Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»मुंबई»मराठा आरक्षण दृष्टीक्षेपात
    मुंबई

    मराठा आरक्षण दृष्टीक्षेपात

    Kishor KoliBy Kishor KoliJanuary 16, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : प्रतिनिधी

    मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेले आंदोलन संपण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत. यामुळे मनोज जरांगे यांचे आंदोलन लवकरच संपणार अशी शक्यता निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांची महत्वाची असलेली ‘सगे सोयऱ्यां’ची अट मान्य केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
    मनोज जरांगे पाटील यांना मुंबईला येण्याची वेळ येणार नाही.राज्य सरकारकडून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहे. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. यामुळे मनोज जरांगे यांच्या मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत की काय, हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
    कायदेतज्ञांकडून घेतला सल्ला
    मनोज जरांगे यांच्या १०० टक्के मागण्या पूर्ण झाल्यामुळे हे आंदोलन संपणार असल्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. आता कुणबी नोंद आढळल्यास मराठा समाजातील सोयऱ्यांनाही आरक्षण मिळण्याची शक्यता आहे. विधी विभागाचे सचिव कायदेतज्ञांना बोलवून सल्ला दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामुळे मनोज जरांगे पाटील यांना मुंबईला येण्याची वेळ येणार नाही.

    सरकारचे शिष्टमंडळ
    जरांगेंची भेट घेणार
    सरकारचे शिष्टमंंडळ आज मनोज जरांगेंची भेट घेणार आहे. आमदार बच्चू कडू, मुख्यमंत्र्यांचे ओएसडी मंगेश चिवटे भेट घेणार आहे. काल जरांगे आणि बच्चू कडूंच्या बैठकीचा तपशील मुख्यमंत्र्यांकडे सादर केला आहे. त्यानंतर सरकारच्या मंत्र्यांमध्ये चर्चा झाली आणि नंतर नवीन ड्राफ्ट तयार करण्यात आला आहे. हा ड्राफ्ट घेऊन दोघे जण आज मनोज जरांगेंची अंतरवाली सराटीमध्ये भेट घेणार आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी २६ जानेवारीपासून मुंबईत होणाऱ्या आंदोलनाच्या पूर्वतयारीच्या पूर्णत्वाला अंतिम स्वरुप देण्यासाठीची योजना आखली आहे.

    समाधानकारक तोडगा : बच्चू कडू
    सरकारला ‘सगेसोयरे’वर समाधानकारक तोडगा मिळाला. मराठा आरक्षण आणि तोडग्याबाबत काल मुख्यमंत्री आणि माझी जवळपास चार तास बैठक झाली. या बैठकीत जरांगेंच्या ज्या काही मागण्या होत्या, त्यावर चर्चा झाली. सगेसोयरे या विषयावरही चर्चा झाली आणि त्यातून एक समाधानकारक तोडगा आम्ही आणला आहे, अशी माहिती बच्चू कडू यांनी दिली. या तोडग्यामुळे जरांगे यांचे समाधान होईल, असेही बच्चू कडू म्हणाले.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Kishor Koli

    Related Posts

    Mumbai-Pune : मुंबई–पुणे एक्स्प्रेस वेची २२ तासांची जॅम

    February 4, 2026

    Deputy Chief Minister : सुनेत्रा पवार हे महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत

    January 31, 2026

    Mumbai : “महिलांचे राज्य! महाराष्ट्रातील १५ महानगरपालिकांमध्ये महिला महापौर

    January 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.