Author: Saimat

साईमत चाळीसगाव प्रतिनिधी घरी सोडून देण्याचा बहाणा करत सात वर्षाच्या अल्पवयीन मुलीसोबत नराधम तरुणाने दुष्कृत्य केल्याचा प्रकार चाळीसगाव शहरात उघडकीस आला आहे. घटनेप्रकरणी पिडीत अल्पवयीन बालिकेच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश उर्फ सुपड्या विठ्ठल पाटील असे संशयीत आरोपीचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे. सात वर्षाच्या बालिकेला स्टेशन रोड परिसरातून संशयीत आरोपीने स्कुटीवर बसवले. तुला घरी सोडून देतो असा बहाणा करत त्याने तिला न्यायालय परिसरातील टेनीस मैदान भिंतीच्या आडोशाला नेत तिच्यासोबत दुष्कृत्य केले. हा प्रकार पिडीत बालिकेने तिच्या आईला कथन केला. तिच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार दाखल गुन्ह्याचा पुढील तपास स.पो.नि. विशाल…

Read More

साईमत कजगाव प्रतिनिधी कजगाव.ता.भडगाव येथील एकोणतीस वर्षीय तरुणाचा उष्मघाताने मृत्यू झाल्याने कजगाव गावात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. कजगाव येथील रहिवासी अक्षय रत्नाकर सोनार (वय२९)याला दिनांक १३ च्या संध्याकाळी अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला चाळीसगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उष्मघाताने अचानक त्याचा मृत्यू झाला नेहमी हिरारीने मित्रांच्या गोतावळ्यात राहणारा हसतमुख तरुण मुलगा अचानक गेल्याने कजगाव परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. मयत तरुणांच्या पश्चात दीड वर्षाचा मुलगा, पत्नी,आई,वडील,एक भाऊ असा परिवार आहे. मयत अक्षय हा सुवर्णकार समाजाचे माजी अध्यक्ष रत्नाकर सोनार यांचा थोरला चिरंजीव होता त्याच्यावर दि. १४ रोजी सकाळी अकरा वाजता कजगाव येथे शोकाकुल वातावरणात…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील शल्यचिकित्सा विभागाने थायरॉईड ग्रंथीने ग्रस्त दोन रुग्णांना शस्त्रक्रियेद्वारे गाठ काढून दिलासा देण्यात यश मिळविले आहे. रुग्णांना नुकताच रुग्णालयातून निरोप देण्यात आला असून, अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी विभागाच्या वैद्यकीय पथकाचे अभिनंदन केले आहे. याबाबत माहिती अशी की, सुरेश भास्करराव पाटील (वय ३२, रा. भडगाव) यांच्या गळ्याला गेल्या १ वर्षापासून गाठ झालेली होती.  त्यांचे कुटुंब अत्यंत साधे व मध्यमवर्गीय आहे. त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात शल्यचिकित्सा विभागात तपासणी केली. तेथे वैद्यकीय पथकाने ही गाठ थायरॉईड ग्रंथीची असल्याने शस्त्रक्रिया करणे गरजेचे आहे, असा निष्कर्ष काढला. त्यामुळे सुरेश पाटील यांची शस्त्रक्रिया करण्यात आली.…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विधी अभ्यासक्रमाच्या प्रात्यक्षिक/लेखी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून या परीक्षा २२ मे ऐवजी २५ मे पासून सुरु होतील. विद्यार्थी व महाविद्यालयांकडून करण्यात आलेल्या मागणी नुसार विद्यापीठाच्या विधी विद्याशाखेतील विविध अभ्यासक्रमाच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. या परीक्षा पुढील प्रमाणे आयोजित करण्यात येत आहेत. सुधारित वेळापत्रकानुसार विधी विद्याशाखेच्या प्रात्यक्षिक परीक्षा २५ मे ते २ जून या कालावधीत होणार आहेत. तसेच बी.ए. एल.एल.बी. सेमीस्टर ३,४,७, ८, ९, १० व एल.एल.बी. सेमीस्टर ३, ४, ५, ६ या सर्व वर्गांच्या  लेखी परिक्षा १० जून पासून सुरु होतील. विधी पदविका अभ्यासक्रमाच्या लेखी परीक्षा…

Read More

साईमत मुंबई प्रतिनिधी  कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजप आणि जेडीएस पक्षाला धूळ चारत काँग्रेसने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. विधानसभेच्या २२४ जागांपैकी तब्बल १३५ पेक्षा अधिक जागांवर आघाडी घेत काँग्रेसने कर्नाटकाची सत्ता स्वबळावर काबीज केली आहे. सर्व जागांवरील अंतिम निकाल येणे अद्याप बाकी आहे. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. कर्नाटकाचा विचार केल्यास तिथे कोणतेच सरकार दुसऱ्यांदा सत्तेत येत नाही. एखादा दुसरा अपवाद सोडला, तर ते बदलत असते. यावेळी आम्ही तो ट्रेंड तोडू शकू असे वाटत होते. पण, ते आम्ही तो ट्रेंड तोडू शकलो नाही. २०१८साली भाजपच्या १०६ जागा निवडून येत ३६ टक्के मत…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी बोगस चिनी लोन अॅप डाउनलोड करण्यास सांगून त्याद्वारे फिर्यादीची संशयित आरोपींनी सर्व माहिती काढून घेतली. त्यानंतर त्यांच्या विविध नातेवाईकांना अश्लील संदेश पाठविले. तसेच, १० लाखाच्यावर फसवणूक केल्याप्रकरणी सायबर पोलीस स्टेशन, जळगावच्या अधिकाऱ्यांनी यशस्वी तपास लावला. थेट कर्नाटकातून भारतातील मास्टरमाईंड असणारे दोन संशयित गुन्हेगारांना पकडून आणले. तसेच, त्यांच्याकडून रक्कम जमा करून पोलीस उपअधिक्षक संदिप गावित यांचे हस्ते फिर्यादी यांना २ लाख रुपये परत देण्यात आले आहे. सदर गुन्हयातील फिर्यादी हे पहुर, ता. जामनेर येथील रहिवाशी असुन त्यांनी दि.०९ जुलै ते दि. २१ सप्टेंबर २०२२ चे दरम्यान विविध नावाचे ऑनलाईन लोन देणारे ३५ मोबाईल लोन अॅप्लिकेशन फिर्यादी यांना मोबाईल…

Read More

साईमत चोपडा प्रतिनिधी आदिवासी कोळी समाजाच्या वतीने अमळनेर प्रांताधिकारी कार्यालयांवर सामाजिक कार्यकर्ते जगन्नाथ बाविस्कर यांनी पुकारलेल्या अन्नत्याग सत्याग्रहाचा लढा यशस्वी झाला असून आंदोलनाच्या पाचव्या दिवशी प्रभारी प्रांताधिकारी कैलास कडलग यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने प्रलंबित अनुसूचित जमातीचे ६० जात प्रमाणपत्र देण्यात आले. कोळी समाजाला न्याय दिल्याने सत्याग्रही समाज बांधवांना लिंबू सरबत देवून उपोषणाची सांगता करण्यात आली. या आंदोलनामुळे आता अमळनेर व चोपडा तालुक्यातील शेकडो कोळी समाजबांधवांना टोकरे कोळीचे (एस.टी.) दाखले मिळणार आहेत. दि. ८ मे पासून अमळनेर येथील प्रांत कार्यालयासमोर आदिवासी टोकरे कोळीचे जातप्रमाणपत्र सुलभ पद्धतीने मिळावे यासाठी चोपडा महर्षी वाल्मिकी समाज मंडळाचे तालुका संपर्कप्रमुख जगन्नाथ बाविस्कर गोरगावलेकर यांनी समाजबांधवांसह अन्नत्याग सत्याग्रह…

Read More

साईमत चोपडा प्रतिनिधी येथील शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने रात्री ८.३० व १०.३० वाजेची चोपडा ते धरणगावमार्गे जळगाव जाणारी बससेवा पुर्णवत सुरु करण्याची मागणीचे निवेदन आगारप्रमुख महेंद्र पाटील यांना देण्यात आले. यावेळी भाजपा शहराध्यक्ष गजेंद्र जैसवाल व सर्व सहकारी यांनी आगारप्रमुख यांच्या लक्षात आणून दिले की सदर बससेवा बंद झाल्यामुळे प्रवाशांना रात्रभर बसस्थानकावर मुक्काम करावा लागतो, अशाप्रकारे तालुकावासियांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. या त्रासापासून प्रवाशांची सुटका व्हावी म्हणून लवकरात लवकर बससेवा पुर्णवत सुरू करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावर आगारप्रमुख महेंद्र पाटील यांनी येत्या दोन ते तीन दिवसात बससेवा सुरू होईल असे सांगितले. सदर निवेदन देतेवेळी भाजपा शहराध्यक्ष…

Read More

साईमत मलकापूर प्रतिनिधी येथील मौजे वाकोडी ता. मलकापुर जि. बुलडाणा येथील विद्या विकास महाविद्यालय असुन सदर संस्थेचे संचालक प्रा. हितेश पाटील व मुख्याध्यापक दिलीप अढाव यांच्या संगनमताने विद्यार्थ्यांची पास होण्यासाठी 10 ते12 हजार रुपये घेऊन विद्यार्थ्यांची मोठया प्रमाणात फसवणूक करीत आहे अशी तक्रार अँटी करप्शन ब्युरो बुलढाणा यांच्याकडे संदीप भगत यांनी केली आहे . सदर तक्रारी मध्ये पुढे नमूद करण्यात आले आहे की प्रत्येक वर्षी महाविद्यालयामध्ये १२ वी कला व विज्ञान शाखेची परिक्षा होत असते या मध्ये विद्यार्थ्यांना परिक्षेसाठी त्यांचेच महाविद्यालय सेंटर मिळते. याचा फायदा घेत प्राध्यापक हितेश पाटील व अढाव सर हे संगनमताने विज्ञान शाखेच्या बिद्यार्थ्यांकडुन जास्त टक्केवारीचे आमिष…

Read More

साईमत अमळनेर प्रतिनिधी अमरावती येथे विवाह सोहळा आटोपून परतलेल्या अमळनेर येथील विवाहितेचा उष्माघाताने मृत्यू झाला. रूपाली गजेंद्रसिंग राजपूत (33) असे मृत विवाहितेचे नाव आहे. याबाबत अमळनेर येथील पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. सध्या जिल्ह्याचा पारा ४४.९ अंश या उच्चांकी पातळीवर आहे. यामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. अमळनेर येथील विवाहितेला उष्माघातामुळे आपला जीव गमवावा लागला. रूपाली राजपूत या गुरुवारी अमरावती येथे सोहळ्यासाठी गेल्या होत्या. तेथून त्या सायंकाळी परतल्या. आल्यानंतर रूपाली यांना मळमळ, उलट्या व चक्कर आली. त्यामुळे पती गजेंद्रसिंग ऊर्फ अतुल पाटील यांनी त्यांना तांबेपुरा येथील खासगी डॉक्टरांकडे नेते. डॉक्टरांनी उष्माघात असल्याचे सांगत प्राथमिक औषधोपचार केले. मात्र, सकाळी उठल्यानंतर…

Read More