Author: Saimat

साईमत, प्रतिनिधी, जळगाव मानसिक आजाराच्या विळख्यात सन 2004 पासून अडकलेल्या 38 वर्षीय रुग्णाची प्रकृती आता हाताबाहेर जात होती. तेवढ्यात त्यांना डॉ.उल्हास पाटील धर्मार्थ रुग्णालयाच्या माध्यमातून आशेचा किरण दिसला. पाच लोकांनी धरुन त्याला रुग्णालयात दाखल केले असता मानसोपचार तज्ज्ञांनीदेखील सावधगिरी बाळगून खात्रीशीर उपचार केले आणि अवघ्या 24 दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर तो रुग्ण नॉर्मल झाला. याबाबत अधिक माहिती अशी की, मागील एक महिन्यापूर्वी एका 38 वर्षीय रुग्णाला डॉ.उल्हास पाटील धर्मार्थ रुग्णालयातील मानसोपचार विभागात आणण्यात आले. येथील मानसोपचार तज्ज्ञांनी रुग्णाशी संवाद साधला. यात रुग्णाला विनाकारण भीती वाटायची, संशय येत असे, कानात वेगवेगळे आवाज येत असत. तसेच तो शिवीगाळही करायचा. एके दिवशी तर रस्त्याने…

Read More

साईमत, प्रतिनिधी, जळगाव शहरातील तांबापूर परिसरातील वृध्द महिलेचे बंद घर फोडून सोन्याचे व चांदीचे दागिने लांबविल्याची घटना घडली होती. या दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपीला एमआयडीसी पोलिसांनी सुरत येथून अटक करून 20 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तसेच त्याचे दोन साथीदार व एक अल्पवयीन मुलाला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शहरातील तांबापूर परिसरातील तस्लीमबी मोहम्मद सैय्यद (वय60) ही वृद्ध महिला बकरी ईदच्या निमित्ताने 26 जून ते 7 जुलैदरम्यान धुळे येथे मुलीकडे घराला कुलूप लावून गेल्या होत्या. त्यावेळी त्याचे घर बंद असल्याचे पाहून चोरट्यांनी घरफोडी करून सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकूण 48 हजारांचा मु्‌‍द्देमाल लांबवला होता. याबाबत एमआयडीसी पोलीस…

Read More

साईमत, प्रतिनिधी, जळगाव स्वातंत्र्य सैनिकांचा व कुटुंबीयांचा सन्मान करण्याचे भाग्य लाभले याचा मला सार्थ अभिमान आहे, असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज सोमवारी येथे केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यातील 224 स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांचा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन आदी उपस्थित होते. पालकमंत्री पाटील म्हणाले की, स्वातंत्र्याच्या 75 वर्षाच्या कालखंडात अनेक महापुरुषांचे योगदान लाभले आहे. स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान फार मोलाचे…

Read More

साईमत, मुंबई : प्रतिनिधी गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या आरोग्य विभागातील जवळपास ११ हजार पदांसाठीची जाहिरात उद्या म्हणजे मंगळवारी,२९ ऑगस्टरोजी येणार आहे. राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी ही माहिती दिली. ठाण्यात एकाच दिवशी १८ जणांचा मृत्यू झाल्यानंतर आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेला व्ोग आल्याचं दिसून येत आहे. राज्यातील आरोग्य विभागातील भरती प्रक्रिया ही गेल्या तीन वर्षांपासून रखडली होती. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असताना या भरती प्रक्रियेवर अनेक प्रश्नचिन्ह उभे करण्यात आले होते. पण काही दिवसांपूर्वी ठाण्यात घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर राज्य सरकारने यामध्ये लक्ष घातले आणि या प्रक्रियेला सुरूवात केली. गेल्या आठवड्यामध्ये ही भरती सुरू होणार असे संकेत देण्यात आले होते. आता त्यासंबंधित…

Read More

साईमत, जळगाव : प्रतिनिधी पहिल्यासारखे एकछत्री सरकार आता नाही. वरती भाजप, धड शिवसेनेची तर हातपाय राष्ट्रवादी काँग्रेसचे असलेले सरकार आहे. तरीही आम्ही कामे करत आहोत. तुम्हीही पालकमंत्री होता. तुमच्या काळात साधी एस. टी. चालकांची भरती झाली नाही, अशा शब्दात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यावर टीका केली. शिवसेनेतर्फे आगामी निवडणुकांची तयारी सुरु झाली आहे. जळगाव ग्रामीण मतदार संघात गणनिहाय मेळाव्ो घेण्यात येत आहेत. तालुक्यातील भादली येथील मेळाव्यात मंत्री पाटील बोलत होते. जिल्हाप्रमुख निलेश पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. टीका करणाऱ्यांना त्यांनी या सभेत आव्हान दिले. मंत्री पाटील म्हणाले, आम्हाला कोणावर ठपका ठेवायचा नाही. आम्ही शिंदे गटात गेल्यानंतर…

Read More

साईमत, प्रतिनिधी, जळगाव  पत्रकारांच्या महत्त्वाच्या मागण्यांसाठी व्हॉईस ऑफ मीडिया या राष्ट्रव्यापी संघटनेने राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी केलेल्या आंदोलनाची दखल घेत आमचे म्हणणे राज्य सरकारपर्यंत सादर करण्याबाबत निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. पत्रकारांच्या अशा आहेत मागण्या पत्रकारांना पत्रकारितेमध्ये १० वर्षे पूर्ण झाली, अशा पत्रकारांना अधिस्वीकृती कार्ड देण्यात यावे. माहिती महासंचालनालयाने शासनाचे पोर्टल तयार करून, त्या पोर्टलवर नव्याने पत्रकारितेत पदवी पूर्ण करून किमान तीन महिने पत्रकारितेचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. अशांना पत्रकार म्हणून प्रमाणपत्र देण्यात यावे. (जसे की बार कौन्सिल वकिलांना वकिली करण्याचा अधिकृत परवाना देते तसे पत्रकार असल्याचा अधिकृत परवाना मिळावा.) राज्यातील अनेक वर्तमानपत्र, साप्ताहिके, मासिकांना जाहिराती मिळतील याचे नवीन निकष…

Read More

साईमत, नवी दिल्ली : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी, २८ ऑगस्ट रोजी रोजगार मेळाव्याअंतर्गत ५१ हजारांहून अधिक तरुणांना जॉईिंनग लेटर दिले. याव्ोळी पंतप्रधान मोदींनी व्हिडिओ कॉन्फरिंन्सगद्वारे तरुणांना संबोधित केले. मोदी म्हणाले की, भारत लवकरच टॉप-३ अर्थव्यवस्थेत सामील होईल. देशाचे रक्षक बनणे हे देशातील प्रत्येक तरुणाचे स्वप्न आहे. ९ महिन्यांत ४.८४ लाख बेरोजगारांना नियुक्ती २२ ऑक्टोबर २०२२ रोजी पंतप्रधानांनी रोजगार मेळाव्याचा पहिला टप्पा सुरू केला. तेव्हा पीएम म्हणाले होते – २०२३ च्या अखेरीस देशातील तरुणांना १० लाख सरकारी नोकऱ्या देण्याचे आमचे लक्ष्य आहे. पंतप्रधानांनी गेल्या ९ महिन्यांत ७ रोजगार मेळ्यांमध्ये ४ लाख ४८ हजारांहून अधिक लोकांना सामील होण्याचे पत्र दिले…

Read More

साईमत, जळगाव : प्रतिनिधी जिल्हाभरात व्ोगव्ोगळ्या पोलीस ठाण्यात घरफोड्या, चोरी आणि अन्य गंभीर स्वरूपाचे आठ गुन्हे दाखल असलेल्या टोळीप्रमुख महिलेसह पाच जणांना जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी काढले आहे. चोरी करणाऱ्या गुन्हेगारांचे नेतृत्व एखादी महिला गुन्हा करते आणि तिच्यावर हद्दपार होण्याची वेळ येते, ही जिल्ह्यातील पहिलीच घटना असण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेल्यांमध्ये भावना जवाहरलाल लोढा (वय ३८, रा. अयोध्यानगर), टोळी सदस्य अनिल रमेश चौधरी (वय ४०, रा. अयोध्यानगर), सैय्यद सजील सैय्यद हारुन (वय २६, रा. मास्टर कॉलनी, मेहरुण), सैय्यद आमीन सैय्यद फारुख पटव्ो ऊर्फ बुलेट (वय २६, रा. मास्टर कॉलनी, मेहरुण), सैय्यद…

Read More

साईमत, लातुर : प्रतिनिधी राजस्थानच्या कोटा या ठिकाणी देशभरातले विद्यार्थी परीक्षांच्या तयारीसाठी येत असतात. रविवारी दुपारी नीटच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. लातूर जिल्ह्यातील उजना या गावातील अविष्कार कासले (१७ वर्षे) हा विद्यार्थी कोटा या ठिकाणी शिक्षण घेत होता. रविवारी अविष्कारने सहाव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच उजना गावातल्या सगळ्यांनाच धक्का बसला आहे.अविष्कारचे आई आणि वडील हे दोघंही शिक्षक आहेत. अहमदपूरमध्ये ते वास्तव्य करतात. यांचा मोठा मुलगा आणि अविष्कारचा मोठा भाऊ हैदराबादमध्ये शिक्षण घेतो. मोठ्या मुलाचं शिक्षणही कोटामधून पूर्ण झालं आहे. त्यानंतर अविष्कारही कोटा या ठिकाणी शिक्षणासाठी गेला होता. अविष्कारने आत्महत्या का केली ? हे…

Read More

साईमत, प्रतिनिधी, जळगाव येथील खुबचंद सागरमल विद्यालयाचे क्रीडा शिक्षक प्रविण वसंतराव पाटील यांना राष्ट्रीय सामाजिक कला साहित्य एकता संमेलनात क्रीडा पर्यावरण व सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल सामाजिक राष्ट्रीय कर्तृत्व सन्मान पुरस्कारने सुप्रसिद्ध अभिनेते सुनील गोडबोले यांच्या हस्ते सन्मानचिन्ह प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी डॉ.कांशिराम धोंडगा, विनोद ढगे, गणेश अमृतकर, राजेश जाधव हे मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या या यशाबद्ल त्यांचे जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, डॉ. सुदर्शन पाटील. डॉ.रितेश पाटील, पिपल्स बॅक संचालक विकास वाघ, ॲड. अविनाश भालेराव, संजय जडे यांनी अभिनंदन केले आहे.

Read More