कोल्हापूर ः महाराष्ट्रातल्या शिंदे-फडणवीस-पवार सरकारने ३० एप्रिल २०२४ पर्यंत परराज्यात ऊस निर्यात करण्यास बंदी घातली आहे. संबंधित सक्षम अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना राज्याबाहेर ऊस निर्यात करता येणार नसल्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.या निर्णयामुळे कर्नाटकमध्ये होणारी ऊसाची संभाव्य निर्यात थांबण्यास मदत होऊन राज्यात पिकणारा ऊस हा इथल्याच साखर कारखान्यांमध्ये पोहोचवला जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान,राज्य सरकारच्या या निर्णयाला विरोध होत आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी या निर्णयावरून राज्य सरकारला इशारा दिला आहे. राजू शेट्टी म्हणाले, हा निर्णय ऊस उत्पादक शेतकऱ्यांना खड्ड्यात घालणारा आहे. गेल्या ३ वर्षांपासून राज्यातल्या साखर कारखान्यांकडून हिशेब घ्या अशी मागणी…
Author: saimat
मुंबई ः प्रतिनिधी ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ची राज्य कार्यकारणी घोषीत झाली असून त्यात उत्तर महाराष्ट्रमधून साईमतचे संपादक प्रमोद बऱ्हाटे,सुरेश उज्जेनवाल, संदीप महाजन, प्रशांत शर्मा, नरेश होळणार, प्रमोद बऱ्हाटे यांची निवड करण्यात आली आहे.या निवडीबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. देशभरात अल्पावधीत नावारूपास येऊन सुमारे छत्तीस हजार पत्रकार सदस्य असलेल्या ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ या संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची घोषणा ‘व्हॉइस ऑफ मीडिया’चे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के केली आहे. संघटनेच्या कार्याध्यक्षपदी नंदकुमार सुतार, संतोष शाळीग्राम यांना संधी देण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी विलास आठवले, तुकाराम झाडे, प्रकाश कथले, जयप्रकाश दगडे यांची निवड करण्यात आली आहे. दुर्गेश सोनार आणि ‘व्हॉइस ऑफ मीडिया’च्या शिक्षण विभागाचे मुख्य समन्वयक…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील नॅशनल हायवे क्रमांक ६ या रस्त्यांवर खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका पावसामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होऊन कोंडी होत आहे. तसेच काही ठिकाणी अपघात होत आहेत. त्यासाठी वाहतूक पोलिसांनी पुढाकार घेत काही ठिकाणचे खड्डे बुजविले. मात्र, खड्डे मोठ्या संख्येने असल्याने पोलिसांची अडचण झाली. त्यामुळे तत्काळ खड्डे बुजवून रस्ता दुरुस्ती करण्यात यावी, अशा आशयाचे पत्र तसेच जळगाव जागा यात्रा आणि निवेदन देऊन प्रशासनाकडे पाठपुरावा सादर केलेला आहे. त्यानुसार तात्पुरती उपाययोजना म्हणून काही ठिकाणी खडी, मुरूम टाकण्यात आला आहे. मात्र, अनेक रस्त्यांवर अद्याप खड्डे आहेत. त्यामुळे वाहनचालकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन जळगाव महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी केले…
गडचिरोली : जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या एका महिला नेत्याची पतीने निर्घृणपणे हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपीने पोलीस ठाण्यात जाऊन स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. या सगळ्या प्रकारानंतर गडचिरोलीत खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. गडचिरोलीच्या कुरखेडा येथील शिवसेना ठाकरे गटाच्या युवती सेनेची शहर प्रमुख राहत सय्यद हिची तिच्या पतीने चाकूने भोसकून हत्या केली आहे. हा थरार मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास घडल्याची माहिती समोर आली आहे. पहाटेच्या सुमारास राहतच्या वडिलांनी उठून पाहिल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला आहे. हत्येनंतर आरोपी पतीने पोलीस ठाण्यात जात या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून…
गोहआटी ः वृत्तसंस्था ओडिशा उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश एस. मुरलीधर यांनी सध्या राजकारण आणि न्यायालयांचे कामकाज यांची सरमिसळ होत असल्याचे मत व्यक्त केले. “न्यायाधीश स्वतःला तटस्थ समजत असले, तरी त्यांच्याकडून राजकीय निवड होते,” असे स्पष्ट मत मुरलीधर यांनी व्यक्त केले. ते गुरुवारी (१४ सप्टेंबर) गौतम भाटिया यांचे पुस्तक ‘अनसिल्ड कव्हर्स : द डिकेड ऑफ द कॉन्स्टीट्युशन, द कोर्ट्स अँड द स्टेट’च्या प्रकाशन कार्यक्रमात बोलत होते. माजी न्यायमूर्ती एस. मुरलीधर म्हणाले, “न्यायाधीश कुठून येतात? गौतम यांचे पुस्तक न्यायाधीश निश्चित स्थानांवरून आले आहेत हे सांगतात. हे पुस्तक तुम्हाला सांगते की, कायदेशीर प्रश्न म्हणून अनेक राजकीय मुद्दे न्यायालयात येत आहेत. उदाहरणार्थ, हिजाब…
त्रिअनंतपूरम ः निपा विषाणूचा संसर्ग केरळमध्ये वाढत असून आज पुन्हा एका बाधिताची नोंद झाली आहे. त्यामुळे केरळमध्ये निपा बाधितांची एकूण संख्या सहा झाली आहे.त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला असून चौघांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये एक नऊ वर्षांचा मुलगाही आहे. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. नव्याने बाधित झालेला रुग्ण ३९ वर्षीय असून त्याच्यावर कोझिकोड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गुरुवारी संशयित रुग्णांची चाचणी केली होती. या संशयित ११ बाधितांचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. निरीक्षणाखाली असलेल्या रुग्णांची संख्या ९५० वर पोहोचली आहे. त्यापैकी २३१ रुग्ण अतिजोखमीच्या श्रेणीतील असून २१ रुग्णांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान,राज्य सरकारने कोझिकोड जिल्ह्यात प्रतिबंधात्मक…
अलिबाग ः दुसरे लग्न केले म्हणून मानसिक त्रास देणाऱ्या बायकोला निर्जन स्थळी नेऊन तिचा खून केल्याची घटना सुधागड पाली तालुक्यात घडली आहे. या प्रकरणी पोलीसांनी आरोपी नवऱ्याला जेरबंद केले आहे.सागर किसन पवार असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ९ सप्टेंबरला सायंकाळी साडेपाचच्या सुमारास उंबरवाडी येथे जंगलभागात अनोळखी महिलेचा कुजलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला होता.या घटनेनंतर पोलीस निरीक्षक सरिता चव्हाण त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. प्राथमिक तपासात सदर महिलेचा खून करून तिचा मृतदेह पाच ते सहा दिवसापूर्वी जंगलात टाकला असल्याचे दिसून आले. ही बाब लक्षात घेऊन पोलीसांनी गेल्या दिवसात बेपत्ता झालेल्या व्यक्तींची माहिती घेतली. त्यात आरड्याची वाडी येथून कुसबा…
मुंबई ः प्रतिनिधी मराठवाडा मुक्ती संंग्रामच्या निमित्ताने संभाजी नगर येथे उद्या मंत्रिमंडळ बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या मंत्रिमंडळ बैठकीसाठी संपूर्ण मंत्रिमंडळ उद्या संभाजीनगरला येईल. त्यांच्या राहण्याची सोय येथील हॉटेल्समध्ये करण्यात आली आहे तर विश्रामगृहेही बुक करण्यात आले आहे. यावरून ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी सरकारवर टीका केली आहे. मंत्रिमंडळ बैठकीसाठी इतका थाट कशाकरता? असा सवाल संजय राऊतांना विचारण्यात आता. त्यावर संजय राऊत म्हणाले की, “या सरकारचे आम्ही अंत्यसंस्कार थाटामाटतच करणार आहोत. हे त्यातच जाणार आहेत. तीन तासांसाठी संपूर्ण प्रशासन वेठीस धरता. हा सगळा खर्च तुम्ही दुष्काळग्रस्तांवर खर्च करा. येथे प्यायला पाणी नाही, अनेक प्रश्न आहेत. आमचे…
नाशिक ः प्रतिनिधी राज्यातील दुष्काळ, पाऊस आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आदित्य ठाकरे म्हणाले, “आत्ता पाऊस पडत असला तरी पाऊस पडण्याआधीच ८० टक्के पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे या नुकसान झालेल्या पिकांचे काय? हा मुद्दा महत्त्वाचा आहे. मागील वर्षीही नुकसान झाले, त्याचे पंचनामे झाले. त्यावेळी मी, अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे असे सगळेच फिरत होतो.मागील वर्षी अतिवृष्टी झाली,आम्ही ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली मात्र, काहीही मदत मिळाली नाही. पंचनामे होतील, पण पुढे काय? “यंदाही पाऊस पडायला सुरुवात झाली असली, तरी पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे पंचनामे होतील, पण पुढे काय? म्हणून माझा प्रश्न हाच राहील की, उद्या मराठवाड्यात मंत्रीमंडळ बैठक आहे.कदाचित आत…
पुणे : प्रतिनिधी जिल्ह्यातील दोन आरोग्यप्रमुखांची एकाच दिवशी बदली केल्याने जिल्हा प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. पुणे महानगरपालिका आरोग्य, वैद्यकीय अधिकारी डॉ. भगवान पवार आणि पुणे जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.रामचंद्र हंकारे यांची मंगळवारी बदली करण्यात आली आहे. एकाच वेळी दोन महत्वाच्या पदावरील अधिकाऱ्यांची बदली झाल्याने प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. डॉ. भगवान पवार यांची सहाय्यक संचालक आरोग्य सेवा अंधत्व नियंत्रण कार्यक्रम या पदावर तर पुणे जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे यांची मुंबई येथील आरोग्य सेवा औद्योगिक विभागाचे सहाय्यक संचालक पदावर बदली करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश राज्य सरकारचे अवर सचिव व.पां. गायकवाड यांनी काढले…