Author: Sharad Bhalerao

खासदार क्रीडा महोत्सवातून ग्रामीण भागातील खेळाडूंना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय संधी उपलब्ध होणार साईमत/जळगाव/प्रतिनिधी :    युवकांच्या उज्वल भविष्यासाठी क्रीडाक्षेत्र महत्वाचे असून प्रत्येक युवकांनी खेळ खेळले पाहिजे. खासदार क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील खेळाडूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी मिळणार आहे. असे प्रतिपादन केंद्रीय युवा कार्यक्रम व क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे यांनी केले. भुसावळ येथील सेंट्रल रेल्वे ग्राउंडवर आयोजित खासदार क्रीडा महोत्सव २०२५ (रावेर लोकसभा मतदारसंघ) च्या भव्य उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी मलकापूरचे आमदार चैनसुख संचेती, रावेरचे आमदार अमोल जावळे, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, बुलढाण्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी लक्ष्मीशंकर यादव, तसेच विविध लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. क्रीडा…

Read More

विद्यापीठात आयोजित दीक्षांत समारंभाप्रसंगी प्रा. गणेशन कन्नबीरन यांचे प्रतिपादन साईमत/जळगाव/प्रतिनिधी :   प्रामाणिकपणा, अथक परिश्रम व विनम्रता हे तीन गुण विद्यार्थ्यांनी अंगीकारले तर त्यांना जीवनात यश हमखास मिळू शकेल.त्यासाठी नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांना उत्कृष्ठ नागरिक बनवेल, असे प्रतिपादन राष्ट्रीय मूल्यांकन व मान्यता परिषदेचे संचालक प्रा. गणेशन कन्नबीरन यांनी केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आयोजित दीक्षांत समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी होते. यावेळी प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे, कुलसचिव डॉ.विनोद पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक प्रा.योगेश पाटील तसेच व्यवस्थापन परिषदेचे सदस्य सर्वश्री राजेंद्र नन्नवरे, प्रा. अनिल डोंगरे, प्रा. साहेबराव भूकन, प्राचार्य जगदीश पाटील, प्राचार्य एस.आर.…

Read More

जैन हिल्सला राष्ट्रीय सिट्रस सिम्पोजियम-२०२५चा समारोप साईमत/जळगाव/प्रतिनिधी :   जागतिकदृष्ट्या भारतात लिंबू वर्गीय फळ बागांमुळे शेतकऱ्यांची उन्नती मार्ग सापडत आहे. प्रक्रिया उद्योगातून निर्यात वाढण्यासाठी खासगी संस्था, शैक्षणिक संस्थांसह धोरणकर्ते यांनी सामुहिकपणे कार्य केले पाहिजे. रोपांची निगा, झाडांच्या पोषणमूल्यांसाठी आधुनिक सिंचन पद्धती, रोपवाटिकांसाठी लॅबोरेटी प्रमाणपत्र सक्तीकरण, रुफस्टॉक व रोपांमध्ये व्हायरस न जाण्यासाठी प्राथमिक काळजी, शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. त्यातूनच चांगल्या फळ बागा फुलतील, असे मनोगत माजी डीडीजी हॉर्टिकल्चर डॉ. एन. के. कृष्णकुमार यांनी शास्त्रज्ञांसमोर मांडले. लिंबूवर्गीय फळ (संत्री, मोसंबी, लिंबू) उत्पादनाला नवी दिशा देण्यासाठी इंडियन सोसायटी ऑफ सिट्रीकल्चर (ISC) आणि जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. यांच्या संयुक्त विद्यमाने ‘राष्ट्रीय…

Read More

कारमध्ये कोंबून चोरट्यांचा थरार, पोलिसात तक्रार दाखल साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  शहरातील वर्दळीच्या खोटे नगर परिसरात चोरट्यांनी धाडस दाखवत हॉटेलसमोर बांधलेली गाय थेट कारमध्ये कोंबून पळवून नेल्याची धक्कादायक घटना रविवारी, २१ डिसेंबर रोजी मध्यरात्री सुमारे १ वाजेच्या सुमारास घडली. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. खोटे नगर भागातील ‘गावकरी हॉटेल’समोर हॉटेल मालकाची गाय नेहमीप्रमाणे बांधलेली होती. मध्यरात्रीच्या सामसुम स्थितीचा फायदा घेत दोन अज्ञात चोरटे पांढऱ्या रंगाच्या ब्रेजा कारमधून घटनास्थळी आले. काही क्षणांतच त्यांनी अत्यंत सराईतपणे गाईला ओढत कारच्या मागील डिक्कीत कोंबले आणि काही सेकंदातच कारसह तेथून पलायन केले. हा संपूर्ण थरारक…

Read More

असोद्यातील शाळेत पीआय शशिकांत पाटील यांचे प्रतिपादन साईमत/जळगाव/प्रतिनिधी :    विद्यार्थी जीवनातील चांगले मित्र आणि मैत्रिणी आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवतात. विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडील, शिक्षक आणि ज्येष्ठांनी दिलेल्या सल्ल्याचे पालन करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांनी सांगितले. असोदा येथील सार्वजनिक विद्यालयात विद्यार्थ्यांच्या मनाची जनजागृती विषयावर आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. त्यांनी गुड टच-बॅड टच, आई-वडील व शिक्षक यांचे जीवनातील महत्व तसेच विद्यार्थी सुरक्षिततेसाठी उपलब्ध पोलीस हेल्पलाइन क्रमांक याबाबत माहिती दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षक पी.जी. कोल्हे होते. विचार मंचावर ए.एस.आय. सुनील पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रदीप राजपूत, पोलीस नाईक ज्ञानेश्वर कोळी…

Read More

विद्यार्थ्यांना हिरव्या रंगावर मार्गदर्शन साईमत/जळगाव/प्रतिनिधी :   विवेकानंद प्रतिष्ठान काशिनाथ पलोड पब्लिक स्कुलमधील पूर्व प्राथमिक विभागात नुकताच ‘ग्रीन कलर डे’ साजरा करण्यात आला. उपक्रमाचा मुख्य उद्देश लहान विद्यार्थ्यांना हिरवा रंगाची ओळख करून देणे तसेच निसर्गातील त्याचे महत्त्व समजावून सांगणे हा होता. यादिवशी सर्व विद्यार्थी व शिक्षक हिरव्या रंगाच्या विविध छटांचे कपडे परिधान करून उपस्थित होते. यादिवशी टेबलवर हिरव्या रंगाचे फळे, भाज्या तसेच वेगवेगळे क्राफ्ट पेपरच्या वस्तु बनवून चार्टवर सुंदररित्या सजविण्यात आले होते. त्यात ज्युनिअर केजीसाठी पानांमध्ये रंगभरण, सिनिअर केजीसाठी आंब्याच्या पानांचे तोरण कसे बनवायचे हे विद्यार्थ्यांकडून करून घेण्यात आले. शिक्षकांनी हिरवा रंग हा निसर्ग, वाढ, ताजेपणा व आरोग्याचे प्रतीक असल्याचे सोप्या…

Read More

जैन हिल्सला ‘राष्ट्रीय सिट्रस सिम्पोजियम-२०२५ तांत्रिक सादरीकरण साईमत/जळगाव/प्रतिनिधी :   गेल्या दोन दिवसात जैन हिल्सच्या माध्यमातून सुरू असलेल्या राष्ट्रीय परिषदेत ‘राष्ट्रीय सिट्रस सिम्पोजियम-२०२५’ शेतकऱ्यांना लागवडीची दिशा ठरविण्याचा मंत्र मिळत आहे. जागतिक मानांकन असलेल्या बंदिस्त वातावरणात मातृवृक्षापासून तयार केलेल्या रोगमुक्त रोपांना प्राधान्य दिले पाहिजे. गेल्या दशकात जैन स्वीट ऑरेंजच्या माध्यमातून जैन इरिगेशनसारखी खासगी संस्था प्रभावी संशोधन करीत आहे ते शेतकऱ्यांसाठी मौलीक अशी गोष्ट आहे, असे सांगत कृषी विज्ञान केंद्र, कृषी विद्यापीठ व संस्थांनी पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना चांगल्यात चांगली रोपे उपलब्ध करुन द्यावी, असे मत परभणी मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अशोक धवन यांनी व्यक्त केले. देशातील लिंबूवर्गीय फळ (संत्री, मोसंबी, लिंबू)…

Read More

स्पर्धेत ६० फिडे गुणांकाच्या खेळाडूंसह १६० सहभागी साईमत/जळगाव/प्रतिनिधी :   जी. एच. रायसोनी इंजिनिअरिंग कॉलेज येथे जी. एच. रायसोनी यांच्या स्मरणार्थ आयोजित जी. एच. रायसोनी ओपन बुद्धिबळ स्पर्धा नुकतीच उत्साहात पार पडली. जळगाव बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने आयोजित स्पर्धेत जळगावसह धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, अकोला व मध्यप्रदेश येथील ६० फिडे आंतरराष्ट्रीय गुणांक असणारे खेळाडू सहभागी झाले. १६० खेळाडूंनी खुल्या वयोगटासह ९, ११, १५ वर्ष वयोगटात आपला सहभाग नोंदवला. स्पर्धेचे उद्घाटन कॉलेजच्या संचालिका डॉ. प्रीती अग्रवाल यांनी पारंपरिक पटावरून केले. खुल्या वयोगटासह पंधरा वर्षे खालील वयोगटात आठ फेऱ्या तर नऊ व अकरा वर्ष वयोगटात सात फेऱ्या घेण्यात आल्या. खुल्या वयोगटात प्रा. तेजस…

Read More

पुण्यतिथीनिमित्त पालखी मिरवणुकीत समाजबांधवांची उपस्थिती साईमत/जळगाव/प्रतिनिधी :   येथील संताजी जगनाडे महाराज तेली समाज बहुउद्देशीय युवक मंडळातर्फे रविवारी, २१ डिसेंबर रोजी दुपारी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त सवाद्य मिरवणूक पालखी सोहळा आयोजित केला होता. मिरवणुकीत महिला व मुलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत विविध वेशभूषा साकारल्या होत्या. याप्रसंगी समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थित होती. सुरुवातीला कांचन नगर येथील श्री स्वामी समर्थ मंदिराजवळ संताजी जगनाडे महाराज आणि संताजी कडोजी महाराज यांच्या प्रतिमेला मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय तुकाराम चौधरी यांच्यासह समाजबांधवांनी माल्यार्पण केले. त्यानंतर समाज बांधवांनी संतांच्या जयघोषात मिरवणुकीला प्रारंभ केला. पालखी सोहळ्याचे यंदाचे पंधरावे वर्ष ही मिरवणूक कांचन नगर, चौगुले प्लॉट, भिलपुरा पोलीस चौकी, घाणेकर चौकमार्गे पोलनपेठेतील दत्त…

Read More

रोटरी जळगावच्या संवाद सत्रातील महिलांचा सूर साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  सातत्य, सकारात्मक विचार व सजगता हेच निरोगी जीवनाचे गमक आहे, असे रोटरी क्लब जळगावच्या निरोगी जीवन व सवयी विषयावरील संवादातील सहभागी महिला सदस्यांनी केले. रोटरीच्या रोग प्रतिबंध व उपचार महिन्यांतर्गत महिला समितीच्यावतीने आयोजित विशेष सभेत त्या बोलत होत्या. त्यात रोटरी परिवारातील सदस्य माजी अध्यक्ष डॉ. सुमन लोढा, सेवानिवृत्त उपप्राचार्य पूनम मानुधने, स्वाती ढाके यांनी सहभाग नोंदवला. संवादाचे संचालन पहिली महिला आदिती कुळकर्णी यांनी केले. याप्रसंगी क्लबचे अध्यक्ष गिरीश कुळकर्णी, मानद सचिव सुभाष अमळनेरकर यांची उपस्थिती होती. तीनही मान्यवर सदस्यांनी आपापल्या जीवनप्रवासातून एकच गोष्ट ठामपणे सांगितली की, निरोगी जीवनासाठी आपण स्वतःसाठी वेळ काढला…

Read More