Author: Saimat

साईमत जळगाव प्रतिनिधी आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध दत्तक्षेत्र श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थान, पिठापूर येथील पादुका, पालखी व रथयात्रेचे शनिवार दि. १४ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ६ वाजता आप्पा महाराज समाधी जळगाव येथे प्रथमच आगमन होणार आहे. आप्पा महाराज समाधीपासून बळीराम पेठेतील ब्राह्मण सभेपर्यंत आगमन व स्वागत यात्रा आयोजित करण्यात आली आहे. त्याच दिवशी रात्री साडेआठ ते साडेनऊ या वेळेत भजन, नामस्मरण व श्रीपाद श्रीवल्लभ पादुकांचे भाविकांना दर्शन घेता येणार आहे. रविवार दि. १५ ऑक्टोंबर रोजी सकाळी ७ ते ८ नगर प्रदक्षिणा/ नामफेरी व सकाळी ९ वाजता रुद्राभिषेक करण्यात येणार आहे. रविवारी सकाळी ७ वाजेपासून दुपारी ४ वाजेपर्यंत सर्व भक्तांना श्री पादुकांचे दर्शन घेता…

Read More

शेती करत असताना शेतकऱ्यांना विविध संकटांचा सामना करावा लागतो. कधी अस्मानी संकट असतं तर कधी सुलतानी. या सर्व संकटांवर मात करूनही काही शेतकरी उत्तम शेती करून लाखोंचा नफा मिळवत आहेत. एका अशाच शेतकऱ्याने डाळींब शेतीतून आर्थिक प्रगती साधली. या शेतकऱ्यानं दोन एकर डाळींब शेतीतून 30 लाखांचं उत्पन्न घेतले. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील नांदोरे गावातील शेतकरी प्रताप भिंगारे यांनी दोन एकर क्षेत्रावर डाळींबाची बाग केली आहे. या बागेतून त्यांनी मोठा आर्थिक नफा मिळवला आहे. प्रताप भिंगारे यांनी डाळींब बागेचं उत्तम नियोजन केलं आहे. भिंगारे यांनी आपल्या डाळींब शेतीतून इतर शेतकऱ्यांसोर आदर्श मांडला आहे. पाहुयात त्यांची यशोगाथा. प्रति किलो डाळिंबाला मिळाला 121…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील बहुजन समाजातील १८ पगड जातीमधील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आधार ठरलेल्या मायबाप कॉलेज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नूतन मराठा महाविद्यालयात १९९१ च्या तृतीय वर्षाच्या बॅचमधील लेकरांचा गोतावळा अर्थात माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात झाला. यावेळी तत्कालीन प्राध्यापकांची उपस्थिती होती. व्यासपीठावर 1991 च्या बॅचचे माजी विद्यार्थी आणि कॉलेजचे प्राचार्य डॉ. एल.पी.देशमुख,यांच्यासह प्रा.व्ही.एस.सोनवणे, प्रा. एस.जे.जाधव,उपप्राचार्य डॉ.माधुरी पाटील, डॉ.के. बी.पाटील, प्रा.डॉ.बी.के.सोनवणे, प्रा.डॉ.पांडुरंग (राजू सर) पाटील आदी उपस्थित होते. यावेळी डॉ.अशोक पांडव, संजय चौधरी, प्रसन्न मांडे, सुनील लाठी, आबासाहेब पाटील,विजय देसाई, उमेश पाटील, आर जी पाटील यांनी गुरुजनांचा सन्मान केला. सर्वांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि सध्या करीत असलेल्या कार्याची माहिती दिली.…

Read More

साईमत मुंबई प्रतिनिधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना चकमक घडवून जीवे मारलं जाणार होतं, असं खळबळजनक विधान शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केलं आहे. मी जबाबदारपणे हा गौप्यस्फोट करत आहे, असंही गायकवाड यांनी म्हटलं आहे. संजय गायकवाड यांच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. एवढेच नव्हे तर एकनाथ शिंदेंचं एन्काऊंटर घडवण्यात कुणाचा सहभाग होता? याबद्दलही सूचक वक्तव्य गायकवाड यांनी केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (CM Eknath Shinde) हत्येच्या कटाबाबत गौप्यस्फोट करताना आमदार संजय गायकवाड म्हणाले, “एकनाथ शिंदे यांना दुसरं काहीही दिलं जाणार नव्हतं, त्यांना मृत्यू दिला जाणार होता. नक्षलवाद्यांच्या हातून त्यांचं एन्काऊंटर केलं जाणार होतं. मुख्यमंत्र्यांना नक्षलींच्या…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशान्वये युवासेना सचिव वरूण सरदेसाई यांच्या मार्गदर्शनात युवासेना कार्यकारिणी सदस्य तथा मुंबई विद्यापीठाच्या सिनेट सदस्या शितल देवरूखकर शेठ व युवासेना कार्यकारिणी सदस्य तथा रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विक्रांत भास्कर जाधव हे शुक्रवार दि. १३ ऑक्टोबर रोजी जळगावच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात सकाळी १०.३० वा. युवासेना आयोजित जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेचे जी. एच. रायसोनी महाविद्यालय येथे उद्घाटन, दुपारी १२ वा. शासकीय तंत्रनिकेतन येथे युवासेना कॉलेज कक्ष युनिटचे उद्घाटन, दुपारी २ वा. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्राचे कुलगूरू डॉ. विजय माहेश्वरी यांच्यासोबत विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नावर चर्चा, सायंकाळी ५.३० वा. जिल्हास्तरी बास्केटबॉल…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी अनेक वर्षांपासून प्रलंबीत असलेला शहरातील गाळेधारकांच्या नूतनीकरणाचा प्रश्‍न आमदार राजूमामा भोळे यांच्या प्रयत्नांनी मार्गी लागला असून मंगळवारी मंत्रीमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. जळगाव शहरातील महापालिकेच्या व्यापारी संकुलातील २३६८ गाळेधारकांचा भाडेपट्टा नूतनीकरणाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. दरम्यान आमदार सुरेश भोळे यांनी शासनाकडे सततच्या पाठपुराव्या मुळे दि.१० ऑक्टोबर, २०२३ रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत या संदर्भात राज्य पातळीवरील निर्णय घेण्यात आला. यांच्या माध्यमातून गाळेधारकांच्या भाडेपट्टा निश्चित व गाळे नूतनीकरणाचा मार्ग मोकळा झाला असून व्यापार्‍यांना आता दिलासा मिळाला आहे. मंत्रीमंडळाच्या निर्णयानुसार, सुधारित महाराष्ट्र महानगरपालिका (स्थावर मालमत्ता भाडेपट्ट्याद्वारे हस्तांतरण व भाडेपट्ट्याचे नुतनीकरण) नियम, २०२३ मध्ये निवासी, शैक्षणिक, धर्मादाय व सार्वजनिक,…

Read More

नवीदिल्ली : वृत्तसंस्था राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवारांनी बंड केल्याने फुट पडली आहे.त्यांचे हे प्रकरण केंद्रीय निवडणूक आयोगाकडे गेले असून याप्रकरणी आज(शुक्रवारी)सुनावणी झाली.या सुनावणीवेळी खुद्द शरद पवार निवडणूक आयोगात उपस्थित होते.दोन तास ही सुनावणी चालली. सुनावणी झाल्यानंतर राष्ट्रवादी कांँग्रेस पक्षाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी, अजित पवार गटाकडून खोटी कागदपत्रे सादर करण्यात आली असून त्यांनी काल्पनिक वाद निर्माण केला असल्याचा दावाही सिंघवी यांनी केला आहे. अभिषेक सिंघवी म्हणाले की, आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगासमोर दोन मुद्दे उपस्थित केले. पहिला म्हणजे आमची बाजू ऐकून न घेता पक्षात वाद असल्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय चुकीचा असू शकतो.त्यामुळे आधी आमची बाजू ऐकून घ्या…

Read More

हांगझोऊ : वृत्तसंस्था चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या पुरुष हॉकी संघाने अंतिम सामन्यात जपानचा पराभव करत सुवर्णपदक जिंकले. फायनल मॅचमध्ये भारताकडून मनप्रीत सिंग, हरमनप्रीत सिंग, अमित रोहिदास यांनी गोल केले. फायनलमध्ये भारताने जपानवर ५-१ असा विजय मिळवत देशाला सुवर्णपदक जिंकून दिले. या विजयासह हॉकी संघाने २०२४ साली होणाऱ्या पॅरिस ऑलिंपिकसाठी प्रवेश मिळवला आहे तर भारताच्या पदकांची संख्या ९५वर पोहोचली आहे.आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे हॉकीमधील हे चौथे सुवर्णपदक आहे.याआधी भारताने १९६६, १९९८, २०१४ साली सुवर्ण जिंकले होते.

Read More

चाळीसगाव : प्रतिनिधी कालबध्द वेतनश्रेणी मंजूर करून आणण्यासाठी तडजोडीअंती सात हजारांची लाच स्वीकारताना चाळीसगाव तालुक्यातील करगाव माध्यमिक आश्रमशाळेचे ग्रंथपाल श्रीकांत गुलाब पवार (वय ३८) यांना जळगाव एसीबीच्या विभागाने लाच स्वीकारताच अटक केली. या कारवाईने शैक्षणिक वर्तुळातील लाचखोरांमध्ये खळबळ उडाली आहे. करगाव आश्रमशाळेचे ४१ वर्षीय कर्मचारी या प्रकरणात तक्रारदार आहेत. तक्रारदार यांची कालबध्द वेतनश्रेणी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग, जळगाव या कार्यालयाकडून मंजूर करून आणण्यासाठी यापूर्वी फोन पेवर पवार यांनी १५ हजारांची लाच स्वीकारली होती. त्यानंतर प्रादेशिक उपसंचालक इतर मागासवर्गीय विभाग नाशिक, येथून पदोन्नतीची थकीत रक्कम ८५ हजार ५१९ टक्केप्रमाणे १२ हजारांची लाच पवार यांनी मागितल्यानंतर त्यात तडजोड होवून सात हजार…

Read More

मलकापूर : प्रतिनिधी शेतकऱ्यांचा हजारो क्विंटलचा कापूस चढ्या भावाने घेऊन शेतकऱ्यांंची फसवणूक करणाऱ्या जग्गू डॉन नारखेडेसह दोन आरोपींची लेखी तक्रार मलकापूर शहर पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, शेतकरी अतुल मधुकर पाटील (वय ४२) रा. कुंड बु. ता.मलकापूर यांनी १५३ क्विंटल ४० किलो कापूस हा प्रति क्विंटल ९००० रुपये प्रमाणे एकूण रक्कम १३ लाख ८० हजार ६०० रुपयाचा कापूस भरून नेला व त्यादिवशी त्यांनी १ लाख ६६ हजार ६५० रुपये नगदी रोख दिले व उर्वरित रक्कम रुपये १२ लाख १३ हजार ९५० इतकी राहिलेली रक्कम २० दिवसाच्या करारावर देऊ असे कबूल केले.त्यानंतर अतुल पाटील यांनी…

Read More