Author: Saimat
येवला ः प्रतिनिधी पुण्यात मैत्रिणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. आरोपी तरुणाने मित्राशी संगनमत करुन मोबाइलद्वारे चित्रीकरण केले तसेच ध्वनीचित्रफित प्रसारित करण्याची धमकी दिल्याचे उघडकीस आले आले आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी तरुणासह त्याचे मित्र, आई आणि बहिणी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी रेहान सय्यद, शाहरुख शेख, सोहेल पठाण तसेच रेहानची आई आणि बहिण यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीडीत तरुणी आणि आरोपी रेहान सय्यद ओळखीचे आहेत. रेहानने तिला जाळ्यात ओढले आणि तिच्यावर बलात्कार केला. रेहानने मित्र अरबाज शेखशी संगनमत करुन मोबाइलद्वारे चित्रीकरण केले…
जळगाव ः प्रतिनिधी येथील सुप्रीम कॉलनीत वास्तव्यास असलेल्या रेहमानखॉ उर्फ रेशमा खान या तृतीयपंथीयाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना घडली आहे. रेहमानखॉ उर्फ रेशमा खान या तृतीयपंथीयाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आज सकाळी उघडकीस आले. एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी येऊन रितसर पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मुंबई : प्रतिनिधी जून महिन्याचा पंधरवडा ओलांडला तरीही पावसाचा काही थांगपत्ताच नव्हता. पण, अखेर ज्याची प्रतीक्षा होती तो मान्सून आता आपल्या दारावर धडकण्यासाठी तयार झाला आहे. नुकतीच मान्सूनबाबत आनंदाची बातमी समोर आली आहे. हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात शनिवारपासून मान्सून सक्रीय होण्याची शक्यता आहे. मुंबई हवामान विभागाने यासंदर्भातील अंदाज वर्तवला. सध्या कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात मान्सून पोहचला आहे. शनिवारपर्यंत त्याचा प्रवासा पुढील रोखाने सुरु होऊन तो विदर्भातील उर्वरीत भागातही दाखल होईल. हवामान खात्याच्या अंदाजानुसार कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पाउस पडेल. दरम्यान, कुठे मान्सून तग धरत नाही तर कुठे एकाएकी आलेल्या मुसळधार पावसाने सर्वांचीच…
मुंबई : प्रतिनिधी बारावीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता मागोमागच इयत्ता 10 वी परीक्षांचे निकालही जाहीर झाले आहेत. शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत निकाल जाहीर करण्यात आला. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर या परीक्षा घेण्यात आल्याचे सांगत शिक्षण मंडळांकडून सुरुवातीला काही मुद्दे स्पष्ट करुन सांगण्यात आले. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल 2022 या शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या परीक्षांचे निकाल आज दुपारी 1 वाजता जाहीर करण्यात आले आहेत. नऊ विभागीय मंडळातून 15 लाखांहून अधिक नियमित विद्यार्थ्यांनी या परिक्षेसाठी नोंदणी केली होती. एकूण 96.94 टक्के विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. यंदाच्या परीक्षांमध्ये कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक लागला तर मुलींनी यंदाही…
रावेर ः प्रतिनिधी राज्य विधानसभेचे माजी अध्यक्ष स्व.लोकसेवक मधुकरराव चौधरी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना पाल येथील सातपुडा विकास मंडळ संचालित कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात अभिवादन करण्यात आले. पाल येथे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा.हितेश फिरके होते. फैजपूरच्या धनाजी नाना महाविद्यालयाचे प्रा.डॉ. शरद बिऱ्हाडे व भालोदच्या कला आणि विज्ञान महाविद्यालयाचे प्रा.डॉ. मुकेश पवार यांनी, बाळासाहेब चौधरी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी प्रा.डॉ. बिऱ्हाडे यांनी स्व.चौधरी यांच्या शैक्षणिक, सामाजिक योगदानाबाबत मार्गदर्शन केले. प्राचार्य फिरके यांनी स्व. बाळासाहेब चौधरी यांच्या दलित, शोषित, पीडितांच्या उद्धारासाठी केलेल्या कार्याची माहिती दिली. प्रास्ताविक प्रा.चारुलता चौधरी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.प्रदीप खैरे यांनी केले…
भुसावळ ः प्रतिनिधी कायद्याचा वापर करून शहरातील वाढती गुन्हेगारी थोपवावी, असे प्रतिपादन जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी केले. शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. पोलिस वसाहतीमध्ये असलेल्या जुन्या डीवायएसपी कार्यालयाच्या इमारतीमध्ये शहर वाहतूक शाखेचे कार्यालय स्थलांतरीत करण्यात आले आहे.त्याचे उद्घाटन पोलिस अधीक्षक डॉ. मुंढे यांच्याहस्ते झाले. पुढे बोलताना डॉ.मुंढे म्हणाले की, वाहतूक शाखेला कार्यालय उपलब्ध करून दिलेले आहे.त्यामुळे शाखेने नागरिकांच्या मनात विश्वास निर्माण करून जास्तीत जास्त चांगली सेवा द्यावी. शहर वाहतूक शाखेला स्वतंत्र कार्यालय नसल्याने हे कार्यालय देण्यात आले आहे. या इमारतीची दुरुस्ती करून शहर वाहतूक शाखेचे कार्यालय तयार करण्यात आले, असे त्यांनी सांगितले. कार्यालयाची…
जळगाव ः प्रतिनिधी दहावीनंतर आयटीआय करणाऱ्या विद्यार्थ्यांना या शैक्षणिक वर्षापासून पॉलिटेक्निक डिप्लोमाच्या कोणत्याही शाखेत थेट द्वितीय वर्षाला प्रवेश घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे आयटीआयच्या सुमारे 10 हजार विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. याद्वारे पॉलिटेक्निक महाविद्यालयांतील जागाही भरण्यास मदत होऊ शकेल. दरम्यान, यंदा खान्देशात पॉलिटेक्निकच्या प्रथम वर्षासाठी 29 महाविद्यालयात 7 हजार 482 जागा उपलब्ध आहे. दहावीनंतरच्या प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी प्रक्रिया (ऑनलाइन पोर्टल) सुरू झाली असून दहावीच्या निकालापूर्वी या पोर्टलद्वारे प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना वैयक्तिक माहिती भरून प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया 2 जूनपासून सुरू झाली असून विद्यार्थ्यांना 30 जूनपर्यंत नोंदणी…
जळगाव ः प्रतिनिधी शाळेची घंटा वाजली असून मुले दफ्तर घेऊन वर्गातही पोहचली आहेत मात्र पहिली ते आठवीच्या विद्यार्थांच्या हातात अद्याप बालभारतीची पुस्तके पडलेली नसल्याने त्यांची चिंता वाढली. राज्य बालभारती विभागाकडून यंदा कमी प्रणात झालेल्या छपाईमुळे पुस्तके आली नसल्याने विक्रेत्यांकडून ती पुढील दहा दिवसात मिळतील, असे सांगितले जाते आहे. राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाकडून (बालभारती) बाजारपेठेत विक्री करण्यासाठी आणि सर्व शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना मोफत वितरणासाठी पुस्तकांची छपाई केली जाते. जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या 3000 शाळांतील पहिली ते आठवीचे सुमारे 4 लाख विद्यार्थी या पुस्तकांच्या प्रतिक्षेत आहेत. पाठपुरावा सुरु बालभारतीच्या पुस्तकांसाठी पाठपुरावा बालभारतीच्या इतिहास, हिंदीसह अन्य काही विषयांची पुस्तके मिळत नाहीत.…
जळगाव ः प्रतिनिधी दुय्यम निबंधक कार्यालयात मालमत्तेसंदर्भात खरेदी विक्री झाल्यानंतर तेथून ऑनलाइन प्रक्रियेद्वारे थेट मंडळ अधिकारी व तलाठ्यांकडे जाते. त्या व्यवहाराची 30 दिवसात नोंद घेणे बंधनकारक आहे; मात्र जिल्ह्यातील मंडळ अधिकारी व तलाठीस्तरावर तब्बल 1024 फेरफार नोंदी प्रलंबित आहेत. तर जळगाव तालुक्यात अशा 104 नोंदी प्रलंबित आहेत. तलाठ्यांनी संबंधितांना नोटीस न दिल्याने जिल्ह्यात 288 फेरफार नोंदी प्रलंबित आहेत. राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात ऑनलाइन फेरफार प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. त्या अंतर्गत दुय्यम निबंधक कार्यालयात मिळकतीच्या नोंदणीसह फेरफार प्रक्रिया एकाचवेळस करण्यात येत आहे. त्यामुळे मिळकतीवर फेरफार लावण्यासाठी नागरिकांना तलाठ्यांकडे जावे लागत नाही. दुय्यम निबंधक कार्यालये महसूल कार्यालयांशी जोडण्यात आलेले…