ज्योतिष शास्त्र के अनुसार कुलदेवी का महत्व नमस्ते मै रविंद्र धुप्पड और नेहा पटेल आपका ASTRO SURYA चॅनल में स्वागत करते है हमारे नये नये व्हिडिओ देखने के लिए चॅनल को Subscribe करीये इस लेख के साथ हमने कुलदेवी का एक शॉर्ट व्हिडिओ भेजा है कुलदेवी दोष, निवारण इसके बारे मे अधिक जानना चाहते हो तो यू ट्यूब पर हमारे 2 व्हिडिओ देख सकते हो इस लेख मे हम कुलदेवी के बारे मे चर्चा करेंगे आप कितनी भी पूजा पाठ कर लो… जब तक कुलदेवी या पितृ प्रसन्न नही होंगे तब तक कोई भगवान प्रसन्न नही होंगे पुराने लोग शुभ…
Author: saimat team
मुंबई :- जिल्ह्यातील मुख्य फळपीक असलेल्या संत्रा या फळपिकाची गुणवत्ता व दर्जा सुधारून ती निर्यातक्षम केली जाणार आहे. त्यासाठी सिट्रस प्रकल्प उभारला जाणार असून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा लाभ होणार असल्याचे शिक्षण, जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सांगितले. या प्रकल्पाबाबत राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चु कडू यांनी मुंबईत बैठक घेऊन अधिकारी वर्गासोबत चर्चा केली व याप्रकरणी गतीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. अचलपूर मतदार संघात 26 हजार हेक्टर जमिनीवर संत्रा बागा आहेत.मात्र आतापर्यत दर्जा व गुणवत्ता सुधारण्याची कुठलिही व्यवस्था नसल्याने शेतकऱ्यांना अत्यल्प मोबदला मिळायचा. हा प्रकल्प स्थापन झाल्यावर चांदुर बाजार,अचलपूर,धारणी,अचलपुर,दर्यापूर, वरूड, मोर्शी, चिखलदरा व आकोटपर्यंतच्या संत्रा बागायतदार शेतकऱ्यांना फायदाच होणार…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील जोशी पेठ, भवानी पेठ, बागवान मोहल्ला, खाटीक वाडा, पतंग गल्ली आदी परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत आहे. यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तरी मनपा आयुक्तांनी या परिसरातील भागांची पाहाणी करून नागरीकांच्या समस्या सोडवाव्यात अशी मागणी या परिसरातील नागरीकांनी केली आहे. याबाबत माहिती अशी की, शहरातील जोशी पेठ, भवानी पेठ, बागवान मोहल्ला, खाटीक वाडा, पतंग गल्ली आदी परिसरात मोठ्या प्रमाणात गटारी तुंबल्या आहेत. तसेच कचराकुंड्यामधील कचरा रस्त्यावरच पडलेला असल्याने या परिसरातील नागरीकांना अशाच घाणीच्या साम्राज्यातून ये-जा करावी लागत आहे. नुकत्याच कोरोनाच्या लॉकडाऊननंतर शाळा सुरु झाल्या असून विद्यार्थ्यांनाही या दुर्गंधीयुक्त परिसरातून वापर…
जळगाव : प्रतिनिधी वैद्यकीय शिक्षण हे सामाजिक सेवेच्या दृष्टीने महत्वाचे शिक्षण आहे. महाविद्यालयात शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी एकमेकांशी बोलावे. संवाद वाढवावा. मैत्रीपूर्ण सलोखा जोपासावा. तसेच, शिस्त व नियोजनबद्ध शिक्षण घेण्यासाठी कार्यरत राहावे, असा सल्ला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी विद्यार्थ्यांना केले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नवीन प्रवेशित प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ व अधिष्ठाता संदेश (डिन्स ऍड्रेस) सोमवारी १ फेब्रुवारी रोजी झाला तसेच प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या तासिकादेखील सुरू झाल्या. या वेळी मंचावर उप अधिष्ठाता (पदव्युत्तर) डॉ. मारोती पोटे, उप अधिष्ठाता (पदवीपूर्व) डॉ. अरुण कसोटे, शरीरक्रियाशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. योगिता सुलक्षणे, जनऔषधशास्त्र विभागाच्या…
जळगाव ः प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या जनसंवाद आणि पत्रकारिता विभागातील प्राध्यापक डॉ.सुधीर भटकर व डॉ.विनोद निताळे लिखित ‘संशोधन पध्दती’ या पुस्तकाचे प्रकाशन कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. पुस्तक प्रकाशन सोहळा दि.१ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ११ वाजता कुलगुरुंच्या दालनात आयोजित करण्यात आला होता. यावेळी कुलसचिव प्रा.बी.व्ही.पवार, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य दिलीप पाटील, कला व मानव्यविद्या प्रशाळेचे संचालक डॉ.अनिल चिकाटे, डॉ.गोपी सोरडे, डॉ.सोमनाथ वडनेरे, अथर्व प्रकाशनचे संचालक युवराज माळी व संगीता माळी उपस्थित होते. ‘संशोधन पध्दती’ हे पुस्तक प्री-पीएच.डी. कोर्स वर्क, सेट-नेट तसेच पेट च्या अभ्यासक्रमावर आधारित असून या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आहे. या पुस्तकात संशोधन पध्दतीवर आधारित बहुपर्यायी…
जळगाव ः प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडी मंडल क्र. ५ च्या अध्यक्षपदी छाया किशोर सारस्वत यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली. पक्षाच्या महिला आघाडीच्या जळगाव जिल्हाध्यक्षा दीप्ती चिरमाडे यांच्या सहीचे नियुक्तीपत्र जळगाव जिल्हा प्रभारी जयश्री अहिरराव यांच्या हस्ते छाया सारस्वत यांना प्रदान करण्यात आले. छाया सारस्वत यांनी पक्षीय पातळीवर आजवर सांभाळलेल्या विविध जबाबदार्या व त्यांची काम करण्याची पद्धत या बाबींचा या नियुक्तीसाठी प्रकर्षाने विचार करण्यात आला आहे. नियुक्तीपत्र प्रदान करतेवेळी महापौर भारतीताई सोनवणे, माजी महापौर सीमाताई भोळे, भाजप महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा रेखा कुळकर्णी, सरचिटणीस ज्योती राजपूत, नितू परदेशी उपस्थित होत्या. छाया सारस्वत यांच्या या नियुक्तीबद्दल माजी मंत्री गिरीश महाजन,…
जळगाव ः प्रतिनिधी शिर्डी येथील एबीपी माझाचे पत्रकार मुकुल कुलकर्णी व नितीन ओझा या दोन्ही पत्रकारांनी शिर्डी संस्थानच्या कारभाराविषयी, गैरसोईविषयी वृत्तांकन केल्याप्रकरणी या दोन्ही पत्रकारांविरुध्द तब्बल अडीच महिन्यानंतर शिर्डी संस्थान प्रशासनाने खोटा गुन्हा दाखल केला आहे. शिर्डी संस्थान प्रशासन अशा पध्दतीने पत्रकारांवर खोटा गुन्हा दाखल करुन माध्यमांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करीत आहे. सदर गुन्हा रद्द करण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघांचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण सपकाळे यांनी केली आहे तसेच या घटनेचा जाहिर निषेधही व्यक्त केला आहे.
जामनेर : प्रतिनिधी जामनेर पंचायत समितीच्या सभापतीपदी भारतीय जनता पक्षाचे जलाल सुलेमान तडवी (चिंचखेडा-तवा) यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ही निवड येथील पंचायत समितीच्या सभागृहामधे दुपारी २ वाजता बोलाविण्यात आलेल्या विशेष सभेत करण्यात आली. सभेच्या पिठासीन अधिकारीपदी तहसिलदार अरूण शेवाळे होते. सहायक अधिकारी म्हणून गटविकास अधिकारी श्रीमती कवडदेवी होत्या.निवड प्रसंगी पंचायत समितीचे बहुतांश सदस्य उपस्थित होते. सभापती निवडीनंतर माजी मंत्री तथा आ.गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी नवनिर्वाचीत सभापती जलाल तडवी यांचा नगराध्यक्षा साधना महाजन यांनी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते अॅड.शिवाजी सोनार, छगनराव झाल्टे, भाजपचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, सरचिटणीस रवींद्र झाल्टे, आनंदा लाव्हरे, जि.प.सदस्य रजनी चव्हाण,…
मुंबई : प्रतिनिधी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करत असून अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. त्यांनी सुरुवातीला केंद्र सरकारने कोरोना संकटात केलेल्या मदतीची माहिती देतांना लवकरच करोना प्रतिबंधक आणखी दोन लस उपलब्ध होणार असल्याचे सांगितले.याशिवाय त्यांनी महाराष्ट्रासाठी मोठी घोषणा केली आहे. नाशिक मेट्रोसाठी २ हजार ९२ कोटी तर नागपूर मेट्रोसाठी ५ हजार ९७६ कोटींची तरतूद करण्यात आली असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या दुसर्या पर्वातील तिसरा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचाही हा तिसरा अर्थसंकल्प आहे तसेच पहिल्यांदाचा पेपरलेस बजेट सादर केले गेले त्यात मेक इन इंडिया टॅबचा वापर केला गेला…
जळगाव ः प्रतिनिधी नाटक, साहित्य, संगीत, नृत्य क्षेत्रात ‘परिवर्तन जळगाव’ ही संस्था गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत आहे.सातत्यपूर्ण उपक्रमांची निर्मिती,गंभीर स्वरूपाचे नाटक करणारी व आयोजन करणारी ही संस्था या वर्षी दशकपूर्ती साजरी करीत आहे. प्रायोगिक स्तरावर उत्तम काम करणा-या परिवर्तनने निर्मित केलेल्या नाटकांचा व सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन दि. ५,६ व ७ फेब्रुवारी २०२१ या काळात तीन दिवस शुक्रवार पेठेतील जोत्सना भोळे सभागृहात परिवर्तन कला महोत्सवाचे आयोजन नाटकघर पुणे व अतुल पेठे यांच्यावतीने करण्यात आले आहे. खान्देशी मातीचा, भाषेचा गोडवा आणि वैविध्यपूर्णता हे परिवर्तन संस्थेच्या निर्मितीचं वैशिष्ट्य असतं. या तीन दिवसीय महोत्सवाची सुरवात शंभू पाटील लिखित ’अमृता साहिर इमरोज’ या नाटकाने होणार…