Author: saimat

बोदवड : प्रतिनिधी महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त ध्यानचंद सिंह यांच्या प्रतिमेचे पूजन नुकतेच करण्यात आले. ध्यानचंद हे माजी भारतीय हॉकी खेळाडू आणि कर्णधार होते. भारतातील आणि जागतिक हॉकीमधील सर्वोत्कृष्ट खेळाडूंमध्ये त्यांची गणना होते. त्यांची जन्मतारीख भारतात “राष्ट्रीय क्रीडा दिन” म्हणून साजरी केली जाते. कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष मिठुलाल अग्रवाल यांच्या प्रोत्साहनातून आणि प्राचार्य प्रा.अरविंद चौधरी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. उपप्राचार्य व्ही.पी. चौधरी यांचे ‘क्रीडा जगत’वर मार्गदर्शन झाले. यावेळी प्रभारी क्रीडा संचालक डॉ.अमर वाघमोडे, डॉ.रत्ना जवरस, हेमलता कोटेचा, डॉ.रुपेश मोरे, वैशाली संसारे, अजित पाटील, धीरेंद्र कुमार, अनिल धनगर, शरद पाटील, शेखरसिंग चव्हाण यांच्यासह महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.

Read More

सोयगाव : प्रतिनिधी जरंडी ग्रामस्थांना ऑनलाइन पद्धतीने कर भरण्याची सुविधा ग्रामपंचायतने उपलब्ध करून दिली आहे. सरपंच स्वाती पाटील यांनी बुधवारी, ३० रोजी ‘माझी वसुंधरा’ उपक्रमाअंतर्गत ग्रामपंचायत ऑनलाइन कर वसुली सुविधेचा प्रारंभ केला. यावेळी ग्रामपंचायत पटांगणात सरपंच स्वाती पाटील यांच्या उपस्थितीत ग्रामसभा झाली. यावेळी उपसरपंच संजय पाटील यांनी ग्रामपंचायतमार्फत राबविण्यात येणाऱ्या नवनवीन सुविधा, ग्रामस्थांनी ग्रामपंचायत सहकार्य करून गाव स्वच्छ व सुंदर, प्लॅस्टिक मुक्त करण्यासंबंधी माहिती दिली. यावेळी सरपंच स्वाती पाटील, उपसरपंच संजय पाटील, ग्रामविकास अधिकारी सुनील मंगरुळे, सदस्य मधुकर पाटील, मधुकर सोनवणे, दिलीप पाटील, संजीवन सोनवणे, अमृत राठोड, महेंद्र पाटील यांच्यासह इतर ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

Read More

यावल : प्रतिनिधी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात खुल्या जागेवर तालुका शिवसेना शिंदे गटाची बैठक नुकतीच उत्साहात पार पडली. अध्यक्षस्थानी माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे होते. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जी मेहनत घेऊन कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दोन संचालक निवडून आणले. याबद्दल शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे व मित्र पक्षाचे कौतुक केले. आपल्या संचालकांकडून शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याबाबत विकास कामे करण्याबाबत मार्गदर्शनपर आवाहन माजी आ.चंद्रकांत सोनवणे यांनी केले. शिवसेनेच्या संघटनेबाबत प्रत्येकाने केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना ज्या राबविल्या जात आहे. त्याबाबत जनतेसमोर जाऊन जनतेला माहिती देऊन मेहनत कशी घ्यावी, याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सूर्यभान पाटील यांनी त्यांना संचालकपदी निवड…

Read More

बोदवड : प्रतिनिधी तालुक्यातील निमखेड ग्रामपंचायतीने शासनाच्या चौदाव्या आणि पंधराव्या वित्त आयोग निधीचा अपहार केला आहे. प्रत्यक्षात कोणतेही कामे न करता बनावट कागदपत्रांद्वारे निधी हडपल्याची तक्रार भीमराव वाघ यांनी बोदवड पंचायत समिती आणि जळगाव जिल्हा परिषद यांच्याकडे लेखी स्वरूपात केली आहे. तालुक्यातील निमखेड ग्रामपंचायतीत चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीत ग्रामसेवक, सरपंच व सदस्यांनी खोटी बिले दाखवून लाखो रूपयांचा अपहार केला असल्याचे तक्रारदार भीमराव वाघ यांनी म्हटले आहे. निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील निमखेड येथील ग्रामपंचायतीला १४ व्या वित्त आयोगान्वये निधी प्राप्त झाला होता. हा निधी ग्रामसेवक, सरपंच आणि काही सदस्यांनी हडप केला आहे. गावात निकृष्ठ प्रतीचे काम केली. काही ठिकाणी कामे…

Read More

मुक्ताईनगर : प्रतिनिधी शेतजमिनीचा ताबा आणि वहीवाटीबाबत शेतकऱ्यातील आपआपसातील वाद मिटविण्यासाठी, समाजामध्ये सलोखा निर्माण होऊन एकमेकांमधील सौख्य व सौहार्द वाढीस लागण्यासाठी एका शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे व दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे असणाऱ्या शेतजमीन धारकाचे अदलाबदल दस्तासाठी मुद्रांक शुल्क नाममात्र १ हजार रुपये व नोंदणी फी नाममात्र १ हजार रुपये आकारण्याबाबत सवलत देण्याची ‘सलोखा’ योजना राबविण्यास शासनाने ३ जानेवारी २०२३ रोजी मान्यता दिली. ‘सलोखा’ योजनेनुसार मुक्ताईनगर तालुक्यातील पहिला दस्त तहसीलदार डॉ.निकेतन वाळे यांच्या प्रयत्नाने नोंदविला गेला. विशेष बाब म्हणजे त्यांनी दस्तावर स्वतः साक्षीदार म्हणून सही करून या योजनेत इतर शेतकरी बांधवांनी सहभागी व्हावे, अशी इच्छा व्यक्त…

Read More

चंद्रपूर : २०१८ पासून नोकरीच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या अंबुजा सिमेंट कंपनीतील प्रकल्पग्रस्तांनी आता मंत्रालयात विष प्राशन करू, असा इशारा राज्य सरकारला दिला आहे. उपरवाही येथील अदानी समुहाच्या ताब्यात असलेली अंबुजा सिमेंट कंपनी म्हणजेच पूर्वीची मे. मराठा सिमेंट वर्क्समधील प्रकल्पग्रस्तांचे २०१८ पासून नोकरीच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. कंपनीने भूसंपादन करारातील अटी-शर्तींचे उल्लंघन केल्याचे जिल्हा प्रशासनाने केलेल्या चौकशीत सिद्ध झाले. मार्च २०१९ मध्ये जिल्हा प्रशासनाने कंपनीविरुद्ध कारवाई करण्याचा प्रस्ताव शासनाच्या महसूल व वन तसेच मदत व पुनर्वसन विभागाकडे पाठवला मात्र चार वर्षे लोटूनही शासनाने कंपनीविरुद्ध कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. कंपनीविरुद्ध कारवाई प्रलंबित असतानाच कंपनीच्या विस्तारित प्रकल्पासाठी जिल्हा प्रशासन व पर्यावरण विभागाने…

Read More

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरच्या कोल्हेवाडी गावातील एका तरुणाचा ठरलेला विवाह गावातीलच एका व्यक्तीने मोडून स्वतःच लग्न त्याच मुलीबरोबर ठरवल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयात त्या तरुणाला बोलावून शिवीगाळ व दमदाटी केली. त्यानंतर तरुणाने टोकाचा निर्णय घेत थेट गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. कोल्हेवाडीतील नितीन सिताराम खुळे (वय ३२) या तरुणाने सोमवारी वडगावपान शिवारातील बाभळीच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी या तरुणाने त्याच झाडाखाली बसून आपल्या मोबाईलमध्ये एक व्हिडिओ शूट केला होता. व्हिडीओमध्ये तरुणाने त्याच्यासोबत घडलेला सगळा प्रकार सांगितला आहे. त्यानंतर नितीनने गळफास घेत…

Read More

लखनऊ ः उत्तर प्रदेशमध्ये मुस्लीम प्रवाशांना नमाज पठणासाठी दोन मिनीट बस थांबवल्यामुळे एका बस वाहकाला नोकरीवरून काढून टाकण्यात आल्याचा प्रकार तीन महिन्यांपूर्वी समोर आला होता. दोन दिवसांपूर्वी या बसवाहकाने आत्महत्या केल्याची बाब उघड झाली असून आता उत्तर प्रदेश राज्य परिवहन मंडळावर या वाहकाच्या पत्नीने गंभीर आरोप केले आहेत. ३२ वर्षीय मोहित यादव उत्तर प्रदेश राज्य परिवहन मंडळाच्या बसवर कंडक्टर म्हणून कार्यरत होते. ३ जून रोजी कौशंबीवरून दिल्लीच्या दिशेने जाणारी बस त्यांनी रामपूरनजीक दोन मिनिटांसाठी थांबवली होती.बसमधील काही मुस्लीम प्रवाशांना नमाज पठनासाठी त्यांनी बसचालक के.पी.सिंह याला दोन मिनिटांसाठी बस थांबवायला सांगितली मात्र याविरोधात काही लोकांनी तक्रार केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मोहित यादव…

Read More

बंगळुरु ः भाजपाला पराभवाची धूळ चारत कर्नाटकमध्ये मोठ्या बहुमताने काँग्रेसचे सरकार स्थापन झाले. सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन आता १०० दिवस लोटले आहेत. “सत्तेवर येण्यापूर्वी काँग्रेसने पाच आश्वासने दिली होती. त्यापैकी तीन आश्वासने पूर्ण केली असून, चौथे आश्वासन बुधवारी (३० ऑगस्ट) पूर्ण करू”, असे सिद्धरामय्या यांनी जाहीर केले आहे. सिद्धरामय्या यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या दुसऱ्या कार्यकाळाची सुरुवात थोडी डळमळीत होती. बहुमत मिळाल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार हे मुख्यमंत्रीपद मिळावे यासाठी अडून बसले होते परंतु, काँग्रेसच्या वरिष्ठांनी त्यांची मनधरणी केल्यानंतर त्यांनी या पदाचा हट्ट सोडला. शिवकुमार यांना उपमुख्यमंत्रीपदावर समाधान मानावे लागले असले तरी त्यांनी बंगळुरू विकास (ज्याच्या अंतर्गत बृह्नबंगळुरू महापालिका येते) आणि…

Read More

नागपूर : समृद्धी महामार्गावर सर्वाधिक अपघात सकाळी ६ ते दुपारी १२ पर्यंत तर सर्वाधिक अपघाती मृत्यू हे रात्री १२ ते ३ च्या दरम्यान नोंदवण्यात आले आहे. ११ डिसेंबर २०२२ ते ३१ डिसेंबर २०२३ पर्यंतच्या कालावधीमधील अपघातांबाबत महामार्ग (सुरक्षा) पोलिसांच्या अहवालातून ही माहिती पुढे आली आहे. पंतप्रधानांनी ११ डिसेंबर २०२२ रोजी समृद्धी महामार्गाचे लोकार्पण केले. याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा महामार्ग सर्वात सुरक्षित असल्याचा दावा केला होता. परंतु, उद्घाटनापासून ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत समृद्धी महामार्गावर एकूण ७२९ अपघात झाले. त्यात १०१ नागरिकांचा मृत्यू झाला. तर २६२ जण गंभीर तर ४८६ जण किरकोळ जखमी झाले. अपघातांचे विश्लेषण…

Read More