साईमत जळगाव प्रतिनिधी (विवेक ठाकरे) लोकसभेचा निकाल लागून अवघ्या दहा दिवसांचाच कालावधी लोटला अनं जिल्ह्यातील पाचोरा विधानसभा मतदारसंघात आरोप- प्रत्यारोपाच्या फैरी झडायला सुरु झाल्या.हे द्वव यापूढे जात आ. किशोरआप्पा पाटील यांच्या एकेरी भाषेमुळे आणि भाजपाचे तालुकाध्यक्ष अमोलभाऊ शिंदे यांच्या प्रतिआव्हानाने चर्चेत असले तरी राज्यात सत्तेत असलेल्या महायुतीत असलेल्या या दोघांची ही चढाओढ सद्यातरी नुराकुस्ती म्हटले तर वावगे ठरू नये.याउलट परिस्थिती असल्यास म्हणजे भाजपाचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे मागील वेळेप्रमाणे बंडखोरी करू शकतात किंवा भाजपच्या वरिष्ठानी कदाचित त्यांना लढण्याचा हिरवा कंदील दिल्याच्या माहितीमुळे विद्यमान आमदारांची आदळआपट आतापासूनच सुरु झाली असावी. महत्वाचे फक्त श्रेयाच्या या लढाईत ऐन खरीपाच्या हंगामाच्या धामधूमीत शेतकऱ्यांचे महत्वाचे प्रश्न…
Author: Saimat
साईमत जळगाव प्रतिनिधी आज च्या तरुणाईने एकमेका विरुद्ध असलेले धार्मिक द्वेष भावना सोडून आपण भारतीय आहोत व भारत देशाचे हित जोपासण्याचा प्रयत्न केल्यास आपसातील मतभेद व मनभेद होणार नाही असे भावनिक आवाहन बबनराव आव्हाड यांनी केले. बकर ईद निमित्त एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे झालेल्या शांतता समितीच्या सभेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबनराव आव्हाड बोलत असताना त्यांनी तरुणांना उद्देशून अत्यंत मार्मिक व रोखठोक असे मत मांडून त्यांना मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन केले. उपस्थिता पैकी मणियार बिरादरीचे फारुक शेख यांनी आपले विचार मांडताना पोलीस दलाने शिक्षेकडून शिक्षणाकडे न वळता प्रथम कायद्याचे व त्या पासून होणारे फायदे तोटे शिक्षणा द्वारे समजावे व त्यानंतर शिक्षा…
साईमत मुक्ताईनगर प्रतिनिधी जळगाव जिल्ह्याचा चांगला विकास व्हावा यासाठी ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे आणि ग्रामविकास मंत्री गिरीषभाऊ महाजन यांना एकत्र आणण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करणार असून दोन्हीही नेते एकत्र येऊन पुन्हा हातात हात घेऊन काम करतील असा मला विश्वास आहे,असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री ना. श्रीमती रक्षाताई खडसे यांनी केले. आपल्या मंत्रिपदाचा पदभार स्विकारल्यावर ना.श्रीमती खडसे यांचे पहिल्यांदाच जिल्ह्यात आगमन झाले आहे.मुक्ताईनगर येथे त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले.या पार्श्वभूमीवर त्यांनी नाथाभाऊ व गिरीषभाऊ यांना एकत्र आणण्याचा आपला मनोदय बोलून दाखवल्यावर या बाबीचे अनेकांनी स्वागत केले आहे. मंत्री श्रीमती रक्षाताई म्हणाल्या की,नाथाभाऊ मोठे नेते आहेत. त्यांच्या भाजपा प्रवेशासंदर्भात आमचे केंद्राचे आणि राज्याचे…
विशेष प्रतिनिधी | जळगाव : रब्बी हंगामात घरी आलेली ज्वारी हमीभावात खरेदी करण्याची शासनाची घोषणा कुचकामी ठरली असून फक्त 30 जूनपर्यंतच शासन ज्वारी खरेदी करणार आहे.जिल्ह्यात पाच हजार शेतकऱ्यांनी ज्वारी विक्रीसाठी नोंदणी केली असताना जिल्ह्यातील अठरा खरेदी केंद्रापैकी आज (15 जून) अखेर फक्त दहा केंद्र सुरु झाल्याने उर्वरित पंधरा दिवसात खरेदी होऊच शकत नाही,अशी भीती व्यक्त होत आहे.दरम्यान, जळगाव जिल्ह्याला फक्त 30 हजार क्विंटल ज्वारी खरेदीची मर्यादा असल्याने निम्मे अधिक शेतकऱ्यांना आपली ज्वारी बाजारभावाने कमी दरात विक्री करावी लागणार आहे. हमीभावाने शेतमाल खरेदीच्या नावावर शेतकऱ्यांची होते थट्टा : एकीकडे शासन मोठा गाजावाजा करून हमीभावात वाढ केल्याचे सत्तेतील लोकप्रतिनिधी सांगत असतात…
साईमत जामनेर प्रतिनिधी दी.९ रोजी तालुक्यातील चिंचखेडा बू. येथे ७ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तीला ठार मारल्याची घटना उघडकीस आली असून या घटनेचा निषेध म्हणून जामनेरात आदिवासी बांधवांच्या वतीने येथील राजमाता जिजाऊ चौकातून तहसील कार्यालयावर दी.१३ रोजी धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी समाज बांधवांनी जामनेर तहसीलदार नानासाहेब आगळे यांना या घटनेच्या निषेधार्थ निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, संशईत आरोपीस तात्काळ अटक करून त्याच्यावर फास्ट ट्रॅक कोर्टात याचिका दाखल करून आरोपीस फाशीची देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी मोठ्या संख्येने आदिवासी समाज बांधव उपस्थितीत होते. या घटनेचा संपुर्ण महाराष्ट्रात निषेद व्यक्त करण्यात येत असून काल दी.१३ रोजी जामनेर…
साईमत प्रतिनिधी मोदी सरकारने तिसऱ्यांदा सत्तेत दाखल होताच जनतेसाठी एक दिलासा पूर्वक निर्णय घेतला आहे. मोदी सरकारने मोफत आधार कार्ड अपडते करण्यासाठी मुदत पुन्हा वाढवुन दिली आहे. गेल्या अनेक वर्ष पासून ही मुदत सातत्याने सरकारकडून वाढविण्यात येत आहे. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी इंटरनेट, वीजेचा लपंडाव पाहता सरकारकडून मुदत वाढ दिली असेल. त्यामुळे देशातील कोट्यवधी जनतेला त्यांचे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी आपला खिसा रिकामा करावा लागणार नाही. आधार कार्डला दहा वर्षांपेक्षा अधिक काळ झाला असेल तर त्याला अपडेट करणे अनिवार्य आहे. आधार कार्ड मोफत रित्या अपडेट करण्यासाठी यापूर्वीची तारीख 14 मार्च होती.त्याला 14 जून, 2024 रोजीपर्यंत सरकत तर्फे मुदत वाढ देण्यात…
साईमत रावेर प्रतिनिधी तालुक्यातील निंभोरा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरिक्षकाला दहा हजार रुपयांची लाच स्विकारतांना जळगाव लाच लुचपत विभागाने रंगेहात पडकल्याने पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. सदर कारवाई दि. १२ जून रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास करण्यात आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार संशयित आरोपी कैलास ठाकूर नामक असल्याचे समजते. दरम्यान, संशयितास ताब्यात घेण्यात आले असून पथक जळगाव कडे रवाना झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
साईमत मुक्ताईनगर प्रतिनिधी मुक्ताईनगर शहराला पूर्णा नदीचे पात्रातून पाणीपुरवठा होत असतो. पूर्णा नदी ही गाळ वाहून नेणारी नदी असून पावसाळ्याचे दिवस असल्याने मध्ये सालाबाद प्रमाणे शहरवासीयांना दूषित व गढूळ पाणीपुरवठा चा सामना करावा लागतो. मागील महिन्यामध्ये मुक्ताईनगर येथील दोन भागातील पिण्याचे पाणी नमुने पिण्यास अयोग्य आलेले होते. तात्काळ अयोग्य आलेले पिण्याचे पाण्याचे नमुने पुन्हा री सॅम्पल पाठवून जळगाव येथे पाणीपुरवठा रासायनिक प्रयोगशाळेमध्ये तपासणी केल्यानंतर ते पिण्यास योग्य असल्याचा अहवाल प्राप्त झाला होता. मुक्ताईनगर नगरपंचायती मधील पाणीपुरवठा अभियंता गेल्या दहा महिन्यापासून नसल्याने हा पदभार लेखापाल हे सांभाळत आहेत.आगामी पावसाळ्याचे दिवस लक्षात घेता नगरपंचायत प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना करीत शहरात पुरवठा होणाऱ्या…
साईमत प्रतिनिधी | दिल्ली पंतप्रधान नरेंद्र मंत्री यांच्या तिसऱ्यावेळी मंत्रिमंडळाचा शपथविधी झाल्यानंतर त्यात सहभागी खासदार ना.श्रीमती रक्षाताई निखिल खडसे यांनी आज क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालयाचा पदभार स्वीकारला आहे. श्रीमती रक्षाताई खडसे यांना क्रीडा आणि युवक कल्याण या खात्याची जबाबदारी मिळाली आहे. या खात्याचे कॅबिनेट मंत्री चिराग पासवान हे असून त्यांच्या सोबत रक्षाताई खडसे यांच्याकडे राज्यमंत्रीपदाची जबाबदारी आली आहे. आज त्यांनी आपल्या मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला आहे. या माध्यमातून जळगाव जिल्ह्यास तब्बल दोन दशकानंतर केंद्रीय मंत्रीमंडळात प्रतिनिधीत्व मिळाले आहे.केंद्रीय मंत्री श्री.मनसुख मांडवीया यांनी रक्षाताई यांना पदभार स्वीकारल्याबद्दल शुभेच्छा दिल्या.
• विवेक ठाकरे • विशेष प्रतिनिधी | जळगाव : केंद्रात आता मोदी सरकारचे 3.0 पर्व सुरु होत असून आज सायंकाळी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पुन्हा भारताचे प्रधानमंत्री म्हणून शपथ घेत आहेत.मोदींच्या तिसऱ्या मंत्रिमंडळात रावेर लोकसभा मतदार संघातून सलग तिसऱ्यांदा विजयी पताका फडकवणाऱ्या खा. रक्षाताई खडसे या सुद्धा केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.खा.रक्षाताई यांची पहिल्याच यादीत मंत्रीपदी वर्णी लागल्याने जिल्ह्यासह खान्देशात आंनदाला उधान आले आहे. उत्तर महाराष्ट्रातील आठ जागांपैकी केवळ दोन जागांवर भाजपला विजय मिळाला होता त्यात उत्तर महाराष्ट्रात दोन्ही विजयी जागा या जळगाव जिल्ह्यातील आहेत.विशेष म्हणजे यातील खा.रक्षाताई खडसे यांनी सलग तिसऱ्यांना विजयी होत पक्षाला घवघवीत यश मिळवून दिले आहे. एम.के.अण्णा…