागाईच्या गर्तेत लोटले आहे. निवडणुकीचे दिवस असताना इंधन दरवाढ रोखून ठेवली होती पण पाच राज्यातील विधानसभा निवडणुका संपताच भारतीय जनता पक्षाने जनतेला महागाईची भेट दिली अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. यासंदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की, भारतीय जनता पक्षाचे सरकार केंद्रात आल्यापासून सातत्याने पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस, खाद्यतेलाचे दर वाढत आहेत. आज एलपीजी गॅस सिलिंडरमध्ये ५० रुपये तर पेट्रोल व डिझेलमध्ये ८० पैशांची वाढ…

Read More

विधानसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमधील जाळपोळ आणि हिंसाचार आपण पाहिलाय. त्यानंतर पुन्हा एकदा पश्चिम बंगालमध्ये जाळपोळ सुरू झाली आहे. ही जाळपोळ तृणमूलच्या एका नेत्याच्या हत्येनंतर सुरू झाली आहे. बोगतुई या गावातील जाळपोळीच्या घटनेत जवळपास डझनभर घरं आणि 10 लोकांना जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये जवळपास 38 लोक जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे. या जाळपोळीच्या घटनेनंतर पुन्हा एकदा पश्चिम बंगालमधील वातावरण तापलं आहे. स्थानिक पोलीस अधिकाऱ्याच्या माहितीनुसार रामपुरहाट शहराबाहेरील बोगतुई गावामधील घरांमधून आतापर्यंत सात मृतदेह सापडले असल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे घटनास्थळावर 10 जळलेले मृतदेह सापडल्याची माहिती एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे. पोलिसांनी सांगितलंय की, गावातील…

Read More

जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील नशिराबाद टोलनाक्याजवळ मालवाहू वाहनाच्या धडकेत दोन तरुण जखमी झाल्याची घटना घडली होती. या घटनेप्रकरणी वाहनचालकांविरोधात नशीराबाद पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी येथील यश अरुण लोखंडे हा त्याचा मिऋ राकेश जाधव याच्यासोबत १२ मार्च रोजी नशीराबाद टोलनाका परिसरात गेला होता. यादरम्यान (एम.एच. १९ डी.के. ७०७३) या मालवाहू वाहनाने यश व त्याचा मित्र राकेश यास समोरुन जोरदार धडक दिली. या अपघातात यश व राकेश या दोघांना दुखापत झाली आहे. उपचार घेतल्यानंतर याप्रकरणी यश याने दिलेल्या तक्रारीवरुन सोमवारी २१ मार्च रेाजी (एमएच १९ डी.के. ७०७३) या मालवाहू वाहनावरील अनोळखी चालकांविरोधात नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात…

Read More

बोदवड: प्रतिनिधी शहरातील गोरक्षनाथ नगरात राहणाऱ्या २७ वर्षीय विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी घडली आहे. विवाहितेला मूलबाळ होत नसल्याच्या कारणावरून छळ केल्याने विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. भावना नीलेश महाजन असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती, चुलत सासऱ्यांना अटक करण्यात आली आहे. बोदवडच्या गोरक्षनाथनगरमध्ये राहणाऱ्या भावना महाजन व निलेश सुभाष महाजन यांच्या लग्नाला सहा ते सात वर्षे झाली होती. परंतु त्यांना मूलबाळ होत नसल्याने पती व चुलत सासरे व सासू विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ करीत तिला क्रूर वागणूक दिली होती. जाचाला कंटाळून भावना महाजन यांनी सोमवारी सकाळी ६.३० च्या सुमारास राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या…

Read More

मुंबई : भारतात लोक घराजवळ कुठेही जाण्यासाठी, स्थानिक बाजारातून सामान आणण्यासाठी स्कूटर घेऊन जाणं पसंत करतात. कदाचित अशाच गरजा लक्षात घेऊन क्रेयॉन एनव्ही कंपनीने भारतीय बाजारात एक लो स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली आहे. ही स्कूटर चावीशिवाय सुरू केली जाऊ शकते. कंपनीने ही स्कूटर चार रंगांच्या पर्यायांमध्ये सादर केली आहे, ज्यामध्ये पांढरा, काळा, निळा आणि सिल्व्हर या रंगांचा समावेश आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरची (Electric scooter) किंमत 64,000 रुपये ठेवण्यात आली आहे आणि ती अनेक उत्तम फीचर्स आणि उत्तम बूट स्पेससह येते. तसेच, यात कीलेस स्टार्टअप सिस्टम आहे. ही स्कूटर देशभरातील 100 हून अधिक किरकोळ ठिकाणी खरेदी केली जाऊ शकते. या…

Read More

रशिया-युक्रेन युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या वाढीचा परिणाम आता देशांतर्गत पातळीवर दिसून येत आहे. भारतात तेल खरेदी कंपन्यांनी मंगळवारी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केली. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सुध्दा वाढ होत आहे. भारतात पेट्रोल दरात 80 पैशांनी वाढ केली आहे. मागच्या आठवड्यात काही कंपन्यांनी दरात दोन ते पाच रूपयांनी वाढ केली होती. दोन वर्षात कोरोनाच्या काळात अर्थिक संकटात सापडलेला सामान्य नागरिक नुकताच उभारी घेत होता. एकाचवेळी सगळेचं दर वाढत असल्याने सर्वसामान्य जनता यामध्ये होरपळली जाईल. विशेष म्हणजे पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवण्यास सुरुवात झाली आहे. कोणत्या शहरात किती महागला सिलेंडर पुणे…

Read More