साईमत, जळगाव : प्रतिनिधी गणेशोत्सव येत्या काही दिवसांवर पोहोचला असून संपूर्ण तालुक्यात या उत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. या संपूर्ण गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासह शांततामय वातावरणात उत्सव साजरा होणे आवश्यक आहे. यामुळेच जळगाव तालुक्यात सामाजिक सलोखा राखण्यासाठी सर्व नागरिक, गणेश मंडळ, सरपंच, शहरातील नगरसेवक व विविध संस्था, सर्व पदाधिकारी यांनी ‘एक गाव, एक गणपती’ तसेच शहरात ‘एक वार्ड, एक गणपती’ साजरा करण्यासाठी पुढाकार घ्यावा व प्रशासनास मदत करावी, असे आवाहन जळगाव तालुका युवासेनेच्या वतीने उपतालुका प्रमुख स्वप्निल सोनवणे यांनी केले आहे. राज्यात दरवर्षीप्रमाणे १९ ते २८ सप्टेंबर २०२३ या कालावधीत सार्वजनिक गणेशोत्सव मोठया उत्साहात साजरा होणार आहे.…
Author: Saimat
साईमत, नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील सर्वाधिक फि घेणाऱ्या वकिलांमध्ये ज्यांच्या नावाचा समाव्ोश होतो. ते प्रमूख नाव म्हणजे हरीश साळव्ो. हरीश साळव्ो यांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा आहे. अर्थात, ही चर्चा आहे त्यांच्या तिसऱ्या लग्नाची. भारताचे माजी सॉलिसिटर जनरल हरीश साळव्ो यांचे वय ६८ आहे. लंडनमधील एका भव्य दिव्य कार्यक्रमात हरीश साळव्ो यांनी त्रिना हिच्याशी लग्न केले. या लग्न सोहळ्याला नीता अंबानी, ललित मोदी, सुनील मित्तल यांच्यासह उद्योग जगतातील दिग्गज लोकांची उपस्थिती होती. हरीश साळव्ो यांनी पहिले लग्न मीनाक्षी यांच्यासोबत केलं होतं. त्यांना दोन मुली आहेत. त्यानंतर त्यांनी २०२० मध्ये कॅरोलिन ब्रासार्ड हिच्याशी लग्न केले. मात्र, दुसरे लग्न देखील फार…
साईमत, जालना : प्रतिनिधी मंत्र्यांच्या शिष्टमंडळासोबत चर्चा केल्यानंतरही मनोज जरांगे यांनी उपोषणावर ठाम राहण्याचा निर्णय जाहीर केला आहे. आंदोलन मागे घेणार नाही, पण सरकारला चार दिवसांचा व्ोळ देत असल्याचे शिष्टमंडळाच्या चर्चेनंतर जरांगे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मराठा आरक्षणावर अध्यादेश काढण्यासाठी आपण सरकारला चार दिवसांची मुदत देत आहोत. तोपर्यंत आपण उपोषण सुरुच ठेवणार असल्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला आहे. शिष्टमंडळाची भेट घेतल्यानंतर मनोज जरांगे यांनी सांगितलं की, आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी संपर्क होत नाही. पण त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर राज्य सरकारचे हे शिष्टमंडळ उद्या पुन्हा एकदा आपली भेट घेणार आहेत आणि या प्रश्नी चर्चा करणार आहेत. मनोज जरांगे यांनी…
साईमत, जळगाव ः प्रतिनिधी मराठा समाजावर झालेल्या लाठीचार्जवर देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागितली आहे. त्यांनी माफी मागितली म्हणजे त्यांनी एक प्रकारे गुन्ह्याची कबुली दिली आहे. आता फडणवीसांनी राजीनामा देण्याबाबत मागील घटनांमधून प्रेरणा घ्यावी असे सुचक विधान शरद पवार यांनी केली आहे. शरद पवार यांची मंगळवारी जळगावात सभा होती. त्याआधी त्यांनी पत्रकार परिषदेत संवाद साधला. पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. शरद पवार म्हणाले की, गोवारींवर लाठी हल्ला झाला नव्हता, तिथे चेंगराचेंगरी झाली होती. या घटनेनंतर त्या खात्याचे मंत्री मधुकर पिचड यांनी ताबडतोब राजीनामा दिला होता. त्यानंतर मुंबईतील एका घटनेनंतर गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी राजीनामा दिला होता. पूर्वीच्या या २…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी जालना येथील उपोषण करणाऱ्या लोकांवर लाठीहल्ला करण्यात आला. पुरुष, महिला, लहान मुले जखमी झाले. शेतकरी, शेतमजूर अनेकांवर लाठीहल्ला केला. राजकारण्यांकडून सत्तेचा गैरवापर करण्यात आला. आया बहिणींवर लाठीहल्ला करण्याची ज्यांची नीती असेल त्यांच्या हातात सत्ता ठेवणार नाही, या सगळ्यांचा आपण शंभर टक्के पराभव करू, या लढाईसाठी आपण सगळ्यांनी तयार राहिले पाहिजे, असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केले. यावेळी व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, एकनाथराव खडसे, महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे, गुलाबराव देवकर, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, ॲड. रविद्रभैय्या पाटील, सतिष पाटील, रोहीत पवार यांची उपस्थिती होती. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मंगळवारी शहरातील सागरपार्क मैदानावर जाहीर सभा…
साईमत, मुंबई ः प्रतिनिधी बीसीसीआयने आगामी वनडे वर्ल्डकपसाठीच्या टीमची घोषणा केली आहे.येत्या ५ ऑक्टोबरपासून आयसीसी वनडे वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. यासाठी १५ जणांच्या स्क्वॉडची घोषणा करण्यात आली आहे. यंदाचा वनडे वर्ल्डकप भारतात आयोजित केला जात असल्याने टीम इंडिया जिंकण्यासाठी प्रबळ दाव्ोदार मानली जात आहे. याव्ोळी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला हा वर्ल्डकप खेळायचा आहे. रोहित शर्मा कर्णधारपदी टीम इंडिया प्रबळ दाव्ोदार म्हणून वर्ल्डकपमध्ये उतरणार आहे. ओपनर रोहित शर्माकडे टीमचे कर्णधारपद सोपवण्यात आले असून हार्दिक पांड्याला उपकर्णधार बनवण्यात आले आहे. केएल राहुल आणि इशान किशन यांचा विकेटकीपर म्हणून टीममध्ये समाव्ोश करण्यात आला आहे.याशिवाय नुकतीच सर्जरी झालेल्या केएल राहुललाही संघात स्थान…
साईमत बोदवड प्रतिनिधी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावामध्ये मराठा आरक्षण मागणीच्या उपोषण करणाऱ्या मराठा समाजाचे कार्यकर्त्यांवर पोलिसांनी अमानुष हल्ला केल्याच्या निषेधार्थ सोमवारी ४ सप्टेंबर रोजी शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती पासुन मराठा समाजाचा मुक मोर्चा काढत मलकापूर चौफुलीवर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी मराठा समाजाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. याबाबत अधिक माहिती अशी की, जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचे आज राज्याच्या विविध भागांमध्ये संतप्त पडसाद उमटले. मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी रस्त्यांवर उतरून आंदोलन करत राज्य सरकारचा निषेध केला. जालना आणि धाराशिवमध्ये बंदला हिंसक वळण लागले. याला जबाबदार गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे आहेत. त्यामुळे…
साईमत जळगाव प्रतिनिधी शिवमहापुराण कथेच्या शेवटच्या दिवशी माता गिरिजा यांनी वटवृक्षाची पूजा कशी केली, प्रभू पुरुषोत्तम श्री रामचंद्र यांना भगवान शिव शंकरांनी कसे दर्शन देऊन प्रणाम केला, गुरु शुक्राचार्य यांची उत्पत्ती आणि उद्धार कसा झाला, तसेच देवी सती यांच्या मनातील संशय कसा दूर झाला आणि रूद्राक्ष महिमा काय, रूद्राक्ष कसा ओळखणार, योग्य धारण केल्याने त्याचे फळ कसे मिळते, या सर्वविषयी महामंडलेश्वर संत श्री बृजभूषणजी (बापू) शास्त्री यांनी कथेत विषद केले. महामंडलेश्वर संत श्री बृजभूषणजींचे स्वागत ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांनी तर स्वरूप लुंकड व डी.डी.बच्छाव सर यांनी सपत्निक शिवमहापुराण ग्रंथाचे पूजन केले. पाचव्या दिवसाच्या कथाप्रारंभावेळी कथामंचावर माजी विधानसभा सदस्य स्मिताताई…
साईमत जळगाव प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज जिल्हा दौऱ्यावर येत असून सागर पार्क मैदानावर त्यांची भव्य जाहीर सभा होणार आहे. या जाहीर सभेच्या तयारीची राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथराव खडसे,माजी मंत्री गुलाबराव देवकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा अॅड. रोहिणीताई खडसे, जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्र पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांची जळगावातील सागर पार्क मैदानावर भव्य अशी जाहीर सभा होणार आहे या सभेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस कडून जोरदार तयारी केली गेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथराव खडसे यांच्यासह माजी मंत्री गुलाबराव देवकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी आज…
साईमत जळगाव प्रतिनिधी केसीई संस्थेच्या इंस्टीट्यूट ऑफ मैनेजमेंट एंड रिसर्चच्या एमबीए आणि एमसीएच्या विद्यार्थ्यांसाठी आज आयबीएम ह्या जागतिक कंपनीच्यावतीने तीन तासांचा जॉब रेडीनेस ट्रेनिंग वर्कशॉप घेण्यात आला. आयबीएमच्या सीएसआर बोक्स तर्फे अहमदाबादच्या तन्वी शाह यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. या ट्रेनिंग वर्कशॉपला एमबीए आणि एमसीएचे एकूण २११ विद्यार्थी उपस्थित होते. वर्कशॉपमध्ये तन्वी शाह यांनी विद्याथ्यांना रेज्युमे काय असतो, एचआर किती वेळ एका रेज्युमेला देतात, तो कसा निवडला जातो, त्याला बनविण्याची योग पद्धत कशी असते, त्यानंतर इंटरव्यू मध्ये कसले प्रश्न विचारले जातात, त्यांची उत्तरे कश्याप्रकारे द्यावीत, परिधान कसा असावा, बॉडी लैन्ग्वेज कशी असावी, आत्मविश्वासाने उत्तर कसे द्यावे, स्वतःच्या क्षमतानुसार करिअर कसा निवडावा…