चालत्या-बोलत्या विद्यापीठास मुकल्याचा निघाला सूर

0
3

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी

ज्येष्ठ लेखक, विचारवंत आणि समता परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. हरी नरके यांच्या निधनामुळे एका चालत्या-बोलत्या विद्यापीठास मुकलो असल्याचा सूर जनमाणसातून निघत आहे. त्यामुळे हरी नरके यांच्या आत्म्यास चिरशांती लाभावी, अशी प्रार्थना करून अमळनेरमध्ये अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आणि माळी समाजाच्यावतीने त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली.

यावेळी समता परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष भिमराव महाजन, माळी समाजाचे अध्यक्ष मनोहर महाजन, माळी समाजाचे युवक कार्यकर्ते धीरज चव्हाण यांनी नरके यांच्या स्मृतींना उजाळा देऊन मनोगत व्यक्त केले. यावेळी माळी समाजाचे सचिव गणेश महाजन, कैलास महाजन, पुरुषोत्तम महाजन, परिश्रम मतिमंद मुलांच्या शाळेचे चेअरमन योगेश महाजन, प्रा.महेंद्र महाजन, युवक कार्यकर्ते धिरज चव्हाण यांच्यासह समता सैनिक, समता प्रेमी नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here