Author: saimat

महानगरपालिकेच्या यंत्रसामग्रीत भर; नगरपालिकेची क्षमता वाढली साईमत/जळगाव/प्रतिनिधी शहराच्या स्वच्छता आणि आपत्कालीन व्यवस्थापन कार्यात मोठा टप्पा घेऊन महानगरपालिकेच्या ताफ्यात सोमवारी नव्याने दाखल झालेल्या अत्याधुनिक यंत्रसामग्रीचे लोकार्पण उत्साहात पार पडले. यामध्ये अग्निशमन विभागासाठी दोन उच्च क्षमतावाले वाहन आणि आरोग्य विभागासाठी तीन नवीन जेसीबी वाहनांचा समावेश आहे. जेसीबी वाहनांचे लोकार्पण महापौर दीपमाला काळे आणि उपमहापौर मनोज चौधरी यांच्या हस्ते आकाशवाणी चौकात करण्यात आले. लोकार्पणानंतर, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील वेस्ट मटेरियल उचलण्याचे काम तात्काळ सुरू करण्यात आले. महापौर काळे यांनी सांगितले की, “या यंत्रसामग्रीच्या मदतीने महामार्गाची स्वच्छता नियमित आणि चकाचक राखणे सोपे होईल.” नवीन जेसीबी वाहनांच्या मदतीने महामार्गावरील कचरा ट्रॅक्टरमध्ये भरून लगेचच साफसफाईस…

Read More

अजित पवारांचा बाजार समितीत मार्चमध्ये अनावरण होणार महाराष्ट्रातील पहिला शेतकरी पुतळा साईमत/अमळनेर/प्रतिनिधी: राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शेतकरी रूपातील महाराष्ट्रातील पहिला पुतळा अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात उभारला जाणार असल्याची औपचारिक घोषणा करण्यात आली आहे. बाजार समितीचे सभापती अशोक आधार पाटील यांनी सांगितले की, मार्च महिन्यात होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत या पुतळ्याचे अनावरण होईल. या निर्णयामुळे अमळनेर तालुक्यात राजकीय तसेच सामाजिक स्तरावर मोठ्या चर्चेला उधाण आले आहे. अजित पवार यांचे अमळनेरशी विशेष नाते आहे. आमदार अनिल पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील आणि माजी नगराध्यक्ष स्व. सुरेश ललवाणी यांच्या सहकार्याने तालुक्यातील विकासाला गती मिळाली. बाजार समितीच्या आर्थिक शिस्त आणि…

Read More

धरणगाव तालुक्यात ‘जलसंकल्प’ अभियानाचा जोरदार शुभारंभ साईमत/पाळधी/धरणगाव /प्रतिनिधी धरणगाव तालुक्यातील पाणीटंचाई आणि पुराच्या धोके टाळण्यासाठी “जलसंकल्प धरणगावचा : पाणी अडवा–पाणी जिरवा, शेती समृद्ध करा” या महत्त्वाकांक्षी अभियानाचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमाच्या माध्यमातून तालुक्यातील नाले, नदीपात्र आणि बंधाऱ्यांचे खोलीकरण, रुंदीकरण तसेच जमिनीची सुपीकता आणि भूजल पातळी सुधारण्याचे काम सुरू होणार आहे. या उपक्रमाचे उद्‌घाटन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी शेतकऱ्यांना पुढाकार घेण्याचे आवाहन करत सांगितले, “आज मी पालकमंत्री म्हणून नाही, तर शेतकरी म्हणून तुमच्यासमोर उभा आहे. पाणी म्हणजे शेतकऱ्याचं जीवन आहे. नाला खोलीकरण म्हणजे शेतीच्या भविष्यासाठीचा विमा.” महत्त्वाचे मुद्दे आणि…

Read More

चाळीसगाव शहर पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी : शहरातील बसस्थानक परिसरात गर्दीचा फायदा घेत महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाणे येथे अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दीपाली सुनील पाटील (वय ४०) या १ मार्च रोजी दुपारच्या सुमारास चाळीसगाव बसस्थानकावरून प्रवासासाठी बसमध्ये चढत होत्या. त्यावेळी बसस्थानकावर मोठी गर्दी होती. याच गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सुमारे ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र लंपास केले. गर्दीमुळे चोरी नेमकी कधी आणि कशी झाली हे त्यांना तत्काळ समजू शकले नाही. काही वेळानंतर…

Read More

सकाळी कीर्तन, सायंकाळी महाआरती अकलूद शिवारात धार्मिक उत्सवाची शोभा साईमत/फैजपूर/ पाडळसे/ /प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील सावदा–फैजपूर रोडवरील पाडळसे येथील अकलूद शिवारात भव्य शिवमहापुराण कथा सोहळ्यासाठी तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रातील सुमारे दहा लाखांहून अधिक भाविकांच्या उपस्थितीची अपेक्षा असून, परिसर आधीपासूनच भक्तिमय उत्साहाने न्हालेला आहे. स्थानिक आणि दूरवरून येणाऱ्या भाविकांसाठी आयोजकांनी पांडाल उभारणी, आकर्षक मंच सजावट, अत्याधुनिक ध्वनी व प्रकाश व्यवस्था तसेच मोठ्या एलईडी स्क्रीनची सोय पूर्ण केली आहे. तसेच सर्व सुविधा विचारात घेऊन पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था, स्वच्छतागृहे आणि विस्तीर्ण वाहनतळ उपलब्ध करून देण्यात आले आहेत. स्वयंसेवकांच्या मदतीने गर्दीचे व्यवस्थापन सुरळीत पार पडावे यासाठी स्वतंत्र नियंत्रण कक्षही…

Read More

प्रेमातून पेटले वैर; प्रेयसीची गोळी झाडून हत्या, प्रियकराची आत्महत्या साईमत/अकुलखेडा (ता. चोपडा)/प्रतिनिधी : तालुक्यातील अकुलखेडा येथे प्रेमप्रकरणातून घडलेल्या दुहेरी मृत्यूच्या धक्कादायक घटनेने परिसर हादरून गेला आहे. प्रेयसीवर गावठी पिस्तुलातून गोळी झाडून तिची हत्या केल्यानंतर प्रियकराने स्वतःवर गोळी झाडून जीवन संपवल्याची घटना २८ रोजी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे गावात भीती आणि हळहळ व्यक्त होत आहे. अकुलखेडा येथील जगदीश काशिनाथ पाटील यांच्या राहत्या घरी अनिता जगदीश पाटील (वय ४०) आणि देवा सुरेश धनगर (वय ४०) यांचे रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह आढळून आले. ही घटना सकाळी साडेदहाच्या सुमारास उघडकीस आली. जगदीश पाटील यांची मुलगी शाळेतून घरी परतल्यानंतर तिने घरात प्रवेश केला असता दोघांचेही…

Read More

आरोपीविरुद्ध एमआयडीसी पोलीसांत गुन्हा साईमत/जळगाव/प्रतिनिधी शहरातील मेहरूण परिसरात एका १९ वर्षीय तरुणीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि. २८ फेब्रुवारी) दुपारी घडली. या प्रकरणी संबंधित तरुणीच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाणे, जळगाव येथे संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मेहरूण परिसरात कुटुंबियांसह वास्तव्यास असलेली १९ वर्षीय तरुणी शनिवारी दुपारी सुमारे ३ वाजता श्रीराम मंदिर चौकातील आपल्या आजीच्या घरी गेली होती. गच्चीवर पापड वाळत घालत असताना, त्याच परिसरात राहणारा संशयित आरोपी भावेश भानुदास पाटील (रा. मेहरूण) तेथे आला. दरम्यान, त्याने तरुणीचा हात धरून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचा आरोप तक्रारीत नमूद करण्यात आला आहे. अचानक घडलेल्या…

Read More

सोशल मीडियावरील तक्रारींना प्रतिसाद; पाच हातगाड्या जप्त, नागरिकांनी व्यक्त केले समाधान साईमत/जळगाव/प्रतिनिधी शहरातील शनिपेठ परिसरात भाजीपाला विक्रेत्यांच्या वाढत्या अतिक्रमणामुळे नागरिकांना दररोज मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. अखेर नागरिकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाज उठवल्यानंतर प्रशासनाने दखल घेत धडक कारवाई केली. शनिवारी अतिक्रमण विभागाच्या पथकाने कारवाई करत दोन्ही गल्ल्यांमधील अतिक्रमण हटवून रस्ते मोकळे केले. शनिपेठेतील बळीराम मंदिर व शनिमंदिर समोरील गल्लीत दररोज भाजीपाला विक्रेते लोटगाड्या लावून किंवा रस्त्यावर बसून विक्री करत होते. त्यामुळे जवळपास ७० टक्के रस्ता अडवला जात होता. वाहनचालकांना ये-जा करण्यासाठी पुरेशी जागा राहत नव्हती. विशेषतः शनिवारी गर्दीच्या दिवशी परिस्थिती अधिकच बिकट होत होती. काही विक्रेत्यांकडून अरेरावीचे प्रकारही होत…

Read More

रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रकार उघड; सेवानिवृत्त नागरिकाचे घर लक्ष्य साईमत/जळगाव/प्रतिनिधी शहरातील कोल्हे नगर परिसरात बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ४० हजार ४०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना शनिवारी (दि. २८ फेब्रुवारी) सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी दुपारी ४ वाजता रामानंद नगर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुरलीधर नारायण धांडे (वय ७५) हे सेवानिवृत्त असून ते काही कारणास्तव घरी नसताना ही घटना घडली. २६ डिसेंबर २०२५ रोजी रात्री १० वाजेपासून ते २८ फेब्रुवारी २०२६ दरम्यानच्या कालावधीत चोरट्यांनी संधी साधली. घर बंद असल्याचे लक्षात येताच अज्ञात आरोपींनी मुख्य…

Read More

“महिलांच्या उद्योजकतेला व स्थानिक कलांना प्रोत्साहन देणे हा महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे साईमत/जळगाव/प्रतिनिधी महिला बचत गट, उद्योजक आणि स्वयंसहाय्यता गटांना प्रोत्साहन देण्यासाठी जळगाव महानगरपालिका व महिला व बालकल्याण विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘खान्देश महोत्सव २०२६’ चे सागर पार्कमध्ये भव्य उद्घाटन झाले. महापौर दीपमाला काळे व उपमहापौर मनोज चौधरी यांच्या हस्ते सुरू झालेल्या महोत्सवात शहरातील प्रशासनिक अधिकाऱ्यांपासून नगरसेवकांपर्यंत मोठ्या संख्येने उपस्थिती होती. ‘व्होकल फॉर लोकल’ या संकल्पनेवर आधारित हा महोत्सव २६ फेब्रुवारी ते २ मार्च दरम्यान सकाळी १० वाजता सुरू होऊन रात्री १० वाजेपर्यंत आयोजित केला जात आहे. उद्घाटन प्रसंगी पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल…

Read More