नागरिकांच्या जीवाशी खेळ, भ्रष्टाचारविरोधी आक्रोश संघटनेचा आंदोलनाचा इशारा साईमत/बोदवड/प्रतिनिधी: बोदवड तालुक्यातील चिखली–शेवगा–वळजी मार्गे माळेगाव निपाणा हा महत्त्वाचा दळणवळणाचा रस्ता सध्या भीषण दुरवस्थेत असून, नागरिकांचे दैनंदिन जीवन अक्षरशः ठप्प झाले आहे. रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे, उखडलेला डांबराचा थर आणि ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही मोठा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर, भ्रष्टाचारविरोधी आक्रोश महाराष्ट्र राज्य (भारत सरकार मान्यताप्राप्त) संघटनेने प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेत, येत्या एका महिन्यात रस्त्याचे काम सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. महत्त्वाचा मार्ग, पण प्रशासनाचे दुर्लक्ष चिखली, शेवगा आणि वळजी ही गावे जोडणारा हा रस्ता बुलढाणा, मलकापूर तसेच खानदेश व विदर्भाला जोडणारा एक महत्त्वाचा दुवा…
Author: saimat
स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून हा कार्यक्रम प्रेरणादायी वातावरणात पार पडला साईमत /तळोदा /प्रतिनिधी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, तळोदा येथे विद्यार्थी विकास विभागामार्फत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून हा कार्यक्रम प्रेरणादायी वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागाचे प्रा. डॉ.आर.डी.मोरे होते. यावेळी प्रा.एल एन.पाटील, प्रा.के.एम.शिंदे, मनिष कलाल, पवन शेलकर,जितेंद्र चौधरी,योगेश महाजन,महेंद्र सामुद्रे तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. याप्रसंगी मागील वर्षी विद्यापीठाद्वारे “सावित्रीबाई फुले प्रथम शिक्षित विद्यार्थिनी” या पुरस्काराने सन्मानित झालेल्या महाविद्यालयातील विद्यार्थिनी कु. पारबती अजित पावरा यांनी आपल्या मनोगतातून…
“समस्या थेट नगराध्यक्षांकडे; जयवंत जाधवांचा लोकाभिमुख निर्णय” साईमत /नवापूर /प्रतिनिधी नवापूर नगर परिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष जयवंत पांडुरंग जाधव यांनी नागरिक-केंद्रित प्रशासनाचा आदर्श निर्माण करत आपले दालन सर्वसामान्य नागरिकांसाठी कायमस्वरूपी खुले ठेवण्याचा लोकाभिमुख निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे शहरातील नागरिकांना कोणताही अडथळा, संकोच किंवा मध्यस्थ न ठेवता थेट नगराध्यक्षांशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध होणार आहे. नगराध्यक्ष जयवंत जाधव यांनी सांगितले की, लोकशाही ही केवळ निवडणुकीपुरती मर्यादित नसून, नागरिकांच्या दैनंदिन प्रश्नांना वेळेत न्याय देणे हेच तिचे खरे स्वरूप आहे. नागरिकांच्या समस्या थेट ऐकून त्या तत्काळ मार्गी लावण्यासाठी माझे दालन नेहमी खुले राहील. नागरिकांचा विश्वास व सहभाग हीच शहराच्या विकासाची खरी ताकद आहे,…
धुळे मनपा निवडणुकीतील पक्षाच्या ५९ उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ साईमत/धुळे/प्रतिनिधी येथील महापालिका निवडणुकीतील भारतीय जनता पक्षाचे ६३ पैकी चार उमेदवार बिनविरोध विजयी झाले. यानंतर आता निवडणूक रिंगणातील पक्षाच्या ५९ उमेदवारांच्या प्रचाराचे रणशिंग रविवारी (ता. ४) दुपारी दोनला प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत फुंकले जाणार आहे. येथील महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने ७४ पैकी ६३ जागांवर उमेदवार दिले आहेत. यापैकी माघारीच्या अंतिम मुदतीपर्यंत चार उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. आता निवडणूक रिंगणात पक्षाचे ५९ उमेदवार आहेत. या उमेदवारांच्या सामूहिक प्रचाराचा श्रीगणेशा करण्यासाठी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची रविवारी दुपारी दोनला जाहीर सभा होत आहे. प्रारंभी खान्देश कुलस्वामिनी आदिशक्ती श्री एकवीरामातेच्या मंदिरात…
गुवाहाटी मेडिकल कॉलेजमध्ये तातडीने दाखल, प्रकृती स्थिर साईमत वृत्तसेवा मनोरंजन विश्वात धक्कादायक घटना घडली असून प्रसिद्ध बॉलिवूड आणि साऊथ चित्रपटांचे अभिनेता आशिष विद्यार्थी आणि त्यांची पत्नी रूपाली बरूआ यांचा गुवाहाटीमध्ये मध्यरात्री दुचाकीच्या धडकेत गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघात इतका भयंकर होता की दोघेही रस्त्यावर कोसळले, ज्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात रात्री सुमारे १२ वाजता झू रोडवरील अॅड्रेस हॉटेलसमोर घडला. आशिष विद्यार्थी आणि रूपाली बरूआ जेवणासाठी हॉटेलमध्ये गेले होते आणि जेवण पूर्ण झाल्यानंतर रस्ता ओलांडत असताना चांदमरी परिसराकडून येणाऱ्या एका भरधाव मोटारसायकलने त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की तिघेही गंभीर जखमी…
निवडणूक काळात गुन्हेगारीवर लगाम; जळगाव पोलिसांची मोठी कारवाई साईमत / जळगाव /प्रतिनिधी आगामी जळगाव महानगरपालिका निवडणूक शांततेत, निर्भय वातावरणात आणि कोणत्याही प्रकारच्या दबावाविना पार पडावी, यासाठी जळगाव पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या तब्बल २४ सराईत गुन्हेगारांना शहराबाहेर हद्दपार करण्याचे आदेश उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाने दिले आहेत. या कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली असून सामान्य नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. जळगाव उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाने निवडणूक पार्श्वभूमीवर शहरातील गुन्हेगारी स्थितीचा सखोल आढावा घेत संबंधित प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे सादर केला होता. या प्रस्तावावर विचार करून उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी हद्दपारीच्या आदेशांना मंजुरी…
महापालिका निवडणुकांबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून सविस्तर अहवाल मागविण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश साईमत /जळगाव /प्रतिनिधी राज्यातील महापालिका निवडणुकांचे चित्र अर्ज भरणे आणि माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर स्पष्ट झाले असून, आता १५ जानेवारी रोजी मतदान आणि १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. मात्र, प्रत्यक्ष मतदानापूर्वीच राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये मोठा आणि अभूतपूर्व प्रकार समोर आला आहे. राज्यातील २९ महापालिकांमध्ये तब्बल ६६ नगरसेवक बिनविरोध निवडून आल्याचे समोर आले असून, प्राथमिक माहितीनुसार ही संख्या ६९ पर्यंत असल्याचा उल्लेख निवडणूक आयोगाकडून करण्यात आला आहे. जळगाव महापालिकेत एकट्या १२ उमेदवारांचा बिनविरोध निवडीत समावेश असल्याने स्थानिक राजकारणातही चर्चांना उधाण आले आहे. राज्याच्या निवडणूक इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर नगरसेवक बिनविरोध निवडून…
नवविवाहित पत्नी ठार, पती गंभीर जखमी साईमत /पारोळा- जळगाव /प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यात रस्ते अपघातांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून महामार्गांवरील वाहतूक व्यवस्था नागरिकांच्या जीवावर उठल्याचे चित्र दिसून येत आहे. महामार्ग क्रमांक सहावर बायपासजवळील म्हसवे फाट्याजवळ भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या जबर धडकेत २१ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर तिचा पती गंभीर जखमी झाला आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून मृत तरुणीच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या अपघातात मृत झालेल्या तरुणीचे नाव रूपाली शुभम बोरसे (वय २१) असे असून गंभीर जखमी पतीचे नाव शुभम भाऊसाहेब बोरसे (वय २५, रा. उंदिरखेडे) असे आहे. शुभम व रूपाली हे दांपत्य दुचाकी…
पाच जण जखमी; पाळधी पोलिसात १६ जणांविरुध्द गुन्हा दाखल साईमत /पाळधी, ता.धरणगाव /प्रतिनिधी रेल (ता.धरणगाव) येथे वाळू उपसा करणाऱ्यांना काही शेतकऱ्यांनी, वाळू उपसा करू नका, असे सांगितले असताना वाळू माफियांनी शेतकऱ्यांवर हल्ला केला. मारहाणीत पाच जण जखमी झाल्यामुळे रेल येथे एकच खळबळ उडाली आहे.पाळधी येथून जवळच असलेल्या रेल येथे मध्यरात्रीच्या सुमारास कानळदा येथील काही जण गिरणा नदी पात्रातून रेती उपसा करीत असल्याची. माहिती मिळाल्याने रेल येथील शेतकरी नरेंद्र पाटील, श्रीकांत पाटील, संदिप पाटील, मंगल पाटील, मनोज पाटील यांनी त्यांना सांगितले की, तुम्ही रेती उपसा करू नका, त्यामुळे आमच्या शेतातील विहिरींचे पाणी कमी होत आहे. याचा वाळू माफियांना राग येऊन त्यांनी…
धानोरा विद्यालयात एनसीसी आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यान साईमत /धानोरा, ता.चोपडा /प्रतिनिधी – शालेय शिक्षणासोबतच खेळ, कला आणि व्यक्तिमत्व विकास यावर भर देणे आवश्यक असून, त्याचबरोबर स्पर्धा परीक्षांसाठी वाचन करणे खरे आधार कार्ड ठरते, असा संदेश खुशबू महाजन यांनी विद्यार्थ्यांना दिला.धानोरा येथील झिपरु तोताराम महाजन माध्यमिक व नामदेवराव भावसिंग पाटील ज्युनियर कॉलेजमध्ये एनसीसी व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. विद्यालयाचे चेअरमन प्रदीप महाजन यांच्या अध्यक्षतेखाली, प्राचार्य के. एन. जमादार आणि पर्यवेक्षक एल. डी. पाटील यांच्या उपस्थितीत विद्यालयाची माजी विद्यार्थीनी आणि जीसीआय गर्ल्स कॅडेट इन्स्ट्रक्टर कोल्हापूर खुशबू देविदास महाजन यांनी मार्गदर्शन केले. खुशबू महाजन या विद्यालयाच्या क्रीडाशिक्षक देविदास…