साईमत, पाचोरा : प्रतिनिधी
येथील शेतकी संघाच्या १५ जागांसाठी ६२ जणांनी अर्ज दाखल केला होता. त्यात तीन दिवसांपूर्वी माजी आमदार दिलीप वाघ आणि आ.किशोर पाटील यांच्या गटाच्या तीन जागा बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित बारा जागांसाठी २४ तारखेपर्यंत माघारीचा अंतीम दिवस होता. त्यानुसार बुधवारी विरोधात भरलेले अर्ज विरोधी नेत्यांनी सामंजस्याची भूमिका घेऊन शेतकऱ्यांच्या हितासाठी निवडणूक न लावता आपल्या उमेदवारांची माघार घेऊन बिनविरोध करण्यासाठी सहकार्याची भूमिका घेतली. त्यामुळे पाचोरा शेतकरी संघाची निवडणूक बिनविरोध करण्याचा दिलेला शब्द दोघांनी खरा करुन दाखविला आहे. याबद्दल दिलीप वाघ आणि आ. किशोर पाटील यांनी त्यांचे आभार मानले.
ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी दोघांनी खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूक बिनविरोध करून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी नवीन १५ संचालकांचा सत्कार केला. त्यांना योग्य सूचना दिल्या. यावेळी माजी आमदार दिलीप वाघ आणि आ.किशोर पाटील यांच्या गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते.