मंगरूळ विकासोच्या चेअरमनपदी विश्‍वास पाटील विजयी

0
152

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी

जळगाव जिल्ह्यात नंबर एकची सहकारी संस्था म्हणून ओळख असलेल्या मंगरूळ विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदाच्या चुरशीच्या निवडणुकीत परिवर्तन पॅनलचे विश्‍वास अभिमन पाटील विजयी झाले.

परिवर्तन पॅनल तथा भाजपाचे भगवान पाटील, जे.पी.पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे दीपक बागुल, भाजपाचे तालुका सरचिटणीस राकेश पाटील, मिलिंद पाटील यांच्या नेतृत्वात चेअरमनपदी विश्‍वास पाटील विजयी झाले. निवडणुकीत अनेक राजकीय घडामोडी झाल्या.
परिवर्तन पॅनलचे सात सदस्य आणि विरोधी पॅनलचे सहा सदस्य चार दिवस सहलीसाठी रवाना झाले होते. विश्‍वास पाटील यांची चेअरमनपदी निवड होऊन नये म्हणून विरोधकांनी अथक प्रयत्न केले. परंतु त्यांना परिवर्तन पॅनलच्या सात सदस्यांनी जोरदार धूळ चारत प्रामाणिकपणा दाखवत विश्‍वास पाटील यांना चेअरमनपदी निवडून दिले.

निवडीकडे संपूर्ण तालुक्यासह पंचक्रोशीचे लक्ष लागले होते. निवडणुकीचे कामकाज सुनील माळी यांनी पहिले. यावेळी सोसायटीचे सदस्य कैलास पाटील, रणछोड बागुल, विनोद पाटील, श्री.घोलप, इंदुबाई पाटील, सचिव निरंक पाटील, मनोहर पाटील, वाल्मिक पाटील, भीला पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here