जळगाव : प्रतिनिधी लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ज्या पद्धतीने गंगा नदीच्या किनार्यावरील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी व गंगा नदी प्रदूषण मुक्त होण्यासाठी गंगा ऑरगॅनिक फार्मिंग क्लस्टर योजनेची घोषणा अर्थसंकल्पीय अधिवेशनात झाली आहे त्याच पद्धतीने माझ्या जळगाव जिल्ह्यातील गिरणा नदी देखील मोठ्या प्रमाणात जल प्रदूषित झालेली असून गंगा नदीच्या धर्तीवर “गिरणा ऑरगॅनिक कॉरिडॉर (क्लस्टर)” ची योजना घोषित होईल का? असा सवाल उपस्थित केल्याने गिरणा काठाच्या शेतकऱ्यांच्या विकासाची मुहूर्तमेढ आरंभली असुन लोकसभेत गिरणाईचा आवाज गुंजला आहे. लोकसभेच्या पटलावर स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गिरणा माईच्या शाश्वत विकासाचा प्रश्न मांडण्यात आल्याने गिरणा खोऱ्यात खा. उन्मेश पाटील यांच्या भूमिकेचे कौतुक केले जात आहे. लोकसभेच्या अधिवेशनात खासदार उन्मेश दादा…
Author: Saimat
जळगाव : प्रतिनिधी क्रिडा प्रकारातील एक अतिशय महत्वाचा क्रिडाप्रकार म्हणजे जलतरण होय . या क्रीडाप्रकाराला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच गरीब , होतकरू आणि गुणी जलतरणपटूंना भरीव मदत करण्याच्या दृष्टीने येथील लक्ष्मी ग्रुप ऑफ कंपनीज व जिल्हा पोलीस दलाच्या संयुक्त सहकार्याने रविवार दि . १७ एप्रिल रोजी स्व. पि.व्ही. माळीदादा स्मरणार्थ भव्य जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा पोलीस मुख्यालयातील पोलीस जलतरण तलाव येथे सकाळी ११ ते ३ या वेळेत होणार आहेत. स्व. पी. व्ही. माळीदादा यांनी जलतरण प्रकार तसेच विविध नामांकित जलतरणपटू घडविण्यात मोलाचे योगदान दिलेले आहे. सुमारे तीस -बत्तीस वर्षांपूर्वी जळगावात प्रोफेशनल स्विमिंग रुजविणारे ते जळगावातील पहिले…
जळगाव : प्रतिनिधी बालकांच्या शारीरिक आणि मानसिक विकासाचा पाया मजबूत करण्याचं काम अंगणवाड्या करीत असून पिढी घडवण्यात अंगणवाडी ही मोलाचे योगदान देते. मात्र अनेक अंगणवाड्यांनी स्वत:च्या वास्तू देखील नाहीत. हीच समस्या लक्षात घेऊन जिल्ह्यात जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत अर्थात डीपीडीसिच्या माध्यमातून १६८ अंगणवाडी इमारत बांधकामसाठी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी तब्बल १९ कोटीचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तब्बल १६८ अंगवाड्यांना स्वतःच्या इमारती होणार आहे. मागील ३ महिन्यांपूर्वी १०८ अंगणवाड्यांसाठी १० कोटींचा निधी मंजूर केला होता. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशिया यांनी बाला ( बिल्डींग ऍज लर्नींग एड ) या अभिनव उपक्रमानुसार एका…
चोपडा प्रतिनिधी : येथील पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संचालक तथा रोटरी क्लब ऑफ चोपडाचे अध्यक्ष पंकज बोरोले यांना पालघर येथे बांबू सेवक पुरस्काराने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे. सविस्तर वृत्त असे की,पालघर येथील सेवा विवेक रुरल डेव्हलपमेंट सेंटर हि संस्था पालघर जिल्हयातील बांबूंपासून नवनिर्मिती व्हावी व त्याद्वारे आदिवासी बांधवांना रोजगार उपलब्धते बरोबर आर्थिक मदत व्हावी या हेतूने बांबूंपासून विविध वस्तू बनवण्याचे प्रशिक्षण या सेवाभावी संस्थेमार्फत आदिवासी बांधवांना दिले जाते.आदिवासी बांधव आपल्या कला – कौशल्यातून बांबूपासून विविध वस्तूंची निर्मिती करीत असतात. दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे व जग प्लास्टिककडे वळत आहे अशा प्रतिकूल परिस्थितीत बांबूपासून पर्यावरण…
जामनेर प्रतिनिधी जामनेर तालुक्यातील पहूर येथे बारी समाजाचे आराध्य दैवत संत श्री रूपलाल महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज सकाळी संत श्री गाडगेबाबा महाराज मंदिर येथे पूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला संत रुपलाल महाराज पहूर गावे जन्मभूमि असल्याने त्यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रम प्रसंगी मा.जिल्हा परिषद कृषी सभापती प्रदीपभाऊ लोढा मा.जिल्हा परिषद सदस्य राजधरभाऊ पांढरे पहूर पेठचे उपसरपंच शामभाऊ सावळे संत श्री गाडगेबाबा महाराज ट्रस्टचे अध्यक्ष कडुबाबाबा पाटील अॅड. एस आर पाटील राष्ट्रवादी काँग्रेस तालुका विधानसभा क्षेत्रप्रमुख शैलेशभाऊ पाटील मा.उपसरपंच रवीभाऊ मोेरे ग्रामपंचायत सदस्य शरदभाऊ पांढरे शिवसेना तालुका प्रवक्ते गणेशभाऊ पांढरे विकास सोसायटीचे मा. चेअरमन गोकुळभाऊ कुमावत शिवसेना शहरप्रमुख…
मुंबई: राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचे गेल्या सहा महिन्यांपासून आंदोलन सुरु आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी मागण्यांसाठी हे आंदोलन सुरु केले आहे. आज यावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होती. या सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने एसटी कर्मचाऱ्यांना अल्टीमेटम दिला आहे. या संपात सामील असणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांनी १५ एप्रिल पर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश दिले आहेत. १५ एप्रिल पर्यंत कामावर रुजू न होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर महामंडळ कारवाई करु शकते अस न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. एसटी कामगारांना कामावरून काढू नका. या शिवाय पुढचे चार वर्ष राज्य सरकार एसटी महामंडळ चालवेल. त्यानंतर आर्थिक निकषाच्या आधारे पुढील निर्णय घेईल, असं कोर्टाने म्हटलं आहे. याबाबत उद्या सकाळी 10 वाजता महत्त्वपूर्ण सुनावणी…
मेष : आज मेष राशीच्या लोकांच्या आयुष्यात मोठे सुख येणार आहे. आज तुम्ही तुमची वैयक्तिक मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करू शकता. व्यापार्यांसाठी दिवस शुभ आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामगिरीने अधिकारी प्रभावित होतील. कठोर परिश्रमाने अवघड कामेही सहज पूर्ण होतील. व्यवसायात चांगला फायदा होईल. आज आरोग्य चांगले राहील. इतरांशी सौहार्दपूर्ण संबंध राहतील. कामानिमित्त लांबचा प्रवास संभवतो. वृषभ : आज वृषभ राशीच्या लोकांनी आपले विचार आणि वर्तन संतुलित ठेवावे. दागिने आणि कपडे खरेदीची शक्यता आहे. व्यवसायात नवीन प्रयोग करून पुढे जाण्याची संधी मिळेल. तुमच्यासमोर काही आव्हान येऊ शकते. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. मन आनंदी असेल. प्रेमसंबंधांमध्ये संवेदनशीलता दिसून येईल, त्यामुळे आज विचारपूर्वक…
चाळीसगाव : प्रतिनिधी चाळीसगावात पोलीसांनी आज गुटख्याचा कंटेनर पकडला असून यात सुमारे एक कोटीचा मुद्देमाल असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करणे सुरू आहे. सविस्तर वृत्त असे की, चाळीसगावात ग्रामीण पोलीसांनी एका कंटेनवर संशय आल्याने त्याचा पाठलाग करून पकडला. सदर कंटेनरची अधिक तपासणी केली असता मध्ये गच्च गुटखा भरलेला असल्याचे दिसून आले. दरम्यान या कंटनेरमध्ये कदाचित एक कोटीचा गुटखा असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या धडाकेबाज कामगिरीमुळे ग्रामीण पोलीसांचे पोलिस निरीक्षक संजय ठेंगे व त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक होत आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करणे सुरू आहेत.
पहुर : प्रतिनिधी जळगाव – औरंगाबाद महामार्गावर वाकोदजवळील सिंहगड हॉटेलजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत बुलेट गाडी रोडाच्या बाजूला जाऊन पडल्याने गाडी चालक तरुण जागीच ठार झाला व मागे बसलेले दोन जण जखमी झाले आहेत याबाबत सविस्तर वृत्त असे की, ‘जळगाव येथुन गोसेगाव ता.सिल्लोड,जि. औरंगाबाद येथे बारावीचा पेपर देण्यासाठी गेलेले जळगाव शिवाजी नगर येथील व्यंकटेश सुधाकर सपकाळे, करण भगत, धिरज सिरसाठ हे तिघेजण पेपर देऊन बुलेट या दुचाकीवर जळगावकडे परत येत होते. वाकोदकडे सिंहगड हॉटेलजवळ अज्ञात वाहनाची धडक बसल्याने गाडी चालक विक्की उर्फ़ व्यंकटेश सुधाकर सपकाळे याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने जागीच मृत्यू झाला तर मागे बसलेले करण व धिरज यांना हातापायाला…