शेतकऱ्यांसाठी ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमाची सुरुवात साईमत/नेरी, ता.जामनेर/प्रतिनिधी : शेतकऱ्यांसाठी ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम (रब्बी) २०२५-२६ अंतर्गत जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे अंतिम वर्षाचे विद्यार्थी देवप्रिंपी गावात दाखल झाले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेश तायडे, कार्यक्रम समन्वयक प्रा.बी.एम. गोणशेटवाड, कार्यक्रम अधिकारी प्रा.व्ही.एस.पाटील व विषयविशेष तज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी गावातील शेतकऱ्यांसाठी विविध कार्यक्रम राबवतील. कृषी दूत धिरज गोकुळ पाटील, श्रीकृष्ण पुंडलिक सोनोने, पैदीमरला नरसिंहा रेड्डी, शेखर नाना ठाकरे आणि विवेक प्रेमराज वरखड या गावात राहून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून मार्गदर्शन देतील. शेतजमिनीची माती व पाणी परीक्षण, विविध पिकांची लागवड, तंत्रज्ञानाचा वापर, पिकांवर येणारे रोग व त्यांचे निवारण या विषयांवर शेतकऱ्यांना…
Author: saimat
सेना-भाजपाचे बहुमत असूनही समन्वयाचा हात; ना. गुलाबराव पाटलांची विकासकेंद्री भूमिका साईमत/पाळधी, ता.धरणगाव /प्रतिनिधी : धरणगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत २३ पैकी १५ नगरसेवक निवडून येत शिवसेना-भाजपा युतीला स्पष्ट बहुमत मिळाले असतानाही, नगराध्यक्षपदाच्या निवडीनंतर राजकीय अहंकार न दाखवता विकास आणि समन्वयाचा सकारात्मक संदेश देणारी घडामोड घडली आहे. शहर विकास आघाडीच्या माध्यमातून निवडून आलेल्या नगराध्यक्षा लिलाबाई सुरेश चौधरी तसेच त्यांच्या सोबत निवडून आलेल्या आठ नगरसेवकांनी पालकमंत्री तथा राज्याचे शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी पालकमंत्र्यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्षा व नगरसेवकांचा शाल-श्रीफळ देऊन सन्मानपूर्वक सत्कार करत अभिनंदन केले.विशेष म्हणजे, नगरपरिषदेवर शिवसेना-भाजपा युतीचे स्पष्ट बहुमत असतानाही नगराध्यक्षपदाच्या निवडीनंतर कोणतीही राजकीय कटुता न ठेवता शहरहिताला…
‘हसत-खेळत गणित शिकूया’ या संकल्पनेतून विद्यार्थ्यांसाठी ‘मथ्स वीक’ शिक्षणावर भर देण्यात आला. साईमत/पारोळा/ प्रतिनिधी विद्यार्थ्यांमध्ये गणिताविषयी आवड, आत्मविश्वास व तार्किक विचारशक्ती विकसित व्हावी म्हणून गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त पारोळा येथील टायगर इंटरनॅशनल स्कूलमध्ये आठवडाभर विविध गणितीय उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. हा उपक्रम स्कूलचे अध्यक्ष रवींद्र पाटील व संचालिका रुपाली पाटील यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात आला. त्यांनी उपक्रमाचे उद्घाटन करत, गणित हा केवळ विषय नसून जीवनातील महत्त्वाचा घटक असल्याचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शनात सांगितले. प्राचार्य पी.एस.पाटील यांनी विद्यार्थ्यांना गणिताची भीती दूर करून विविध उपक्रमांतून आनंदाने गणित आत्मसात करण्याचे आवाहन केले. आठवडाभर गणितावर आधारीत शैक्षणिक गाणी, प्रेरणादायी चित्रपट, गणितीय खेळ स्पर्धांचे आयोजन करण्यात…
जनता कला व वाणिज्य महाविद्यालयात एन.सी.सी. विभागाच्या वतीने घरगुती गॅस अपघात प्रतिबंध व सुरक्षा कार्यशाळा घेण्यात आली. साईमत/मलकापूर /प्रतिनिधी : घरगुती गॅसच्या सुरक्षित वापराविषयी जनजागृती निर्माण व्हावी व संभाव्य अपघात टाळण्यासाठी आवश्यक खबरदारीची माहिती नागरिकांना मिळावी, या उद्देशाने मंगळवार दि.२३ डिसेंबर रोजी जनता कला व वाणिज्य महाविद्यालयात एन.सी.सी. विभागाच्या वतीने घरगुती गॅस अपघात प्रतिबंध व सुरक्षा कार्यशाळा घेण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. सुधीर चव्हाण होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लेफ्टनंट वाय.एस.राजपूत यांनी केले. प्रमुख उपस्थितीत डॉ. एस. एस. शुक्ला होते. कार्यशाळेत रचना गॅस ॲण्ड अप्लायन्सेसचे व्यवस्थापक कुणाल मिलिंद यावतकार यांनी घरगुती एलपीजी सिलिंडर, रेग्युलेटर, पाईप व इतर उपकरणांचा सुरक्षित…
ॲड.अर्जुन पाटील यांचे प्रबोधनात्मक भाषण; पिठलं-भाकरीच्या समतेच्या पंगतीतून मानवतेचा संदेश साईमत/बोदवड/प्रतिनिधी : दगडाच्या देवाला नैवेद्य दाखवण्यापेक्षा भुकेल्याला भाकरी द्या, हाच खरा धर्म आहे, असे क्रांतिकारी विचार मांडणारे संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त बोदवड दिवाणी व फौजदारी न्यायालय परिसरात वैचारिक प्रबोधनाचा जागर करण्यात आला. बोदवड वकील संघाच्या वतीने आयोजित कार्यक्रमातून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत माणुसकीचा संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान बोदवड वकील संघाचे अध्यक्ष ॲड. अर्जुन पाटील यांनी भूषविले. आपल्या अभ्यासपूर्ण आणि प्रभावी भाषणात त्यांनी संत गाडगे महाराज हे केवळ संत नसून समाज परिवर्तनाचे चालते-फिरते विद्यापीठ होते, असे प्रतिपादन केले. समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, व्यसनाधीनता आणि अस्वच्छता याविरोधात महाराजांनी आयुष्यभर लढा दिला.…
‘आम्ही लोक आदिवासी’ या कवितेची कविकट्टा या व्यासपीठवर निवड झाली. साईमत/भडगाव/प्रतिनिधी : सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात पिंपरखेड (ता.भडगाव) येथील माध्यमिक आदिवासी आश्रमशाळेतील माध्यमिक शिक्षक कवी राम सखाराम जाधव यांची ‘आम्ही लोक आदिवासी’ या कवितेची कविकट्टा या व्यासपीठवर निवड झाली. दि.३ जानेवारी रोजी सत्र क्र.११ मध्ये दुपारी १२ ते १ या वेळेत कविताचे सादरीकरण होणार आहे. कवी राम जाधव हे आदिवासी बोलीभाषा व बंजारा बोलीभाषेचे अभ्यासक आहेत.आदिवासी बालकांमध्ये राहून त्यांनी पारंपरिक, मौखिक, लोकगीते जमवून त्यांनी त्या गीतांचा मराठी या प्रमाण बोलीभाषेत काव्यात्मक अनुवाद केला आहे. आदिवासी बोलीभाषेतील गीतांच्या माध्यमातून त्यांनी आदिवासी विद्यार्थ्यांना चार ते पाच…
सांस्कृतिक महोत्सव ‘रेझोनन्स’ नुकताच उत्साहात पार पडला.महोत्सवाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. साईमत/चोपडा/प्रतिनिधी : येथील पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या कला, संस्कृती, इतिहासप्रेम व सर्जनशीलतेचे प्रभावी दर्शन घडवणारा दोन दिवसीय वार्षिक सांस्कृतिक महोत्सव ‘रेझोनन्स’ नुकताच उत्साहात पार पडला.महोत्सवाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. पहिल्या दिवशी कार्यक्रमाचे उद्घाटन उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब घोलप यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी शाळेच्या वार्षिक कॅलेंडर २०२६ चे प्रकाशनही करण्यात आले. कार्यक्रमास मानसी धीरज बाविस्कर, उमेश करोडपती, डॉ. विकास हरताळकर, घनश्याम अग्रवाल, वैशाली पंडित, प्रवीण सोनवणे, सुभाष पटेल, प्राचार्य अरुण पाटील, प्राचार्या सुरेखा मिस्त्री आदी मान्यवरांसह संस्थेचे पदाधिकारी व शिक्षकवृंद उपस्थित होते. संस्थेतर्फे सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. पहिल्या दिवशी बॉलीवूड…
सबगव्हाण टोल प्लाझावर वाहनांना लावले रिफ्लेक्टर साईमत/पारोळा /प्रतिनिधी दाट धुके, थंडीची लाट आणि सतत खराब होणारे हवामान लक्षात घेऊन भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जळगाव युनिटतर्फे रस्ते अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष रस्ता सुरक्षा जागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे.टोल संकलन करणाऱ्या कंपनीचे व्यवस्थापक भूषण सुरेश बागूल, उपव्यवस्थापक सचिन श्रीधर दळवी यांच्या उपस्थितीत सबगव्हाण टोल प्लाझावर वाहनांना रिफ्लेक्टर लावण्यात आले. तसेच वाहन चालकांना वाहतुकीच्या नियमांची माहिती देऊन सुरक्षित वाहन चालवण्यावर मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमामुळे अपघात टाळण्यास मदत होणार आहे. ही मोहीम साधारणतः एक ते दोन आठवडे सुरू ठेवली जाणार असल्याची माहिती देण्यात आली.
नगराध्यक्षांसह २२ जागांवर भाजप विजयी, राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचा ४ जागांवर प्रवेश साईमत/जामनेर /प्रतिनिधी : जामनेर नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपने वर्चस्व कायम राखत नगराध्यक्ष पदासह एकूण २२ जागांवर विजय मिळवला असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार) गटाने चार जागांवर विजय मिळवत नगरपरिषदेत प्रवेश केला आहे. जामनेर नगरपरिषदेतील एकूण १७ नगरसेवक पदांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती. यापूर्वीच भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार साधनाताई महाजन यांच्यासह नऊ नगरसेवक बिनविरोध निवडून आले होते. त्यामुळे उर्वरित १७ जागांसाठी २ डिसेंबर रोजी मतदान घेण्यात आले होते. या निवडणुकीची मतमोजणी २१ डिसेंबर रोजी जामनेर येथील जळगाव रोडवरील शासकीय आयटीआय येथे पार पडली. मतमोजणीदरम्यान भाजपाला सर्व २७ जागा मिळतील,…
शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये हरित सेनेतर्फे जनजागृती करण्यात आली. साईमत/जळगाव/प्रतिनिधी : येथील खुबचंद सागरमल विद्यालयातर्फे मकरसंक्रांती सणाच्या पार्श्वभूमीवर नायलॉन मांजा वापरामुळे होणारे धोके लक्षात घेऊन शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये हरित सेनेतर्फे जनजागृती करण्यात आली. यावेळी नायलॉन मांजामुळे पक्षी, माणसे व प्राणी जखमी होतात. तसेच पर्यावरणाचे मोठे नुकसान होते. याबाबत मुख्याध्यापक योगीनी बेंडाळे यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. नायलॉन मांजा वापरणे कायद्याने गुन्हा असून त्यासाठी दंड व शिक्षा होऊ शकते, याची जाणीव करून दिली. तसेच विद्यार्थ्यांनी कागदी, कापसाची किंवा पर्यावरणपूरक मांजा वापरण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी “नायलॉन मांजा वापरणार नाही व इतरांनाही वापरू देणार नाही” अशी प्रतिज्ञा घेतली. शाळा परिसरात नायलॉन मांजा वापराविरोधात फलक लावून जनजागृती…