Author: saimat

नवीदिल्ली ः केंद्र सरकारने १८ ते २२ सप्टेंबर दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनाचा अजेंडा त्यांनी अद्यापही गोपनिय ठेवला असून यावरून विरोधकांनी केंद्र सरकारला लक्ष्य केले ेआहे. नेमक्या कोणत्या मुद्द्यांवरून विशेष अधिवेशनात चर्चा होणार याबाबत खुलासा न झाल्याने काँग्रेसनेही यावरून टीका केली आहे. दरम्यान, मोदी चालिसा ऐकण्यासाठी आम्ही अधिवेशनात बसणार नाही,अशी ठाम भूमिका काँग्रेसने घेतली आहे. काँग्रेस संसदीय पक्षाची काल (५ सप्टेंबर) बैठक झाली. या बैठकीत सोनिया गांधी, पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे उपस्थित होते. काँग्रेसच्या बैठकीआधी इंडिया आघाडीच्या नेत्यांची बैठक मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी झाली होती. काँग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश म्हणाले की, “सरकारने विरोधी पक्षांना विश्वासात घेतले नाही…

Read More

रामपूर ः तमिळनाडूचे क्रीडा आणि युवक व्यवहार मंत्री आणि मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचा मुलगा तसेच अभिनेते उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यावरून देशभरातून गदारोळ झाला होता. आता उदयनिधी स्टॅलिन आणि प्रियांक खरगे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. शनिवारी (२ सप्टेंबर) उदयनिधी स्टॅलिन यांनी एका कार्यक्रमात बोलताना सनातन धर्माचं उच्चाटन करण्याची भूमिका मांडली होती. “सनातन धर्म हा समानता व सामाजिक न्यायाच्या विरोधात आहे. काही गोष्टींना विरोध करण्याऐवजी त्यांचं उच्चाटन केलं जायला हवं. डास, डेंग्यू, मलेरिया आणि करोनासारख्या आजारांना विरोध केला जाऊ शकत नाही. त्यांचे उच्चाटनच केले जायला हवं. त्याचप्रमाणे सनातन धर्माचंही व्हायला हवं”, असे विधान उदयनिधी यांनी…

Read More

वॉशिंग्टन ः द्रमुक नेते आणि तमिळनाडूचे युवक कल्याण मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माची तुलना डेंग्यू, मलेरिया आणि करोना रोगाशी करून सनातन धर्माचे निर्मूलन करण्याबाबतचे विधान केले. ज्यावरून देशभरात सध्या वाद सुरू आहे. तर याप्रकरणी उदयनिधी यांच्याविरोधात आता गुन्हाही दाखल झाला आहे. एकीकडे भारतात हा वाद सुरू असताना दुसरीकडे अमेरिकेच्या एका शहरात ३ सप्टेंबर हा सनातन धर्म दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा करण्यात आली आहे. अमेरिकेतील केंटुकी येथील लुईव्हिल शहराच्या महापौरांनी शहरात ३ सप्टेंबर हा सनातन धर्म दिवस म्हणून घोषित केला आहे. इंडिया टीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. उपमहापौर बार्बरा सेक्स्टन स्मिथ यांनी महापौर क्रेग ग्रीनबर्ग यांच्या वतीने लुईसविले येथील…

Read More

गाझियाबाद : मुलाला पाण्याची भिती वाटू लागली, अचानक वागण्यात बदल होऊ लागला. मध्येच बोलताना भुंकू लागला हा सगळा प्रकार पाहून धास्तावलेल्या कुटुंबीयांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत फार उशीर झाला होता. उपचार सुरू करण्यापूर्वीच १४ वर्षांच्या मुलाने बापाच्या कुशीत जीव सोडला. उत्तर प्रदेशाच्या गाझियाबादमध्ये १४ वर्षांच्या मुलाला शेजारी राहणाऱ्या एका महिलेचा कुत्रा चावला. जखम खोल नसल्याने त्याने घरी कोणालाही न सांगता त्यावर स्वतःच उपचार घेतले. आई-बाबा ओरडतील या भीतीने त्याने त्या जखमेवर मलम लावून. जवळपास एक महिन्यांपूर्वी त्याला कुत्रा चावला होता. पण वेळेत उपचार न मिळाल्यामुळे त्यांच्या संपूर्ण शरीरात रेबिजचा संसर्ग पसरला. त्यानंतर त्याचा दुर्देवी मृत्यू झाला. शाहवेज असे…

Read More

अकोला ः शहरात एक मन हेलावणारी घटना उघडकीस आली आहे. जन्मदात्या आईनेच पोटच्या लेकीची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. तीन महिन्यांनंतर चिमुकलीच्या हत्येचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अकोल्यात आईच्या नावाला काळिमा फासणारी घटना घडली आहे. जन्मदात्या आईने हत्या केल्याची घटना उघडकीस आल्याने पोलिसही हादरले आहे. आईच आपल्या पोटच्या लेकराची मारेकरी निघाली आहे. साधारण दोन महिन्यांपूर्वी चिमुकलीचा मृत्यू झाला होता. मात्र, या प्रकरणात आता पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आल्याने हत्येचा खुलासा झाला आहे. काय घडले नेमके? २ जूनला नाकाला चिमटा लावून मुलगी झोपली होती. नाकाला चिमटा तसाच लागून असल्याने गुदमरून तिचा मृत्यू झाल्याचा बनाव तिच्या…

Read More

मुंबई ः प्रतिनिधी जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. मुंबई कार्यालयात दिवसभर झालेल्या चौकशीनंतर रात्री उशिरा ईडीने गोयल यांना अटक केली आहे. कॅनरा बँकेची ५३८ कोटींना फसवणूक केल्याप्रकरणी गोयल यांची चौकशी केली जात होती. याच प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली आहे. जुलै महिन्यात काय घडले? जुलै महिन्यात अंमलबजावणी संचालनालयाने जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल आणि इतरांविरुद्ध नव्याने आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी या प्रकरणी मुंबई आणि दिल्लीतील सुमारे आठ ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. छापेमारीच्या या कारवाई दरम्यान ईडीने काही आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त केली होती. आता नरेश गोयल यांना रात्री उशिरा अटक करण्यात…

Read More

प्रतापगड ः राजस्थानातल्या प्रतापगड जिल्ह्यातल्या एका गावात धक्कादायक घटना समोर आली आहे. या गावात एका आदिवासी विवाहितेची नग्न धिंड काढण्यात आली. २१ वर्षीय विवाहितेची तिच्या पतीकडून आणि सासरच्यांकडून विवस्त्र धिंड काढण्यात आली. त्यावेळी ही महिला मदतीसाठी आर्त हाक देत होती. या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या महिलेचे दुसऱ्या पुरुषाशी प्रेमसंबंध आहेत असा संशय तिच्या पतीला आणि तिच्या सासरच्यांना होता. याच संशयावरुन तिची धिंड काढण्यात आली. ही महिला गर्भवती आहे असेही पोलिसांनी म्हटले आहे.विवाहबाह्य संबंधांच्या संशयावरुन तिच्या पतीने आणि तिच्या सासरच्यांनी तिची नग्न धिंड काढली.ही महिला लग्नानंतरही दुसऱ्या पुरुषाबरोबर राहात होती.त्याच गोष्टीचा राग मनात ठेवून तिला त्या घरातून पळवून गावात आणण्यात…

Read More

सावंतवाडी : पर्वरी गोवा येथील फ्लॅटवर एका युवतीचा खून करून मृतदेह आंबोली घाटात फेकून देण्यात आला होता. आज सावंतवाडी आणि गोवा पोलिसांच्या पुढाकाराने सुमारे ७० फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढण्यात आला. या स्त्री जातीच्या मृतदेहाचा एक हात व पाय आढळून आला नसल्याचे शोध पथक व पोलिसांनी म्हटले आहे. या प्रकरणी गोवा पोलिसांनी दोघा संशयितांना घटनास्थळी आणले होते. त्यांनी दाखविलेल्या अंदाजाने सावंतवाडी पोलीस व आंबोलीच्या रेक्सु टीम ने शोध घेत मृतदेह बाहेर काढून पंचनामा केला. प्रेयसीने पोलिसात तक्रार दिल्याच्या रागातून म्हापसा येथील कामाशी शंकर उडपनव (२८) युवतीचा प्रियकराने खून करून तिचा मृतदेह आंबोली घाटात फेकल्याचा प्रकार गोवा पोलिसांच्या तपासात शुक्रवारी…

Read More

मुंबई ः प्रतिनिधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जालन्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेल्या मराठा आक्रोश मोर्चातील आंदोलकांवर झालेल्या पोलिसांच्या लाठीचार्जवर प्रतिक्रिया दिली आहे. “जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात काल मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून सुरु असलेल्या उपोषणस्थळी पोलिसांकडून लाठीमार झाला आणि गर्दी पांगवण्यासाठी हवेत गोळीबारही झाला. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि मी याचा निषेध नोंदवतो,” असे मत राज ठाकरेंनी व्यक्त केले तसेच इथं सरकार चुकले हे निश्चित, असे म्हणत शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर हल्लाबोल केला. राज ठाकरे म्हणाले, “या घटनेवर मी कालपासून लक्ष ठेवून आहे आणि या घटनेवर येणाऱ्या प्रतिक्रिया पाहत होतो. मुळात मराठा समाजाने आरक्षणासाठी जी आंदोलने केली,…

Read More

मुंबई ः प्रतिनिधी भारतीय जनता पार्टीचे नेते हिंदुत्वाच्या मुद्यावर सातत्याने शिवसेनेच्या ठाकरे गटाला आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करत असतात. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसशी युती करून बाळासाहेबांचे (शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे) हिंदुत्व सोडले अशी टीका त्यांच्यावर होत असते. या टीकेला उद्धव ठाकरे यांनी आज उत्तर दिले. शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या ‘होऊ द्या चर्चा’ या कार्यक्रमात केलेल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी भाजपा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे म्हणाले, परवा पत्रकार परिषदेत मला एकाने प्रश्न विचारला त्यावर मी उत्तर दिले की, आमच्याकडे (इंडिया आघाडी) पंतप्रधानपदासाठी अनेक चेहरे आहेत, महिला आहेत, शिक्षण आणि वयोमानानुसार वेगवेगळे पर्याय आहेत…

Read More