मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्वरित निलंबनाची कारवाई केली साईमत /जळगाव /प्रतिनिधी : जिल्हा परिषदेच्या अर्थ विभागातील दोन कर्मचाऱ्यांवर बोगस दिव्यांगत्व प्रकरण उघडकीस आले असून, मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी दोघांवर निलंबनाची कारवाई केली आहे. ही कारवाई राज्याच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या आदेशानुसार हाती घेतलेल्या तपासणी मोहिमेतून समोर आली आहे. राज्यातील दिव्यांग कर्मचारी व दिव्यांग व्यक्तींच्या दिव्यांगत्व प्रमाणपत्राची तपासणी करण्यासाठी राज्य सरकारने विशेष मोहीम हाती घेतली होती. या तपासणी दरम्यान पाचोरा पंचायत समितीत कार्यरत वरिष्ठ सहाय्यक लेखा विक्रम सुरेश पाटील आणि धरणगाव पंचायत समितीत कार्यरत कनिष्ठ सहाय्यक लेखा संतोष लक्ष्मण पाटील यांची नियुक्ती दिव्यांग प्रवर्गातून करण्यात आल्याचे दिसून आले. तपासणी दरम्यान जळगाव…
Author: saimat
मालेगाव येथील दुचाकीस्वाराचा मृत्यू साईमत /चाळीसगाव/प्रतिनिधी : रस्त्याच्या बाजुला नादुरुस्त उभी असलेल्या पिकअप व्हॅनला मागून येणाऱ्या दुचाकीने जबर धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना दि.९ जानेवारी रोजी रात्री सुमारे २ वाजेच्या सुमारास घडली. घटनेची चाळीसगाव पोलिसात नोंद करण्यात आली आहे. तौकीर अली पिरजादे (रा.मालेगाव) असे मयताचे नाव आहे. दि.९ जानेवारी रोजी रात्री सुमारे २ वाजेच्या सुमारास धुळे कडून चाळीसगाव मार्गे छत्रपती संभाजीनगरकडे जाणारे एक पिकअप वाहन भोरस फाट्याजवळ रस्त्यात नादुरुस्त झाल्याने रस्त्याच्या कडेला उभे होते. त्याचवेळी मागून येणाऱ्या एका दुचाकीने उभ्या असलेल्या पिकअप वाहनाला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी…
इराण नागरिकेला आश्रय दिल्याप्रकरणी धरणगावात गुन्हा, दोन आरोपींना अटक साईमत /धरणगाव /प्रतिनिधी : शहरातील सराय मोहल्ला परिसरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. इराण देशातील फरनाज हमीद रेझा मसाई (रा. तेहरान, इराण) आणि तिचा तीन वर्षांचा मुलगा सुफी अली यांना विनापरवानगी व व्हिजाची मुदत संपलेली असतानाही आश्रय दिल्याप्रकरणी धरणगाव पोलिसांनी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपींना अटक केली आहे. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धरणगावच्या कुरेशी मोहल्ल्यात राहणारे शेख रफीक शेख मुसा आणि शेख अहमद रजा शेख मुसा यांनी फरनाज मसाई आणि तिच्या मुलाला त्यांच्या घरी आश्रय दिला होता. तपासात समोर आले की, महिलेच्या व्हिजाची मुदत २०२२…
अप्सरा चौकात मोटारसायकल पार्किंगवरून तणाव; व्यापारी–ठेलेवाले पोलिस ठाण्यात साईमत /भुसावळ/प्रतिनिधी :: शहरातील गजबजलेल्या अप्सरा चौक परिसरात आज सकाळी मोटारसायकल पार्किंगवरून सुरू झालेला किरकोळ वाद काही वेळात तणावात रूपांतरित झाला. या घटनेमुळे थेट छबीलदास कपडा मार्केटमध्ये व्यवहार ठप्प झाले आणि परिसरात चिंता पसरली. अप्सरा चौकात सुमारे ११ वाजता, दुकानासमोर मोटारसायकल उभी ठेवण्याच्या कारणावरून एका लोडगाडी चालक आणि दुकानदारामध्ये शाब्दिक चकमक झाली. सुरुवातीला साधा वाद वाटला असला तरी, काही वेळातच परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आणि परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. वादाची माहिती मिळताच आसपासच्या व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी छबीलदास कपडा मार्केटमधील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने तात्पुरती बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.…
लहान वयात टोकाचे पाऊल; १४ वर्षीय मुलाचा मृत्यू साईमत /एरंडोल/प्रतिनिधी : एरंडोल तालुक्यातील टोळी येथे १४ वर्षीय निलेश सुरेश पाटील या मुलाने राहत्या घराजवळील पत्राशेडमध्ये गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. मृतक निलेश (वय १४, मूळ रा. करवंद, ता. शिरपूर, जि. धुळे) सध्या टोळी येथे आपल्या कुटुंबासह वास्तव्यास होता. ७ जानेवारी रोजी अज्ञात कारणामुळे त्याने घराजवळील पत्राशेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना समजताच नातेवाईकांनी तातडीने त्याला ग्रामीण रुग्णालय, एरंडोल येथे नेले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. एरंडोल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस हेड कॉन्स्टेबल…
“उपमुख्यमंत्री शिंदे अनुपस्थित; तरीही जळगावमध्ये महायुती रोड शोने जनसागर लोटला” साईमत /जळगाव/प्रतिनिधी : जळगाव महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज गुरुवारी आयोजित महायुती रोड शोमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ऐनवेळी दौरा रद्द झाला. तरीही महायुतीने प्रचारात कोणताही खंड पडू दिला नाही आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रमुख नेत्यांसह, पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन रोड शो यशस्वीपणे राबविला. रोड शोदरम्यान महाविजय रथ यात्रेला शहरभर जनसागर लोटल्याचे दृश्य पाहायला मिळाले. दोन दिवसापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रोड शोनंतर, उपमुख्यमंत्री शिंदे यांचा रोड शो जळगाव शहरात जय्यत तयारीसह आयोजित करण्यात आला होता. शहरातील प्रमुख रस्त्यांवर आकर्षक स्वागत कमानी, बॅनर्स, झेंडे आणि फलक लावून संपूर्ण मार्ग भगवेमय…
शिवणी-ताळसवाडा मार्गावर ऑटोचालकाचा गळा आवळून निर्घृण खून; परिसरात भीतीचे वातावरण साईमत /मलकापूर/प्रतिनिधी : शिवणी ते ताळसवाडा मार्गावर एका व्यवसायिक ऑटोचालकाचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना गुरुवार, दि. ८ जानेवारी रोजी समोर आली. मृतकाची ओळख अमोल भाऊराव भवरे (वय ३५) अशी झाली असून, प्राथमिक तपासात त्याचा गळा आवळल्याचे स्पष्ट झाले आहे. खुन झाल्यानंतर मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकल्याने परिसरात भीती आणि खळबळ पसरली आहे. घटना सकाळच्या सुमारास उघडकीस आली. नागरिकांना संशयास्पद अवस्थेत मृतदेह दिसल्याने त्यांनी तात्काळ पोलीस यंत्रणेला सूचित केले. पोलिस पथक घटनास्थळी पोहोचून पंचनामा करून शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठविला. प्राथमिक तपासानुसार, मृतकाच्या गळ्यावर जोरदार आघात झाल्याचे खुणा आढळल्या असून, या घटनेला खून…
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न साईमत /जळगाव/प्रतिनिधी : जळगाव शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर व जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था, शांतता आणि सुरक्षिततेचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. येत्या १५ जानेवारी रोजी मतदान तर १६ जानेवारी रोजी मतमोजणी होणार असल्याने निवडणूक प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. या बैठकीत निवडणूक कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, संभाव्य अनुचित घटनांना आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना, मतदान व मतमोजणीच्या दिवशी कडक सुरक्षा व्यवस्था, तसेच पोलीस, महसूल, महानगरपालिका व अन्य यंत्रणांमधील समन्वय व तत्काळ प्रतिसाद यंत्रणा याबाबत सविस्तर चर्चा झाली. संवेदनशील भागांवर विशेष…
तुंबलेल्या गटारांमुळे दलीत वस्तीतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात साईमत /बोदवड/प्रतिनिधी शिरसाळा ग्रामपंचायतीच्या निष्काळजी, मनमानी व उदासीन कारभारामुळे गावातील नागरिकांचे आरोग्य अक्षरशः राम भरोसे असल्याचे भयावह चित्र समोर आले आहे. दलीत वस्ती परिसरातील गटारे अनेक दिवसांपासून तुंबलेल्या अवस्थेत असून सांडपाणी रस्त्यावर साचल्याने संपूर्ण परिसरात अस्वच्छता, दुर्गंधी आणि डासांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढला आहे. या गंभीर समस्येकडे ग्रामपंचायतीने पूर्णतः दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. दलीत वस्तीतील परिस्थिती अत्यंत विदारक दलीत वस्ती भागातील गटारे पूर्णपणे घाण पाण्याने भरून वाहत असून सांडपाणी थेट रस्त्यावर पसरले आहे. परिणामी नागरिकांना ये-जा करणेही कठीण झाले आहे. घरासमोरच साचलेल्या सांडपाण्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून लहान…
उज्जैन दर्शनासाठी निघालेल्या मित्रांवर काळाचा घाला; कन्नड घाटात भीषण अपघात, शेवगावचे तिघे ठार, चौघे गंभीर साईमत /चाळीसगाव/प्रतिनिधी : मध्य प्रदेशातील उज्जैन येथे महाकालेश्वर दर्शनासाठी निघालेल्या सात मित्रांच्या आनंदयात्रेचा शेवट भीषण दुर्घटनेत झाला. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात असलेल्या कन्नड घाटात चारचाकी वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात नगर जिल्ह्यातील शेवगाव येथील तिघा तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून चौघे जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे शेवगाव तालुक्यात शोककळा पसरली आहे. प्राप्त माहितीनुसार, शेवगाव येथील सात मित्र चारचाकी वाहनाने उज्जैनकडे दर्शनासाठी निघाले होते. जळगाव–चाळीसगाव मार्गावरील कन्नड घाट परिसरात वाहन पोहोचताच एका तीव्र वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. वेगात असलेली कार रस्त्याच्या कडेला…