Author: Saimat

रेल्वेनं प्रवास (Travel) करून इच्छित स्थळी (Destination) पोहोचल्यानंतर मोठा प्रश्न असतो तो राहण्याच्या (Accommodation) सोयीचा. एखाद्या शहरात आपलं घर किंवा नातेवाईक नसतील, तर सुरू होते हॉटेलची (Hotel) शोधाशोध. पण महानगरांमध्ये हॉटेलचे दरही परवडणारे नसतात. अशा प्रवाशांसाठी आता रेल्वेनं एक ‘गुड न्यूज’ दिली आहे. जर तुम्ही रेल्वेचा प्रवास करून मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर उतरणार असाल, तर तुम्हाला हॉटेलची चिंता करण्याची गरज नाही. दक्षिण मुंबईत असणाऱ्या CSMT रेल्वे स्टेशनवर एक ‘पॉड हॉटेल’ उभारलं जातंय. याचं काम जवळपास पूर्ण झालं असून जून महिन्याच्या अखेरीस ते प्रवाशांसाठी खुलं करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे. वेटिंग रूमच्या जवळ होतंय पॉड हॉटेल सीएसएमटी…

Read More

मुंबई : प्रतिनिधी  पेट्रोलियम कंपन्यांची वेट अॅंड वॉचची भूमिका कायम असून आज ३ जून २०२२ रोजी कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचा दर स्थिर ठेवला. सलग १२ व्या दिवशी इंधन दर जैसे थेच आहेत. आज शुक्रवारी मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव १११.३५ रुपये इतका आहे. दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये इतका आहे. कोलकात्यात १०६.०३ रुपये आणि चेन्नईत पेट्रोलचा भाव १०२.६३ रुपये झाला आहे. बंगळुरुमध्ये पेट्रोलचा भाव १०१.९४ रुपये इतका असून चंदीगडमध्ये ९६.२० रुपये इतका आहे. मुंबईत आज एक लीटर डिझेलचा ९७.२८ रुपये इतका आहे. दिल्लीत डिझेल ८९.६२ रुपये आहे. चेन्नईत एक लीटर डिझेलचा भाव ९२.२४ रुपये इतका असून कोलकात्यात डिझेलचा भाव ९२.७६ रुपये…

Read More

हॉटेल किंवा रेस्टॉरंटच्या बिलात सेवा कर लावणे बेकायदा असल्याचे भारत सरकारने सांगितले. लवकरच केंद्र सरकारच्या सूचनेनुसार हॉटेल आणि रेस्टॉरंटच्या बिलात सेवा कर अर्थात सर्व्हिस टॅक्स लागू करू नये यासाठी दिशानिर्देश दिले जातील. नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया (एनआरएआय) ही संस्था केंद्राच्या सूचनेनुसार निर्देश देणार आहे.  हॉटेल किंवा रेस्टॉरंटच्या बिलात सेवा कर लावणे बेकायदा असल्याचे भारत सरकारने सांगितले. लवकरच केंद्र सरकारच्या सूचनेनुसार हॉटेल आणि रेस्टॉरंटच्या बिलात सेवा कर अर्थात सर्व्हिस टॅक्स लागू करू नये यासाठी दिशानिर्देश दिले जातील. नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया (एनआरएआय / National Restaurant Association of India – NRAI) ही संस्था केंद्राच्या सूचनेनुसार निर्देश देणार आहे. अनेक हॉटेल…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात गीता मधुसूदन पाटील हिने 2019-2021 मध्ये एमएससीमध्ये 84 गुण मिळवून पर्यावरण शास्त्र या विषयात सुवर्ण पदक मिळवले आहे. ती सेवानिवृत्त विभागीय सहनिबंधक एम.डी.पाटील व वैशाली पाटील यांची मुलगी तर महापारेषणचे सहायक अभियंता व दादासाहेब फाळके पुरस्कार 2022 विजेते हर्षवर्धन पाटील यांची बहीण आहे.

Read More

जळगाव ः प्रतिनिधी ग्रीन ह्युमन फाउंडेशनतर्फे दररोज स्वच्छता मोहीम राबवण्यात येते. 29 मे रोजी फाउंडेशन व जेसीआय जळगावतर्फे सुभाष चौकात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या उपक्रमात भवानी मंदिरापासून ते संपूर्ण दाणाबाजार परिसर स्वच्छ करण्यात आला. महापौर जयश्रीताई महाजन यांनी ग्रीन ह्युमन फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांसोबत श्रमदान करत घंटा गाडीत कचरा टाकण्याचे आवाहन केले. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष प्रियंका कौराणी, उपाध्यक्ष रूपाली किरंगे, सचिव काजल सैनी, सहसचिव हितेश शिंपी, जेसीआय जळगावचे अध्यक्ष भाग्येश त्रिपाठी, प्रथमेश दायमा, अशुतोष दायमा, वरूण जैन, प्रतीक सेठ, भूषण कासार, सूरज बिर्ला उपस्थित होते.

Read More

जळगाव ः प्रतिनिधी मोफत शिक्षणाचा अधिकार या योजनेनुसार 25 टक्के प्रवेश अंतर्गत 2022-2023 वर्षांकरिता प्रतीक्षा यादी जाहीर झाली आहे. यात जिल्ह्यातील 594 विद्यार्थांचा समावेश आहे. 3 जूनपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश निश्‍चित करावयाचे असून गुरुवारपर्यंत 346 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्‍चित केले आहे. दरम्यान,आज शुक्रवारी प्रवेशाची अंतिम मुदत असून आता मुदतवाढ मिळण्याची शक्यता कमी आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार, दरवर्षीप्रमाणे 25 टक्के प्रवेश प्रक्रिया राज्यात ऑनलाइन पद्धतीने राबवण्यात येत आहे. यंदा जळगाव जिल्ह्यातील 285 शाळांमधील 3147 जागांसाठी ही प्रक्रिया राबवली जात आहे. त्यानुसार 2940 विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर करण्यात आली होती. निवड यादीतील 2940 पैकी 2173 विद्यार्थ्यांनीच मुदतीअंती प्रवेश निश्‍चित केला.…

Read More

जळगाव : प्रतिनिधी राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या किर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने जळगावातील पिंप्राळा येथील श्रीराम संस्थानच्या मैदानावर शनिवार दिनांक 4 मे रोजी शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या मानराज पार्क नजीकच्या श्रीराम मंदिराच्या मैदानावर निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या किर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी 7 ते रात्री 9 या कालावधीत आयोजीत करण्यात आलेल्या या किर्तनाला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ह.भ.प. गौ- प्रेमी गजानन महाराज वरसाडेकर यांनी केले आहे.…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी ‘फाली सारख्या संस्थांच्या माध्यमातून भारतातील भविष्यकालिन शेतीत संशोधनाची दिशा निश्‍चित होत आहे. फालीच्या संमेलनातून युवा शेतकरी, संशोधक आणि नव उद्योजक समोर येत आहे. अशा घटकांना युपीएलसारखे उद्योग शिष्यवृत्ती व लघुउद्योग निर्मितीसाठी मदत करतील असे प्रतिपादन युपीएलचे अध्यक्ष रजनीकांत श्रॉफ यांनी केले. ‘फालीच्या उपक्रमामुळे शेतीकडे नव पिढी वळते आहे. शेतीतील नव संशोधन हे सर्वच उद्योगांसाठी पूरक आहे. शेतीला नवी दिशा देण्याचा संकल्प सर्वांनी करायला हवा. आपले कुटुंब आणि आपला परिवार शेतीमय करण्याचा प्रयत्न केला तर देशातील शेतीची प्रगती उत्तम होईल असे जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन म्हणाले.’ ‘फाली’च्या आठव्या संम्मेलनाच्या पहिल्या सत्राच्या समारोपात मान्यवरांच्याहस्ते पारितोषिक विजेत्या स्पर्धकांना मेडल,…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी राजयोग शोध आणि प्रतिष्ठानच्या मीडिया विंग तर्फे 29 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर 2022 रोजी ब्रह्माकुमारीज्‌ मुख्यालय माऊंट आबू येथे राष्ट्रीय मीडिया संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. समाधान आधारित पत्रकारितेने समृद्ध भारत या मुख्य विषयावर देशभरातील पत्रकार, मीडिया प्रतिनिधी यात सहभागी होतील.त्यात वृत्तपत्रे, टीव्ही, रेडिओ, केबल, शासकीय मीडिया संस्था, जनसंपर्क अधिकारी, जाहिरात संस्था, सायबर मीडियातील घटक, दूरसंचार आणि पोस्ट विभाग, मीडिया शिक्षण संस्था आदि क्षेत्रातील प्रतिनिधी सहभागी होतील. संमेलनात सहभागासाठी डॉ. सोमनाथ वडनेरे, महाराष्ट्र माध्यम समन्वयक, मीडिया प्रभाग यांच्याशी 9850693705 यावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. निसर्ग सौंदर्याने बहरलेले माऊंट आबू अप्रतिम निसर्ग सौंदर्याने बहरलेल्या माऊंट आबूकडे…

Read More

चाळीसगाव प्रतिनिधी धनगर समाज उन्नती मंडळ व मल्हार सेना चाळीसगाव यांच्या विद्यमाने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी  होळकर यांची 297 वी जयंती उत्सव मंगळवार दिनांक ३१/५/२०२२ रोजी सकाळी ९ वाजता समाजाचे ज्येष्ठ नागरिक व पत्रकार श्री रमेश  जानराव  व सौ रजनी जानराव यांच्या हस्ते सपत्नीक पुतळा पूजन करण्यात आले . सकाळी ९ वाजता पूजनानंतर शहरातील प्रमुख मार्गावरून मोटर सायकल रॅली काढण्यात आली रॅलीला समाजाचे अध्यक्ष साहेबराव आगोने यांनी पिवळा झेंडा दावून प्रारंभ करण्यात आले यावेळी सर्व समाज बांधव उपस्थित होते . सायंकाळी ५ वाजता पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेचे पूजन करून मिरवणुकीला सुरुवात करण्यात येणार आहे. मिरवणूक सदर बाजार ,आंबेडकर चौक, घाट…

Read More