जळगाव ः प्रतिनिधी चैतन्यनगर ज्येष्ठ नागरिक संघातर्फे रविवारी डॉ. मिलिंद वायकोळे यांच्या हॉस्पिटलमध्ये ज्येष्ठांसाठी आरोग्य शिबिर घेण्यात आले. शिबिराचा 45 सभासदांनी लाभ घेतला. डॉ. मिलिंद वायकोळे, डॉ. रूपाली वायकोळे यांनी सभासदांची आरोग्य तपासणी करून मार्गदर्शन केले. शिबिरात तपासणी केल्यानंतर ज्येष्ठांना निष्पन्न झालेल्या आजारांबाबत चाचणी करून औषधोपचाराचे आवाहन करण्यात आले. चैतन्यनगर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पंडितराव सोनार, उपाध्यक्ष ॲड अरुण धांडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सचिव विकास बोरोले व सदस्यांनी नियोजन केले. ॲड अरुण धांडे यांनी आभार मानले.
Author: Saimat
औरंगाबाद : एकनाथ शिंदे यांनी अनेक आमदारांसोबत बंडाचा पवित्रा घेतल्यानंतर शिवसेनेच्या गोटात खळबळ निर्माण झाली आहे. यातच शिवसेनेच्या एका आमदाराने केलेल्या दाव्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. शिंदे गटात सामील होण्यासाठी आपल्याला ५० कोटींची ऑफर दिल्याचा दावा शिवसेनेचे आमदार उदयसिंग राजपूत यांनी केला आहे. एवढचं नव्हे तर दोन चारचाकी भरुन पैसे आल्याचे फुटेज असल्याचा गौप्यस्फोट राजपूत यांनी केला. पण आपल्याला १०० कोटी दिले तरी आपण शिवसेनेशी गद्दारी करणार नाही, अशा शब्दांत आमदार राजपूत यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. उदयसिंग राजपूत औरंगाबादचे कन्नडचे आमदार आहेत. त्यांच्या या दाव्यामुळे एकनाथ शिंदे अडचणीत येऊ शकतात . शिवसेनेशी बंडखोरी करण्यासाठी मला ५० कोटीहून अधिकची ऑफर होती.…
साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी यावल नगरपालिका कार्यक्षेत्रातील ओला व सुका घनकचरा वाहतूक करण्याचा ठेका एका ठेकेदाराला दिला असला तरी ठेकेदाराकडे असलेल्या कचरा वाहतूक करणाऱ्या काही वाहनावरील घंटा आणि रेकॉर्डिंगचा आवाज नागरिकांना येत नसल्याने घंटागाडी आली किंवा नाही याबाबत नागरिकांना समजत किंवा ऐकू येत नसल्याने नागरिकांमध्ये अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत याकडे यावल नगरपरिषद साफसफाई व स्वच्छता विभाग कर्मचाऱ्याचे दुर्लक्ष होत असून ठेकेदाराचे बिल मात्र तो कर्मचारी टक्केवारी घेऊन नियमित काढीत असल्याचे यावल शहरात बोलले जात आहे.या ठेकेदाराची कचरा वाहतूक यंत्रणेची वाहनांची मुख्याधिकारी यांनी प्रत्यक्ष पाहणी व चौकशी करून त्याचे बिल अदा करू नये अशी संपूर्ण यावल शहरातून मागणी होत…
कजगाव : आमीन पिंजारी येथे चोरीचे सत्र सुरूच असून चोरीचे सत्र थांबता थांबत नसल्याचे चित्र दिसून येते आता पुन्हा एकदा चोरट्यांनी धाडस करून तब्बल आठ लाख रुपये कीमतीचे जनरेटर चोरून नेण्याचा प्रयत्न केला मात्र पहारेकरी ला अचानक जाग आल्याने त्यांनी आरडाओरड केली व चोरटे तेथून फरार झाले सदरील चोरीच्या घटनेमुळे गावात एकच चर्चेला उधाण आले आहे अलिकडच्या काही दिवसांपासून गावात विविध ठिकाणांना चोरट्यांनी टार्गेट केल्याचे दिसून येत आहे महादेव मंदिर,ऋषीबाबा मंदिर कालिका माता मंदिरावर चोरट्यांनी हात साफ केल्याचे आढळून आले आहे त्यातच कनाशी रस्त्यावरून काही दिवसांपूर्वी बैल जोडी चोरी झाल्याची घटना घडली होती तर त्याच रस्त्यावर तीन दिवसांपूर्वी शेतकऱ्यांच्या शेतातील…
मुंबई : प्रतिनिधी मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसैनिकांनी बंडखोर नेत्यांच्या कार्यालयावर हल्ले केले. त्यांचा निषेध केला. याला शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी काल शक्तिप्रदर्शन करून शिवसेनेचा निषेध केला. त्यानंतर शिवसेनेला मोठा धक्का बसला; शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी, शिंदेंच्या समर्थनात राजीनामा देणार असल्याची घोषणा केली. मागील अडीच वर्षांपासून आपल्या संघटनेची राष्ट्रवादी पक्षाकडून गळचेपी चालली आहे. त्याचा निषेध म्हणून जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देत आहे, असे म्हस्के यांनी आपल्या ट्विट केले. https://twitter.com/nareshmhaske/status/1540748818043482112?s=20&t=MU_HifQObXUUMZXW7s_QlQ एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ शिवसेना पक्षातील हा पहिलाच राजीनामा आहे. नरेश म्हस्के यांचा राजीनामा शिवसेनेसाठी पहिला मोठा धक्का आहे. ही घोषणा म्हस्के यांनी ट्वीटमध्ये…
मुंबई :- मुबंईत शिवसैनिक शिवसनेच्या बंडखोर नेत्यांच्या कार्यालयांवर हल्ले करत आहेत. आज सकाळी उल्हासनगर येथे शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांचे कार्यालय शिवसैनिकांनी फोडले. श्रीकांत शिंदे हे बंडखोरांचे नेते एकनाथ शिंदे यांचे पुत्र आहेत. पुण्यातही बंडखोर आमदार तानाजी सावंत यांचे कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. शिवसेनेच्या ३७ पेक्षा जास्त आमदारांनी एकनाथ शिंदेंना समर्थन दिले आहे. त्यामुळे शिंदें विरुद्ध उद्धव ठाकरे असा संघर्ष निर्माण झाला आहे.
मुंबई : सध्या राज्यात शिवसेनेतील बंडखोरी हा विषय चर्चेत आहे. एका कार्यक्रमात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी याना याबाबत विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणालेत की “महाराष्ट्र सरकारवरील संकट लवकरच दूर होईल,असे मला वाटते.” हे संकट आपण दूर कराल का, याच्या उत्तरात ते म्हणालेत की “आगे-आगे देखो होता है क्या! आजच्या समस्येत उद्याची उत्तरं लपलेली असतात. लवकरच सर्वच प्रश्नांची उत्तरं मिळतील. आलेले ढग दूर होतील. अंधकार नष्ट होईल आणि सूर्य उगवेल.” गडकरी आणि उद्धव ठाकरे यांचे व्यक्तिगत संबंध अतिशय घनिष्ट आहेत त्यामुळे ठाकरेंवर घोंगावणारे ढग दूर होतील का? असा प्रश्न त्यांना विचरण्यात आला. गडकरी म्हणालेत, वेयक्तीक संबंध, हे राजकीय…
मुंबई : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर आतापर्यंत त्यांनी शिवसेनेच्या अनेक आमदारांना गळाला लावले आहे. तसेच शिवसेनेचे अनेक खासदारांनाही शिंदे यांनी फोडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती.मात्र शिवसेना नेते गजानन किर्तीकर यांनी या चर्चा फेटाळल्या आहेत. दरम्यान, खासदार भावना गवळी आणि श्रीकांत शिंदे सोडल्यास बाकी सर्व खासदार शिवसेनेसोबत असल्याची माहिती किर्तीकर यांनी दिली. त्यामुळे शिवसेना आणि शिंदे गट यांनी पुन्हा एकदा संख्याबळावर केलेला दावा कितपत खरा आहे अशी चर्चा सध्या रंगली आहे. एकीकडे सरकार वाचवण्यासाठी शिवसेनेच्या गोटात हालचाली वाढल्या आहेत. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे गट संख्याबळ पूर्ण करून सरकार स्थापनेच्या तयारीत असल्याची माहिती आहे. दरम्यान फोडाफोडीचे राजकारण करत…
मुंबई : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसैनिक कमालीचे आक्रमक झाले आहेत. बंडखोर आमदारांच्या कार्यालयांवर आणि घरांवर शिवसैनिक धडत देत आहेत, कार्यालये फोडत आहेत, त्यांच्या फ्लेक्सला काळं फासत आहेत. अशा सगळ्या परिस्थितीत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मुंबई पोलिसांनी मोठा निर्णय घेतलाय. आजपासून पुढील १५ दिवस म्हणजेच १० जुलैपर्यंत मुंबईत कलम १४४ लागू करण्याचा निर्णय मुंबई पोलिसांनी घेतला आहे. कोणत्याही पक्षाने किंवा पक्षाच्या कार्यकर्त्याने कायदा हातात घेऊ नये, यासाठी मुंबई पोलिसांनी जमावबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. जमावबंदी लागू केल्यानंतर चार किंवा चारपेक्षा अधिक लोकांना एकत्र जमता येणार नाही. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसैनिक पेटून उठले…