परभणी ः परभणीचे शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय जाधव यांनी आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री तानाजी सावंत यांच्यावर टीका केली आहे. निधीबाबत तानाजी सावंत कोणालाही विश्वासात घेत नाही. पैसे दिल्यावरच निधी दिला जातो, असा गंभीर आरोप संजय जाधव यांनी केला आहे. ते एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते. संजय जाधव पुढे म्हणाले की, “परभणी जिल्ह्याच्या निधीबाबत पालकमंत्री तानाजी सावंत कोणालाही विश्वासात घेत नाहीत. गेल्यावर्षीचा एक दमडीही निधी मिळाला नाही. कररुपातून उभा राहिलेला तो निधी आहे. स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात नसल्याने निधीचे मालक पालकमंत्री झाले आहेत.ते कोणालाच मोजायला तयार नाहीत.पैसे दिले, तरच निधी दिला जातो, अशी परिस्थिती जिल्ह्यात सुरु आहे. “जे शिंदे…
Author: saimat
नागपूर : राज्यात तलाठी भरतीची पहिल्या टप्प्यातील परीक्षा सुरू आहे. यात पेपरफूट झाल्याचा दावा माध्यमांनी केला तर पेपरफूट झालीच नाही, असे महसूल विभागाने स्पष्ट केले मात्र या प्रकरणात नाशिकमध्ये पकडलेल्या उमेदवारांकडे प्रश्नपत्रिका सापडल्या आहेत. त्याचा अर्थ काय? असा सवाल केला जात आहे. या संपूर्ण प्रकरणावर राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. रोहित पवार यांनी ट्विटरवर सांगितले की, “तलाठी भरतीच्या पहिल्याच दिवशी नागपूर आणि नाशिकमध्ये पेपर फुटल्याच्या घटना समोर आल्या.नोकरीच्या अपेक्षेने सामान्य कुटुंबातील मुले-मुली मोठ्या मेहनतीने अभ्यास करतात परंतु शासनाच्या निष्काळजीपणामुळे पेपरफूट होते आणि या सर्व युवा वर्गाच्या स्वप्नांवर पाणी फिरवले जाते.वन विभागाच्या परीक्षांचे पेपर फुटल्यावर…
पुणे : पुण्याच्या शिक्रापूर परिसरात दोन मुलींनी एका ज्येष्ठ महिलेला निर्दयीपणे मारहाण केल्याचा धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.पोलिसांनी याप्रकरणी दोन्ही तरुणींविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु केला आहे. दरम्यान, वृद्ध महिलेच्या अंगावर बसून तरुणीने तिला मारहाण केल्याचे व्हिडीओमधून समोर आले आहे. प्राप्त माहितीनुसार, मारहाण करणाऱ्या दोन बहिणी असून त्यांना त्यांची आईदेखील यामध्ये साथ देताना दिसत आहे तर मारहाण झालेली वृद्ध महिला ही शेजारी राहत असल्याची माहिती मिळत आहे. याबाबत शिक्रापूर पोलीस ठाण्यामध्ये दोन मुली आणि त्याच्या आई विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त केला जात…
मुंबई ः प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांवरून मनसे प्रचंड आक्रमक झाली आहे.राज ठाकरेंच्या दौऱ्यानंतर मनसेने ठिकठिकाणी खळ्ळंखट्याक सुरू केले आहे. संतप्त कार्यकर्त्यांनी काही ठिकाणी तोडफोडही केली.यावरुन शिंदे गटाच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी मनसेला डिवचले आहे. आधी माणगाव…नंतर राजापूर आणि आता रत्नागिरी…मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेवरून मनसेने आक्रमक पवित्रा घेतला. ‘अभी नही तो कभी नही’ असे म्हणत कंत्राटदार आणि प्रशासनाला धडा शिकवण्यासाठी मनसेने ठिकठिकाणी खळ्ळंखट्याक आंदोलन सुरू केले.चंद्रावर जाऊन खड्डे पाहण्यापेक्षा महाराष्ट्रातच खड्डे पाहा, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला होता.एकीकडे राज्यात गतीमान सरकार असल्याचा दावा मुख्यमंत्री वारंवार करतायेत मात्र दुसरीकडे खड्ड्यांमुळे जिकडे-तिकडे वाहतूक मंदावल्याची वास्तव आहे. दीपालीला सय्यद यांचा टोला मनसेच्या या आंदोलनावर शिवसेना…
गुरुग्राम ः हरियाणाच्या गुरुग्राममध्ये एक धक्कादायक घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. एका तरुणाने लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रेयसीवर स्क्रू डायव्हरने जीवघेणा हल्ला केला. सेक्ससाठी नकार दिल्याने नराधमाने तरुणीचा खून करण्याचा प्रयत्न केला. उत्तर प्रदेशमध्ये राहणाऱ्या आरोपीला गुरुग्रामच्या राजीव चौकातून पोलिसांनी अटक केली आहे.शिवम कुमार असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी शिवम विरोधात गुन्हा दाखल करून त्याच्यावर अटकेची कारवाई केली आहे. पीडित तरुणीने आरोप करत म्हटले की, शिवमने शारीरिक संबंध करण्यासाठी मला मजबूर केले. जेव्हा मी शिवमला शारीरिक संबंध करण्यासाठी नकार दिला, त्यावेळी त्याने माझ्या मानेवर स्क्रू डायव्हरने हल्ला केला. पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, पीडित महिला तिच्या नवऱ्यापासून वेगळे होऊन भाड्याच्या…
बीड ः आईच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या वडिलांना त्यांच्या अल्पवयीन मुलाने संपवल्याचा धक्कादायक प्रकार बीडमध्ये घडला. बीड जिल्ह्यातील पूस या गावात ही घटना घडली. या प्रकरणात पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. या घटनेने बीड जिल्हा हादरला आहे. अंबाजोगाई तालुक्यातील पुस या ठिकाणी राहणारा एक गृहस्थ त्याच्या पत्नीवर कायमच चारित्र्यावरुन संशय घेत होता तसेच तो रोज दारु पिऊन घरी यायचा आणि पत्नीवर संशय घ्यायचा. १६ ऑगस्टच्या दिवशी आई घरी असताना मुलाने वडिलांना फोन केला आणि जेवणाबाबत विचारणा केली मात्र वडिलांनी मी शेतात जेवणार आहे, डबा पाठवून द्या हे सांगितले. तसेच घरी आल्यावर दूध घेईन असेही त्याने त्याच्या मुलाला सांगितले. यानंतर मोठ्या…
नाशिक ः प्रतिनिधी सिनेटची निवडणूक स्थगित झाली कारण मिंधे आणि भाजपा गटाची तयारी नाही. कार्यक्रमात तयार होता तरीही निवडणूक स्थगित झाली.अशा गोष्टी घडणं लोकशाहीसाठी घातक आहे, असे आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे.आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. त्याआधी आदित्य ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही टीका केली. निवडणुका स्थगित होणे हे घातक आहे. देशात आपल्या लोकशाही नाहीये असेच समजून आता आपल्याला काम करावं लागणार आहे असेही आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे. कर्नाटकात छत्रपती शिवरायांचा पुतळा हटवण्यात आला. त्यामागे नेमकं कोण आहे हे तपासून बघावे लागेल असेही आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे. तुम्ही छगन भुजबळांच्या बालेकिल्ल्यात चाललात का? असे विचारले असता आदित्य ठाकरे…
मलकापूर : प्रतिनिधी “अमरावती ते चिखली” राष्ट्रीय महामार्ग क्र.५३ वरील मलकापूर “नांदुरा-चिखली मुक्ताईनगर अशा ४५ कि.मी. लांबी आणि ८०० रुपये कोटी निधीच्या विकास कामाचे शुक्रवारी, १८ ऑगस्ट रोजी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते मलकापूर येथील गोविंद विष्णू महाजन विद्यालयाच्या प्रांगणावर लोकार्पण करण्यात आले. नांदुरा-चिखली मुक्ताईनगर खंडाच्या चौपदरीकरण प्रकल्पाची लांबी ४५ कि.मी. आहे. याअंतर्गत ६ कि.मी.चा नांदुरा ग्रीनफील्ड बायपास, मलकापूर आरओबी, ४ प्रमुख पूल, १८ छोटे पूल, ११ कल्व्हर्ट, ३ वाहन अंडरपास, ४ पादचारी अंडरपास, ११.५३ कि.मी. दुपदरी सर्व्हिस रोड, २० बस शेल्टर, १ ट्रकले बाई यांचा समावेश आहे. यावेळी खा. रक्षा खडसे यांनी रावेर लोकसभा क्षेत्रातील विविध…
फैजपूर : प्रतिनिधी येथील वीज पुरवठा वारंवार खंडीत होणे आणि नगरपरिषदेचा शहरातील पाणीपुरवठा रोजच विस्कळीत होत असल्याने शहरातील नागरिकांच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्या संदर्भात आ. शिरीष चौधरी यांनी तात्काळ सावदा येथील वीज मंडळाच्या कार्यालयात बैठक घेतली. बैठकीला धनंजय चौधरी, केतन किरंगे, पत्रकार अरुण होले, वीज मंडळाचे फैजपूर येथील उप अभियंता सरोदे, फैजपूर विभागाचे पाटील, लोहारा वीज केंद्राचे अधिकारी उपस्थित होते. यापुढे नगरपरिषदेच्या पाणीपुरवठ्यावर आणि आसाराम नगर फिडरवर परिणाम होऊ देणार नाही, असे आश्वासन वीज मंडळाचे सपकाळे यांनी दिले. फैजपूर शहरातील आसाराम नगर फिडरवर गेल्या ४ महिन्यांपासून दररोज वीज पुरवठा दिवसातून किमान ४ वेळा खंडित होत होता. त्यामुळे घरातील इलेक्ट्रॉनिक उपकरणे…
यावल : प्रतिनिधी महाराष्ट्र मंदिर महासंघाच्यावतीने महर्षी व्यासनगरी यावल येथे तालुकास्तरीय मंदिर विश्वस्त बैठकीचे येथील श्री महर्षी व्यास मंदिराच्या सभागृहात आयोजन केले होते. बैठकीला तालुक्यातील ३५ हून अधिक मंदिरांचे मंदिर विश्वस्त उपस्थित होते. बैठकीत १४ मंदिरात वस्त्रसंहिता लागू होणार असल्याचा निर्धार मंदिराच्या विश्वस्तांनी घेतला आहे. ‘मंदिरात वस्त्रसंहितेची आवश्यकता’ या विषयावर सनातन संस्थेचे सद्गुरू नंदकुमार जाधव यांनी तर ‘मंदिर संस्कृती रक्षणाची आवश्यकता’ या विषयावर महाराष्ट्र मंदिर महासंघाचे जळगाव जिल्हा समन्वयक प्रशांत जुवेकर यांनी संबोधित केले. वस्त्रसंहिता लागू करण्याच्या विषयानंतर बैठकीला उपस्थित असलेल्या १४ मंदिरांच्या विश्वस्तांनी उत्स्फूर्तपणे त्यांच्या मंदिरात वस्त्रसंहिता लागु करण्याचा निर्णय दिला. महर्षी व्यास मंदिराचे अध्यक्ष प्रमोद गडे आणि त्यांचे…