साईमत जळगाव प्रतिनिधी शहरातील अजिंठा चौफुली परिसरातील अयोध्या नगर येथे रविवारी सकाळी अचानक इलेक्ट्रिक डीपीला आग लागल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र अग्निशमन दलाच्या वेळेवर आणि तत्पर कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सुमारे ८ वाजून ४० मिनिटांनी स्थानिक नागरिक विजय वानखेडे यांनी मोबाईलद्वारे अग्निशमन विभागाला घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पोहोचेपर्यंत डीपीला लागलेली आग वाढत असल्याने परिसरात काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र अग्निशमन दलाच्या पथकाने प्रसंगावधान राखत परिस्थिती नियंत्रणात आणली. या मोहिमेत वाहनचालक प्रकाश चव्हाण, प्रदीप धनगर, संजय तायडे तसेच…
Author: saimat team
साईमत वृत्तसेवा आयपीएल 2026 च्या आजच्या रविवारी क्रिकेटप्रेमींसाठी खऱ्या अर्थाने ‘सुपर डबल हेडर’ची मेजवानी रंगणार आहे. आज दोन महत्त्वाचे सामने खेळवले जाणार असून पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स आमनेसामने येणार आहेत, तर दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात हायव्होल्टेज लढत पाहायला मिळणार आहे. आजचा पहिला सामना लखनौ येथील अटल बिहारी वाजपेयी एकाना स्टेडियमवर होणार आहे. हा सामना दुपारी रंगणार असून दोन्ही संघ विजयाच्या इराद्याने मैदानात उतरणार आहेत. Gujarat Titans संघाने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध १ धावाने मिळवलेल्या रोमांचक विजयामुळे आत्मविश्वास उंचावला आहे. त्या विजयामुळे गुणतालिकेत त्यांचे स्थान मजबूत झाले असून आता सलग दुसरा विजय मिळवण्याचे लक्ष्य…
रोहित पवारांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ; पुढील महिन्यात मोठ्या घडामोडींचे संकेत साईमत मुंबई प्रतिनिधी महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही वर्षांपासून सातत्याने घडत असलेल्या उलथापालथींच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत मिळत आहेत. भाजपचे सत्तेतील मित्रपक्षच आगामी काळात भाजपच्या निशाण्यावर येऊ शकतात, असा खळबळजनक दावा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. त्यांच्या या विधानामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. 2019 पासून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आल्या आहेत. शिवसेनेतील फुटीनंतर एकनाथ शिंदे यांनी अनेक आमदारांसह भाजपसोबत सत्ता स्थापन केली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पडत अजित पवार गट सत्तेत सहभागी झाला. या सगळ्या घडामोडींमुळे राज्यातील…
गुन्हेगारीवर पोलिसांचा कडक बडगा; शहरात सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर साईमत भुसावळ प्रतिनिधी आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी भुसावळ उपविभागीय पोलिसांनी धडक ‘कोम्बिंग ऑपरेशन’ राबवत गुन्हेगारी प्रवृत्तींवर जोरदार कारवाईचा बडगा उगारला आहे. या विशेष मोहिमेत बाजारपेठ पोलिसांनी तब्बल 14 सराईत गुन्हेगारांची झाडाझडती घेतली असून, दोन फरार आरोपींना अटक करून मोठे यश मिळवले आहे. या कारवाईत आर्म अॅक्ट तसेच चोरीसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या संशयित व आरोपींची सखोल तपासणी करण्यात आली. यामध्ये पोलिसांच्या रडारवर असलेले दोन फरार आरोपी जेरबंद करण्यात आले. अटक करण्यात आलेल्यांमध्ये समीर शहा जब्बार शहा उर्फ डमरू आणि केवल अनिल टाक (दोघे रा. भुसावळ)…
साईमत जळगाव प्रतिनिधी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी – जळगाव महानगरतर्फे प्रबोधन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून, या निमित्ताने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. समाजात समता, सेवा आणि प्रबोधनाचा संदेश पोहोचविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. याच अनुषंगाने संत चोखामेळा बोर्डिंग येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप तसेच अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत करण्यात आली तसेच अन्नदान करून सामाजिक बांधिलकी जपण्यात आली. या कार्यक्रमास जळगाव शहराचे आमदार सुरेश दामू भोळे (राजू मामा), भाजपा जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष दीपक जी सूर्यवंशी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील तसेच गटनेते…
साईमत जळगाव प्रतिनिधी जळगावकरांसाठी दीर्घ प्रतीक्षेनंतर एक आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जळगाव ते इंदूर विमानसेवा लवकरच सुरू होण्याची शक्यता असून, या नव्या हवाई मार्गामुळे प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. ‘फ्लाय-९१’ (Fly91) या विमान कंपनीच्या माध्यमातून ही सेवा सुरू केली जाणार आहे. पुणे, गोवा, हैदराबादनंतर इंदूरची भर सध्या ‘फ्लाय-९१’ कंपनीकडून जळगाव विमानतळावरून पुणे, गोवा आणि हैदराबाद या शहरांसाठी नियमित विमानसेवा सुरू आहे. आता या यादीत महत्त्वाचे व्यावसायिक आणि शैक्षणिक केंद्र असलेल्या इंदूरचा समावेश होणार असल्याने प्रवाशांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. इंदूर हा मध्य प्रदेशातील महत्त्वाचा हब असून, तेथून दिल्लीसह देशातील अनेक प्रमुख शहरांसाठी नियमित विमानसेवा उपलब्ध आहे.…
साईमत जळगाव प्रतिनिधी शहरालगत मोहाडी शिवारातील एकलव्य नगर परिसरातील अतिक्रमण हटविण्याचा मुद्दा चांगलाच तापला आहे. महापौर दीपमाला काळे यांनी तातडीची पत्रकार परिषद घेऊन महापालिकेच्या जागेवरील अतिक्रमण कोणत्याही परिस्थितीत काढण्यात येईल, अशी ठाम भूमिका मांडली. मागील अनेक वर्षांपासून आदिवासी भिल्ल बांधवांनी झोपड्या उभारून वास्तव्य केले असून ते सुमारे २० वर्षांपासून येथे राहत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईला त्यांनी तीव्र विरोध दर्शविला असून झोपड्या कोणत्याही परिस्थितीत हटवू देणार नसल्याची आक्रमक भूमिका आधीच त्यांनी घेतली आहे. नुकतेच महापालिकेचे पथक अतिक्रमण हटविण्यासाठी गेले असता महिलांसह नागरिकांच्या आक्रमक भूमिकेमुळे कारवाई विना परतली. दरम्यान, काही अज्ञात व्यक्तींनी झोपड्यांसाठी जागा विक्री केल्याचा संशय…
साईमत वृत्तसेवा बैरुत: इस्रायलने (Israel) लेबनॉनच्या (Lebanon) राजधानी बैरुतमध्ये (Beirut) बुधवारी रात्रभर हवाई हल्ले (airstrike) करून हेझबोला प्रमुख नईम कासिमचा वैयक्तिक सल्लागार अली युसूफ हर्शी ठार केले असल्याचा दावा आयडीएफने केला आहे. हा हल्ला इराण- अमेरिका युद्धविरामानंतरही सुरू राहिल्यामुळे मध्य पूर्वेत तणाव पुन्हा वाढल्याचे निर्देशित झाले आहे. इस्रायली लष्कराच्या (IDF) टेलिग्राम निवेदनानुसार, हर्शी हा नईम कासिमचा अत्यंत जवळचा सहकारी आणि वैयक्तिक सल्लागार होता. हेझबोला प्रमुखाच्या कार्यालयाचे व्यवस्थापन पाहण्यात त्याची महत्त्वाची भूमिका होती. हल्ल्यात लिटानी नदीच्या उत्तर ते दक्षिण भागातील दोन महत्त्वाच्या क्रॉसिंगवरही कारवाई करण्यात आली, जिथून शस्त्रे, रॉकेट्स आणि लाँचर्स वाहतूक केली जात होती. याशिवाय, दक्षिण लेबनॉनमधील हेझबोला दहशतवाद्यांकडून वापरली…
साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी महाराष्ट्र राज्यातील महसुल विभागातील नायब तहसिलदार, राजपत्रित वर्ग-2 हे अत्यंत महत्त्वाचे पद आहे परंतु नायब तहसिलदार या पदाचे वेतन राजपत्रित वर्ग-2 चे नसल्याने महाराष्ट्र राज्य तहसिलदार व नायब तहसिलदार संघटना यांनी नायब तहसिलदार यांचे ग्रेड पे वाढविण्याबाबत सन 1998पासून आजपर्यंत शासनाकडे वारंवार पाठपुरावा करुनही संघटनेच्या मागणीचा कोणताही विचार करण्यात आलेला नाही. संघटनेने नायब तहसिलदार राजपत्रित वर्ग 2 यांचे ग्रेड पे 4800 रु. करण्याचे अनुषंगाने शासनाला यापुर्वीही बेमुदत बंदची नोटीस दिली होती परंतु महसूल प्रशासन (महाराष्ट्र शासन) यांनी या संदर्भात कुठलीही दखल घेतलेली नाही.त्यामुळे संघटनेने येत्या 3 एप्रिलपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. तत्कालीन अपर…
साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील कंत्राटदारांची सार्वजनिक बांधकाम विभागाकडे 450 कोटींची बिले थकित असतांना राज्य शासनाने जळगाव जिल्ह्याला केवळ 38 कोटी रूपये देऊन तोंडाला पाने पुसली आहेत. त्यामुळे जळगाव जिल्हा कंत्राटदार संघटनेने यापुढेही काम बंद आंदोलन सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला असून नवीन निविदांवर बहिष्कार टाकण्याचे ठरविले आहे. शासनाच्या निषेधार्थ काल रोजी जिल्ह्यातील 150 कंत्राटदारांनी एकत्रित येत भिक मागो आंदोलन करून शासनाचे या प्रश्नाकडे लक्ष वेधले. ‘बिल नाही तर काम नाही’ अशी भूमिका राज्यातील कंत्राटदारांनी घेताच राज्य सरकारने कंत्राटदारांची थकित बिले देण्यासाठी तातडीने तब्बल 13 हजार कोटी रूपये विविध विभागांना हस्तांतरीत केल्याचा आव आणला. मात्र प्रत्यक्षात ही रक्कम थकित बिलांच्या…