Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»कृषी»भाज्यांचे दर कडाडले, पितृपक्षात हिरव्या भाज्या मिळेना?
    कृषी

    भाज्यांचे दर कडाडले, पितृपक्षात हिरव्या भाज्या मिळेना?

    SaimatBy SaimatSeptember 14, 2022Updated:September 14, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत लाईव्ह नाशिक प्रतिनिधी :

    देशाचे किचन गार्डन  म्हणून ओळख असलेल्या नाशिक मध्येही भाजीपाल्यांचे दर  कडाडले आहेत. त्यात पितृपक्ष सुरू असल्याने भाजीविक्रेत्यासह ग्राहक बाजार समितीत  खरेदीसाठी गर्दी करत आहे. मात्र, भाजीपाल्यांचे दर हे कडाडले असून गवार आणि दोडक्याने शंभरी पर केली आहे. टोमॅटो देखील चाळीशीपार गेला आहे. पालेभाज्या महागल्याने सर्वसामान्य ग्राहकांना त्याचा फटका बसतोय. पितृपक्षात बाजार समितीतील आवक दरवर्षीच्या तुलनेत 30 ते 40 टक्क्यांनी घटली आहे. त्यामुळे पालेभाज्यांचे दर आणखी तेजीत राहणार असून महिना ते दीड महिना ही परिस्थिति अशीच राहील असा अंदाज बाजार समितीकडून वर्तविला जात आहे.

    मुंबईसह उपनगर, गुजरात, सूरत अशा विविध शहरांत नाशिकच्या बाजार समितीतून भाजीपाला जात असतो. याशिवाय इतर मोठ-मोठ्या राज्यात देखील नाशिकहून भाजीपाला जातो.

    नाशिक जिल्ह्यातील शेतकरी विविध भाजीपालींचे उत्पादन घेत असतात. त्यामुळे ताजा भाजीपाला थेट बाजारसमितीत मिळत असल्याने ग्राहक गर्दी करत असतात.

    पितृपक्षात भाजीपाला हा जास्तच दराने ग्राहकांना खरेदी करावा लागतो, मात्र, दरवर्षीच्या तुलनेत यंदा भाजीपाला ग्राहकांच्या आवाक्याबाहेर गेला आहे.

    गवार, दोडके यांनी तर अक्षरशः शंभरी पार केली आहे, टोमॅटो हा चाळीशीपार गेला आहे. वांगी 60 रुपये किलो, बटाटा, फ्लॉवर, कोंबी 30 रुपये किलो तर भेंडी 80 रुपये किलो दराने मिळत आहे.

    शेवगा 300 रुपये किलो, दोडका आणि गिलके 100 रुपये किलो, गवार 160 रुपये किलो, श्रावण घेवडा सुद्धा 100 रुपये किलोवर जाऊन पोहचला आहे.

    मागणी वाढल्याने पुरवठ्यात घट झाल्याने भाजीपाल्याच्या दरात वाढ झाली आहे. याशिवाय पावसाने नुकसान झाल्याने पालेभाज्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Malegaon : मालेगाव महापालिकेतील लिफ्ट कोसळली

    February 7, 2026

    Jalgaon : फुले कृषी महोत्सव 2026 : केळीच्या ८० वाणांचे थेट प्रात्यक्षिक

    February 3, 2026

    Jalgaon : मालेगावजवळ माजी महापौर जयश्री महाजन यांच्या कारचा भीषण अपघात

    January 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.