Author: Saimat

जळगाव : प्रतिनिधी शहरातील रामेश्वर कॉलनीत राहणारे अमर रमेश भोळे वय-३२ यांना दारू पिण्याची सवय असल्याने दि.१६ मार्च रोजी दुपारी १२.३० च्या सुमारास ते मंगलपुरी भागातील पुष्पा ठाकूर यांच्या दारूच्या अड्ड्यावर गेले होते. त्याठिकाणी काम करणाऱ्या प्रकाश नावाच्या मुलाने त्यांना सांगितले कि मी मोहाची दारू आणलेली आहे. त्याने दारूच्या बाटलीत ती दारू टाकून दिली. दारू पिल्यानंतर अमर भोळे यांना रक्ताची उलटी झाली. त्यानंतर ते घरी येऊन झोपले असता त्यांना पुन्हा रक्ताच्या उलट्या झाल्या. कुटुंबियांनी अमर भोळे यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांनी गोदावरी हॉस्पिटल येथे पाठविले. प्रकृती अस्तावस्त असल्याने काही दिवस ते बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते. बुधवारी पूर्ण शुद्दीवर आल्यानंतर अमर…

Read More

औरंगाबादः प्रतिनिधी मराठवाड्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या जालना ते जळगाव रेल्वे मार्गाच्या अंतिम सर्व्हेला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मंजुरी दिली आहे. रेल्वे मंत्रालयाने या प्रकल्पाच्या सर्वेक्षणासाठी साडे चार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. जालना ते जळगाव हा 174 किलोमीटर लांबीचा मार्ग असून त्याच्या सर्वेक्षणाचे काम सुरु झाले आहे. हे सर्वेक्षण 23 ते 25 मार्च या कालावधीत होणार असून त्यासाठी रेल्वे विभागाचे अधिकारी जालन्यात दाखल झाले आहेत. विभागाचे हे अधिकारी जालना ते जळगाव मार्गावरील विविध गावांना भेटी देणार आहेत. त्यानंतर रेल्वेमार्गासंबंधीचा अहवाल रेल्वे विभागाकडे दिला जाईल. हा रेल्वे मार्ग झाल्यानंतर मराठवाड्याच्या ग्रामीण भागातील औद्योगिक विकासासह, व्यापार, दळणवळण, शेती, लघुउद्योग आणि…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी स्वातंत्र्यानंर देशाचा विकास आणि देशातील गोरगरीब, कामगार, शेतमजूर,दलित व अल्पसंख्याकांच्या विकासाच्या योजना काँंग्रेस पक्षानेच सुरू केल्या असून या योजनांमुळे या वंचीत वर्गाला न्याय देण्याचे काम काँग्रेस पक्षाने केले असून आजही करीत आहे. म्हणूनच काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्यांच्या हिताचा असल्याचे विचार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे सरचिटणीस व जळगाव शहर जिल्हा कमेटीचे डिजिटल सदस्य नोंदणी अभियानाचे,निरीक्षक किशोर बोरकर यांनी येथे व्यक्त केले. जळगाव शहर जिल्हा काँग्रेस कमेटीव्दारा काँग्रेस भवनात आयोजित डिजिटल सदस्य नोंदणी अभियानासाठी ते आले होते.याप्रसंगी ते पुढे म्हणाले की,काँग्रेस पक्षातील शेवटच्या कार्यकर्त्यांच्या कार्याचे मुल्यमापन करून त्या कार्यकर्त्यांस न्याय देण्याचे काम खासदार राहुल गांधी करणार आहेत.पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्ते…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  गेल्या एक वर्षात मृत्यूमुखी पडलेल्या कर्मचार्‍यांच्या वारसांना अनुकंपातत्वावर नोकरी मिळेपर्यंत त्यांना नियमानुसार देय असलेल्या मासिक निर्वाह भत्त्याची प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढा, असे आदेश महावितरणचे संचालक (मानव संसाधन) डॉ. नरेश गिते यांनी दिले आहेत.  राज्यातील मानव संसाधन व औद्योगिक संबंध अधिकारी यांच्या व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी  संजय ढोके, महाव्यवस्थापक(व्य.प्र.) राजेंद्र पांडे, महाव्यवस्थापक(मा.सं.) भूषण कुलकर्णी व सहमुख्य औद्योगिक सबंध अधिकारी ललित गायकवाड उपस्थित होते. महावितरण मधील मासिक निर्वाह भत्ता तसेच अनुकंपा तत्वातर्ंगत नोकरीच्या प्रलंबित प्रकरणांबाबतचा आढावा घेताना डॉ. नरेश गिते म्हणाले, प्रशासनात अनुकंपातत्वाची  प्रकरणे अधिक संवेदनशील पध्दतीने हाताळली पाहिजेत. मृत…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  रुग्णसेवा हिच ईश्‍वरसेवा हे ब्रिद घेऊन गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील रुग्णालय जळगाव जिल्ह्यासह बुलढाणा जिल्ह्यातील गावोगावी तज्ञ डॉक्टरांच्या चमूद्वारे पोहोचत आहे. खेड्यापाड्यात घेण्यात येत असलेल्या कॅम्पद्वारे नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी केली जात असून अनेकांना गंभीर आजाराची लक्षणे दिसत असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात येण्याचा सल्ल्यासह येण्यासाठी गाडीचीही व्यवस्था उपलब्ध करुन दिली जात आहे. मंगळवार, २२ मार्च रोजी यावल तालुक्यातील कासारखेडा, भादली आणि मोहाडी येथे एकाचदिवशी मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. जळगाव येथील सुप्रिम कॉलनीतील शिवाजी महाराज चौकात सोमवार, २१ मार्च रोजी डॉ.उल्हास पाटील रुग्णालयातर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. यावेळी मुधमेह, रक्तदाब, टू डी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांनी सोमवारी राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. याशिवाय उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचीही भेट घेतली. या वेळी त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली. कुलगुरू प्रा. माहेश्वरी यांनी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांचीही भेट घेतली. या वेळी जनसंपर्क अधिकारी डॉ. सुनील पाटील उपस्थित होते. विद्यापीठाशी निगडित अनेक विषयांवर यावेळी चर्चा झाली. विद्यार्थीहिताच्या प्रश्नांवर कुलगुरू डॉ.माहेश्वरी यांनी राज्यपालांना साकडे घातले.

Read More

जळगाव प्रतिनिधी भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीवरून जाणाऱ्या बालकाला चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज मोहाडी गावाजवळ घडली. या संदर्भातील वृत्त असे की, सुजय गणेश सोनवणे (वय१३) हा मुलगा आज दुपारी साडे अकराच्या सुमारास जळगावहून मोहाडी गावाकडे जात होता. याप्रसंगी गावाजवळ एमएच-२८ बी ७७०३ या क्रमांकाच्या भरधाव ट्रकने त्यांच्या एमएच १९ डीएम ११ या क्रमांकाच्या दुचाकीला धडक दिली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. सुजयचा मृतदेह जिल्हा रूग्णालयात आणला असून तेथे आप्तांनी प्रचंड गर्दी केली आहे. जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात धाव घेतली

Read More

ग्रामसेवक आणि ग्रामविस्तार अधिकाऱ्यांमधे खळबळ. यावल सुरेश पाटील तालुक्यातील डोंगरकठोरा ग्रामपंचायतीच्या हद्दीतील शासकीय जमीनीची महसूल विभागाकडून रितसर परवानगी न घेता,गांवठाण प्रकरणाबाबत कार्यवाही न करता भोगवटादार लावून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी यावल येथील संबंधित एका ग्रामविस्तार अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश फैजपूर भाग उपविभागीय अधिकारी कैलास कडलग यांनी भालोद मंडळाधिकारी मिलिंद देवरे यांना दिले आहे. उपविभागीय अधिकारी कैलास कडलग यांनी भालोद मंडळ अधिकारी मिलिंद देवरे यांना दिलेल्या आदेशात म्हटले आहे की,यावल तालुक्यातील डोंगरकठोरा येथील ग्रामपंचायतीच्या हद्दीतील शासकीय जमीन असलेल्या गावठाणाबाबत यावल पंचायत समिती कार्यालयातील ग्रामविस्तर अधिकारी यांनी वरिष्ठ कार्यालयाची रितसर परवानगी न घेतला भेगवटादार लावून गाव नमूना नंबर ८ (अ) तयार केल्याबाबत…

Read More

विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी सोयगाव तालुक्यातील जरंडी येथे मंगळवार मध्यररात्रीच्या सुमारास शेतातील गोडाऊन मध्ये साठवून ठेवलेला कापूस चोरीला गेल्याची घटना घडली आहे, जरंडी येथील शेतकरी नितीन मानसिंग पाटील यांच्या जरंडी शिवारातील गट नंबर ३८०/ब यांच्या शेतातील गोडाऊन मध्ये साठवून ठेवलेला कापूस चोरीला गेला आहे, चोरांनी शेतातील गोडाऊन जवळ नसल्याच्या फायदा घेत नितीन पाटील यांच्या शेतातील गोडाऊनच्या शेडचे कुलूप तोडून अंदाजे ४० क्विटल ४ लाख ५० हजार रुपये किंमतीचा कापूस चोरी केला आहे या घटनेची पोलिसांना माहीत दिल्यानंतर घटनास्थळी सोयगाव पोलीस दाखल झाले पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सुदाम शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सतीश पंडित , जमादार रवींद्र तायडे, राजू बर्डे…

Read More

मुंबई यास्मिन शेख  महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पाणी पोहोचावे यासाठी शासनाचा जलसंपदा विभाग काम करत आहे. या उद्देशाने शासनाने अनेक कामे पूर्ण केली असून अनेक कामे सुरू असल्याची माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सभागृहात दिली. मंगळवारी विधानसभेत २६३ अन्वये अनुदान मागणीवर चर्चा करण्यात आली. यावेळी विधानसभेतील सर्व सदस्यांनी या चर्चेत भाग घेत अनेक चांगल्या सुचना केल्या.  गोदावरी थट कालवा दुरुस्तीच्या कामाला महाविकास सरकारमध्ये गती मिळाली असून पुढील दोन वर्षात मोठे काम होईल. महाविकास आघाडी सरकार आल्यापासून निळवंडे धरणाच्या कामाला मोठी गती मिळाली आहे. कोविडच्या काळात आर्थिक चणचण असताना या प्रकल्पासाठी ८२३ कोटी ७२ लाख रुपये दिले गेले तर यंदाही २२-२३ यावर्षी…

Read More