मलकापूर सतीश ढांगे स्थानिक पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते इंजिनिअरिंग कॉलेज मलकापूर येथे महाविद्यालयातिल महिला उद्योजक कक्षामार्फत जनजागृती कार्यक्रम प्राचार्य डॉ. अनिल खर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातिल महिला उद्योजक कक्षाचे प्रेसिडेंट प्रा. तेजल खर्चे, अमरावती येथील एमएसएमई व स्टार्ट अप फोरम भारत च्या अध्यक्षा प्रगती तायडे तसेच महाविद्यालयातिल प्राध्यापिका मयुरी पाटील, संजीवनी वाडेकर, कोमल होले, ज्योती पाटील, स्नेहल पवार सह मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी उपस्थित होत्या. महिलांसाठी औद्योगिक धोरण आणणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य ठरले आहे. या धोरणामागचा सरकारचा विचार म्हणजे एक महिला शिकली की कुटुंब शिकते हा जसा शाश्वत विचार आहे, त्याच धर्तीवर एक महिला उद्योजक…
Author: Saimat
मलकापूर सतीश ढांगे शेतकर्यांचे जिवनमान उंचावण्याकरिता प्रत्येक सरकार विविध प्रकारच्या अनेक योजना अंमलात आणते. त्या योजनांवर प्रत्येक सरकारचा शेतकरी बांधवांसाठी खर्च कमी, अन् जाहिरातीच जास्त दिसतात. पण प्रत्यक्षात या शासनातर्फे राबविल्या जाणाऱ्या योजनांचा शेतकऱ्यांना फायदा कमि अन् मनस्तापच अधिक असल्याच्या वाईट अनुभव आहे.त्यातिलच एका शेतकरी बांधवाकरीता राबविली जाणारी शेतकरी सिंचन योजना .या योजनेद्वारे शेतकरी बांधवांना सिंचनासाठी व सिंचनावर आथारीत उपाय योजनांसाठी .शेतकरी बांधवांना मदत केली जाते.पण ही मदत कोटी गरजु शेतकऱ्यानं पर्यंत पोहचत असेल याबाबत तरी एक शेतकरी म्हणुन आज तरी शंकांच येत आहे.नानाजी देशमुख योजना शेती सिंचनाच्या सोई पासुन तर फळबागे पर्यंतच्या सर्व सुविधा शेतकरी बांधवांना अनुदानाच्या माध्यमातुन पुरविते.…
पहुर प्रतिनिधी जामनेर तालुक्यातील पहुर कसबे सोसायटीचा मनमानी कारभार सुरू असल्याने सर्वसामान्य नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. जामनेर तालुक्यातील पहूर कसबे सोसायटी मध्ये गावातील नागरिक अनेक कामांसाठी पहुर कसबे सोसायटी येथे कामानिमित्त येत असतात मात्र आज सकाळी साडेदहा वाजले तरीही पहुर कसबे सोसायटी बंद होती त्यामुळे कामानिमित्त आलेल्या नागरिकांना आल्या पायी परतावे लागत आहेत त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहेत. पहुर कसबे व पहुर पेठ सोसायटीत एकच सेक्रेटरी काम पाहत आहेत त्यामुळे पहुर कसबे सोसायटी मध्ये नविन सेक्रेटरी यांची नियुक्ती करा अशी मागणी केली जात आहेत. कर्मचारी गेले कोठे ? – पहुर कसबे सोसायटी रोज सकाळी आठ…
पाचोरा प्रतिनिधी आगामी काळात होऊ घातलेल्या महात्मा ज्योतीराव फुले, भगवान महावीर व डॉ बाबसाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना व युवासेनेच्या वतीने दि १० रविवारी रोजी पाचोरा येथील श्री गो से हायस्कूल येथे सकाळी ९.३०वाजता खुल्या सामान्य ज्ञान स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून यात सहभागी स्पर्धकांना भरघोस बक्षिसे जिंकण्याची संधी उपलब्ध झाली असून या निमित्ताने परिक्षार्थींची आगामी स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने तयारी देखील करता येणार असल्याने अधिकाअधिक विद्यार्थ्यांनी या स्पर्धा परीक्षेत सहभागी होण्याचे आवाहन पाचोरा शिवसेना व युवासेनेच्या वतीने करण्यात आले आहे. आगामी काळात विविध शासनाच्या भरती प्रक्रियेत तृतीय व चतुर्थ श्रेणीतील पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरतीची घोषणा शासनस्तरावर झाली असून त्यादृष्टीने…
मलकापूर प्रतिनिधी सतीश ढांगे मलकापूर 5/4/22येथील बौद्ध युवकास जातिवाद्यांनी जबर मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी देत जातीवाचक शिवीगाळ करीत चार चाकी वाहनांची केली तोडफोड ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून आरोपी अद्याप मोकाट… सविस्तर असे की पंतनगर येथे बौद्ध समाजातील संघर्ष आत्माराम सुरडकर वय 37 याला मयूर होंबे वय 25 रा. शिवाजीनगर व कार्तिक हांडगे वय 30 वर्ष रा. सावजी फेल मलकापूर यांनी विष्णू इंगळे रा. कुंड याच्या फोनवरून फोन केला व त्यावरून मयूर होंबे हा मला म्हणाला की तुझ्या फायद्याचं काम आहे तू लवकर जगू मामाच्या धाब्यावर ये यावरून मी घरून 7:30 च्या सुमारास जग्गू मामा च्या धाब्यावर गेलो असता तेथे…
जळगाव ः प्रतिनिधी अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ यांच्या मान्यतेने व महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या सहकार्याने जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना व जैन स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे 8 ते 13 एप्रिलदरम्यान सहादिवसीय राष्ट्रीय बुद्धिबळ सांघिक अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा पुरुष व महिला गट अशी स्वतंत्रपणे आयोजित केली आहे. स्पर्धेसाठी भारतभरातील नावाजलेले 10 पुरुष व महिला ग्रँडमास्टर, 13 आंतरराष्ट्रीय मास्टर व फिडे मास्टर, राज्य संघटनेमार्फत चार अधिक एक राखीव संघ पाठवले जाणार असल्याची माहिती काल संघटनेने पत्रकार परिषदेत दिली. राष्ट्रीय दर्जाची स्पर्धा जळगावमध्ये आयोजित होत असल्याने जळगावसह महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. स्पर्धेतील प्रत्येक डावाचा कालावधी 90 मिनिटे व प्रत्येक चालीसाठी 30…
जामनेर(प्रतिनिधी):- तालुक्यातील कापूसवाडी येथील रहिवाशी उत्तम रघुनाथ ढोणी वय ३८ यांचा मृतदेह आढळून आल्याची घटना आज दि.६ रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून सदर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. उत्तमने आत्महत्या केली नसून त्यांची हत्या करण्यात आली असल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केल्यामुळे पोलीसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की,मयत उत्तम हा स्वत:च्या चारचाकी वाहनांमधून प्रवाशी वाहतूक करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित होता.गावातील ग्रा.पं.सदस्य राजेंद्र काशिकर हे सावकारी करीत असून मयत उत्तमने त्यांच्या कडून व्याजाने पैसे घेतलेले आहे.हलाखीची परिस्थिती असल्यामुळे उत्तम घेतलेले पैसे वेळेवर देऊ शकत नसल्याने काशिकर त्याच्या मागे पैशाचा तगादा लावत होता.दि.५…
जळगाव ः प्रतिनिधी जिल्हा बँकेचे मध्यस्थ म्हणून शेतकऱ्यांना कर्जवाटप करणाऱ्या तब्बल 159 विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांनी यंदाच्या आर्थिक वर्षात विक्रम केला आहे. या सोसायट्यांनी तब्बल 100 टक्के कर्जाची वसुली केली आहे. वसुलीच्या माध्यमातून जिल्हा बँकेची वार्षिक पीककर्ज वसुली तब्बल 650 कोटींवर पोहोचली. शासनाच्या नव्या धोरणानुसार बँकेकडून शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंतच्या मर्यादेत विनाव्याजी कर्ज दिले जाते. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे जिल्ह्यात शेतकऱ्यांकडे 1 हजार कोटी रुपयांचे कर्ज थकल्याने 6 महिन्यांपासून बँकेकडून कर्जवसुलीचे प्रयत्न सुरू होते. दरम्यान, 31 मार्चपूर्वी 650 कोटी रुपयांची कर्ज वसुली झाली आहे. जिल्हा बँकेची पीककर्जाची थकबाकी वाढल्याने बँकेचा एनपीए वाढला आहे. दरम्यान, कर्जवसुलीसाठी बँकेने राबवलेल्या विशेष मोहिमेला यश आले आहे.…
जळगाव ः प्रतिनिधी महापालिकेला कधी नव्हे एवढा निधी मिळाला आहे. त्यातून रस्त्यांची व गटारींची कामे करताना गुणवत्तेवर भर देणे अपेक्षित आहे. मक्तेदाराची दलाली करण्यापेक्षा आपल्या जबाबदारीचे भान ठेवा. रस्त्यांच्या गुणवत्तेविषयी तक्रारी वाढत असून, त्यात कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, अशा शब्दात महापौर जयश्रीताई महाजन यांनी अभियंत्यांची कानउघाडणी केली. कामे सुरू न करणाऱ्या मक्तेदारांना काळ्या यादीत टाकण्याच्या सूचना केल्या. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून गेल्या वर्षी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी 61 कोटींचा निधी मंजूर केला होता. या निधीतून शहरातील रस्त्यांची व गटारींची कामे केली जात आहेत; परंतु त्यासंदर्भात तक्रारी सुरू झाल्या आहेत. त्याची दखल घेत महापौर महाजन यांनी काल दुपारी सार्वजनिक…
जळगाव ः प्रतिनिधी इंदौर येथील प. पू. नाना महाराज तराणेकर यांचे जीवनदर्शन घडविणारी संजीव कुसूरकर लिखित मालिका गेल्यावर्षी सायंदैनिक …साईमत…ने महिनाभर प्रकाशित केली.त्यावर आधारित ॥ मार्तंड जे तापहीन॥ या पुस्तकाचे प्रकाशन पुणे येथील श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरात आयकर अपील न्यायाधिकरणाचे सदस्य इंटुरी रामा राव यांचे हस्ते नुकतेच करण्यात आले. याप्रसंगी त्रिपदी परिवाराचे अर्ध्वयु हरी मुस्तीकर, विश्वस्त ॲड. शिवराज कदम,संजीव कुसूरकर,श्री. जहागिरदार आदी.