आसोदा येथील सार्वजनिक विद्यालयात आयोजित कार्यक्रमात भालचंद्र पाटील यांचे प्रतिपादन साईमत/जळगाव/प्रतिनिधी शैक्षणिक संस्था ह्या देशाच्या विकासात्मक दृष्टिकोनाच्या पाया असतात. त्यासोबत विद्यार्थी गुणवत्ता विकासाचा विचार हा शालेय जीवनातूनच महत्त्वपूर्ण आहे. त्यासाठी संस्थाचालक आणि शिक्षक यांच्या समन्वयाची भूमिका विद्यार्थ्याला प्रगतीकडे घेऊन जाणारी असते, असे प्रतिपादन पीपल्स् बँकेचे माजी चेअरमन भालचंद्र पाटील यांनी केले.सर्वोदय एज्युकेशन सोसायटीचे नवनिर्वाचित अध्यक्ष, सचिव, चेअरमन व कार्यकारी मंडळाचे असोदा येथील सार्वजनिक विद्यालयात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आयोजित केलेल्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष अनिल महाजन होते. त्यांनी बोलताना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच त्यांच्या स्पर्धा परीक्षांचा पाया हा शालेय जीवनापासून रोवला गेला पाहिजे. त्यातून ते विद्यार्थी आपला सर्वांगिण विकास घडवून…
Author: Sharad Bhalerao
‘अटल वयो अभ्युदय योजना’ विषयी माहिती आता रेडियो मनभावनवर साईमत/जळगाव/प्रतिनिधी सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय (भारत सरकार ) व सामुदायिक रेडिओ संघटना, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आमचे ज्येष्ठ, आमचा अभिमान’ अभियानंतर्गत ‘अटल वयो अभ्युदय योजना’बद्दल जिल्ह्याभरात जनजागृती करण्यासाठी सामुदायिक रेडियो मनभावन ९०.८ एफ. एम.च्या माध्यमातून पुढील ४ महिने राबविण्यात येणार आहे. ‘अटल वयो अभ्युदय योजना’ सोबतच ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती देण्यात येणार असल्याचे ‘रेडिओ मनभावन’चे संचालक अमोल देशमुख यांनी सांगितले. जळगाव शहरातील रामानंद नगर परिसरातील ‘ज्येष्ठ नागरिक मंडळ’ याठिकाणी ४०-४५ वयोवृद्ध नागरिकांच्या उपस्थितीत ‘अटल वयो अभ्युदय योजना’बद्दल कार्यक्रम घेण्यात आला. खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार…
लेवा गणबोली कवी संमेलनात मान्यवरांनी व्यक्त केला आशावाद साईमत/जळगाव/प्रतिनिधी विश्व लेवा गणबोली दिन आणि बहिणाबाई चौधरी यांच्या स्मृतिदिनानिमित्त कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या ग्रंथालया नजीक हिरवळीवर आयोजित लेवा गणबोली कवी संमेलनात शेतकरी, तरुण पिढी, संवेदनशील स्त्री जीवन आदी विषयांवरील लेवा भाषेतील दमदार कवितांच्या सादरीकरणाने बहिणाबाईंचा वारसा नव्या- जुन्या पिढीच्या समन्वयातून अधिक समृद्ध होत राहील, असा आशावाद व्यक्त झाला. मंगळवारी विद्यापीठाच्या विचारधारा प्रशाळेअंतर्गत असलेल्या बहिणाबाई चौधरी अध्ययन व संशोधन केंद्राच्यावतीने बहिणाबाई चौधरी स्मृतिदिनानिमित्त लेवा गणबोली कवी संमेलन आयोजित केले होते. ग्रंथालयाच्या इमारतीत प्रशाळेबाहेरील हिरवळीवर कवी संमेलन पार पडले. उबदार थंडीत सकाळी बहिणाबाईंचा वारसा समृद्धपणे चालवण्याची ग्वाही देणारे कवी – कवयित्री…
फत्तेपूर परिसरातील गावांच्या दिव्यांगांची उपस्थिती साईमत/जामनेर/प्रतिनिधी तालुक्यातील फत्तेपूर येथील सरस्वती इंग्लिश स्कूलमध्ये दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग बांधवांना चिल्ड्रन्स हार्ट फाऊंडेशन विरार यांच्याकडून ब्लॅकेट आणि चटईचे वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी चिल्ड्रन्स हार्ट फाऊंडेशन विरारचे अध्यक्ष संदीप सिंग होते. त्यांनी दिव्यांग बांधवांची गरज लक्षात घेत थंडीचे दिवस असल्यामुळे दिव्यांग बांधवांना ब्लॅकेट आणि चटई आवश्यक असते. अशाप्रकारे त्यांना वेळोवेळी मदत करत राहणार, दिव्यांग बांधव त्यांच्या हिमतीने लढत असतो. त्यांना भविष्यात आम्ही मदत करत राहु, असे मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी फत्तेपूर परिसरातील, किन्ही, पिंपळगाव, लोणी, मेहगाव पिंप्री, निमखेडी गावातील दिव्यांग बांधव आले होते. चिल्ड्रन्स हार्ट फाऊंडेशनचे अमरिन पेंटर ट्रस्टी, वैभव खेडेकर, राकेश नेमन, रिना नवले…
ज्ञानगंगा, एकलव्य प्राथमिक विद्यामंदिरात आरोग्य विभागाकडून प्रारंभ साईमत/जामनेर/प्रतिनिधी जळगाव जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्यावतीने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर व जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ.रमेश धापते यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात एक लाख ४७ हजार ५९ मुला- मुलींना जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले. त्यात शहरी भागातील ३७ हजार १८१ व ग्रामीण भागातील एक लाख ९ हजार ८७८ मुला-मुलींचा समावेश आहे. जंतामुळे मुला-मुलींमध्ये रक्तक्षय,कुपोषण,सतत थकवा, शारीरिक व मानसिक वाढ न होणे, पोटदुखी, डोकेदुखी आदी समस्या जाणवत असतात.त्यावर उपाययोजना म्हणून आरोग्य विभागामार्फत अंगणवाडी विभाग व शिक्षण विभाग यांच्या सहकार्याने तसेच शाळा बाह्य मुला-मुलींना आशा स्वयंसेविका मार्फत वय वर्ष २ ते १९ वर्षापर्यंत मुला-मुलींना जंतनाशक गोळ्या…
स्मृतीप्रित्यर्थ वृक्षांची केली लागवड, समाजबांधवांची लाभली उपस्थिती साईमत/जामनेर/प्रतिनिधी येथील रहिवासी किरण व अनिल माळी यांचे वडील आणि सत्यशोधक समाजाचे प्रचारक रमेश वराडे यांचे मामा छगन रामदास पाटील यांचे अल्पशा आजाराने २४ नोव्हेंबर रोजी निसर्ग विलीन झाले होते. त्यांचा दशक्रिया विधी व गंध मुक्ती विधीचा कार्यक्रम महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या सार्वजनिक सत्यधर्म म्हणजे सत्यशोधक पद्धतीने विधीकर्ते शिवदास महाजन, एरंडोल यांच्या हस्ते नुकताच झाला. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ वृक्ष लागवड करण्यात आली. कार्यक्रमास सत्यशोधक समाजाचे प्रचारक रमेश वराडे, पवन माळी, कैलास महाजन, वासुदेव माळी, मोहन चौधरी, बाबुराव पाटील, सुभाष पाटील यांच्यासह समाज बांधव, नातेवाईक उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रेरणा सत्यशोधक समाज संघाकडून मिळाली.
साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी येथील इनरव्हील क्लबतर्फे तेजज्ञान फाउंडेशन संस्थेमार्फत येथील महिला मंडळ हाॅलमध्ये ‘हॅप्पीथाॅटस’ म्हणजेच चांगले विचार विषयावर कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी सरश्रीजी यांचे विचार खूप प्रेरणादायी असतात आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेकांना जीवनात सकारात्मक बदल घडवून आणता आले आहेत. तेजज्ञान फाऊंडेशन हॅपी थॉट्स आपल्या जीवनातील मानसिक, शारीरिक, सामाजिक, आर्थिक चार प्रमुख तत्त्वांवर काम करतात. येथे ध्यानचेही महत्त्व सांगितले. ध्यान म्हणजे मनाला शांत करून एकाग्रता साधण्याची प्रक्रिया. त्यामुळे तणाव कमी होतो, लक्ष केंद्रित होते आणि आत्म जाणीव वाढते. पॉझिटिव्ह विचार म्हणजे आशावादी दृष्टिकोन बाळगणे आणि चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे हे आत्मविश्वास वाढवते, नैराश्य कमी करते आणि जीवनात सकारात्मकता आणते. एकत्रितपणे, मेडिटेशन आणि…
विविध कार्यक्रमांचे उत्कृष्ट आयोजन साईमत/जामनेर/प्रतिनिधी येथील भारतीय जैन संघटनेला पुणे येथील राष्ट्रीय अधिवेशनात संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथा, राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र लुंकड यांच्या हस्ते जामनेरातील खानदेश विभाग उपाध्यक्ष सुमित मुनोत व कार्यकारणी सदस्यानी स्वीकारला. जामनेर शाखेने २०२३ व २४ मध्ये ६ स्मार्ट गर्ल शिबिर, दोन हजार वृक्षारोपण, रक्त तपासणी शिबिर,महिला दिनानिमित्त २१ प्रभावशाली महिलांचा नारी शक्ती सन्मान पुरस्कार, जैनिज्म इन एक्शन – धार्मिक सेशन, स्वातंत्रदिनानिमित्त गौशाळेत चारा वितरण, प्रजासत्ताक दिना निमित्त शाळेत शैक्षणिक साहित्य वितरण, योगादिन निमित्त तीन दिवसीय योगा शिबीर व योग शिक्षकांचा सत्कार, गुणवंत विद्यार्थी व तपस्वी यांचा सत्कार, स्वास्थ शिबिर, अनाथालयात अन्नदान, वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात क्रांती करणाऱ्या व्यक्तिमत्वचा…
अध्यक्षपदी बबलू चव्हाण तर उपाध्यक्षपदी जगदीश पाटील यांचा समावेश साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी येथील पोलीस ग्राउंडवर ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेची नूतन कार्यकारिणी नुकतीच घोषित करण्यात आली. त्यात अध्यक्षपदी बबलू अंबरसिंग चव्हाण तर उपाध्यक्षपदी जगदीश वसंत पाटील यांची निवड करण्यात आली. उर्वरित कार्यकारिणीत कार्याध्यक्षपदी उमेश चिंधा ठाकरे, कोषाध्यक्ष विनोद प्रभाकर घुमरे, सचिव अरुण पंडित गायकवाड, प्रसिद्धी प्रमुख पुष्कर राजेंद्र कुमावत, सल्लागार सुनिल दिनकर पाटील, संघटक अनिल बंकट राठोड, सहसंघटक तुषार भिकन तांबे, सहसचिव सतीश कैलास पाटील, सदस्यपदी भाऊसाहेब पिलोरे, सुपडू गोकुळ, गोरख राठोड, रविंद्र मोरे, राहुल चौधरी, रमेश आव्हाड, सुनिल कापसे, विष्णू राठोड, मुश्ताक शेख, विलास पाटील, गणेश गोयर, विजय पाटील, दीपक अहिरे, दिनकर कदम,…
रॅलीत जागतिक एड्स दिनाचे महत्व, एचआयव्ही एड्सविषयी दिली माहिती साईमत/पाचोरा/प्रतिनिधी येथील आयसीटीसी विभाग ग्रामीण रुग्णालय, साईनाथ सार्वजनिक वाचनालय, ग्रंथालय आणि डॉ.वाय.पी.युवा फाउंडेशन, एन.जी.ओ. खडकदेवळा बु., गो.से.हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक एड्स दिनानिमित्त एचआयव्ही एड्स जनजागृतीपर अभियान रॅली काढण्यात आली. ही रॅली पाचोरा ग्रामीण रुग्णालयापासून छत्रपती शिवाजी महाराज, भाजी मंडई इतर भागातून काढण्यात आली. रॅलीत गो.से. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. रॅलीत एच.आय.व्ही.एड्स जनजागृतीपर जागतिक एड्स दिनाचे महत्व, एचआयव्ही म्हणजे काय? एचआयव्ही व एड्स यातील फरक, एचआयव्ही होण्याची प्रमुख कारणे कोणती? विशेष घाव्याची काळजी, समाजातील गैरसमज, उपचार व एचआयव्ही बाधित व्यक्तींना योग्य समानतेची वागणूक मिळावी यासाठी प्रयत्न करणे या सर्व…