यावल : प्रतिनिधी तालुक्यातील किनगाव हे बऱ्हाणपूर–अंकलेश्वर या महामार्गावरील मुख्य बाजार पेठेचे गाव आहे,आणि राष्ट्रीय महामार्गावर असल्यामुळे किनगाव नायगांव लोकांची मोठ्याप्रमाणात रहदारी व वाहतूक प्रमाणात होत असते. किनगाव नायगाव रस्त्यावर रस्त्याच्या मधोमध एक खड्डा पडलेला आहे या पडलेल्या खड्ड्यांमुळे किनगाव ग्रामपंचायत तसेच जिल्हा परिषद विभाग संबंधित कर्मचाऱ्याचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने किनगाव,नायगाव ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे तसेच हा पडलेला खड्डा संबंधितांनी तात्काळ दुरुस्त न केल्यास हिंदवी स्वराज्य सेनेकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. किनगाव नायगांव मुख्य रस्त्यावर किनगाव मधील तडवी वाड्यात एका गटारी वरचा धाप्याचा भाग खुप दिवसापासून तुटलेला आहे त्याठिकाणी मोठा खड्डा पडला आहे परंतु याकडे…
Author: Saimat
मुबंई : प्रतिनिधी विधान परिषद निवडणुकीसाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून भाजपतर्फे मविआ आमदारांना धमकावले जात असल्याचा आरोप आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. त्यावर पराभवानंतर काय कारणे सांगायची, याची तयारी पटोलेंनी आताच सुरू केली आहे, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला. तसेच, मविआच्या आमदारांना धमकावल्याची कॉल रेकॉर्डिंग नाना पटोलेंकडे असेल, तर त्यांनी ती पत्रकारांसमोर आणावीत, असे आव्हानही त्यांनी दिले. भाजपचे पाचही उमेदवार जिंकतील चंद्रकांत पाटील म्हणाले की, विधान परिषद निवडणुकीसाठी 20 जून रोजी मतदान आहे. भाजपचे पाचही उमेदवार या निवडणुकीत जिंकतील. मविआने कितीही दावा केला तरी त्यांचा एक उमेदवार पराभूत होईल. फक्त तो कोणत्या पक्षाचा असेल,…
भुसावळ ः प्रतिनिधी माजी आमदार तथा खासदार स्व.हरीभाऊ जावळे यांची 16 जून रोजी असलेल्या द्वितीय पुण्यतिथी निमित्ताने अंतर्नाद प्रतिष्ठान भुसावळच्या वतीने यावल तालुक्यातील वाघळूद येथील जिल्हा परिषद शाळेत 30 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.यात अक्षरमित्र पुस्तक, पाटी, वही, पेन्सिल, खोडरबर हे साहित्य वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग.स.संचालक योगेश इंगळे हे तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समिती सदस्य अजय पाटील, उपाध्यक्ष ज्योती पाटील, अंतर्नादचे सदस्य जीवन महाजन उपस्थित होते. स्व.हरिभाऊ जावळे यांची पुण्यतिथी सामाजिक बांधिलकी जोपासून उपक्रम राबवित वंचित विद्यार्थ्यांना मदत करण्यात आली आहे.हे समाजासाठी नक्कीच प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन ग.स.संचालक योगेश इंगळे यांनी केले.स्व.हरिभाऊनी त्यांच्या कार्यकाळात सर्वच…
जळगाव : प्रतिनिधी पावसाळा सुरु झाला तरी शहरातील रस्त्यांची कामे पूर्ण झालेली नाही. जी झाली ती एका पावसात वाहून जातील. त्यामुळे थर्डपार्टी ऑडिट केल्याशिवाय कोणत्याही मक्तेदाराचे पेमेंट करू नका अशी मागणी आमदार राजूमामा भोळे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत काल केली. तर आमदारांना दरवर्षी पाच कोटी विकासनिधी मिळतो. त्यांनी आतापर्यंत एकदाही रस्त्यांसाठी निधी दिलेला नाही. तो दिला असता तर चित्र वेगळे असते असा मुद्दा माजी महापौर नितीन लढ्ढा यांनी उपस्थित करीत आ. राजूमामा भोळे यांच्यावर पलटवार केला. भोळेंनी रस्त्यांसाठी निधी दिला नाही : नितीन लढ्ढा आमदारांना मतदार संघाच्या विकासासाठी दरवर्षी पाच कोटींचा निधी मिळतो.पाच वर्षात 25 कोटी रुपये शहरातील रस्त्यांसाठी…
जळगाव ः प्रतिनिधी ट्रॅफिक विभागाचे काम काय आहे, वाहतूक सुरळीत करणे की वसूली करणे? एका बाजूला वाहतूक कोंडी झालेली असताना वाहतूक पोलिस त्याकडे दुर्लक्ष करून वाहनचालकाकडे कागदपत्रे तपासून वसूली करतात. त्यांना विचारले असता, आम्हाला वरुन टार्गेट देण्यात आले असल्याचे सांगतात. त्यांना कोणी टार्गेट दिले आहे का? असा गंभीर आरोप माजी पालकमंत्री तथा भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी काल जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केला. नियोजन भवनात ही बैठक झाली. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी या प्रश्नावर पुढील आठवड्यात बैठक घेण्याची सूचना देऊन विषयावर तात्पुरता पडदा टाकला. शहरात प्रवेश करणाऱ्या रस्त्यांवर वाहतूक कोंडीची समस्या नित्याचीच झाली आहे. ती सोडवण्यासाठी वाहतूक पोलिसांची नेमणूक असताना…
जळगाव ः प्रतिनिधी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे नेते खासदार राहुल गांधी यांच्यावर ईडीतर्फे करण्यात येणाऱ्या कारवाईच्या विरोधात जळगाव जिल्हा काँग्रेसतर्फे काल जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निषेध नोंदविण्यात आला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले. आमदार शिरीषदादा चौधरी, माजी खासदार डॉ. उल्हासदादा पाटील, जिल्हा परिषदेचे गटनेते प्रभाकर सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाभरातील पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी भूपेंद्र जाधव, ज्ञानेश्वर कोळी, जमील शेख, ॲड. अमजद पठाण, सचिन सोमवंशी आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळच अडवण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या दालनात 50 पदाधिकाऱ्यांना सोडण्यास सांगण्यात आले परंतु नंतर अल्पबचत भवनात प्रमुख पदाधिकाऱ्यांना बसण्यात सांगण्यात आले.जिल्हाधिकारी अभिजित…
जळगाव ः प्रतिनिधी बांधकामाच्या मंजुरीसाठी मनपाच्या नगररचना विभागाकडे प्रस्ताव दाखल केला जातो. परंतु मंजुरीनंतर प्रत्यक्षात नकाशाप्रमाणे बांधकाम केले जात नसल्याचे प्रकार समोर येत आहे. आगामी काळात मंजूर नकाशाप्रमाणे बांधकाम नसल्यास संबंधिताना पूर्णत्वाचा दाखला मिळणार नाही असा इशारा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी दिला आहेे. गेल्या महिन्यात वास्तुविशारद, आर्किटेक इंजिनिअर यांची बैठक झाली होती.त्यात या संदर्भात सुचना दिल्या होत्या. बांधकाम प्रस्ताव ऑनलाईन सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. 17 जून रोजी आयुक्तांसह नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांनी काही बांधकामांची पाहणी केली. त्यात नकाशाप्रमाणे बांधकाम नसल्याचे आढळून आले आहे.
कोल्हापूर : वृत्तसंस्था अनैतिक संबंधाच्या संशयावरून एका तरुणाने सोबत राहणाऱ्या महिलेसह दोन मुलांचा गळा दाबून खून केला. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव वेलंग शिरंबे येथे ही घटना गुरुवारी (१६ जून) उघडकीस आली. सविस्तर माहिती अशी की, पोलिसांनी दत्ता नारायण नामदास (मूळ रा. राजेबोरगाव, ता. जि. उस्मानाबाद; सध्या रा. वेलंग (शिरंबे) जि. सातारा) याला अटक केली आहे. दत्तासोबत योगिता दत्ता नामदास (३८) दोन मुलांसह राहत होती. तिचे दुसऱ्याशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून त्याने योगिताचा गळा दाबून खून केला. त्यानंतर योगिताच्या तनू आणि समीर या दोन्ही मुलांना झोपेतून उठवले आणि मळ्यातील विहिरीत ढकलून दिले. तिघांचे खून करून घराला कडी लावून तो निघून गेला. अकलूज…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील विद्यूत कॉलनीत राहणारे ८८ वर्षीय सेवानिवृत्त वृध्दाला इन्शूरन्स कंपनीच्या नावाने ६२ लाख रूपयांचा ऑनलाईन गंडा घालणाऱ्या सात संशयित आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांनी दिली. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील सात संशयित आरोपींना दिल्ली व उत्तरप्रदेशातून अटक करण्यात आली आहे. अशी माहिती अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांनी शुक्रवार, दि. १७ जून रोजी सायंकाळी माध्यमांशी बोलतांना दिली. सविस्तर माहिती अशी की, “विद्यूत कॉलनीतील रहिवाशी टिकाराम शंकर भोळे (वय-८८) यांच्याशी नोव्हेंबर २०१७ ते २५ ऑक्टोबर २०२१ दरम्यान दिपका शर्मा, अनुराग शर्मा व कमलाकरन रेही असे नाव…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था सैन्यभरतीच्या ‘अग्निपथ’ योजनेचा विरोध उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत पसरला. बिहार, उत्तर प्रदेश, हरियाणा, उत्तराखंड, राजस्थान, तेलंगण, पश्चिम बंगाल, ओडिशा, दिल्लीसह १३ राज्यांमध्ये हिंसाचार व निदर्शने झाली. या राज्यांतील ४० हून अधिक शहरांमध्ये दंगली झाल्या. रेल्वे व रस्ते अडवण्यात आले. दगडफेकीत सर्वसामान्य नागरिक अडकले. तेलंगणाची राजधानी हैदराबादमधील सिकंदराबाद रेल्वेस्थानकावर गर्दी हटवण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला. त्यात एकाचा मृत्यू, १३ जखमी झाले. १६४ रेल्वे रद्द कराव्या लागल्या. ३१६ विस्कळीत झाल्या. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी तरुणांना रेल्वे मालमत्तेचे नुकसान न करण्याचे आवाहन केले आहे. हिंसक आंदोलकांबाबत माजी लष्करप्रमुख जनरल व्ही.पी. मलिक म्हणाले की, जाळपोळ आणि हिंसाचार करणारे तरुण सैन्यात भरती होण्याच्या लायकीचे…