दोन चिमुकल्यांच्या मृत्यूने शहरात संतापाची लाट साईमत/भडगाव/प्रतिनिधी : येथील आदर्श इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये झालेल्या अत्यंत दुर्दैवी घटनेच्या निषेधार्थ शनिवार दि.२० रोजी संपूर्ण शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. शाळेतील निष्काळजीपणामुळे दोन चार वर्षीय चिमुकल्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप असून या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना तसेच नागरिकांनी एकत्र येत बंदची हाक दिली होती. शहरवासीयांनी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. भडगाव शहरातील मुख्य बाजारपेठेसह अंतर्गत रस्त्यांवरील सर्व दुकाने, व्यापारी संकुले, हॉटेल्स, भाजीपाला विक्रेते, किराणा दुकाने आणि खासगी आस्थापने पूर्णपणे बंद राहिल्या. सकाळपासूनच शहरात शुकशुकाट दिसत होते. नेहमी गजबजलेली बाजारपेठ पूर्णतः रिकामी पडली…
Author: saimat
जिल्हा परिषदेत ‘सकारात्मक शिस्त’ या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. साईमत/ पहूर, ता. जामनेर/प्रतिनिधी : तालुक्यातील जोगलखेडे जिल्हा परिषद शाळेत पाचवी शिक्षण परिषद उत्साहात पार पडली. जिल्हास्तरावरून देण्यात आलेल्या डिजिटल मार्गदर्शक सूचनेनुसार परिषदेत ‘सकारात्मक शिस्त’ या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमात उपस्थित शिक्षक आणि अधिकारी मुलांच्या सर्वांगीन विकासासाठी आवश्यक असलेल्या नैतिक मूल्यांची रुजवणूक, आनंददायी शिक्षण आणि आपत्ती व्यवस्थापनाबाबत सविस्तर सूचना दिल्या. अध्ययन निष्पत्ती व मासिक नियोजनाबाबत चंदन राजपूत यांनी मार्गदर्शन केले. शिक्षण परिषदेत गुणवत्ता सुधारणा व विचारविनिमयाला महत्त्व दिले गेले. उद्घाटनासाठी पोलीस पाटील विजय पाटील आणि उपसरपंच श्रीकांत चौधरी उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात केंद्रप्रमुख ज्ञानेश्वर पाटील यांनी मार्गदर्शन कसे करावे, शिक्षकांचे कर्तव्य…
रघुनाथराव गरूड यांच्या ४१ व्या पुण्यतिथीनिमित्त विद्यार्थ्यांसाठी आयोजित क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन साईमत/जामनेर/प्रतिनिधी : तालुक्यातील पाळधी येथील धी. शेंदुर्णी एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमती क.द.नाईक माध्यमिक विद्यालयात स्व.आचार्य गजाननराव रघुनाथराव गरूड यांच्या ४१ व्या पुण्यतिथीनिमित्त विद्यार्थ्यांसाठी आयोजित क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामपंचायत सदस्य मनोज नेवे यांच्याहस्ते करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी मुख्याध्यापक एस.एन. पाटील, सर्व शिक्षकवृंद तसेच शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते. स्पर्धा सुरू करण्यापूर्वी उपस्थितांनी स्व. आचार्य स्व.आचार्य गजाननराव करूड यांना अभिवादन करून त्यांच्या कार्याची आठवण व्यक्त केली.मुख्याध्यापक एस.एन. पाटील यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करताना क्रिकेटसारख्या खेळांमुळे शारीरिक स्वास्थ्य सुधारते तसेच विद्यार्थ्यांमध्ये संघभावना, संयम आणि धैर्य यासारख्या मूल्यांची जोपासना होते, असे सांगितले.…
वीज ग्राहकांमध्ये प्रचंड नाराजी व संताप व्यक्त होत आहे. साईमत/भडगाव/प्रतिनिधी : दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत सत्तेत असताना प्रत्येक कुटुंबाला २०० युनिट वीज मोफत दिली होती. त्यानंतर त्यांच्याच पक्षाने पंजाबमध्ये मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या सरकारकडून ३०० युनिटपर्यंत प्रत्येक कुटुंबाला मोफत वीजपुरवठा केला. या राज्यांमध्ये या योजनेमुळे वीज कंपनी व राज्याचे बजेट फायदेशीर ठरले आहे. महाराष्ट्रात मात्र महागडा वीजपुरवठा देत वीज दर सतत वाढत असल्याने राज्यातील वीज ग्राहकांमध्ये प्रचंड नाराजी व संताप व्यक्त होत आहे. दिल्ली व पंजाबमधील यशस्वी योजनांच्या पार्श्वभूमीवर येथेही कमीत कमी २०० युनिट वीज मोफत पुरवावी, अशी मागणी पाचोरा भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती, राष्ट्रपती…
ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष ; पर्यावरणप्रेमींमध्ये नाराजी साईमत/ पहूर ता. जामनेर/प्रतिनिधी : जामनेर तालुक्यातील पहूर येथे वाघूर नदीच्या पात्रात गावातील नाल्यांमधील सांडपाणी व कचरा थेट टाकला जात असल्याने नदीपात्रात मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग साचले आहेत. या गंभीर प्रकाराकडे ग्रामपंचायतीकडून सोयीस्कर दुर्लक्ष होत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. नदी प्रदूषण रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘नमामि गंगे’ अभियान राबविण्यात येत असून नद्यांचे संवर्धन व स्वच्छता हा त्यामागील मुख्य उद्देश आहे. मात्र, पहूर येथील वाघूर नदीत वर्षानुवर्षे गावातील सांडपाणी सोडले जात असून, आता त्यात भर म्हणून नाल्यांमधील केरकचरा व उकिरडा थेट नदीपात्रात टाकला जात आहे. परिणामी नदीचे स्वरूप पूर्णतः दूषित झाले असून कचऱ्याचे…
मलकापूर नगरपरिषद कारभारावर प्रहारची तक्रार साईमत/ मलकापूर/प्रतिनिधी : मलकापूर शहरात सध्या सुरू असलेल्या विविध विकासकामांचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचा आरोप नागरिकांकडून होत असून, ही कामे नगरपरिषदेतील संबंधित अभियंत्यांच्या आशिर्वादानेच सुरू असल्याची जोरदार चर्चा शहरात रंगू लागली आहे. रस्ते, नाले, सौंदर्यीकरण तसेच इतर सार्वजनिक कामांमध्ये निकृष्ट साहित्याचा वापर, नियमांचे सर्रास उल्लंघन आणि अनेक ठिकाणी अपूर्ण व दर्जाहीन कामे सुरू असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शहरातील काही भागांत नव्याने झालेल्या रस्त्यांवर काही दिवसांतच भेगा पडल्याचे, नाल्यांची कामे अर्धवट ठेवण्यात आल्याचे तसेच सौंदर्यीकरणाच्या नावाखाली निकृष्ट साहित्य वापरल्याचे प्रकार समोर येत आहेत. या संदर्भात नागरिकांनी व लोकप्रतिनिधींनी वेळोवेळी तक्रारी करूनही संबंधित अधिकाऱ्यांकडून जाणीवपूर्वक…
राष्ट्रीय सेवा योजना (रासेयो) शिबिराअंतर्गत कायदेविषयक मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. साईमत/मलकापूर/प्रतिनिधी : तालुक्यातील पिंप्रीगवळी राष्ट्रीय विद्यालयातर्फे आयोजित राष्ट्रीय सेवा योजना (रासेयो) शिबिराअंतर्गत कायदेविषयक मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराच्या पाचव्या दिवशी सावरगाव (ता.मोताळा) येथे कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किरण पाटील होते. दुपारच्या सत्रात ‘बौद्धिक संपदा’ या विषयावर धामणगाव बढे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नागेश जायले यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा, कायदा व सुव्यवस्था याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना कायद्याची मूलतत्त्वे समजावून सांगत सामाजिक शिस्त व जबाबदारीचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी मलकापूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयातील प्रसिद्ध विधितज्ज्ञ ॲड.जी.डी.पाटील यांनी पॉक्सो (पीओसीएसओ) कायद्याविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती…
प्रधानमंत्री सौर घर मोफत वीज योजना अंतर्गत आयोजित जनजागृती शिबिर उत्साहात पार पडले. साईमत/यावल /प्रतिनिधी : तालुक्यातील सांगवी बु.येथे महावितरण कंपनीमार्फत प्रधानमंत्री सौर घर मोफत वीज योजना अंतर्गत आयोजित विशेष जनजागृती शिबिर उत्साहात पार पडले. शिबिर फैजपूर उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता नितीनकुमार पाटील व सहाय्यक अभियंता राहुल कवठे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडले. शिबिरात ग्रामस्थांना वीज बिलावरील नाव बदल प्रक्रिया तसेच प्रधानमंत्री सौर घर योजनेची सविस्तर माहिती देण्यात आली. सौर ऊर्जेचा वापर करून वीज बिलामध्ये कशी बचत करता येईल, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. शिबिर यशस्वितेसाठी महावितरणचे सुरेश मोरे, महेंद्र महाजन, हर्षवर्धन तळेले,जुबेर, योगेश बारी, गोविंदा भास्कर,…
सुरळीत व सुरक्षित वाहतुकीसाठी प्रशासन सज्ज साईमत/चाळीसगाव/ प्रतिनिधी: तालुक्यातील औट्रम (कन्नड) घाट मार्गाची जळगाव जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर या दोन जिल्ह्यांना जोडणारा हा महत्त्वाचा घाट मार्ग असल्याने येथे वाहतूक सुरळीत, सुरक्षित आणि अपघातमुक्त राहावी, या दृष्टीने ही पाहणी करण्यात आली. पाहणीदरम्यान घाटातील रस्त्यांची सद्यस्थिती, वाहतुकीतील अडथळे, संभाव्य अपघातप्रवण ठिकाणे तसेच वाहतूक नियंत्रण आणि सुरक्षिततेसाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा सखोल आढावा घेण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित यंत्रणांना वाहतूक कोंडी होणार नाही याची विशेष दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या. तसेच घाट मार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने राबविण्याचे निर्देशही देण्यात आले. अपघातप्रवण ठिकाणी सूचना फलक,…
सहारा नसलेल्या महीला तसेच वृद्ध ,निराधार मनोरुग्ण यांना थंडी पासुन बचाव म्हणून ब्लॅकेट चे वाटप केले साईमत/जामनेर /प्रतिनिधी : सद्या हिवाळ्याचे दिवस असल्याने कडाक्याची थंडीत उघड्यावर राहणारे, आर्थिकदृष्टा दुर्बल कुटुंबे,वृद्ध निराधार व्यक्ती यांना थंडीचा जास्त त्रास सहन करावा लागत असून त्यांना मायेची उब मिळावी या साठी चिल्ड्रन्स हार्ट फाऊंडेशनने ग्रामीण भागातील गरजूंना मोफत ५०० ब्लॅकेटचे वाटप करून त्यांच्या जीवनात मायेची उब निर्माण करण्याचा काहीसा प्रयत्न बोदवड केला आहे. चिल्ड्रन्स हार्ट फाऊंडेशन चे अध्यक्ष तसेच सामाजिक कार्यकर्ते संवेदनशील व्यक्तीमत्व संदीप सिंग यांनी आत्मसन्मान फाऊंडेशन बोदवड येथील कोणाचाही सहारा नसलेल्या महीला तसेच वृद्ध ,निराधार मनोरुग्ण यांना थंडी पासुन बचाव म्हणून ब्लॅकेट चे वाटप…