देशात नवीन रोजगार संधींमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. भविष्य निर्वाह निधी संघटनेअंतर्गत (ईपीएफओ) २०२१-२२ या वर्षात १ कोटी २२ लाख नवीन रोजगारांची नोंदणी झाली आहे. संघटीत क्षेत्रात एका वर्षात सर्वाधिक नोकऱ्या निर्माण झाल्याची ही पहिलीच वेळ आहे. केंद्र सरकारकडून रोजगारांची आकडेवारी जाहीर करण्यात आली. आर्थिक वर्ष २०२१-२२ या वर्षात एकूण १ कोटी २२ लाख नोकरीच्या संधी निर्माण झाल्या. एका वर्षात इतक्या मोठ्या संख्येने नोकऱ्या निर्माण होण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्याआधी २०२०-२१ या वर्षात ७७ लाख १० हजार नोकऱ्या निर्माण झाल्या होत्या. २०१९-२० या वर्षात ७८ लाख आणि २०१८-१९ या वर्षात ६१ लाख १० हजार नोकऱ्यांची निर्मिती झाली होती. विशेष…
Author: Saimat
जळगाव (प्रतिनिधी) स्वाती गुप्ता, इंदौर यांना पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली. स्वाती गुप्ता यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान या विद्याशाखेंतर्गत फिजिक्स मध्ये ‘इनव्हेस्टिगेशन ऑफ नॅनोपोरस लो-के डायइलेक्ट्रीक थिन फिल्म’ या विषयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या इलेट्रॉनिक्स विभागाचे प्रमुख प्रा.डॉ. ए.एम.महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली कबचौउमवि,जळगाव विद्यापीठात शोधनिबंध सादर केला. त्यांच्या यशाबद्दल कुलगुरु प्रा.व्ही.एल.माहेश्वरी, प्रभारी प्र-कुलगुरु प्रा.एस.टी.इंगळे, प्रभारी कुलसचिव प्रा.किशोर पवार, परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक प्रा.डी.एस.दलाल यांनी अभिनंदन केले आहे.
फैजपूर: प्रतिनिधी येथील धनाजी नाना महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबीर कळमोदा येथे संपन्न झाले. सदरील शिबीरात विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासाच्या दृष्टीकोणातून रोज सकाळी योग आणि प्राणायामाचे प्रशिक्षण देण्यात आले. योग आणि प्राणायाम प्रशिक्षण देण्यासाठी महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. गोविंद सदाशिवराव मारतळे हे उपस्थितीत होते. डॉ. मारतळे यांनी योग यांचे प्रात्यक्षिक व त्या आसनाचे महत्त्व सांगितले. त्या सोबत प्राणायाम व त्यांचे प्रशिक्षक आणि त्याबद्दल सविस्तर माहिती सांगितली. डॉ. मारतळे यांनी आधुनीक युगात मनुष्याची बदलेली जीवनशैली व त्यातून निर्माण झालेले विकार या बद्दल मार्गदर्शन केले. शरीरातील निर्माण झालेले विकार यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी योग व प्राणायाम हे उत्तम साधन आहे. मनुष्याने योग…
फैजपूर प्रतिनिधी यावल रावेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी वर्ग अ जमीन शेत पोटखराब असलेलं क्षेत्र असल्याने तो पोटखराब दुरुस्त करून लागवडीखाली आणल्यास शेताच्या उत्पन्नात वाढ होईल, शेतीचे कर्ज मिळेल, नैसर्गिक आपत्ती झाल्यास भरपाई मिळू शकते. आपल्या शेताची पोटखराब क्षेत्र दुरुस्त केल्याने किमतीत वाढ होते. पोटखराब क्षेत्र दुरुस्ती मुळे शासनाचा महसूल वाढतो. बागायती असल्यास जास्त लाभ मिळू शकतो. त्यासाठी प्रत्येक गावातील शेतकऱ्यांनी पोटखराब क्षेत्र दुरुस्त साठी जवळच्या तलाठी कार्यालयात अर्ज सादर करावा व सदर च क्षेत्र दुरुस्ती करून लागवडीखाली आणावे असे आवाहन फैजपूर प्रांत कैलास कडलग यांनी केली आहे. यात हंबर्डी जमीन 1.85, शेतकरी 72, मारूळ जमीन 2.55, शेतकरी 49, उंटावद जमीन 0.38,…
चाळीसगांव प्रतिनिधी आज चाळीसगाव येथील सामाजिक कार्यकर्ते वर्धमान भाऊ धाडीवाल मित्र मंडळ मीनाक्षीताई निकम यांच्या स्वयंदीप दिव्यांग संस्थेच्या मार्फत आयोजित केलेल्या दिव्यांग वधू-वर परिचय मेळाव्यात जवळपास ८५ वर आणि वधू यांनी आपला परिचय करून दिला असून चाळीसगाव येथील धुळे रोड बायपास जवळील बालाजी लॉन्स येथे आयोजित मेळाव्यात अनेक विवाह इच्छुक मुला-मुलींच्या परिवारांचे एकमेकांशी बोलणे होऊन लग्न जुळवण्याच्या मार्गावर आलेत आजच्या या धकाधकीच्या जगात चांगल्या सुदृढ तरुण-तरुणींचे लग्न जमण्यात अनेक पालकांना दमछाक होते अशा परिस्थितीत दिव्यांग वधू-वरांचे लग्न जमणे आणि ते होणे ही मोठी कसरत होऊन बसली आहे म्हणून या बांधवांना देखील लग्न जुळवून ते पार पाडणे सुखकर व्हावे यासाठी या…
विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी काढणीवर आलेल्या मका पिकाला वादळी वाऱ्याने मुख्य वीज प्रवाहाची वाहिनी दुसऱ्या वाहिनीला स्पर्शून गेल्याने अचानक झालेल्या शोर्ट सर्किटमुळे दोन आकार क्षेत्रातील मका पिकाला आग लागून शंभर टक्के जळून खाक झाल्याची घटना जरंडी शिवारात उघडकीस आली आहे याप्रकरणी वीज मंडळाच्या महावितरण विभागाकडून घटनेचा पंचनामा केला आहे.या घटनेत शेतकऱ्याचे तब्बल दोन लाख रु चे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मधून हाती आले आहे.मात्र महसूल विभागाने घटनास्थळी अद्यापही भेटी दिलेल्या नाही. सोयगाव परिसरात तीन दिवसापासून वादळी वाऱ्याचे वातावरण तयार झालेले आहे या तीन दिवसात वादळी वारा आणि वावटळ सुरु झाल्या असल्याने या वादळी वाऱ्याने रोहित्राच्या मुख्य वीज वाहिनी दुसऱ्या वीज…
भुसावळ : प्रतिनिधी येथील नगरपरिषद हद्दीतील आरक्षित भूखंडाचे आरक्षण रद्द करुन सदर आरक्षण 31 मे पर्यंत मुक्तीचे नोटीफिकेशन जाहीर करावे असे नोटीफिकेशन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नगरपालिकेला दिले आहे. दरम्यान, या नोटीफिकेशन विरोधात नगरपरिषदेने सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागणे आवश्यक आहे. मात्र, आजवर याबाबत कुठलीही कारवाई होतांना दिसत नसल्याने माहिती अधिकार कार्यकर्ता दिनेश उपाध्याय यांनी एक जागरुक नागरीक म्हणून सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासंदर्भात आदेश अथवा परवानगी द्यावी, अशी मागणी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना केली आहे. सदर मागणीची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी अर्जावरील पुढील कारवाईसाठी उपसचिव सतिश मोघे यांच्याकडे अग्रेसीत केली आहे. दरम्यान, नगरपरिषद हद्दीतील आरक्षित भुखंडाच्या संदर्भात उच्च न्यायालयात…
पाचोरा : प्रतिनीधी केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल – डिझेल दरवाढीमुळे सर्वसामान्य जनतेचे हाल होत असून ही दरवाढ मागे घेण्यात यावी, या मागणीसाठी शिवसेना आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वात पाचोऱ्यामध्ये महागाई विरोधात प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी केंद्र सरकार विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आलीत. पेट्रोल -डिझेल, गॅस, भाजीपाला, खाद्य तेल तसेच सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे दर नियंत्रणात आणून महागाई कमी करू, रोजगार वाढवू” अशा भूलथापा मारत जनतेला “अच्छे दिन” चे स्वप्न दाखवत मोदी सरकार केंद्रात सत्तेत आले. परंतु, आज महागाई गगनाला भिडत असताना मोदी सरकार यावर एक शब्दही बोलायला तयार नाही. केंद्र सरकारने जनतेच्या विश्वासघात केला आहे. म्हणूनच जनतेचे जबाबदारी प्रतिनिधी म्हणून…
जळगाव : प्रतिनिधी शहरात राष्ट्रवादी काँग्रेसने वाढत्या महागाई विरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बॅनरची आरती करून आंदोलन केले. पेट्रोल पंपावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसने हे आंदोलन करीत मोदी सरकारचा निषेध केला . देशभरात महागाईमुळे त्रस्त झालेली असून नागरिक व सामान्य जनता त्यात भरडली जात आहे. हातावर पोट भरणाऱ्या मोल मजुरी करणाऱ्या वर्गाला तर गॅस महागल्यामुळे अन्न शिजवून खाणे देखील जड झालेले आहे. महागाईमुळे मूलभूत गरजा देखील भागविणे अवघड होत आहे. गॅस, पेट्रोल, डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढतच असून डॉलरच्या तुलनेत रुपया कमी होत चालला आहे. केंद्र सरकार या सर्वांकडे लक्षच देत नाही. या सर्व अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस शहरतर्फे आज दि.२१ रोजी जळगाव…