शिवसेना ठाकरे गटाचे खा.संजय राऊतांचा जोरदार हल्ला साईमत/मुंबई/प्रतिनिधी : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत जागावाटपावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप आता शिगेला पोहोचले आहेत. शिवसेनेच्या (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अत्यंत बोचरी टीका केली आहे. “आतापर्यंत मुंबईत शिवसेना भाजपला जागा देत होती, पण आज शिंदेंना जागांसाठी अमित शहांच्या दारात जावे लागत आहे,” अशा शब्दांत राऊत यांनी शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेवर निशाणा साधला. संजय राऊत म्हणाले की, गेल्या ६० वर्षांच्या इतिहासात शिवसेनेला जागा मागण्यासाठी कधीही कोणाच्या दारात जावे लागले नव्हते. शिवसेना नेहमीच ‘मोठ्या भावाच्या’ भूमिकेत राहिली आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांनी भाजपसमोर पूर्णपणे लोटांगण घातले असून भाजप जे फेकेल, त्या जागांवर…
Author: Sharad Bhalerao
आंदेकरला न्यायालयाने काही अटी आणि शर्तींसह अर्ज भरण्याची परवानगी साईमत/पुणे/प्रतिनिधी: गुन्हेगारी विश्वाशी संबंधित असलेल्या आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर याच्या उमेदवारीने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. आंदेकर कुटुंबाने उमेदवारी अर्ज भरल्यानंतर ते कोणत्या पक्षाकडून लढणार याबाबात अनेक तर्क- वितर्क लढवले जात होते. अखेर आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून आंदेकरला उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आयुष कोमकर हत्याप्रकरणात तुरुंगात असलेल्या सोनाली आणि लक्ष्मी आंदेकर यांना पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक २३ मधून सोनाली आणि लक्ष्मी आंदेकर राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक लढवणार आहेत. या दोघीही तुरुंगातुन…
३९ उमेदवारांची यादी जाहीर साईमत/मुंबई/प्रतिनिधी : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय समीकरणे वेगाने बदलताना दिसत आहेत. जागावाटपाच्या मुद्द्यावरून अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या ओढाताणीनंतर, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) ने महायुतीला मोठा धक्का दिला आहे. भाजपने आणि शिवसेना (शिंदे गट) यांनी विश्वासघात केल्याचा आरोप करत आठवले यांनी मुंबईत स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला असून ३९ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली आहे. जागावाटपाच्या चर्चेत रिपाईला सात जागा देण्याचे आश्वासन महायुतीच्या नेत्यांकडून देण्यात आले होते. मात्र, उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आलेली असतानाही महायुतीने जाहीर केलेल्या याद्यांमध्ये रिपाईच्या एकाही उमेदवाराला स्थान देण्यात आले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सायबर गुन्हेगारांचे सोपे लक्ष्य साईमत/दिल्ली/प्रतिनिधी: सणासुदीचा काळ असो किंवा नवीन वर्षाचे स्वागत, सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होणे आता सामान्य झाले आहे. मात्र, आनंदाच्या या वातावरणात सायबर चोरटेही तितकेच सक्रिय झाले आहेत. सध्या नवीन वर्षाच्या डिजिटल ग्रीटिंग्स आणि शुभेच्छा मेसेजच्या नावाखाली ‘एपीके’ (APK) फाइल्स पाठवून मोबाईल युझर्सची फसवणूक करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. स्मार्टफोनच्या वाढत्या वापरामुळे १८ वर्षांखालील मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच या सायबर गुन्हेगारांचे सोपे लक्ष्य ठरत आहेत. या फसवणुकीची पद्धत अत्यंत साधी पण तितकीच घातक आहे. सायबर चोरटे व्हॉट्सॲप, एसएमएस किंवा ईमेलद्वारे ‘नवीन वर्षाच्या शुभेच्छा’ देणारे आकर्षक मेसेज पाठवतात. या मेसेजमध्ये एखादे विशेष…
काही वेळातच आनंदाचे सूर थांबले आणि दुःखाचा आक्रोश उसळला साईमत/नाशिक/ प्रतिनिधी : हातावरची मेंदी अजून ओलीच होती. डोळ्यांत नव्या संसाराची स्वप्नं ती रंगवत होती. नववधू म्हणून बोहोल्यावर चढण्याची वेळ जवळ आली होती; पण नियतीने त्या क्षणाआधीच तिचे आयुष्य हिरावून घेतले. मंगलाष्टकांची तयारी सुरू असताना काही वेळातच आनंदाचे सूर थांबले आणि दुःखाचा आक्रोश उसळला. तरुणीचा दीपशिखा या हृदयविकाराच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना रविवारी पाम स्प्रिंग रिसॉर्टमध्ये घडली. रविवारी (दि. २८) सकाळी विवाहाची धावपळ सुरू असतानाच दीपशिखाला अस्वस्थ वाटू लागले. तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याचा उपयोग झाला नाही. हृदयविकाराच्या धक्क्याने तिचे निधन झाल्याचे सांगताना डॉक्टरांनाही गहिवरून आले.…
राखी जाधवांची राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाला सोडचिठ्ठी साईमत/मुंबई/प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाच्या मुंबई अध्यक्ष राखी जाधव यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीने मुंबईत ठाकरे बंधूच्या युतीशी आघाडी केल्यानंतर जागावाटपात काही वॉर्डावर पाणी सोडावे लागणार असल्यामुळे राखी जाधव नाराज होत्या. ठाकरे बंधू युती आणि काँग्रेस असे दोन पर्याय त्यांच्यासमोर होते. मात्र युतीची बोलणी सुरू असतानाच दुसरीकडे भाजपाने राखी जाधव यांना पक्षात प्रवेश दिल्याने निवडणूक काळात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का मानला जात आहे. राखी जाधव यांनी गेल्या दोन दिवसांपूर्वीच आपली नाराजी बोलून दाखवली होती. त्यानंतर आता त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनीही…
राज ठाकरेंनी स्वत: ‘एबी’ फॉर्म दिला साईमत/मुंबई/विशेष प्रतिनिधी : मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना ‘एबी फॉर्म’ वाटप करण्यास सुरुवात केली आहे. मुंबईत मनसेचे ज्येष्ठ नेते यशवंत किल्लेदार यांना पहिला एबी फॉर्म देऊन त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. राज ठाकरे यांनी स्वत: यशवंत किल्लेदार यांना पक्षाचा अधिकृत उमेदवारी अर्ज सुपूर्द केला. किल्लेदार हे दादरमधील वॉर्ड क्रमांक १९२ मधून निवडणूक लढवणार आहेत. २०१७ च्या निवडणुकीत हा वॉर्ड शिवसेनेच्या ताब्यात होता, मात्र आगामी निवडणुकीसाठी झालेल्या जागावाटपात हा भाग मनसेच्या वाट्याला आला आहे. एबी फॉर्म वाटपाच्या वेळी मनसेचे ज्येष्ठ…
३५० पेक्षा जास्त इच्छुक वधू-वरांनी परिचय करून दिला साईमत/जळगाव/प्रतिनिधी : “मांगल्य” वधु-वर सुचक केंद्र जळगाव, धनगर समाज महासंघ मल्हार सेना अहिल्या महिला संघ व कर्मचारी संघटना यांच्यातर्फे आयोजित राज्यव्यापी सर्व शाखीय धनगर समाज वधु-वर परिचय मेळावा जळगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक, निमखेडी शिवार याठिकाणी २८ डिसेंबर रोजी उत्साहात पार पडला. अध्यक्षस्थानी अकोलाचे सेवानिवृत्त अधिकारी केशव पातोंड होते. त्यांनी सामूहिक विवाह ही काळाची गरज आहे व लग्न समारंभासाठी होणाऱ्या अमाप पायबंद घालावा व जुनी आहेर देणे घेणे पद्धत बंद करावी, असे मनोगतातून व्यक्त केले. कार्यक्रमांमध्ये ३५० पेक्षा जास्त इच्छुक वधू-वरांनी आपला परिचय करून दिला. ३० वर्षापासून मांगल्ये वधु-वर सुचक केंद्राचे…
मान्यवरांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवून सुरुवात साईमत/जळगाव/प्रतिनिधी : जळगाव रनर्स ग्रुपच्यावतीने सागर पार्क येथे आयोजित केलेल्या खान्देश रन (मॅरेथॉन)ला धावपटूंनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. स्पर्धेत ३, ५, १० व २१ किलोमीटरसाठी सुमारे २५०० धावपटूंनी सहभाग नोंदवला. खान्देश रनच्या सुरुवाती प्रसंगी २१ किलोमीटरसाठी हिरवा झेंडा दाखवून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जैन इरिगेशनचे अशोक जैन, अतुल जैन व अथांग जैन, पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, सुप्रीम इंडस्ट्रीजचे सुरेश मंत्री, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उद्योजक मनोज अडवाणी, राजेश चोरडिया तसेच जळगाव रनर्स ग्रुपचे अध्यक्ष किरण बच्छाव आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून स्पर्धेला अधिकृत सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमादरम्यान…
विहितगावला शिवसेना ठाकरे गट, मनसे कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा साईमत/नाशिकरोड/ प्रतिनिधी : नाशिक महानगरपालिकेसाठी येत्या १५ जानेवारीला मतदान होणार असून, १६ तारखेला मतमोजणी आहे. या दिवशी महानगरपालिकेत आमची सत्ता येणार व परिवर्तन घडविणार असे प्रतिपादन शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी केले. विहितगाव येथील साई ग्रँड लॉन्समध्ये शिवसेना ठाकरे गट व मनसे कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिवसेना उपनेते दत्ता गायकवाड, मनसेचे सलीम मामा शेख, खासदार राजाभाऊ वाजे, माजी आमदार वसंत गीते, जिल्हाप्रमुख डीजी सूर्यवंशी, महानगरप्रमुख प्रथमेश गीते, उपजिल्हाप्रमुख भैय्या मणियार, केशव पोरजे, योगेश गाडेकर, हेमंत गायकवाड, योगिता गायकवाड, सुवर्णा…