साईमत जळगाव प्रतिनिधी विवेकानंद प्रतिष्ठान संचालित कै. ब.गो.शानभाग विद्यालय, सावखेडा येथे संस्कृत दिनानिमित्त दि. 31 ऑगस्ट ते 04 सप्टेंबर दरम्यान इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी संस्कृतसप्ताह पाळण्यात येत असून या सप्ताह निमित्ताने बहुपर्यायी प्रश्नमंजूषा स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांना संस्कृत भाषा अतिशय सोपी वाटावी व त्यांच्यात या भाषेविषयी गोडी निर्माण व्हावी हाच उद्देश या सप्ताहा मागे आहे. या सप्ताह अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहासाठी मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. या संस्कृत सप्ताहात विद्यार्थ्यांसाठी संस्कृत एकल गीत गायन स्पर्धा, संस्कृत व्याकरण बहुपर्यायी प्रश्न स्पर्धा, संस्कृत स्तोत्र पठण स्पर्धा, संस्कृत गप्पांचा कार्यक्रम या स्पर्धा घेण्यात येणार आहेत…
Author: Saimat
साईमत जळगाव प्रतिनिधी श्री साईबाबा संस्थान शिर्डी आयोजित श्री साईसतचरित पारायण सोहळा शिर्डीतील श्री साई समाधी शताब्दी महोत्सव मंडप येथे केसीई सोसायटी चे कान्ह ललित कला केंद्र जळगाव निर्मित ‘भावयात्रा’ या कार्यक्रमाचा ७ वा प्रयोग नुकताच सादर करण्यात आला. दरवर्षी श्रावण महिन्यात पारंपरिक अशा श्री साई सतचरित पारायण सोहळा निमित्त सात दिवस विविध नामवंत कलाकारांचे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.यात जळगावच्या भावयात्रा या कार्यक्रमास संधी देण्यात आली होती.यावेळी भाविक भक्तांनी सदर कार्यक्रम बघुन समधान व्यक्त केले . यावेळी कलाकार संकल्पना लेखन सादरकर्ते शशिकांत वडोदकर, ईशा वडोदकर , कपिल शिंगाने सर, देवेंद्र गुरव , रेडिओ मनभावन ९०.८ एफ एम चे आर जे…
साईमत जळगाव प्रतिनिधी गोदावरी फाऊंडेशनतर्फे मोफत हृदयरोग निदान व संपूर्ण आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन जिल्हा सत्र न्यायालयात करण्यात आले होते. या शिबिरात हृदयविकाराचे लक्षणं आढळून आलेल्या १६० जणांची टू डी इको तपासणी तर ३१४ शिबिरार्थींची ईसीजी कार्डिओग्राफ तपासणीही यावेळी करण्यात आली. शिबिरासाठी डॉ.उल्हास पाटील धर्मदाय रुग्णालयाच्या हृदयालयातील डीएम कार्डिओलॉजिस्ट डॉ.वैभव पाटील, मेडिसीन तज्ञ डॉ.तुषार पाटील, निवासी डॉ.विशाल चव्हाण, सर्जरी विभागातील डॉ.गजानन गवळी, नेत्ररोग निवासी डॉ.नेहा नारखेडे, ऑर्थोचे निवासी डॉ.गौतम कुंभार यांनी शिबिरार्थींची आरोग्य तपासणी केली. याशिवाय ज्यांना हृदयविकाराचा त्रास होता किंवा हृदयविकारासारखी लक्षणे किंवा शंका असलेल्या शिबिरार्थींची टू डी इको तपासणी अर्थात हृदयाची सोनोग्राफीही मोफत करण्यात आली. टू डी इको…
साईमत जळगाव प्रतिनिधी नुकतेच भारताने चांद्रयान ३ हे अवकाशयान चंद्राच्या दक्षिण भागात सुखरूप पणे उतरवून एक नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला.याचा यशोत्सव सुधर्मा संस्थेच्या वतीने येथील विविध झोपडपट्टीतील ५० विद्यार्थ्यांसमवेत “भाऊचे उद्यान” येथे साजरा केला. कार्यक्रम प्रसंगी मराठी विज्ञान परिषदेचे सचिव दिलीप भारंबे उपस्थित होते. त्यांचे स्वागत सुधर्मा चे अध्यक्ष हेमंत बेलसरे यांनी भगवतगीता देउन केले. याप्रसंगी इस्रोच्या शास्त्रज्ञांचे सर्वांनी टाळ्या वाजवून अभिनंदन केले. दिलीप भारंबे यांनी, न्युटनचा सिद्धांत, दाबाची संकल्पना स्पष्ट करण्यासाठी ३०० पिनांवर एका पायावर उभे राहणे, पाणबुडीत वापरले जाणारे पॅरीस्कोप, भुपृष्ठिय तणावाचे मापन,सेंन्ट्रिफ्युगल फोर्स एनर्जीचा उपयोग,केंद्रगामी ऊर्ध्वगामी बल, उर्जा अक्षयता नियम,तुतारीचा उपयोग करून ध्वनी तिव्रता वाढविणे, आर्किमिडीज सिद्धांत…
साईमत जळगाव प्रतिनिधी चांगलं काम करत असताना स्वतःला रोज सिद्ध करावं लागत, मात्र या दबावाचा तुम्ही सकारात्मक विचार केला तर आयुष्यात नक्कीच यशस्वी व्हाल. तुम्ही तुमच्या क्षमता वाढवू शकले तर तुमचं भविष्य नक्कीच उज्वल आहे. दृढ निश्चय केला तर या जगात अशक्य अस काही नाही. दीपस्तंभ मनोबल चे कार्य व उभारणी बघून मी आश्चर्यचकित झालो आहे. दिव्यांग अनाथ विद्यार्थ्यांच्या संदर्भातलं काम कसं असावं याचा आदर्श या संस्थेने निर्माण केला आहे. महिन्यातून एकदा मनोबल प्रकल्पातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मी नक्की येईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद यांनी केले. दीपस्तंभ फाऊंडेशन मनोबल प्रकल्पात रक्षाबंधन कार्यक्रमाच्या निमित्ताने ते विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते. या…
साईमत जळगाव प्रतिनिधी शालेय स्पर्धेसाठी शासनाकडून मंजूर असलेल्या निधी पैकी अर्धी रक्कम आयोजक संघटनेला स्पर्धां सुरु होण्यापूर्वी देण्यात यावी अशी मागणी हॉकी व फुटबॉल संघटने चे फारुक शेख यांनी केली आहे. युवासेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव यांच्या माध्यमातून आंतर शालेय क्रीडा स्पर्धांना सुरुवात झाली असून २२ ऑगस्ट २०२३ रोजी क्रीडा कार्यालय व एकविध क्रीडा संघटनाच्या सभेत जोपर्यंत क्रीडा अधिकारी हे खेळासाठी मंजूर असलेल्या रकमे पैकी ५० टक्के रक्कम अग्रीम स्वरूपात त्या खेळाच्या संघटनेला देणार नाही तोपर्यंत त्या स्पर्धा संबंधित संघटना घेणार नाही असे ठरले होते. १ ते २ सप्टेंबर रोजी हॉकी…
साईमत जळगाव प्रतिनिधी अनेक दिवसा पासून जळगाव जिल्ह्यासह इतरत्र पाऊस नसल्याने संपूर्ण मानवजात हवालदिल झाली असून पाऊस पडावा म्हणून जळगाव शहरात दि 3 सप्टेंबर रविवार रोजी नमाज ए इस्तेसका चे आयोजन सकाळी ९ वाजता ईदगाह मैदान, अजिंठा चौक, जळगाव येथे मौलाना उस्मान कासमी यांच्या नेतृत्वात करण्याचे आयोजन ऊलमा काऊन्सिल ने केले आहे. तरी संपूर्ण जळगाव वासियांनी आपल्या कडे असलेली जनावरासह सकाळी ८.४५ वाजता इदगाह मैदानावर उपस्थीत रहावे असे आवाहन शहर ए काझी मुफ्ती अतीकुर रहेमान, इदगाह ट्रस्ट चे अध्यक्ष वहाब मलिक व जनरल सेक्रेटरी फारुक शेख यांनी केले आहे.
साईमत, मुंबई ः प्रतिनिधी आशिया चषकाला दिमाखात सुरुवात झाली आहे. पहिल्याच सामन्यात पाकिस्तानने नेपाळचा पराभव करत विजयी सुरुवात केली. आशिया चषकात भारताचा पहिला सामना पाकिस्तानविरोधात शनिवारी होत आहे. या सामन्याकडे सर्व क्रीडा प्रेमींचे लक्ष लागले आहे. भारत आणि पाकिस्तान हे क्रिकेट जगतातील कट्टर प्रतिस्पर्धी आहेत. दोन्ही संघाचा सामना म्हणजे संपूर्ण जगातील क्रिकेट रसिकांसाठी ब्लॉकबस्टर शो असतो. दोन्ही देशातील संबंध खास नसल्याने दोघेही एकमेकांचा दौरा करत नाहीत. अशात मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्येच आमने-सामने येतात. आशिया चषकात शनिवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सामना रंगणार आहे. आशिया चषकाच्या इतिहासात आतापर्यंत टीम इंडियाचे पारडे जड राहिले आहे. यंदा श्रीलंकेमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार…
साईमत, मुंबई ः प्रतिनिधी भारतासह राज्यावर दुष्काळाचे संकट उभे ठाकले आहे. तीन महिन्यात पावसाची मोठी तूट दिसून आली आहे. महाराष्ट्र आणि केरळमध्ये पावसाने पाठ फिरवल्याचे दिसत आहे. ऑगस्ट महिन्यात भारतात शतकातील सर्वात कमी पावसाची नोंद झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. आतापर्यंत ऑगस्ट महिन्यात फक्त १६० मिमीच्या जवळपास पाऊस झाला आहे. ऑगस्ट २०२३ हे मान्सून वर्ष १९०१ नंतरचा सर्वात कोरडा महिना म्हणून नोंदवला गेला आहे. त्यामुळे यंदा दुष्काळाची स्थिती ओढावली आहे. १ जूनपासून संपूर्ण देशात मान्सूनमध्ये पावसाची तूट वाढत गेली. ऑगस्टअखेरपर्यंत देशातील पावसाची तूट ९ टक्कयांपर्यंत जाऊन पोहोचली आहे. त्यातच पुन्हा एकदा मान्सून ब्रेकची स्थिती असल्याने ही तूट आणखी वाढण्याची…
साईमत, मुंबई ः प्रतिनिधी इंडिया आघाडीच्या गुरूवारी सुरू झालेल्या दोन दिवसांच्या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीत विरोधकांच्या एकजुटीचा निर्धार केला जाणार आहे. जागावाटप हा आघाडीतील कळीचा मुद्दा असला तरी केवळ जागावाटपाच्या सूत्रापुरतीच चर्चा मर्यादित ठेवली जाईल. मतभेद होतील अशी कोणतीही कृती सध्या तरी केली जाणार नसल्याची सुत्रांची माहिती आहे. इंडिया बैठकीसाठी नेतेमंडळी मुंबईत दाखल झाली आहेत. पाटणा आणि बंगळुरूनंतरची तिसरी बैठक यशस्वी करण्याचा प्रयत्न आहे. विरोधकांची एकजूट अधिक भक्कम कशी होईल यावरच अधिक भर दिला जाणार आहे. गुरुवारी सायंकाळी इंडिया आघाडीच्या मानचिन्हाचे अनावरण झाले. विरोधी नेत्यांची अनौपचारिक चर्चा होईल. शुक्रवारी दिवसभर आगामी रणनीतीवर खल केला जाईल. आघाडीत मतभेद होतील अशी कोणतीही…