साईमत, पाचोरा : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ मुख्य कार्यालय, पुणे यांच्या आदेशाने आणि नाशिकचे उपमहाव्यवस्थापक राजेंद्रकुमार जोशी यांच्या संकल्पनेने तसेच नाशिकचे प्रोग्रामर किरण उगले यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा वखार केंद्राअंतर्गत सातगाव (ता.पाचोरा) आणि जरंडी (ता.सोयगाव) येथे ‘वखार आपल्या दारी’ हा कार्यक्रम नुकताच पार पडला.
यावेळी साठा अधीक्षक किशोर पाटील यांनी शेतकऱ्यांना अन्नधान्य साठवणुकीचे महत्त्व तसेच शेतमाल तारण योजना आदींची माहिती दिली. यावेळी उषा पाटील (सरपंच, सातगाव), स्वाती पाटील (सरपंच, जरंडी) यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी कृष्णा लोहार, अनिल खरे, प्रमोद कोठावदे, राहुल पारो आदींनी परिश्रम घेतले.