साईमत, नाशिक: प्रतिनिधी अधिक मासात लेक-जावयाला यथायोग्य पाहुणचार करण्याची परंपरा आहे. चांदीचे ताट, ताह्मण, निरांजन, गाय-वासरूची प्रतिकृती, दागिना देण्याची प्रथा आजही कायम आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरातील सराफ बाजारात महिन्याभरात कोटींची उलाढाल झालेली आहे. दर तीन वर्षांनी एकदा अधिक महिना येतो. या महिन्यात जावयाला घरी बोलावून पंचपक्वान्न जेवण देण्यासह विविध सोन्या-चांदीच्या वस्तूंची भेट देण्याची परंपरा आजही पाळली जाते. 18 जुलैपासून सुरू झालेल्या अधिक मासाचा शेवट 15 ऑगस्टला झाला. या काळात सराफा बाजाराला मोठी झळाली मिळालेली दिसली. चांदीचे ताट, ताह्मण, निरांजन, गाय-वासरू, ताट, भांडे, समई, चांदीचे दिव्ो, कॉइन, तसेच सोन्याची अंगठीची बाजारपेठेत चलती होती. अधिक मासात सराफ बाजारात झालेली उलाढाल श्रावणात कायम…
Author: Saimat
साईमत, नाशिक: प्रतिनिधी पावसाळा सुरू होऊन अडीच महिन्यानंतरही जिल्ह्यात समाधानकारक पाऊस न पडल्याने शेतकऱ्यांवर आता दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. कपाशी, मका, बाजरी, सोयाबीन आदी पिके जागेवरच करपल्याने शेतकऱ्यांना पुन्हा बियाणे खरेदी करण्याची व्ोळ आल्याचे चित्र जिल्ह्याभरात दिसून येत आहे. जिल्ह्यात खरिपाची 91.58 टक्के पेरण्या झाल्या आहेत. जुलैअखेर खरिपाची पेरणी होते. त्यानंतर लेट खरीप व रब्बीचा हंगाम सुरू होतो. या काळात लाल कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात होते.हा कांदा चांदवड, येवला, नांदगाव, मालेगाव या भागात मोठ्या प्रमाणात घेतला जातो. तर कळवण, देवळा, सटाणा या भागात लाल कांद्यासह उन्हाळ कांद्याची लागवड होते. लाल कांदा (पोळ) लागवडीयोग्य रोप तयार झालेले असले तरी अत्यल्प…
साईमत, इगतपुरी: प्रतिनिधी स्मशानभूमीत जायला रस्ता नसल्याने चक्क घरासमोरच अंत्यविधी करण्यात आल्याचे आदिवासी बहुल इगतपुरी तालुक्यातील धक्कादायक घटना समोर आली आहे. स्मशानभूमीत जायला रस्ता नसल्याने गावातील घरासमोरच अंत्यविधी करण्याची व्ोळ मृताच्या नातेवाईकांवर आली आहे. इगतपुरी तालुक्यातील उंबरकोण गावामधील ही घटना आहे. स्मशानभूमीकडे जाणारा नेहमीच्या वहिवाटीचा रस्ता स्थानिक शेतकऱ्याने बंद केल्यामुळे हा प्रसंग ओढावला असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. गावातील मयत ध्रुपदाबाई चंदर सारुक्ते या महिलेचे 20ऑगस्ट रोजी निधन झाले. अंत्ययात्रा व अंत्यविधी करण्यासाठी स्मशानभूमीवर जाणारा रस्ताच स्थानिक शेतकऱ्याने बंद केल्यामुळे मृताच्या कुटुंबाने आपल्या राहत्या घरासमोर अंत्यविधी केला आहे. या गंभीर प्रकारास संपूर्णपणे ग्रामपंचायत जबाबदार असल्याचे मृताच्या कुटुंबियांनी सांगितले आहे. तसेच महसूल…
साईमत, नाशिक : प्रतिनिधी कांदा दरवाढीच्या भीतीने केंद्र सरकारने 40 टक्के निर्यात शुल्क लादल्याच्या निषेधार्थ नाशिक जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशनने जिल्ह्यातील कांदा लिलाव आजपासून बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सकाळपासून नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट असून विविध ठिकाणी शेतकऱ्यांसह राजकीय संघटनांनी आक्रमक होत रस्त्यावर उतरल्याचे चित्र दिसत आहे. जिल्ह्यातील वणी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी सुरत-शिर्डी महामार्ग रोखला आहे. त्यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे. याव्ोळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सरकारच्या शासकीय आदेशाची होळी देखील करण्यात आली. दरम्यान, याव्ोळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी केंद्र सरकारला महागाई दर कमीच…
साईमत, जळगाव , प्रतिनिधी स्वत:चे आधी आत्मपरिक्षण करा. आपली शक्तीस्थाने, कमजोरी काय आहेत? दोन्ही जाणून घ्या. आपल्याला काय संधी आहेत आणि काय धोखे आहेत हे ही तपासा. त्यानंतर काय करायचे आहे त्याचा विचार करा. कोणकोणत्या गोष्टी टाळाव्या याबाबत डॉ. उदय निरगुडकर म्हणाले, नाऊमेद करणाऱ्या अनेक गोष्टी घडत असतात, पण त्याला बळी पडू नये. निसर्गाने प्रत्येकाला काही गुण दिलेले आहेत. नैराश्याचे शिकार होऊ नका, विफलतेची भावना मनात आणू नका. अयशस्वी झाल्यावर किंवा मागे पडल्यावर पक्षपात, अन्याय झाला – केला गेला, अशी भावना मनात येऊ शकते, अशा भावनांना अजिबात थारा देऊ नका. उलट जिगर दाखवा. यशस्वी व्यक्तीला यश का मिळाले? याचा अभ्यास…
साईमत, प्रतिनिधी, जळगाव बुलढाणा जिल्ह्यातील २२ वर्षीय तरुणाचा मन्यारखेडा(ता.जळगाव) तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबत नशिराबाद पोलिस स्टेशनात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अंकुश शिवाजी सुरळकर (वय२२), रा.धामणगाव (ता.मोताळा जि.बुलढाणा) असे मृत तरुणाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, अंकुश सुरळकर हा जळगाव एमआयडीसी परिसरात राहत असलेल्या बहिण व मेव्हणे अनिल दामू इंगळे यांच्याकडे गेल्या आठ दिवसांपासून नोकरीच्या शोधासाठी आला होता. गेल्या आठ दिवसांपासून तो नोकरीच्या शोधात होता. गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे नोकरी शोधायला जात असल्याचे सांगून बहिणीच्या घरून गेला होता. त्यानंतर तो घरी परतलाच नाही. त्याच्या नातेवाईकांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला परंतु काहीच माहिती मिळाली…
साईमत, जळगाव, प्रतिनिधी देशाच्या रक्षणासाठी घरादाराचा त्याग करून सीमेवर लढणाऱ्या सैनिक बांधवांसाठी हृदयाचे भावा-बहिणीचे नाते जपणारा रक्षाबंधन सणानिमित्त दरवर्षाप्रमाणे आपले कर्तव्य मानून नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेतर्फे ५०० राख्या पाठविण्यात आल्या. या भावा-बहिणीचे नाते दृढ करणाऱ्या राख्या येथील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातर्फे पाठवण्यात आल्या. याप्रसंगी माननीय जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी संजय गायकवाड, सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी संजय रामराव गायकवाड, नितीन पाटील, रतिलाल महाजन आदी उपस्थित होते. या राख्या सीमावरती भागात असलेल्या सैनिक बांधवांसाठी लेह,लद्दाख, तवांग, सिक्कीम, नभुला पास, पुंछ सेक्टर,तंगधार इत्यादी ठिकाणी पाठविण्यात आल्या. सैनिक कल्याण कार्यालयास या राख्या पाठवण्यासाठी सोपविण्यात आल्या. याप्रसंगी नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा मनिषा पाटील, नेहा जगताप,…
साईमत, प्रतिनिधी, जळगाव येथील दोघांनी असामान्य अशी १०० वी हाफ मॅरेथॉन (२१कि.मी.रनिंग ) पूर्ण केली. जळगाव शहरातून प्रथमच असा विक्रम करणारे भारत पेहवानी (४७वय) आणि होरीलसिंग राजपूत (५३वय) अशी त्यांची नाव आहेत. भारत पहवानी यांचे दाणा बाजारात दुकान आहे तर होरिलसिंग राजपूत यांचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे सकाळी मेहरूण तलाव ट्रॅकवर ठिकठिकाणी रांगोळी, ढोल-ताशे, फुलांचा वर्षाव करून त्यांच्या विक्रमाला शहरवासीयांनी दाद दिली. त्यांच्या १००व्या हाफ मॅरेथॉनचा फिनिश लाईनला सोबत होते १०० जळगाव रनर्स ग्रुपचे धावपटू व १०० ओम योग ग्रुपचे सदस्य, तसेच पिंकेथॉन ग्रुपच्या महिलांचा सहभाग लक्षणिय होता. हाफ मॅरेथॉन पूर्ण केल्यानंतर त्या दोघांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे…
साईमत,धुळे : प्रतिनिधी सांगवीतील दंगलीनंतर आदिवासी युवकांवर अन्याय होत असल्याचे सांगत विविध आदिवासी संघटनांतर्फे शुक्रवारी धुळे येथे मोर्चाचे आयोजन केले होते. मात्र, मोर्चाला परवानगी नाकारल्याने निवडक पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांच्या कार्यालयात जाऊन निव्ोदन दिले. सांगवी येथे विश्व आदिवासी दिनानिमित्त आदिवासी क्रांतिकारकांच्या प्रतिमा असलेले बॅनर्स १० ऑगस्टला चारण समाजातील लोकांनी फाडले. त्याबाबत विचारणा करण्यासाठी गेलेल्या आदिवासींना चारणांनी जातिवाचक शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. त्यात तीन जण गंभीर जखमी झाले. सांगवी (ता. शिरपूर) येथील दंगल नियंत्रणासंदर्भात पोलिसांचे वर्तन आक्षेपार्ह असून, या दंगलीची ‘सीबीआय’तर्फे चौकशी करावी, शिरपूर उपविभागाचे पोलिस उपअधीक्षक सचिन हिरे व सांगवी पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक जयेश खलाणे यांची बदली…
साईंमत, जळगाव : प्रतिनिधी कंजरभाट समाजातर्फे कंजरभाट समाज मंदिराच्या प्रांगणात प्रथमच स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी कंजरभाट समाजाचे ज्येष्ठ नेते बिरजू नेतलेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी समाज बांधवांसह विविध स्तरातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. याप्रसंगी ज्येष्ठ सामाजिक नेत दीपक माछरेकर, ह.भ.प.सनातन महाराज, सामाजिक कार्यकर्ते विजय दहियेकर, सूर्यभान अभंगे, कंजरभाट समाजाचे संस्थेचे अध्यक्ष विजय अभंगे, कार्याध्यक्ष शशिकांत बागडे, उपाध्यक्ष सचिन बाटुंगे, सचिव राहूल नेतलेकर, खजिनदार योगेश बागडे, मोहन गारुंगे, नरेश बागडे, मोहन चव्हाण, मंगल गुमाने, संजय गारुंगे, विजय बागडे, संतोष इंद्रेकर, प्रदीप नेतलेकर, प्रकाश दहियेकर, संतोष बागडे, सुरज गारुंगे, अविनाश अभंगे, विशाल नेतले, अमित गागडे, उत्तम गुमाने, राकेश गारुंगे, किरण…