Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»कृषी»गारपीटसह वादळाने झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावे
    कृषी

    गारपीटसह वादळाने झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावे

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoFebruary 28, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, चोपडा : प्रतिनिधी

    तालुक्यात २६ फेब्रुवारी रोजी बेमोसमी पाऊस पडला. यावेळी मोठ्या प्रमाणात गारपीट व वादळ झाल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामध्ये मका, ज्वारी, हरभरा, केळी, दादर व गहू असे काढणीवर आलेल्या पिकांचे नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळावी, अशा आशयाचे तहसिलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी निवेदन नायब तहसीलदार आर. आर. महाजन यांनी स्वीकारले.

    तालुक्यात २६ रोजी रात्री अचानक वादळ व गारपीटसह पाऊस आल्याने तालुक्यातील ठिकठिकाणी शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. तयार झालेली पिके जमीनदोस्त झाली असल्याने त्यांच्या पुढे आर्थिक संकट उभे राहिले आहे. शेती करण्याकामी लागलेला खर्चही निघणार नाही, अशी विवंचना झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाने झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन राज्य सरकारने शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, अशी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

    निवेदन देतेवेळी तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती विनायक चव्हाण, पं.स.चे माजी सभापती डी. पी. साळुंखे, शांताराम सपकाळे, तुकाराम पाटील, सुनील डोंगर पाटील, माजी नगरसेवक कैलास सोनवणे, भाऊसाहेब साळुंखे, युवक जिल्हा सरचिटणीस लहुश न्हायदे, दीपक वानखेडे, विशाल गवळी, शेखर पाटील, मच्छिंद्र पाटील, अमोल पाटील, भाईदास पाटील, इंद्रजीत पाटील, युवक शहराध्यक्ष समाधान माळी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Heartbreaking Incident In Chopra : दोन महिन्यांच्या चिमुकलीचा हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यात मृत्यू

    March 31, 2026

    देशात पुरेसा एलपीजी साठा; अफवांकडे न जा, सरकारचा संदेश

    March 25, 2026

    Jalgaon : लाडकी बहीण योजनेत फेब्रुवारीचा हप्ता लवकरच लाभार्थींच्या खात्यात जमा होणार

    March 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.