जळगाव ः प्रतिनिधी केशव स्मृती प्रतिष्ठानतर्फे एनजीओ क्लिनिक उपक्रमांतर्गत ग्रामविकासाच्या रोजगार संधी व प्रकल्प-प्रस्ताव लेखन कार्यशाळा 1 जून रोजी आयोजित करण्यात आली आहे. संभाजी राजे नाट्यगृहात सकाळी 10.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत ही कार्यशाळा होईल. स्वयंसेवी काम करणाऱ्या संस्थांमधील कार्यकर्त्यांना संस्थेत चालणाऱ्या विविध प्रकल्पांसाठी किंवा प्रस्तावित उपक्रमासाठी निधीची आवश्यकता असते. त्यासाठी योग्य प्रकारे आपल्या कामाची मांडणी करणे गरजेचे असते. उपयोगी असणारे प्रकल्प, प्रस्ताव लेखनाचे मार्गदर्शन या कार्यशाळेत होणार आहे. सीएसआर व प्रकल्प-प्रस्ताव विषयावरील तज्ज्ञ डॉ. प्रसन्न पाटील यांचे प्रकल्प प्रस्ताव लेखन या विषयावर तर ग्रामविकास व रोजगार या विषयातील सुमारे 20 वर्षांचा अनुभव असलेले डॉ. प्रसाद देवधर यांचे मार्गदर्शन…
Author: Saimat
जळगाव ः प्रतिनिधी आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुका व पक्षसंघटन वाढीसाठी जिल्ह्यात चार दिवस शिवसंपर्क अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत शहरात वातावरण निर्मितीसाठी शिवसेना व युवासेनेच्यावतीने काल दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले.त्यानंतर महाबळ परिसरात युवासेनेच्या वतीने ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर किट्सचे वाटप करण्यात आले. शिवसंपर्क अभियानाच्या निमित्ताने शिवसेनेचे राज्यभरातील नेते जळगावात दाखल झाले आहेत.जिल्हाभरात 26 ते 29 मे दरम्यान होणाऱ्या विविध कार्यक्रमांतर्गत काल शहरात वातावरण निर्मिती व्हावी यासाठी नेहरू चौकापासून दुचाकी रॅली काढण्यात आली. टॉवर चौक, चित्रा चौकमार्गे रॅली निघून शिवतीर्थ मैदानाजवळ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर स्वातंत्र्य चौक, आकाशवाणी चौक, काव्यरत्नावली चौक मार्गे जावून मेहरूण भागात रॅलीचा…
जळगाव ः प्रतिनिधी आरटीई अर्थात खासगी शाळांमध्ये राखीव असणाऱ्या 25 टक्के जागांवर निवड यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना 19 ते 27 मे दरम्यान प्रवेश निश्चितीची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती मात्र प्रतीक्षा यादीतील एकाही विद्यार्थ्याचा प्रवेश निश्चित न झाल्याने शिक्षण विभागाच्या माध्यमातून 3 जूनपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार दरवर्षाप्रमाणे 25 टक्के प्रवेश प्रक्रिया राज्यात ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येत आहे. यंदा जिल्ह्यातील 285 शाळांतील 3147 जागांसाठी ही प्रक्रिया राबवली जाते आहे.त्यानुसार 2940 विद्यार्थ्यांची निवड यादी तर 2399 विद्यार्थ्यांची प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली होती. निवड यादीतील 2940 पैकी…
जळगाव ः प्रतिनिधी गेल्या 13 मे रोजी पहाटे 2.15 वाजेच्या सुमारास डी मार्टच्या पाठीमागे आदर्शनगर भागात चार वेगवेगळ्या ठिकाणी पार्किंग मधील मिळून एकूण सहा मोटारसायकल व दोन फोर व्हीलर गाड्या अज्ञात व्यक्तीने जाळून 18 लाख रु.चे नुकसान केले होते. गाडी मालकांच्या भावना व संवेदना अतिशय तीव्र होत्या.कोणाशी काही वैर नाही तरी त्यांचे असे नुकसान झाले होते. नुकसानीला जबाबदार तरी कोणाला धरायचे व त्याने असे नुकसान केले तरी का? असा सर्वांच्या पुढे प्रश्न होता. या प्रकरणी पंधरा दिवसात सतत तपासाची चक्रे फिरवून या गुन्ह्याची उकल रामानंद पोलीस स्टेशनचे सिनिअर पोलीस इन्स्पेक्टर विजय शिंदे व त्यांच्या टिमने केली असून यातील आरोपीचा शोध…
उस्मानाबाद : वृत्तसंस्था उस्मानाबादमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पेपर सोडवताना कॉपी करत असलेल्या विद्यार्थ्याला शिक्षकाने पकडलं. त्यामुळे तणावात आलेल्या विद्यार्थ्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. कृषी पदवीका अभ्यासक्रमाची परीक्षा सुरु असून समुद्रवाणी इथं राहणारा 21 वर्षांचा स्वप्निल ढोबळे हा विद्यार्थी ही परीक्षा देत होता. परीक्षेदरम्यान स्वप्निल कॉपी करत असल्याचं परीक्षा विभागाच्या पथकाला आढळलं. पथकाने त्याला रंगेहाथ पकडलं. या कारणासाठी त्याला 1 वर्ष निलंबित करण्यात आलं. कारवाई झाल्याने स्वप्निल प्रचंड तणावात होता. यातूनच त्याने आत्महत्या करण्याच निर्णय घेतला. स्वत:च्या शेतात जाऊन त्याने कडूलिंबाच्या झाडाल गळफास घेत जीवन संपवलं. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
नाशिक : प्रतिनिधी काही दिवसांसाठी जनशताब्दी आणि गोदावरी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. इगतपुरी येथील टिटोली यार्डातील तांत्रिक कामांमुळे मध्य रेल्वेने आज शनिवारपासून सहा दिवसांचा मेगा ब्लॉक जाहीर केल्यामुळे प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे . मेगा ब्लॉकमुळे गोदावरी एक्सप्रेस व मुंबई – जालना जनशताब्दी एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या विलंबाने धावणार असल्यामुळे प्रवाशांना अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे. येथील मध्य रेल्वेच्या टिटोली यार्डात रेल्वे प्रशासनातर्फे २८ मे ते १ जून या दरम्यान तांत्रिक कामे हाती घेण्यात येणार आहेत . या कामांमुळे मनमाड – मुंबई – मनमाड गोदावरी स्पेशल रेल्वे. २८ मे ते २जूनदरम्यान दोन्ही बाजूंनी धावणार…
मुंबई : प्रतिनिधी राज्यात मोठ्याप्रमात पोलीस भरती करण्यात येणार आहे. या भरतीत ७ हजार पदांसाठी १५ जूनपासून पोलीस भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. याबाबत राज्याच्या गृहविभागातून ही माहिती मिळत आहे. राज्यभरात लवकरच पोलीस भरती सुरू होणार आहे. पोलीस दलातील रिक्त जागांसाठी १५ जूनपासून भरती प्रक्रिया राबवली जाणार असल्याची माहिती गृहविभागाच्या सूत्रांनी दिली आहे. विविध पदांसाठी ७ हजार जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी लवकरच भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. अधिकृत तारखेची माहिती जाहीर केली जाणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून राज्यात पोलीस बदल्यांचा विषय चर्चेत आहे. हजारो तरुण पोलीस भरतीच्या दृष्टीने तयारी करीत आहेत. त्यातच आता गृहविभागाने आतापर्यंत साडे पाच हजार जागांसाठी…
मेष : राशीचे लोक या दिवशी प्रत्येक काम चपळाईने पूर्ण करतील. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. नोकरीत कोणाच्या तरी सहकार्याने काहीतरी नवीन शिकण्याची संधी मिळेल, मनाला आनंद होईल. भागीदारी व्यवसायात कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेऊ नका. महिला आज घरातील कामात जास्त व्यस्त राहतील. आज ७५% नशिबाची साथ आहे. हनुमानाची पूजा करावी. वृषभ : राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कामात चांगले यश मिळवून देणारा आहे, तुमचे परिश्रम आणि नशीब हर प्रकारे साथ देईल. आर्थिक स्थिती चांगली राहील. आज तुम्हाला कार्यक्षेत्रात स्वतःहून लाभ मिळेल. प्रॉपर्टी डीलबाबत निर्णय तुमच्या बाजूने होऊ शकतात. आपली कमाई सावधगिरीने खर्च करा. वाहन चालवताना काळजी घ्या. आज ९०% नशिबाची साथ…
जळगाव ः प्रतिनिधी जिल्हा सहकारी दूध संघाच्या निवडणुकीच्या तयारीचा प्राथमिक टप्पा सुरू झालेला आहे. दूध संघाच्या मतदार संस्था असलेल्या 470 प्राथमिक दूध उत्पादक संस्थांमध्ये ठराव करण्यासाठी विशेष सभांचे आयोजन केले जात आहे. यासाठी सभासदांना सभेचा अजेंडा पाठवण्याची कार्यवाही सुरू झालेली आहे. जिल्हा दूध संघाची निवडणूक 2015 मध्ये झाली होती. कोरोनामुळे मुदतवाढ मिळाल्यानंंतर या वर्षी ही निवडणूक होत आहे. संघासाठी एकूण 470 मतदार संस्थांकडून मतदान केले जाणार आहे. एकूण 21 संचालक निवडून देण्यासाठी ऑगस्ट महिन्यात संभाव्य मतदार होणार आहे.यासाठी सभासद संस्थांकडून मतदार निश्चित करण्यासाठी ठराव मागवण्यात आले आहेत. सहकार विभागाने सर्व सभासद संस्थांना पत्र देवून ठराव मागवले आहेत. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात…