पुणे : वृत्तसंस्था
शिवसेनेचे प्रवक्ते व खासदार संजय राऊत मराठा समाजाविरोधात अभद्र शब्द वापरत आहेत. त्यांनी स्वत:ला आवरावे अन्यथा छावा संघटनेचे छावे त्यांना ठोकून काढतील, असा इशारा छावा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे-पाटील यांनी पुण्यात बोलताना दिला.
छत्रपती संभाजीराजांना खासदारकीपासून रोखण्याचे काम शिवसेना आणि संजय राऊतांनी केले. राज्यात शेतकरी मरत आहेत आणि राऊत राजकीय पोळी भाजत आहेत.मराठा समाजाविषयी अभद्र शब्द वापरत आहेत. त्यांनी स्वत:ला आवारावे, अन्यथा संघटनेचे छावे त्यांना ठोकून काढल्याशिवाय राहणार नाहीत, असे ते म्हणालेत.
राज्यातील मराठा समाजाने आपल्या न्याय्य मागण्यांसाठी लाखोच्या संख्येने मूक मोर्चा काढला. कुठेही तणाव निर्माण होऊ दिला नाही. मात्र, या मोर्चाला मुका म्हणून खासदार राऊत यांनी हिणवले होते. आमचा कोणत्याही पक्षाला विरोध नाही सध्या जे सुरू आहे. त्यातून होणाऱ्या क्रांतीला आमचा पाठिंबा आहे, असे जावळे-पाटील यांनी सांगितले.