Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»अमळनेर»पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यासाठी प्रशासनाला वेळ मिळेना !
    अमळनेर

    पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यासाठी प्रशासनाला वेळ मिळेना !

    saimatBy saimatOctober 26, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जिल्हा प्रशासनाकडे अहवाल सादर केलेला नाही

    साईमत/अमळनेर/प्रतिनिधी

    तालुक्यात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या मुसळधार व सततच्या पावसाने नुकसान झालेल्या पिकांचा पंचनाम्याचा अहवालच अद्यापही जिल्हा प्रशासनाकडे सादर केलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत कशी मिळणार?, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

    तालुका प्रशासन निवडणुकांच्या कामात तर पुढारी उमेदवारीत व्यस्त असल्याने ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पिकांच्या नुकसानीचा पंचनामा झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचा पंचनामा कोण करेल? शासन दरबारी शेतकऱ्यांनी निवेदन, धरणे आंदोलन करूनही शासन कुंभकर्णी झोप घेत असेल तर भारतासारख्या कृषी प्रधान देशात जगाचा पोशिंदा वाऱ्यावर पडला असल्याची बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.

    ऑक्टोबर महिन्यात मुसळधार पावसाने कापणीला आलेल्या पिकांचे नुकसान होऊनही दखल अद्यापपावेतो घेतली गेलेली नाही. २ ऑक्टोबर ते २० ऑकटोबर या दरम्यान तालुक्यात चार वेळा मुसळधार पाऊस झाला. मका, ज्वारी, सोयाबीन ही पिके कापणीला तर कापूस वेचणीला आला असताना शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला गेला. यावर्षी सुरुवातीपासूनच मुसळधार पावसाला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागले.

    परिणामी उत्पन्न कमी आणि खर्च जास्त अशी परिस्थिती असताना आह, त्या परिस्थितीत पिके सावरण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला होता. पिके घरात येण्याच्या वेळेस पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. शेतकऱ्यांनी सर्व नुकसानग्रस्त पिकांचा सरसकट पंचनामा करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. मात्र, निवडणुका जवळ आल्याने लोकशाहीत शेतकऱ्यांना न्याय मिळेल की नाही? असाही प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

    सरसकट पंचनामा करण्याची मागणी

    शेतात पंचनाम्यासाठी अधिकारी बांधावर पोहोचला नाही. परिणामी जोपर्यंत पंचनामा करणारा अधिकारी शेताच्या बांधावर पोहचत नाही तोपर्यन्त पीक कापणी व कापूस वेचणी करायची नाही का ? असाही प्रश्न पडला आहे. पावसाची उघडीप झाली आहे. आहे त्या परिस्थितीत शेतकरी पिके काढणीला लागले आहेत. मात्र, कुणीही पहायला तयार नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. पंचनामे करण्यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांमध्येच एक वाक्यता नसून सर्वसामान्य शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये, यासाठी सरसकट पंचनामा करण्यात यावा, अशीही मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

    नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे होणार

    प्रशासनाने पंचनाम्याचे आदेश दिले आहेत. तालुक्यात मंडळ व गावनिहाय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. त्यांचेच पंचनामे केले जातील, असे तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी सांगितले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Amalner : अमळनेर गावात विवाहितेचा विनयभंग

    January 14, 2026

    Amalner : अमळनेरमध्ये दुचाकीवर जाताना मांजाने गळा कापला

    January 14, 2026

    Amalner:दहिवद ग्रामपंचायतीच्या वृक्षलागवडीची शास्त्रज्ञांकडून पाहणी

    December 29, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.