मुंबई प्रतिनिधी यास्मिन शेख राज्यपाल अभिभाषणात गोधळ केल्या नंतर अभिभाषण न करता किंबहुना राष्ट्रगीत न होऊ देता राज्यपालांनी सभागृहातून काढता पाय घेतला . आजपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरवात झाली . सुरवात होण्या अगोदर राज्यपाल अभिभाषण करतात मात्र या अभिभाषणात राज्यपाल सभागृहात येताच सत्ता पक्षाच्या आमदारांनी शिवाजी महाराजांच्या जयघोष केल्याच्या घोषणा दिल्या . त्यातच विरोधी पक्षाने सरकार दाऊद चे दलाल च्या घोषणा दिल्या या गोधळात राज्यपालांनी अभिभाषणाची सुरवात केली आणि काही शब्द वाचून अभिभाषणाचा शेवट केला यात सर्व गोधळात राज्यपाल सभागृहातून निघून गेले त्यानंतर राष्ट्रगीत झाले . आरोप प्रत्यारोप अभिभाषण न करता निघून गेल्यावरून सत्तापक्ष आणि विरोधकांनी एक मेकांवर आरोप करण्यास…
Author: Saimat
मेष : आयुष्यातील त्रास दूर होईल आणि घराच्या देखभालीशी संबंधित कामाकडे लक्ष दिले जाईल. तुमच्या जवळच्या लोकांना भेटण्याची संधी मिळेल. तुमच्या रागावर आणि उत्कटतेवर नियंत्रण ठेवा. कामाच्या ठिकाणी प्रलंबित योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी हा अनुकूल काळ आहे. नोकरीत कामाच्या प्रचंड ताणामुळे थकवा जाणवेल. यासोबतच तुमच्या प्रमोशनची शक्यताही वाढेल. कुटुंबात प्रेम आणि आनंदी सुसंवाद राहील. वृषभ : आर्थिक बाबतीत योग्य बजेट असेल. तुम्ही केलेल्या कामाचे समाजात कौतुक होईल. महत्त्वाचे व्यावसायिक निर्णय घेण्याऐवजी, आपली उर्जा केवळ चालू उपक्रमांवर केंद्रित करा. घरातील वातावरण सुख-शांतीपूर्ण राहील. पती-पत्नीमध्येही योग्य समन्वय राहील. प्रेमसंबंधात तणाव निर्माण होऊ शकतो. आरोग्याच्या किरकोळ समस्या निर्माण होतील. तुमची दिनचर्या व्यवस्थित ठेवल्यास तुम्ही…
बीड : प्रतिनिधी बाईक अपघातात तिघा जीवलग मित्रांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. बीडमध्ये घडलेल्या या अपघातामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. भरधाव बसने एका दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात बाईकवरुन प्रवास करणाऱ्या दोघा जणांचा जागीच मृत्यू झाला, तर तिसऱ्या तरुणाने उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. ही घटना धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील खजाना विहिरीजवळ बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली. तिघेही जण बुलेटवरुन बीडच्या दिशेने येत असताना समोरुन येणाऱ्या बसने त्यांना उडवलं. ही धडक इतकी जबर होती, की दोघांचा जागीच अंत झाला, तर उपचार सुरु असताना तिसऱ्या मित्राने प्राण गमावले. तिघा जीवलग मित्रांचा बाईक अपघातात मृत्यू झाल्याची करुणाजनक घटना उघडकीस…
औरंगाबाद : प्रतिनिधी पती आणि सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या त्रासाला अनेक महिलांना बळी पडावं लागतं. घरगुती हिंसाचाराच्या अनेक तक्रारी पोलिसात दाखल आहेत, मात्र कित्येक तक्रारी पोलिसांपर्यंत पोहोचल्याही नसतील. या वास्तवाची दुसरी बाजू दाखवणारी एक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे बायकांकडून होणाऱ्या नवरोबांच्या छळाची . पत्नी पतीचा छळ करत असल्याच्या तब्बल 285 तक्रारी एकट्या औरंगाबाद जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. हा आकडा फक्त गेल्या वर्षभरातील आहे. त्यामुळे बायको-सुनांवरील अत्याचाराच्या घटना उजेडात येत असताना नवऱ्यांवरही अन्याय-अत्याचार वाढत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे नवरा-बायकोमध्ये तक्रारी आणि वादाचे प्रमाण वाढल्याचं बोललं जात आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी पत्नी आपल्या पतीला उदंड आयुष्य मिळावे…
विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी आगामी जिल्हा परिषद,पंचायत समितीच्या निवडणुकांच्या अनुषंगाने बुधवारी सोयगावला पंचायत समितीच्या सभागृहात शेवटच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले परंतु या शेवटच्या बैठकीलाही यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी दांड्या मारल्याचे बैठकीदरम्यान उघड झाले होते,त्यामुळे सदस्यांनी नाराजीचा सूर काढला असल्याने या गैरहजर यंत्रणांना कारणे दाखवा बजावण्याचा निर्णय घेण्यात आला. सोयगाव पंचायत समितीच्या सभापती प्रतिभा जाधव यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामीण विकासासाठी मार्च अखेरीस आणि कालावधी संपल्याने शेवटची मासिक बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीत मार्च अखेरीस साठी अखर्चित ग्रामीण विकास निधी,घरकुल योजना यासह इतर यंत्रणांचा आढावा घेण्यात येणार होता परंतु यंत्रणाच्या खुद्द अधिकाऱ्यांनीच या बैठकीकडे पाठ फिरविल्याने बैठकीत काहीच निष्पन्न झाले नव्हते त्यामुळे विकासाचे केवळ कागदोपत्री…
विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी … सोयगाव तालुक्यातील कींन्ही येथे सकाळी आठ ते दहाच्या वेळात तीन पिसाळलेल्या कुत्र्यानी गावात व शेतीशिवारात धुमाकुळ घालीत सात जणांना कडकडुन चावा घेत जखमी केल्याची घटना घडली जखमीमधील दोन जणांना औरंगाबाद घाटीत तर एकास चाळीसगाव इतर बनोटी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे सद्या कीन्ही गावात घबराटीचे वातावरण पसरले आहे. .सोयगाव तालुक्यातील कींन्ही येथे सकाळी आठ ते अकरा वाजेपर्यंत ह्या पिसाळलेल्या कुत्र्यांचा धुमाकूळ चालुच होता गावात ही पिसाळलेली कुत्रे घुसताच गल्ली बोळात आरडाओरडा सुरु झाला तो पर्यत ह्या कुत्र्यानी कुणाच्या हाताला तर कुणाच्या पायाला कडकडुन चावा घेत गंभीर जखमी केले जखमींमध्ये गंगाराम शेलार (वय…
विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी सोयगाव तालुक्यातील निंबायती येथे आदिवासी तडवी भिल्ल समाजाच्या गोरगरीब महीला पुरूष व अपंग 30 तीस कुटुंबांना किराणा किट वाटप करण्यात आले, यावेळी पुणे येथील के एम हॉस्पिटल सामाजिक संस्थेच्या बिराजदार मॅडम , महाराष्ट्र एकलव्य आदिवासी तडवी भिल्ल विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष अलीबाबा तडवी, औरंगाबाद जिल्हा कार्यध्यक्ष करीम तडवी, ग्रामीण विकास सामाजिक संस्थेचे तालुका अधिकारी नागणे साहेब, तालुका कार्यध्यक्ष तथा ग्रा.पं. सदस्य अनुप तडवी, सामाजिक कार्यकर्ते जुबेर तडवी, मा. ग्राम पं. सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते नजीर तडवी, मेहमूद तडवी, वजीर तडवी आदी उपस्थित होते
भुसावळ : प्रतिनिधी शहरातील सात नंबर पोलिस चौकीच्या मागील परीसरातत 38 वर्षीय विवाहितेची छेड काढून विनयभंग केल्याप्रकरणी भुसावळ शहर पोलिस ठाण्यात संशयीत संदीप रामकिसन कनोजिया (30) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. 38 वर्षीय विवाहिता बाजारात जात असतांना मरीमाता मंदीराजवळ संशयीत संदीपने छेड काढली. या प्रकरणी विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात संशयीताविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयीताला पोलिसांनी अटक केली. पुढील तपास पोलिस निरीक्षक गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संजीव सोनवणे करीत आहे.
मुंबई : ऐश्वर्या राय बच्चनच्या चाहत्यांसाठी खूशखबर आहे. बच्चन कुटुंबाची सून पुन्हा एकदा चाहत्यांच्या भेटीसाठी मोठ्या पडद्यावर येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे ऐश्वर्या दिग्गज दिग्दर्शक मणिरत्नमच्या पीएस-1 या सिनेमात दिसणार आहे. जी एक मायथोलॉजिकल जॉनर मुव्ही आहे. या सिनेमात ऐश्वर्या एका वेगळ्याच लूकमध्ये दिसणार आहे. बुधवारी सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली. सोबत सिनेमातील स्टार कास्टचा फर्स्ट लूक देखील शेअर करण्यात आला. पीएस-1 हा सिनेमा 2 भागांमध्ये रिलीज होणार आहे. कल्किच्या क्लासिक नॉवल पोन्नियिन सेल्वनमधून सिनेमाची कथा घेण्यात आली आहे. ,लाइका प्रोडक्शन्स आणि मद्रास टॉकीजने सिनेमाची निर्मिती केली आहे. हा सिनेमा 30 सप्टेंबर रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. पीएस-1 ची कथा…
मुबई : प्रतिनिधी देशासह राज्यात कोरोनाचा आलेख कमालीचा घसरला आहे. दैनंदिन रुग्णसंख्या आणि रुग्णालयात दाखल होण्याच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यात लागू असलेले कोरोनासंदर्भात काही नियम शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात राज्य सरकारने नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून येत्या 4 मार्चपासून नव्याने करण्यात आलेले बदल लागू होतील. कोरोनाची स्थिती सुधारत असलेल्या जिल्ह्यांचा अ श्रेणीत समावेश करण्यात आला असून अ श्रेणीत 14 जिल्हे आहेत. या 14 जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. निर्बंध शिथिल करण्यात आलेल्या 14 जिल्ह्यात 4 मार्चपासून नाट्यगृहे, सिनेमागृहे , रेस्टॉरंट्स, पर्यटन स्थळे, धार्मिक स्थळेही 100 टक्के क्षमतेनं…