फैजपूर ता.यावल : प्रतिनिधी
दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास होत असून वाहने, कारखाने व हरितगृहातून उत्सर्जित होणाऱ्या विषारी वायु, दूषित पाणी व किरणोत्सारांमुळे पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाला आहे. ग्लोबल वॉर्मिग, ऋतूमधील अनियमितता आणि तीव्रता वाढली आहे.त्यातच मानवाने जंगलतोड करून जमीन संपादित केली आणि त्यावर सिमेंंटची जंगले व कारखाने उभारले आहेत. या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून धनाजी नाना महाविद्यालयाचे वनस्पतीशास्त्र विभागाचे प्राध्यापक शिवाजी मगर यांनी वाढदिवसाच्या औचीत्याने वृक्षारोपण करून पर्यावरण पूरक वाढदिवस साजरा केला व दर वाढदिवसाला वृक्षारोपणाचा संकल्प सोडला.
यासोबत संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला त्यांनी पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण, परिसर स्वच्छता व प्रदूषण विरहित वातावरणासाठी प्रयत्न करावा असे आवाहन केले.प्रा. शिवाजी मगर यांनी परिवारासोबत मनुदेवीच्या डोंगरराशीत अशोक वृक्ष लावून अत्यंत आनंदाने व उत्साहाने वाढदिवस साजरा केला. यावेळी त्यांच्यासोबत श्रद्धा मगर, श्रावणी मगर व अनुष्का मगर उपस्थित होते.यावेळी त्यांचे स्नेही प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र राजपूत व मित्रपरिवार उपस्थित होता.
पर्यावरण संवर्धनासाठी खारीचा वाटा का असेना या स्तुत्य उपक्रमाबद्दल परिसरातून प्रा शिवाजी मगर यांचे कौतुक होत असून असाच उपक्रम उपक्रम प्रत्येकाने राबवावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.