Author: Saimat

चाळीसगाव : प्रतिनिधी रस्त्यावर उभे असलेले ट्रॅक्टर बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग येऊन एकाने डोक्यात रॉडने टाकून मारहाण करत गंभीर दुखापत केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील तळेगाव येथे घडली होती. याप्रकरणी ग्रामीण पोलिसात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील कृष्णापूर तांडा (तळेगाव) येथील उमेश रमेश चव्हाण (वय-२७) हा वरील ठिकाणी परिवारासह वास्तव्यास आहे. चव्हाण यांच्या घरी रविवार, दि. ८ मे रोजी रात्री ९:३० वाजता जाऊळचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. तेव्हा शेजारी राहणारे काका धोंडीराम भिका चव्हाण यांनी घरासमोरील मुख्य रस्त्यावर ट्रॅक्टर व खाट टाकलेली होती. उमेश यांनी घरी कार्यक्रम असल्यामुळे आपण ट्रॅक्टर व खाट बाजूला करण्याविषयी…

Read More

मेष : राशीच्या लोकांना दिवस चांगला जाईल. व्यवसायात लाभ होईल. नोकरदार लोकांचा प्रभाव वाढेल. त्याच वेळी, कामाच्या ठिकाणी कामाची आणि प्रामाणिकपणाबद्दल योग्य प्रशंसा आणि आदर मिळू शकतो. दिलेले पैसे परत केले जातील. आजची सुरुवात चांगली होणार आहे. घरात आनंदाचे वातावरण राहील. आज ७२% नशिबाची साथ आहे. गुरुजन किंवा ज्येष्ठांचे आशीर्वाद घ्या. वृषभ : राशीच्या लोकांचा आजचा दिवस शिक्षणासाठी चांगला आहे, मेहनतीनुसार यश मिळेल. उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची योजना यशस्वी होईल. या दिवशी तुमच्यामध्ये काम करण्यासाठी नवीन ऊर्जा संचारेल. कामासाठी आजचा दिवस चांगला आहे. वडिलोपार्जित मालमत्तेबाबत काही प्रकरण प्रलंबित असल्यास त्याचा निर्णय तुमच्या बाजूने होईल. आज ६०% नशिबाची साथ आहे. पालकांचा…

Read More

विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी दिनांक 26/5/2022 वार गुरुवार रोजी आदिवासी समन्वय समितीचे कोळी मल्हार , कोळी महादेव,टोकरे कोळी इ.अनुसूचित जमातीच्या विद्यार्थां शिक्षणापासून वंचित राहू नये,तसेच जी.प. व पंचायत समिती निवडणुका लवकरच जाहीर होणार आहे . तसेच शेतमजूर शेतकरी,सुशिक्षीत बेरोजगार,भूमिहीन लाभार्थी यांना विकासाच्या योजनेसाठी बऱ्याच बांधवाना प्रस्ताव भरायचे आहे. आणी काही प्रलबीत प्रश्नांसाठी वेळ मिळावा करिता उपविभागीय अधिकारी उपविभाग सिल्लोड यांना निवेदन देण्यात आले. यावेळे आदिवासी समन्वय समितीचे मराठवाडा विभाग अध्यक्ष सखाराम बिऱ्हाडे, उपाध्यक्ष आनंदा इंगळे, युवा जि. अध्यक्ष,विजेंद्र इंगळे,जिल्हा समन्वय पांडुरंग साळवे, गणपत साळवे, ता.स. दीपक सोनवणे, युवा ता.अ. गोपाल इंगळे, विष्णू भोटकर कैलास गवळी ता अ.जनार्दन जोहरे, ता.स. शालिक गवळी,…

Read More

विजय चौधरी- सोयगाव वादळ सुटले आणि लग्न मंडप कोसळला ही घटना सोयगाव तालुक्यातील बहुलखेडा खेडा यागावी घडली सुदैवाने यात कुणालाही इजा झाली नाही. विवाह सोहळा संपन्न झाल्यानंतर मंडपात वधू-वर फोटो शूट सुरू होते तसेच लग्न मंडपात जेवणाची पंगत बसलेली असतांना अचानक वादळ येऊन संपूर्ण मंडप कोसळल्याने मंडपाखाली वधू-वर दोन्ही कडील वर्हाडी मंडळी तसेच जेवणाच्या पंगतीत बसलेले सर्व लोक या मंडपाखाली झाकल्या गेले त्यामुळे एकच खळबळ उडाली सुदैवाने यात कुणालाही इजा झाली नाही. https://youtu.be/tS7WjBdqEhA

Read More

फैजपूर ता.यावल : प्रतिनिधी येथील नगरपालिकेतील आरोग्य विभागात लाखो रुपये किमतीच्या साहित्य खरेदीत झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी फैजपूर पोलीस स्टेशन व वरिष्ठांकडे तक्रार देऊन दोन महिने उलटूनही दखल न घेतल्याने प्रशासनाच्या भूमिकेविषयी परिसरात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. फैजपुर नगरपालिकेच्या आरोग्य विभागात लाखो रुपये किमतीचे साहित्य खरेदी करण्यात आले. त्यात आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत असलेले श्री. चावरे यांच्या भावाची फैजपूर येथील धर्मदाय रजिस्टर संस्था मेहतर वाल्मीक जनकल्याण सेवा या संस्थेला ठेका दिला गेला. नगरपालिकेने बिलाची शहानिशा न करता तसेच मालाची तपासणी न करता सुमारे 5लाख 40 हजार 850 रुपये बिल संबंधित संस्थेला अदा करण्यात आले. त्यात टॉयलेट व इतर वस्तूंच्या खरेदीमध्ये…

Read More

मुंबई : प्रतिनिधी राज्याचे परिवहनमंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्यावर सक्तवसुली संचलनालयाकडून आर्थिक गैरव्यवहारप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच अनिल परब यांच्याशी संबंधित राज्यातील सात ठिकाणांवर ईडीकडून छापे टाकण्यात आले आहे. या छाप्यांमधून ईडीच्या हाती कोणती माहिती आणि पुरावे लागणार, हे पाहावे लागेल. ईडीच्या या कारवाईमुळे अनिल परब यांच्यासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. आता ईडीकडून लवकरच अनिल परब यांना चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्यता आहे. राज्याचे परिवहनमंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्यावर सक्तवसुली संचलनालयाकडून आर्थिक गैरव्यवहारप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच अनिल परब यांच्याशी संबंधित राज्यातील सात ठिकाणांवर ईडीकडून छापे टाकण्यात आले आहे. या छाप्यांमधून ईडीच्या हाती…

Read More

जळगाव : प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या केंद्रीय प्रशिक्षण व नियुक्ती कक्षामार्फत विद्यापीठाच्या विविध प्रशाळेतील विद्यार्थ्यांसाठी “करिअर ॲव्हेन्यू इन सायबर सिक्युरिटीज” या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत जळगाव येथील सायबर क्षेत्रातील तज्ज्ञ पार्थ जामोदकर यांनी दैनंदिन जीवनात तंत्रज्ञान अधिक गुंतलेले असल्याने कुशल सायबर सुरक्षा व्यावसायिकांची गरज वाढत आहे. सायबर सुरक्षा हे चांगले करिअर क्षेत्र होऊ शकते असे मत व्यक्त केले. सायबर सुरक्षा म्हणजे काय, सायबर धोक्यांचे प्रकार, सायबर सुरक्षेचे फायदे याची माहिती दिली. तसेच व्हाईट हॅट व ब्लॅक हॅट यातील फरक ओळखणे, हॅकर्स व सायबर क्राईम याबाबतही माहिती देऊन विविध उदाहरणे त्यांनी दिली. यावेळी अध्यक्षस्थानी संगणकशास्त्र प्रशाळेचे…

Read More

पाचोरा : प्रतिनिधी राष्ट्रीय पिछडा वर्ग (ओ. बी. सी.) मोर्चाच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष विकास पटेल चौधरी यांच्या नेतृत्वात विविध सामाजिक मुद्यांवर आधारित चरणबद्ध आंदोलन केले जात आहे. यापूर्वी धरणे आंदोलन आणि रॅली प्रदर्शन करण्यात आले होते ,त्याआधारे आज दि. २५ मे रोजी एकदिवसीय “भारत बंद” आंदोलन करण्यात आले. याआंदोनला पाचोऱ्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. पाचोरा शहरात सकाळी १० वाजेपासून छत्रपती शिवाजी महाराज चौक, जामनेर रोड, रेल्वे स्टेशन रोड, बस स्थानक रोड, भडगाव रोड, जारगाव चौफुली, भारत डेअरी स्टॉप, येथे अत्यावश्यक सेवा वगळता संमिश्र प्रतिसाद दिसुन येत आहे. या आंदोलनासाठी राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक व भारत मुक्ती मोर्चाचे…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनच्या विजय फिरके,विजय पाटील व उमेश घुले या धावपटुंनी लोणावळा येथे संपन्न झालेल्या टाटा अल्ट्रा ३५ किमी रन या स्पर्धेत यश संपादन केले. त्याबद्दल डॉ बाबासाहेब आंबेडकर मैदानावर तिघांचे विशेष अभिनंदन करण्यात आले. रात्रीच्या काळोखात ३ वाजता लोणावळ्याच्या सुनील वॅक्स म्युझिअम येथून स्पर्धेस सुरुवात झाली तर तब्बल ८५० मी उंचीवरील अवघड असा घाट धावत जाऊन तिकोना किल्ल्याजवळील जवन तुंगी मार्गापर्यंत नियोजित वेळेत पोहचायचे होते. परंतु अतिशय निर्धाराने तीनही धावपटुंनी हा कठीण असा मार्ग धावत जाऊन पूर्ण केला. याप्रसंगी आपण मागील काही महिन्यांपासून घेत असलेली मेहनत तसेच प्रवीण फालक सर व डॉ तुषार पाटील…

Read More

मुंबई : प्रतिनिधी दावोस येथे सुरू असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्राच्या ऊर्जा क्षेत्रात ५० हजार कोटींची गुंतवणूक खेचून आणण्यात ऊर्जा विभाग व ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत हे यशस्वी ठरले आहेत. राज्यातील अपारंपरिक ऊर्जा क्षेत्राच्या विकासाला यामुळे गती मिळणार असून २०० मेगावॅट वीज आणि ३० हजार नवे रोजगार या गुंतवणुकीतून उपलब्ध होणार आहेत. राज्याच्या ऊर्जा क्षेत्रात नवी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत व महाराष्ट्र सरकारच्यावतीने प्रयत्न केले जात आहेत. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून डॉ. राऊत हे सध्या दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत सहभागी झाले असून ऊर्जा क्षेत्रात अधिकाधिक गुंतवणूक खेचून आणण्यासाठी ते स्वतः प्रयत्न करीत आहेत.…

Read More